(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विधी लिखीत

    विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित

    कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

    राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी

    राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

    नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे

    परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

    आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं

    काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

    दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे

    राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

    सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन

    सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 9, 2020


  • खोडकर कृष्ण

    किती रे खोड्या करशी कृष्णा
    यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।

    झोपू दे रे तिजला आता, ती तर गेली खूप दमूनी
    दही दुधानी भांडी भरली,
    काही प्याली, काही वाटली,
    काही तर ती उपडी झाली,
    पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
    गणरायाचे पूजन करितां
    मग्न झाली यशोदा माता
    लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडता
    फस्त करशी काही मोदक, ताटामधले तूच खाऊनी....२,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
    गोपीच्या तू फोडल्या घागरी,
    पळवी त्यांची वस्त्रे सारी,
    दुधा तुपाची केली चोरी,
    मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
    खोंड्या नच लीला बघूनी,
    प्रेमभावना उचंबळूनी
    जाई यशोदा ती बावरूनी
    डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 7, 2019


  • सुरात गुंफले शब्द प्रेमाचे

    सुरात गुंफले शब्द प्रेमाचे
    ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीचे,
    भाव सुंदर सुखद असतो मनी
    भेट आपुली साहित्यिक वरुनी..
    नसेल नाते आपुले काही
    प्रेम भाव असेल मन मंदिरी,
    प्रेमळ काव्य करते स्वाती
    रसिकहो आनंद असावा कायम हृदयी..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 7, 2021


  • वासनेचा बाजार

    तिच्या शरीरावरील जखमांच
    दुःख सहज न दिसतं
    देह विक्री करतांना मात्र
    तीच मन रोज मरतं..
    चारचौघीसरखं सामान्य जगणं
    तिलाही नक्कीच हवं असतं
    पांढरपेशा दुनियेत मात्र तीच
    अस्तित्वही डागाळलेलं असतं..
    ती ही असते एक सजीव स्त्री
    हेच दुनियेत विसरल जातं
    रोज नव्याने शरीर विकतांना
    भावना मारणं नशिबी उरतं..
    ती ही असते एक कोमल स्त्री
    पण पुरुषी वासनेत माल असतो
    ती करते धंदा देहाचा रोज पण
    तो व्यवहार पापी पोटाचा असतो..
    वासनेचा बाजार भरतो रोज
    देहाचा होम तिच्या दाहक होतो
    तिच्यामुळे कितीक वाचतात स्त्रिया
    नाहीतर बलात्कार हा कुठल्याही स्त्रीवर
    कधीही वासनिक भावनेत होऊ शकतो..
    किंमत तिला नसते कधी
    फक्त देहाचा मोल असतो
    वाटते लाज कितिकेदा जेव्हा
    कितीक स्त्रियांना तिचा भाव न कळतो..
    असते ती पण एक स्त्री
    फरक फक्त नशिबाचा असतो
    तिच्या इच्छा भावना मनाचा बांध
    रोज रात्री दुःखद असा त्या बाजरी मरतो..
    -- स्वाती ठोंबरे.

      November 12, 2021


  • जाळी

    धागा धागा विणून, केली तयार जाळी

    गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी....१,

    स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे

    सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे....२,

    तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही

    जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३,

    जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ

    संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 17, 2021


  • शुर्पणखाची एक सुडकथा

    रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.

    लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. मिनाक्षीमध्ये त्यामुळे दैत्य व ब्राह्मण ह्या दोघांचे वैचारीक व भावनिक गुणधर्म उतरले होते. सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव

    शुर्पणखा पडले. ह्याच नांवाने ती पूढे ओळखली जावू लागली.

    तीने लक्ष्मणाला बघीतले. ती लक्ष्मणावर मोहित झाली. तीने लक्ष्मणाकडून प्रेम व तीच्याशी विवाह करण्याची अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणाने तीचा विचार फेटाळून लावला. दोघांचा वैचारीक संघर्ष झाला. लक्ष्मण हा त्याच्या विचारावर ठाम होता. तर ती अत्यंत आग्रही होती. ती असूरी वृत्तीची होती. एक गर्व, अभिमान, व अहंकार याने ती भारलेली होती. लक्ष्मण आपल्या विचाराला साथ देत नाही, हे समजताच ती आक्रमक झाली. घटनेचे रुपांतर हातघाईवर झाले. लक्ष्मणाच्या हातून तीला शारिरीक इजा झाली. तीच्या चेहऱ्यावर वार लागला. नाकाला दुखापत झाली. शुर्पणखा किंचाळत तेथून पळून गेली. ती खवळली होती. सुडाने पेटली होती. तीच्यावर वार करणाऱ्याला नष्ट करण्याचे तुफान तीच्यांत पेटले होते. पण तशी ती असाहाय्य होती.

    ती त्याच क्षणी तीचाच भाऊ रावण याच्याकडे गेली. नुकताच घडलेला सर्व वृतांत त्याला सांगितला. तीने त्याच्याकडे मदतीची अपेक्षा केली. रावण लंकाघीश होता. एक पराक्रमी बलाढ्य होता. युद्धांत त्याने सर्व देवाना देखील पराजीत केले होते. नवग्रह यांना बंदी केले होते. त्याक्षणी त्याकाळी रावणाला आपल्या सामर्थ्याची जाण होती. त्याच बरोबर प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ होता. बहीण शुर्पणखा हीची विटंबना झालेली त्याच्या लक्षांत आली. परंतु हा संघर्ष केवळ त्यांच्यातील दोघांचा होता. एका बलाढ्य राजाने तीच्यासाठी ह्या अवहेलनेत सहभाग घ्यावा ही अत्यंत क्षुल्लक बाब त्याचासाठी होती. त्याने स्वताः कोणतीही मदत देण्यास ठाम नकार दिला. शुर्पणखा निराश झाली. रावणाकडून तीला मदत मिळण्याची शक्यता नव्हती मात्र ती चतूर होती, शाहाणी होती थोडीशी राजकारणीही होती. तीने रावणाला दुसऱ्या मार्गाने छेडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली " रावणा एका गोष्टीची मी तुला आज आठवण देऊ इच्छीते. रामाची पत्नी सीता ही त्यांच्या बरोबर आहे. ती अतीशय देखणी आहे. सुंदर आहे. तुला ती तुझी राणी म्हणून खूपच शोभणारी आहे. तू तीला घेऊन ये. वेळ पडल्यास तू तुझ्या बळाचा शक्तीचा वापर कर. " रावणाला हा सल्ला मुळीच आवडला नाही. रावण एक महान राजा होता. मन्दोदरी ही त्याची पत्नी होती. महाराणी होती. तो तीला अत्यंत आदराने व प्रेमाने वागवीत असे.

    २. मन्दोदरी देखील एक आदर्श स्त्री म्हणून समजली गेली. तीचे नांव पंचकन्या म्हणून प्रसिद्ध आहे. मान्यता पावलेली आहे. ( तारा, सीता, मंदोदरी, अहील्या, द्रौपदी ).

    अशा महान मन्दोदरीचा रावण हा पती. रावण चवचाल, वाईट नजर असलेला कोठेही संदर्भ रामायणात नाही. शुर्पणखेच्या विचीत्र व विक्षीप्त अशा विचारसरणीला रावणाने रागाने धुडकावून लावले. शुर्पणखा निराश झाली. तरीही तीने आपला विचार सोडला नाही. ती अतीशय चाणाक्ष्य होती. तीचे सर्व वार खाली जात होते. हे जाणून तीने वेगळीच चाल खेळली. तीला हे संपूर्ण माहीत होते की रावण तीचा भाऊ जेवढा पराक्रमी तेवढाच अत्यंत अहंकारी व अभिमानी स्वभावाचा आहे. तीने शांत होत त्याला एक आठवण करुन दिली. त्याच्या मनाला छेडले. " रावणा आठव तुझा त्या सभाग्रहांत झालेला उपमर्द. तु जनक राजाच्या मुलीच्या स्वयंवरासाठी गेला होतास. तेथे ठेवलेल्या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणे हा पण ठेवलेला होता. दिसायला सोपा परंतु अत्यंत आवघड ही गोष्ट होती. तेथील जमलेल्या कुणालाही ते धनुष्य किंचीत देखील हालवता आले नव्हते. तू तो प्रयत्न केलास. तू ते धन्युष्य उचललेस. त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करु लागलास. परंतु ते प्रचंड जड असल्या कारणाने तुझा तोल गेला. तू पडलास. सारी सभा, तेथील जमलेले राजे तुला हासले. त्या हासण्यांत वधू मुलगी सीता ही देखील सहभागी झाली होती. ती पण कुत्सितपणे हासली. तुझा असा अपमान झाला होता. ते अपयश हा एक डाग होता. " मी याचा बदला घेईन " अशी गर्जना करीत तू त्यावेळी स्वयंवर मंडप सोडून गेलास. आठव ते सारे. जागृत कर तुझ्या ठेच पोंहोंचलेल्या स्वाभिमानाला. ज्या स्त्रीने तुझी हेटाळणी केली, त्यावेळी जी तुला हासली तीच सीता मला वनांत दिसली. ती राम लक्ष्मणाबरोबर आहे. मला दिली गेलेली वागणूक कदाचित् तुला क्षुल्लक वाटेल. भले तू राम लक्ष्मण यांना कोणतीही शिक्षा करु नकोस. परंतु त्या सीतेला प्रथम लंकेत घेऊन ये. तीला बंदीवासांत ठेव. तीला योग्य ती शिक्षा कर. हेच तुझ्या जनक राज्याच्या दरबारांत स्वयंवराच्या वेळी झालेल्या अपमानाचे परिमार्जन असेल. "

    रावण हे सर्व वर्णन ऐकत होता. त्याच वेळी तो शिवधनुष्य पेलता न आल्यामुळे पडला, सभागृहातील इतर राज्यांचे हासणे, सीतेचेही कुत्सीतपणे बघत हासणे, हे प्रसंग आठवू लागला. त्याचा अहंकार चेतावला गेला. बहीणीच्या विचारामधला गर्भीत आशय त्याच्या लक्षांत आला. राम लक्ष्मणाचा येथे कोणताच सहभाग नव्हता. त्यांच्याशी संघर्ष करण्यासारखे त्याला कांहीच वाटले नाही. मात्र जो त्याचा अपमान सीतेकडून स्वयंवरप्रसंगी झाला, तो दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. तीला लंकेच्या एका महान राजाचा अपमान करण्याची सजा दिली गेलीच पाहीजे. रावणाच्या मनांत हे पक्के झाले. आत्मविश्वास, सैनबळ, युद्धनिती, ही रावणाची नेहमीची चाल असे. परंतु ह्या गोष्टी त्यानी टाकल्या. शिवाय राम लक्ष्मण ह्याना तो फक्त दोन विरपुरुष समजत होता. ते फार पराक्रमी आहेत असा कोणताच प्रभावी प्रसंग तोपर्यंत दिसण्यांत आला नव्हता. त्यांच्याशी युद्ध करण्याची संकल्पना त्याला त्याक्षणी आलीच नाही. त्याचे फक्त एकच ध्येय बनू लागले. आणि ते म्हणजे सीतेला लपून, पळवून आणणे. व बंदी करणे. राम लक्ष्मणाशी संघर्ष टाळणे. येथेच त्याने कपटनिती अनुसरली. शुर्पणखेच्या विचारांना त्याने एका दृष्टीकोणातून मान्यता दिली.

    त्या तथाकथीत कुकर्मासाठी तो एकटाच निघाला. फक्त एक सहकारी त्याचा मामा मारीच ह्याला त्याने बरोबर घेतले. ते ह्या साठी की एखादे मायावी रुप घेऊन राम लक्ष्मणाला सीतेपासून तात्पूरते अलग करता यावे. आणि तसेच घडले देखील.

    ३. मारीच ह्याला मायावी शक्ती आवगत होती. तो सुवर्ण हरीण बनला. सातेच्या हट्टापायी राम त्याला पकडण्यासाठी धावला. रामाचा आवाज काढीत त्याने लक्ष्मणाला मदतीला बोलाऊन घेतले. अशा तऱ्हेने मारीचने राम लक्ष्मणाला सीतेपासून वेगळे केले.

    रावणाने साधूचा वेष धारण केला. कारण सीतेला त्याचा विश्वास वाटावा. लक्ष्मणाने आपल्या दिव्य शक्तीने सीतेच्या रक्षणासाठी झोपडी भोवती आखलेली लक्ष्मण रेषा ह्याची पण जाण त्याला आली होती. त्यानेच सीतेला भिक्षा देण्यासाठी पद्धतशीर ती लक्ष्मणरेषा ओलांडण्यासाठी उद्युक्त केले. ह्याच दुर्दैव क्षणाला सीता फसली. ती जीवनांत येणाऱ्या संकटाला समजू शकली नाही. ती जागृत राहीली नाही. गाफील राहीली. हीच सतर्क न राहण्याची तीची चूक तीला पुढील संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागली. थोड्याशा चुका, छोटासा चुकीचा अंदाज, अविच्यारी निर्णय, जीवनामध्ये कसे तुफान निर्माण करतो हे ह्याचे उदाहरण. अशीच अनेक उदाहरणे आपण सतत बघत असतो. अनुभव घेत असतो. हे सत्य आहे. आपल्या अशा चुकांचे बोल आपण नशीबाला, दैवाला लावतो. कारण ही वृत्ती व प्रवृती असते. कुणीही त्याची जीम्मेदारी स्वतःवर घेत नसतो. येथे तर सीता ही महान व दिव्य भूमिकेतली होती. मग सारे खापर रावणाच्या माथी मारणे सहज व सोपे होते.

    रावणाने डाव साधला. सीतेला शक्तीनीशी उचलले. पुष्पक विमानानी आकाशमार्गे तो तेथुन निसटला. थेट लंकेत आला. रावणाने सीतेला बळजबरीने पळविले. हे सत्य होते. परंतु त्याने तीच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. कोणताही अतिप्रसंग केला नाही. अथवा विनयभंग केला नव्हता. लंकेला सीतेला बंदीस्त करुन वेगळे अशोक वनांत ठेवण्यांत आले. तीला राजमहलमध्ये केंव्हाच ठेवले नव्हते. ज्या परिसरांत राजा रावण स्वतः रहात होता, त्या वास्तुपासून दुर अंतरावर त्याने सीतेची राहण्याची सोय केली होती. अशोक वनांत अनेक फळझाडे, फुलझाडे, लता वेली, पशुपक्षी, पाण्याचे झरे इत्यादी यांचा विलक्षणसुंदर निसर्ग निर्मण केला होता. त्या आनंदमय वातावरणांत सीतेला प्रसन्नतेने राहता येईल याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली. अनेक दासदासी यांचा पहारा तीच्या सभोवताली ठेऊन तीच्या रक्षणाची संपूर्ण काळजी घेतली जात असे. ( दुर्दैवाने ह्या दासीना राक्षसीनी ही उपाधी लाऊन त्या वातावरणाला दुषित करण्याचा प्रयत्न केला गेला. ) सीतेच्या सहवासांत असलेल्या रावणाच्या सेविकांनी सीतेला अतिशय प्रेम जीव्हाळा व आदराची वागणूक दिली. तीच्या सर्व वैयक्तीक गरजा सतत पूर्ण करण्यांत लक्ष दिले. अर्थात ह्या सर्व बाह्य सुखसोई केलेल्या होत्या. तरी सीता स्वतःला निराश, दुःखी, असहाय्य आणि सतत असुरक्षीत समजे. ती आनंदी केंव्हाच झाली नाही.

    झालेल्या अपमानाचा बदला, एक सुडाची तिव्र भावना, अहंकाराला बसलेली ठेच, ह्याचा प्रचंड मानसिक परीणाम रावणाच्या मनावर होणे केव्हांही गैर म्हणता येणार नाही. ती एक मानवी जीवनाची नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणावी लागेल. रावण हा कांही संतमहात्मा नव्हता.की त्याने पडती बाजू घेत उदारमनाने सर्व सहन करावे. एक बलाढ्य पराक्रमी राजा, त्याच्या हातून अशाच प्रकारे होणार हे निरीक्षण असते. परंतु तो जेंव्हा राजा ह्या भूमिकेमधून सिंहासनावरुन उतरतो व रावण ह्या भूमिकेत येतो, त्यावेळी त्याच्या स्वभाव विशेषावर प्रकाश टाकणे योग्य होईल. सीतेला त्याने अत्यंत सन्मानाने अशोक वनांत बंदीस्त केले होते. तीच्यावर केंव्हाही, व कधीही अत्याचार, अन्याय, जबरदस्ती, वा भावनीक हल्ला केला नाही. तीला केव्हांही स्पर्श देखील केला नाही. सीतेला तीच्या विचारांचे संपूर्ण स्वातंत्र दिले गेले होते.

    ४. जर सीतेचा सहकार असेल, मान्यता असेल, उत्स्फूर्त इच्छा असेल तरच रावण तीला राणी मंदोदरीच्या रांगेत बसण्याची परवानगी देणार होता. राणीचा सन्मान मिळणार होता. रावण शक्तीशाली होता. लंकाधीश राजा होता. सीतेवर बळजबरी करुन हे त्याला साध्य करणे ही क्षुल्लक बाब होती. परंतु रावणाच्या महान व अध्यात्मिक व्यक्तीमत्वाला हे केव्हांच मान्य नव्हते.

    रामायणाचा शेवटचा संदर्भ समजणे महत्वाचे ठरते. घडत जाणाऱ्या सर्व प्रसंगाच्या शेवटी जी घटना घडली ती देखील चिंतनीय बाब ठरते. राम रावण युद्ध झाले. रावण मारला गेला. सीतेची सुखरुप सुटका झाली. आयोध्येला परतण्यापूर्वी रामाने सीतेच्या पावित्र्याची शंका घेत, अग्नी परीक्षा घेतली. सीता त्यांत यशस्वी झाली. ती संपूर्ण पावित्र्याची देवता ठरली. सीतेची अग्नीपरीक्षा ही जशी तीची महानता दर्शीत करते, त्याच प्रमाणे ती राजा रावण ह्याच्या बंधणात देखील किती सुरक्षीत होती व पवित्र जीवन जगू शकली हे तिव्रतेने दाखविते. राजा रावण ह्याची महानता आपण खऱ्या अर्थाने जाणली पाहीजे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 16, 2017


  • फळाची मजा

    आंबा आहे फळांचा राजा
    मधुर रसदार हापूसची मजा

    फणसाला बुवा काटेच फार
    रसाळ पिवळा गरा मात्र चवदार

    केळी हिरवी, पिवळी किंवा वेलची
    पौष्टिक गोड, रोजरोज खायची

    द्राक्ष कशी घोसाला लगडलेली
    सुमधुर, टपोरी नाशिकवाली

    आईला म्हणावं फळं रोजच आण
    चवीला छान नि आरोग्याचीही खाण

    - यतीन सामंत

      July 26, 2022


  • चक्र

    मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी ।

    कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरती ।।

    एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरती ।

    आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची भाकरी बनती ।

    निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे ।।

    एक मारूनी जगवी दुजाला, हीच तयाची विशेष अंगे ।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 3, 2020


  • हळुवार तू …

    हळुवार तू...हळुवार तू ...
    सारेच तुझे हळुवार...हळुवार तू ...।।धृ।।

    हळुवार लाजणे, हळुवार रुसणे,
    हळुवार हसणे, हळुवार बोलणे ।। १ ।।

    तुझे हळुवार माझ्या प्रेमात पडणे,
    तुझे हळुवार मला प्रेमात पाडणे । ।२।।

    तुझे हळुवार प्रेम हळूच व्यक्त करणे
    तुझे हळुवार माझ्या हृदयात शिरणे ।।३।।

    तुझे हळुवार मला हळूच स्पर्शने
    गालात तुझ्या हळुवार गोड हसणे ।।४ ।।

    मला पाहता हळुवार नजर चोरणे
    माझ्या डोळ्यात हळुवार तुझे पाहणे ।।५।।

    माझ्या स्वप्नात तुझे हळुवार येणे
    मी उठता तुझे हळुवार ते जाणे ।।६ ।।

    तुझे हळुवार माझ्या चित्रात उतरणे
    तुझे हळुवार माझी कल्पना होणे ।।७।।

    तुझे हळुवार माझे जीवन व्यापणे
    तुझे हळुवार माझे जीव घेणे ।।८ ।।

    ©कवी - निलेश बामणे

      June 9, 2017


  • जगलो कसा किती?

    जगी मी जगलो कसा कळले नाही
    पण भोगले ते कधी विसरलो नाही

    आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती
    स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही

    मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो
    तो सहवास लाघवी विसरलोच नाही

    भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान
    दोष! कधीही कुणाला दिलाच नाही

    लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे
    दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही

    सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला
    हताश होऊनी मी कधी हरलो नाही

    त्या कृपाळू, दयाघनाची साथ आहे
    भयभीत! मी कधीही झालोच नाही

    जन्ममृत्यू! अटळ कालचक्र सृष्टीचे
    त्यातुनी जगी कुणाचीच सुटका नाही

    जगणेही सुंदर! त्याहूनही मृत्यू सुंदर
    साशंक, मी मनी कधी झालोच नाही

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१३९

    २८ - १० - २०२१

      October 29, 2021