(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • २ – गँ गणपती

    ॐ गँ , ॐ गँ , गँ गणपती गँ गणपती

    महामंत्र हेरंबाचा प्रत्यक्ष-पराशक्ती ।।

    गकार करि साकार, मोरया , मोहक गजशुंडा

    गकार, गोंडस दंत वाकडा तुझा वक्रतुंडा

    गकार, समईमध्ये नाचे ज्योती तमहारी

    गकार, गर्भसमाधि गहन निजमातेच्या उदरीं

    गकार गणदल, कार गुणबल, गकार गहन गती ।।

    अकार अविचल आद्यस्वर अवतार तुझा मूर्त

    अकार, बृहद्-अवकाशपोकळी कोटिसूर्यव्याप्त

    अकार कालातीत अनंतहि, अकार तूंच अनादि

    चिरशाश्वत तूं, अस्तित्वातच ब्रह्मांडाआधी

    अकार , अवगुंठन सगुणाचें अद्वैताभंवती ।।

    शिर टेकुन अर्धेंदु बने तन , नमन भालचंद्रा

    याचक-ओंजळ अर्धेंदू , अर्धेंदु वरदमुद्रा

    एकवटत बिंदूमधिं ऊर्जास्रोत अमर्याद

    पंचप्राणांमधें घुमे घन अनुस्वारनाद

    उरीं अनाहत ओंकाराची ओजस अनुभूती ।।

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • विश्वामित्राची देणगी

    छम छम बाजे

    पैंजण माझे

    मी अप्सरा स्वर्गाची

    देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।।

    स्वर्गामघुनी आले भूवरी

    धडधड होती तेव्हां उरी

    तपोभंग तो करण्यासाठीं

    आज्ञा होती इंद्राची ।। १।।

    मी अप्सरा स्वर्गाची

    देवलोकींच्या राज्याची

    तपोबलाच्या सामर्थ्यानी

    प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी

    सत्वहरण ते अशा ऋषीचे

    परीक्षा ठरली दिव्यत्वाची ।। २ ।।

    मी अप्सरा स्वर्गाची

    देवलोकींच्या राज्याची

    भाग्य माझे थोर कसे

    विश्वामित्राना जिंकले असे

    मात्रत्वाचे रंग भरुनी

    देई देणगी शकुंतलेची ।। ३।।

    मी अप्सरा स्वर्गाची

    देवलोकींच्या राज्याची

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • “मी”

    माणसाचा अहंभाव रसातळाला नेतो. समाजात राहून आपल्या वेगळ्याच भ्रमात राहणा-या लोकांचे परिवर्तन या शब्दपुष्पाच्या माध्यमातून होर्इल अशी आशा बाळगूया!

  • संतुलन

    आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें

    तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।।

    नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे

    तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।।

    सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग

    प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।।

    वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी

    सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।।

    एकाची शक्ती बनते दुसऱ्यास पुरक

    निसर्गचक्र शोधते संतुलन त्यांत एक ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित

    जाणती हे सगळे

    परि दुःखात शोक करिती

    हे कुणा न कळे

    आपण कर्म केलेले

    आपणचि भोगतो

    फळ कर्माचे आलेले

    तेच आपण चाखतो

    आहे तुजसी हे ज्ञान

    माहीत सर्वाना

    खंत द्यावी सोडून

    नको दाखवूं भावना

    इतरांसाठीं आहे

    ती भावना उदरीं

    सहानुभूती पाहे

    इतर जनांचे पदरी

    शोक भावना दाखवी

    तुझ्या दुःखाची

    नसतां तुज निर्दयी ठरवी

    हीच भीति जनाची

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • लोपलेले श्रेष्ठत्व

    डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।

    महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।

    जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।

    आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।

    दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।।

    परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।

    डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।।

    कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।

    कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।।

    परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।

    आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।।

    परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।

    ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।।

    पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।

    विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।।

    मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।

    अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।।

    अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।

    गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।।

    चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।

    विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।।

    परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।

    ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।।

    हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।

    तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।।

    पुढ

    नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।

    अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।।

    चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी..

    प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या

    करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या..

    दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे

    आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे..

    विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला

    अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला..

    फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले

    कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले..

    विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा

    वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा..

    सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई

    कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई..

    डॉ, भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • राम झालो मी कधी घनश्याम झालो मी

    प्रदीप निफाडकरांची गझल

  • आत्मनिर्भर भारत

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली भारती बिर्जे डिग्गीकर यांची हि कविता


    होवो भारत आत्मनिर्भर नवी जागो इथे प्रेरणा
    सांगे गर्जून लोकनायक असे देण्या नवी चेतना
    आहे काय म्हणायचे? कुठून या येतात संकल्पना ?
    आता पूर्ण अशक्यही परतणे कोशामध्ये त्या जुन्या

    आला निर्मम काळ एक असला आक्रित हे आगळे
    सारी मानवजात बंद कसल्या कैदेत ते ना कळे
    येते संकट शक्यता नवनव्या घेऊन त्याच्यासवे
    सांगे हा कृतिशील नायक, नवे रणसूत्र हा ऐकवे

    या भूमीतच नांदली विकसली ऊर्जा तपोसाध्य ती
    पूर्वापारचं आत्मतत्त्व जपणारी ही जुनी संस्कृती
    सारे तेच प्रमेयसाधन नव्या संकल्पकार्यास्तव
    आता एक करू पुनश्च प्रण की लाभो नवे वैभव

    आम्ही निर्मल विश्वभाव धरला आहे जरी अंतरी
    आधी उद्यमशीलताच जपणे जी स्वावलंबी करी..
    आता आकळतो चिरंतन असा संदर्भ भाष्यातला
    सायासाविण बंध एक जुळतो विश्वासवे आपला..

    - भारती बिर्जे डिग्गीकर

  • पचास साल की आयु

    पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी
    हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी

    सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा
    फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा

    सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर
    हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार

    जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना
    जीन गुणोंको हमनेही ना पहचाना

    वो हमारेमे संकरीत है, उसकी दिगयी हमे कल्पना
    आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी

    देखी किसीने हमारे मे थे बाते सारी
    आचंबेके साथ सोंच रहे थे गंभीरतासे

    के इन गुणोंका पता उन्हे लगा कैसे
    जीन गुणोंका अर्थ हमने, आज तक ना जाना

    कैसे मिला उनका उन्हे ठिकाना
    जो कुवेमेही नही था, वो बालटी मे कैसे आया

    और इन बातोंका हमे आश्चर्य हुआ
    शायद यह हो सकती है पार्टी की मिठाईयां

    नैतीक दबाव उनपर जीस वझेसे आया
    खिलानेवाले की कुच तो इज्जत करो

    उसके आसलीयत पर मत उतरो
    कमसे कम इतनी उमरबाद, होने दोजी खूष उसे

    सोचा हुंगा किसीने, मन मे ऐसे
    कलतक दे रहे थे जो गालीयां

    दिखी आज हमारेमे उनको खुबीयां
    चार झुठ एक सच्चे के बराबर, जब रेटकर कहा जाता है

    और किसीकी तारीफ, हकीकत बनती
    जब आखों मे पानी लाकर कहा जाता है

    यह तो पता हुआ उनकी तारीफ से,
    के आसलीयत मे जिंदगी होनी चाहीए कैसी

    इन ताऱिफ और गुलदस्तोकी चौकटने प्रसन्न किया हमारा चित्त
    और ख्यालोंकी दुनीयांने बिती सारी रात

    करवटे बदलते बदलते सोचना मजबूर किया
    के जो कुछ जिंदगी मे सच्चा हुआ, तुने क्या पाया

    जिंदही का मकसद क्या, जरा सोच इन बातों पे
    यही विचार झाकने लगा मन मे, उमरके इस मोड पे

    रईस बापकी इकलोती आवारा आवलाद
    देखी हमने पैसोको करते बरबाद

    लक्ष्मी के मोलको वो गधा जानेगा कैसे
    वह तो समझताहै पैंसो को पानी जैसे

    समयका मोल हमने किया उस आवारा भाती
    और खो बैठे वो महान संपत्ती

    गया वख्त फिर हात आता नही,
    बचपन मे शिक्षकने घोल घोलकर बाते कही

    अर्थ उन पक्तीओंका तो हम जान गये थे
    पर मतलब से उसके बहूत दूरी पर थे

    पचास साल जानेके बाद, पंक्तीओंका दोहरा रहे है करते याद
    पर अब तो ये बेफूझूलकी हुई ना बाते

    दुनीयांके चक्करको कैसे वापीस फिराते
    पेंडीग रखो इन बातोंको, फूरसतसे करेंगे हम उनको

    कर दिया इन्ही बेफीकीर आदतोंनो सर्वनाश
    और समय खो जाने पर आता था हमे होश

    खेल कुद और तंदुरस्ती को जान
    विद्यार्थी दशा मे नही हुयी इसकी पहचान

    समझते थे खाईंगे पियेंगे बनेगे नवाब,
    खेलेंगे पढेंगे बनेंगे खराब

    चार बच्चोंका अड्डा जमाए, झाडके तले बैठते थे
    और दुसरे दोस्त, जो खेल रहे, उनपर कॉमेट्स करते थे

    बगैर खेले मैदान मे, खेलोंपर करते थे मार्गदर्शन
    किसीसे कुछ सुना, या अकबारपढा, यही था हमारा ग्यान

    बातें बनाना यही कला, हमने सिखी पढाईके जमानेसे
    और उमरके हिसाबसे जो मिला ग्यान, निकालते उगालकर दिमागसे

    उन बातो मे ना कुछ अनुभव था, ना अभ्यास किया पंक्ती
    बकते थे भडाभड जो मुहसे निकल आती

    खेल कुद मे रहे पिछए और लिख पढाईमे निचे
    इसी कारण जिंदगी मे रहे कच्चे

    ग्यानी अनुभवोंकी थी हमारेमे कमतरता,
    सिर्फ उमरके अनुभवोंको कोन पुछता

    अब आपही सोंचो जरा,
    जीसके जिंदगी मे था खाना पिना मौज उडाना

    समयको फूकटका माल समझकर बरबाद करना
    कैसे इन लोगों ने हमे आदर्शवादी माना

    यह तो हुआ जबानी जमाखर्चा, क्या झूठ और क्या सच्चा
    पर एक सज्जनने जो कही बात,

    उसमे दिखी मुझको जिंदगी की हकीकत
    उसने सुनाया हमारे तारीफ का राज

    वही बना जिंदगीके तस्सलीका आवाज
    ये दुनीया देखनेमे है खूबशूरत, पर काटोंसे भरी हुयी अनगीनत

    हर कदमपर जिंदगी के लीए चाहीए झगडा
    एक एक दिन गीने इन्सान आगे बडा

    सोचना पडता था के गया दिन कैसा
    आनेवाले दिन का नही था भरोसा

    यह संसार है बेरहेम, बेदर्द औऱ जालीम
    इसी जिंदगीमे हम जिये थे ५० साल कमसे कम

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • देहातून आत्मा सुटावा.

    द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, --

    देहातून आत्मा सुटावा.

    घे स्वैर भरारी,
    माझ्या देखण्या पाखरा,---
    बद्ध पंख हे उचंबळती,
    सोडून ही बंदिस्त कारां,---

    पिंजर्‍याचे दार लागतां,
    जीव तुझा घुसमटे,
    स्वातंत्र्याच्या फोल कल्पना,
    सर्वच विचारा खींळ लागे

    आतल्या आत जीव तडफडे,
    सीमित जागा, नुसताच हिंडे
    डोळे भिरभिरत कसा शोधशी,
    तू आपला मुक्तपणा, --!!!

    जो येईल तो बोलू बघे,
    इथेतिथे उगा हात लावे,--
    कठोर काळीज करुन आपुले,
    मानव कधी छेड'ही काढे,-!

    नको नको परतंत्रता,
    पटकन आता झेपाव गगनी,
    मिसळ जाऊन भाईबंदा,
    स्वातंत्र्याने होशील आनंदी,

    झाडा झाडांवर कर आपला,
    अगदी स्वच्छंद विहार,
    गोड गोड फळे चाखावया,
    कशाला रे उशीर फार ,--?

    या कारे'त काय ठेवले,
    बेचैनी, उलघाल, अस्वस्थता,
    ताणतणाव विसरून साऱ्या,
    पर" पसरून कर गोड सांगता,-!!

    हिमगौरी कर्वे.©