(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दिवाळी

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता


    आली दिवाळी आली दिवाळी
    दिव्या दिव्यांच्या लावून ओळी
    रंगा रंगाने खुलवु रांगोळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।। १ ।।

    लाडू करंजी ती कडबोळी
    शेव चिवडा अन् शंकरपाळी
    काटेरी चकलीची मजा निराळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।। २ ।।

    अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी
    उटण्याचा आलेप गंध दरवळी
    सुरसुऱ्या फुलबाजी झाल्या उतावळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।।३।।

    चांदण चुरा सजला आभाळी
    दिव्यांची आरास आसमंत उजळी
    आकाश कंदिल समृद्धी उधळी
    आली दिवाळी आली दिवाळी...।।४।।

    आली सोनपावलांनी लक्ष्मी सांजवेळी
    सौख्य, समृद्धी हौस ही आगळी
    पाडव्याचा सण पतीला ओवाळी
    आली दिवाळी आली दिवाळी...।।५।।

    भाऊ आला माझा मंगलवेळी
    लाविते टीळा चंदन भाळी
    स्वप्नांना त्याच्या मिळो यशाची झळाळी
    प्रेमाचे नाते जपते ही दिवाळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ॥६॥

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

  • दुःख विसर बुद्धी

    कसे मानू उपकार, देवा तुझे
    देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे

    खेळ आहे जेथें, हार जीत आहे
    घर बांधणीते, पड झड पाहे

    असे जन्ममरण, ह्याच देहीं
    हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही

    एक दुःख येतां, मन होई निराश
    काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश

    एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां
    जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां

    निसर्गाची रीत, दुःख तोची काढी
    करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी

    दुःख होते दुर, हेच आणिल समाधान
    दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • बिकट वाटा

    अनभिज्ञ बिकट वाटा
    अगतिक जिद्दी पाऊले

    ध्येय खंबीर वाटसरूंचे
    अथक नित्यची चालले

    वळणेही, वेडी वाकडी
    अंदाज, सारेच आंधळे

    साथ अनामिक वाटाडा
    हातात हात धरुनी चाले

    साक्षी,स्पर्श त्याचे ग्वाही
    निःशंक! जगती चालले

    चराचरी न कुणीही एकटे
    रूप श्रीचे सोबती चालले

    हेच अतर्क्य, अगम्य सारे
    सुखनैव! चिरंजीव राहिले

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ३६.

    ५ - २ - २०२२.

  • तवा

    या तव्यावरची भाकरी
    नाही निर्लेपला ऐकायची |
    कारण सरावलेल्या हातांनी
    तीला सवय होती फिरायची ||१||

    ठरावीक ठिकाणी दाबल्यावर
    ती टच्च अशी फुगायची |
    दोनच चिमटीत धरुन
    अलगतशी तुटायची ||२||

    तशीच जीवनाची भाकरी बाई
    तीला लेपनाची गरज नाही |
    कुठे फुगायचे कुठे ओसरायचे
    हे तिच्यावर अवलंबून नाही ||३||

    सराईत हात दिसणार नाहीत
    चिमटीतून कधी सुटणार नाहीत |
    त्यांच्या खोल तव्यामधून
    कोणी बाहेर पडणारच नाही ||४||

  • अश्रू साचले पापणी आड

    अश्रू साचले पापणी आड
    मोकळे हलकेच होऊ दे,
    वाट तुझी पाहता मी हलकेच
    डोळ्यांत थेंब सारे तप्त कोरडे..
    येशील का तू कातर क्षणी भेटाया असा
    घेशील मज घट्ट मिठीत वेढून तेव्हा,
    स्पर्श तुझा आश्वासक अलगद व्हावा
    वाट तुझी पाहून थकले मी आता..
    ओढ असेल ही काही गतजन्मीची
    कसले हे ऋणानुबंध तुझ्या माझ्यात,
    अलगद एकाकी गुंतले तुझ्यात मी
    नकळत मोहरल्या माझ्या जाणिवा..
    आर्त तुझी अबोल आठवण
    का रे तू असा अलिप्त कोरडा,
    घे अलवार घट्ट मिठीत मज
    करपल्या कितीक नाजूक भावना..
    ये तू असा अवचित सख्या
    वेदना अनेक मनात साचल्या,
    होईल मोकळ्या मिठीत तुझ्या
    अश्रुत ओल्या माझ्या अव्यक्त व्यथा..
    तप्त मोहरल्या तुझ्या मिठीत चेतना
    व्याकुळ सांज वेळ ही कातर केशरी,
    न कळतील कधी तुला रे माझ्या
    तुझ्यात गुंतलेल्या नाजूक भावना..
    वाट तुझी पाहते मी रोज कातरवेळी
    सांज व्याकुळल्या केशरी छटा या,
    का तुझी भूल आल्हाद पडावी मनी
    गतजन्मीची ओढ अंतरी निःशब्द खुणा ..

    -- स्वाती ठोंबरे.

  • प्रेमात काय पडायचं ?

    प्रेमात काय पडायचं ?
    कोणालातरी प्रेमात पाडण्यात मजा असते

    प्रेमात काय मरायचं ?
    कोणालातरी प्रेमात उचलण्यात मजा असते

    प्रेमात काय झुरायच ?
    कोणालातरी प्रेमात झुरविण्यात मजा असते

    प्रेमात काय रडायचं ?
    कोणालातरी प्रेमात हसविण्यात मजा असते

    प्रेमात काय मिळवायचं ?
    कोणालातरी प्रेमात देण्यात मजा असते

    प्रेमात काय सोडायचं ?
    कोणालातरी प्रेमात गुंतविण्यात मजा असते

    प्रेमात काय अडकायच ?
    कोणालातरी प्रेमात सोडण्यात मजा असते

    कवी - निलेश बामणे ( एन. डी. )

  • ओझं

    जड झाला जीव आता
    ओझं सोसवत नाही...
    भोग भोगायचे किती आता
    देवादारी बसवत नाही...!

    जन्म वाया गेला राबण्यात
    नाही गाव दुसरं पाहिलं..
    भरल्या गोकूळ घराचं
    सपान मनात राहिलं..!

    वाट एकटा चालला
    तिला जोडीला घेतलं..
    एक नातं विश्वासाचं
    त्याच्या जिवावर बेतलं...!!

    .... राजेश जगताप, मुंबई
    ९८२१४३५१२९.

  • मन भारावते

    पाऊस येता मन जाते भाराऊनी
    सृष्टीचे रुप जाते हिरवेगार होऊनी
    अनेकांच्या मनातले विचार पाऊस घेतो जाणूनी
    म्हणूनच ती गाणे गाते संगीतमय होऊनी

    तृप्त होते जीवसृष्टी मातीचा गंध घेऊनी
    पण हाच पाऊस कधी कधी जातो काळ बनूनी
    चातकालाही आवडे पाऊस भारी
    तो थकतो पावसाची वाट बघूनी

    समुद्र जातो खवळूनी
    किनाऱ्यावरील लोक जीव मुठीत बसतात धरुनी
    लहान मुले लुटतात मजा पावसात खेळूनी
    धबधबाही खेळतो हिरव्यागार सृष्टीतूनी

    वाट पाहते तुझी डोळे भरुनी
    पण जीवसृष्टीला नको टाकू रडवूनी

    - भाग्यश्री सतीश प्रधान

  • वेळेची किमया

    वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची ।

    जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची...१,

    जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी ।।

    वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,

    प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे ।

    कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,

    काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे ।

    उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,

    कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला ।

    हीच तर वेळेची किमया, कशी कळे कुणाला....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सारेच खेळाडू

    खेळाच्या त्या मैदानीं,
    रंगात आला खेळ,
    मुरलेले खेळाडू,
    आनंदी जाई वेळ ।।१।।

    खेळाच्या कांहीं क्षणी,
    टाळ्या शिट्या वाजती,
    आनंदाच्या जल्लोषांत,
    काही जण नाचती ।।२।।

    निराशा डोकावते,
    क्वचित त्या प्रसंगीं,
    हार- जीत असते,
    खेळा मधल्या अंगी ।।३।।

    सूज्ञ सारे प्रेक्षक,
    टिपती प्रत्येक क्षण,
    खेळाडू असूनी ते,
    होते खेळाचे ज्ञान ।।४।।

    मैदानी उतरती,
    ज्यांना असे सराव,
    जीत त्यांचीच होते,
    ज्यांच्यात खिलाडू भाव ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com