मानव देह देऊनी ईश्वरा,
उपकार केले मजवरती,
सेवा करण्या तव चरणाची,
संधी लाभली भाग्याने ती ।।१।।
कर्म दिले मानव योनीसी,
श्रेष्ठत्व येई त्याचमुळे,
उद्धरून हे जीवन नेण्या,
कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।।
मुक्त होणे जन्म मरणातूनी,
साध्य होई प्रभूसेवेने,
परि तीच मुक्ती वंचित करते,
आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।।
एक मागणे प्रभू चरणी,
मुक्ती न देई मजला,
संधी देऊनी तव सेवेची,
सहवास मिळवा हर घडीला ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नकार देत होती माझ्या प्रेमाला,
बघून, मी आहे एक बेकार
जळत होते, जळत होते
तिच्या विणा माझे शरिर
सर्व शांत झाले आता,
फायर ब्रिगेड नोकरी मिळता
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शांत व्हावे, आठवांचे मोहोळ
साठव जागवित काळीज थकले
जगायचे ते सारे जगुनी झाले
भोगण्यासारखे काही न उरले
स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी
ते भाग्य कृपाळू जगवित राहिले
ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी
स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले
भौतिक सुखाला, विटुनी जाता
ध्यास परमार्थाचे जीवास लागले
अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी
सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २७४
२८/१०/२०२२
चढत्या रात्री द्रव सोनेरी ।
चषकांमधली नशा बिलंदर ।
मंद सानुली ज्योत सांगते ।
हे नच अपुले नवसंवत्सर ।।
थाट चालतो माठ जिवांचा ।
किनाऱ्यावरी गर्दी कलंदर ।
पश्चिमेकडे झुकता झुकता ।
दिशादिशांतील वाढे अंतर ।।
उगा कशाला सदा वाहता ।
दास्यवृत्तीची मढी खांद्यावर ।
रूढी तोडुनी गढी गाडता ।
अभिमानाने फुलेल अंबर ।।
ब्रह्मध्वज हा तुमचा अमुचा ।
चैत्र पाऊली येई निरंतर ।
सरता तम , हे उजाडेल मग ।
सूर्य उद्याचा असेल सुंदर ।।
रचना : डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
ओटी भरण आज कौतुकाचे
हवे नको काय ते तूच सांगायचे
ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।।
शालू हिरवा जरतारी काठ
चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट
श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।।
मोगरा अंबोली, दवणा मरवा,
रूपाराणीला या, मखरी मिरवा,
मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।।
सुगंधित वाळा, उटी चंदनाची
हौस पुरवा फळांची फुलांची,
डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।।
कौसल्येचा राम, देवकीचा शाम,
असेल तयाचे रूप मनोरम,
पडसाद कानी घुंगुर वाळ्याचे ।।४।।
"मी कुणाला कळलो नाही"
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही..
सोडून गेले माझेच मला
"मी कुणाला कळलोच नाही.."
"मी कुणाला कळलोच नाही"
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
सुचले होते सारे कांहीं , ढळत्या आयुष्यीं ।
संधिप्रकाश दिसत होता, सूर्य अस्ताशीं ।१।
काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे ।
कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे ।२।
समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें ।
खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे ।३।
विषय सारे अथांग होते, अवती भवती ।
कसा पोहू या ज्ञान सागरीं, विवंचना होती ।४।
निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न लागे ।
क्षणांत चमकूनी प्रकाश देणें, हीच विजेची अंगे ।५।
वर्षा येवून निघून जाते, न्हाऊं घाली धरणीला ।
हिरवे प्रफुल्लित वातावरणीं, आनंद दिसे सर्वाला ।६।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कसा, काय, कोण खेळला
बघत नाही कुणी
खेळातील यश अपयशाच्या
राहतात फक्त आठवणी
मरुन गेला नाटककार, तो
नांव ही गेले विसरुनी
जिवंत आहे आजही नाटक
रचिले होते त्यांनी
जगास हवे कर्म तुमचे
नको तुमचे जीवन
पशूसही जीवन असते
मरतो तो तसाच येऊन
वाल्यानें केले खून
लोक विसरुनी जाती
आजही वाचतां रामायण
कौतूक त्याचे करिती
वेशेघरी राहिलेला
गेला कालीदास विसरुनी
मेघदूत, शाकूंतल वाचतां
महाकवीच्या येती आठवणी
वेचीत असतो फुले
आम्हीसोडून सारे काटे
लोकही घेती उचलूनी
त्यांना जे चांगले वाटे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti