जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं,

ठाऊक असते सर्वांना,

मृत्यू हा अटळ असूनी,

केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।

आगमनाचा काळ त्याचा,

कल्पनेनें ठरविला जातो,

अचूक जरी शक्य नसले,

विचार त्यावरी करीता येतो ।।२।।

जीवन म्हणती त्या काळाला,

जगणे आले मृत्यू येई तो,

जगण्यापुढे पर्याय नसतां,

सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।

तन मनाला सुख देऊनी,

जीवन काल वाढविती कांहीं,

सद्उपयोग तो केला जावा,

हीच इच्छा सदैव राही ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



वाट कुणाची बघतो आम्हीं,

ठाऊक असते सर्वांना,

मृत्यू हा अटळ असूनी,

केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।

आगमनाचा काळ त्याचा,

कल्पनेनें ठरविला जातो,

अचूक जरी शक्य नसले,

विचार त्यावरी करीता येतो ।।२।।

जीवन म्हणती त्या काळाला,

जगणे आले मृत्यू येई तो,

जगण्यापुढे पर्याय नसतां,

सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।

तन मनाला सुख देऊनी,

जीवन काल वाढविती कांहीं,

सद्उपयोग तो केला जावा,

हीच इच्छा सदैव राही ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author