(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रत्येकाला इथं दुःख असतं

    प्रत्येकाला इथं दुःख असतं
    असतं फक्त ते दिसतं नसतं,
    हास्य वरवर सगळीकडे असं
    म्हणून त्यात ते कळतं नसतं..
    गैरसमज करणं इथं तर
    खूप सोप्प सहज असतं,
    किंवा गैरसमज करुन
    घेणं नित्य रोज होतं असतं..
    तू मला बोलला मग मी
    राग तुझ्यावर तो धरेन,
    दोन शब्द तुला जास्त बोलेन
    हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं..
    दुसऱ्याला गृहीत धरण
    सहज मग होतं असतं,
    जबरदस्तीच गणित त्यात
    नकळत सहज घडतं असतं..
    हक्काने रागवणार ओरडणार
    मोठं माणूस आपुलकीच नसतं,
    झाली चूक तर दाखवणारं आता
    आयुष्यात मोठं माणूस समोर नसतं..
    नातं पण हल्ली उलगडत नसतं
    एकमेकांना काय हवे कळतं नसतं,
    साधा गजरा आणण पण प्रेम आहे
    जुन्या पिढीतील हे प्रेम आता माहीत नसतं..
    दोघांचं चुकलं जरास कुठे हल्ली तर
    ओरडण राग हे नवरा बायकोत होतं,
    भांडण राग ह्यात वेळ सगळा जातो
    प्रेम करायला मग अबोला सोबत उरतो..
    फास्ट दुनियेत सगळचं फास्ट मग
    पैसा जवळ खूप ह्यातच सुख कळतं,
    गरजा कमी करुन थोडं तडजोड करुन
    आनंद मिळतो हे मग साधं गणित न कळतं..
    घरी आणि बाहेर पण नित्य हेच
    सगळीकडे घडतं ते असतं,
    हक्क आणि राग ह्यात पटकन रुसणं
    पण समुजन घेणं दुसऱ्याला होतं नसतं..
    कुणीही आवडून जावं सहज मनात
    अशी लोकं भेटणं आयुष्यात छान घडतं,
    नशिबात असेल तितकं दान मिळतं
    हेच तर जीवनाचं अंतिम सार ठरतं
    कुणी मनात गोड आवडून जावं
    अस हल्ली लोकांचं वागणं होतं नसतं,
    आणि आवडलं मनापासून कुणी तर
    ते सांगणं पण हल्ली कठीण असतं..
    मोह व्हावा अगदी साध्या गोष्टींचा
    पण त्या गोष्टी मिळणं अवघड ठरतं,
    देव करतो रचना ही अशी निराळी
    नशीबाचा दैव फेरा काय ते मग समजतं..
    मरणं सोप्प सहज हल्ली झाले
    जगणं फार कठीण होऊन बसलं,
    करोना कधीही घालेल घाला आता
    भीतीच हे संकट थोडं मनात असतं..
    कोण कधी फटकन जाईल
    कुणाला हे कधी माहीत नसतं,
    आज आहे क्षण आपला आनंदाचा
    तरुण म्हातारं काही मरणदारी नसतं..
    आज करते स्वाती कविता ही
    पण उद्या माझं ही मरणं येऊ शकतं,
    नसेल मग मी ह्या जगात अशी
    कधीही श्वास जाऊ शकतो..
    हेच अंतिम सत्य आयुष्यात
    भरवसा जगण्याचा जरा नसतो,
    नको राग द्वेष कटुता भांडण सारे
    मेल्यावर मग हळहळ करणं उरतं..
    जीवनाचे सूत्र हे सहज साधे
    माणूस अवघड ते करतो,
    समजून न घेणं दुसऱ्याला मग
    गैरसमजाचं दुष्ट चक्र ते फिरतं..
    वाचा कविता ही रसिकहो
    मनात किल्मिश कधी नसावं,
    येईल मरणं माझे कधीही मग
    काळ समोर कधी येऊ शकतो..
    निसर्ग,फुलं,पाऊस,काव्यांत
    मन सहज बेधुंद मुक्त करावं,
    कुणी आवडलं मनापासून मग
    हृदयात गोड बंदिस्त करावं..
    कविता झाली माझी मोठी खूप
    तरी रसिकहो वाचा तुम्ही सारे हो,
    गंध कवितेचा मनात माझ्या नेहमी
    स्वातीच्या प्रेमात राहील तारा हृदयस्थ..
    -- स्वाती ठोंबरे.
  • माझे पणाची जाणीव

    एका मोठ्या कारखान्याचा मालक,

    भासत होता छोट्या विश्वाचा चालक

    लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,

    मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण

    उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,

    लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,

    खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत

    पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे

    पण नशीब दुर्दैवी बिचारे,

    मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,

    वर्ज्य केल होत साखर व मिठाला

    नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी

    भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.

    जगण्यासाठी आहार नियंत्रण

    समजला होता हे तत्व.

    वात पित्ताची प्रकृती त्याची.

    थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.

    लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,

    कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,

    आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,

    कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर

    व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.

    पाने मागे पुढे चाळीत होता,

    मध्येच मान वर करून बघत होता,

    विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,

    हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर

    सारे उभे होते सभोवताली.

    माना त्यांच्या झुकत होत्या,

    शब्द त्याचे ते उचली,

    कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार

    चेहऱ्यावर चमकत होता.

    आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या

    उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे

    या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले

    लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....

    स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.

    साखर मिठ वर्ज्य असलेले,

    हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,

    तरी देखील हे सारे माझे आहे,

    हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • सर्वस्व अर्पा प्रभुला

    केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं

    उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं

    एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं

    आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं

    परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी

    नको मजसी जीवन हीच भावना उरीं

    सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा

    तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

    देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.

  • शीर्षक :- श्रावणी अष्टाक्षरी काव्य रचना

    मेघ दाटून येतात
    मोर नाचतो अंगणी
    सरी वर सर येता
    चिंब भिजली अवनी.

    वेली वृक्ष बहरले
    थेंब टपोरे झेलूनी
    धरणीला सुखावले
    आज भरल्या मेघांनी..

    श्रावणाच्या येती धारा
    झुले झुलती वाऱ्यांनी..
    माहेरच्या आठवणीं
    आज आल्या परतूनी..

    सजवले धरतीला
    ओल्या हिरव्या पानांनी
    नभांगण रंगविले
    सप्तरंगी रंगातूनी..

    ओल्याचिंब वाटेवरी
    सर वेचिता श्रावणी .
    फुललेल्या फुलासवे
    मन गेले आनंदूनी

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

  • घनमेघ

    बरसत, बरसत ये रे घना
    चिंब चिंब भिजव रे मना
    आसक्त,अधीर प्रीतभाव
    बरसत, बरसत ये रे घना
    सांग कसे, मीच रे सावरुं
    हे निळ्या सावळ्या घना
    तुझ्यात रे स्पर्षतो सावळा
    बरसत, बरसत ये रे घना
    हेच गगन, हीच वसुंधरा
    उताविळ, मिलना रे घना
    तूच रे, चैतन्य या सृष्टिचे
    ये सजवित ब्रह्मांडा रे घना

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १४८

    ७ - ६ - २०२२.

  • देवा तुझे द्वार (चारोळी)

    काव्याक्ष चारोळी

    देवा तुझे द्वार
    असे भक्तीचा सागर
    येऊन करी स्तुती जागर
    तिथे तू असशी का तारणहार?

    -- सौ.माणिक शुरजोशी
    ७/१२/१९

  • कोकणचा कुलाचार

    कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण
    इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण

    सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग
    हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग

    शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी
    त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी

    ताडामाडांसह उभे स्वागता आगर
    सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर

    सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर
    आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार

    अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे
    देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे

    तृणकुसुमे शोभती देवीलागी अलंकार
    रिमझिम सनईचा आकाशी झंकार

    घन गर्जना करून गाती मंगल आरती
    विद्युल्लता तळपती तबकात जणू ज्योती

    वृक्षांच्या माथ्याला काजव्यांची रोषणाई
    कोकणकन्यांची बोडणालागी घाई

    मनःपूत कोसळती मग पर्जन्याच्या धारा
    पंचपात्रे भरभरून जणू पंचामृतधारा

    आनंदाचे झरे खळाळती हिरव्या रानी
    भरे बोडण तृप्तीचे वसुंधरेच्या सदनी

    पलिकडे मावळात वारकर्यांचे रिंगण
    इथे कोकणात भरे अन्नपूर्णेचे बोडण!

    - गौरी बावडेकर

  • दिव्य शक्ति

    व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना
    अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१//

    तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप
    नयना न जमले टिपण्या ते रुप //२//

    निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत
    कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३//

    पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध
    न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४//

    मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास
    जिव्हेला मात्र न कळे तुझा सहवास //५//

    स्पर्शांत आहेस तूं माझ्या अवती भवती
    समज न येई परंतु तुझी अस्तित्व शक्ति //६//

    इंद्रिये असमर्थ असूनी न शोधती तुला
    ये मानव रुप घेऊन दर्शन देई मजला //७//

    अथवा दे मजलागी अपूर्व दिव्य शक्ति
    समरस व्हावे तुझ्यांत हिच माझी विनंती //८//

    डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • मिठापरी जीवन

    खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ

    परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट....१,

    जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला

    केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला..२,

    तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते

    हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फूटते....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०