भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
मातेहूनही ती मोठी,
भाषा देतसे अधिक वेलांटी,!
ती आहे सृजनांत ,
सर्वांची काळी आई,
तिच्या कुशीतून जन्म घेतो,
आपण सारे, पक्षी, प्राणी, --!
ती करते जसे संगोपन,
जिवांचे नित्य जतन,
म्हणूनच तिला रोज करावा,
नेमाने आपण प्रणाम,---!
काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
जीवनातील संजीवनी,
तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!
जोडीदार आभाळाची,
विशाल त्यांचा संसार
लेकुरे उदंड जाहली,
गोकुळ सगळा परिवार,--!
माती पोटी जन्मते बीज,
आणि विशाल वृक्ष होती,
कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
हीच बिजे मातीत रुजती,--!
फळे-फुले रसरशीत,
कधी पिकून पडती,
त्यातूनच पुन्हा जन्मती
मातीतून परत वरती,--!
मानवी शरीर पार्थिव,
मातीतच शेवट अंत,
तिच्यातून असे जन्म,
तिच्यात एकरूप परत,---!!
© हिमगौरी कर्वे.
March 1, 2020
पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.
" मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः
यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् "
(जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)
क्रौंच पक्षाला मुजरा
कारुण्यामधूनी उगम पावला
आद्य काव्याचा झरा
वंदन करितो क्रौंच पक्षा
घे मानाचा मुजरा १
गमविले नाहीं व्यर्थ प्राण ते
निषाधबाणा पोटीं
टिळा लावला काव्येश्वरीनें
मानानें तुझ्या ललाटीं २
ह्रदयस्पर्शी जी घटना घडली
तडफड तव होतां
कंठ दाटूनी शब्द उमटले
पद्यरुप घेतां ३
उगम पावतां काव्यगंगा ही
वाहू लागली भूलोकी
वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा,तुका
अशांचे आली मुखी ४
काव्यप्रवाह हा सतत वाहे
कितीक जणांच्या शब्दातूनी
अंशरुपानें काव्येश्वरी ही
बरसे व्यक्त होऊनी ५
(कविता)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 11, 2012
रम्य नील अंबरी लकाकतात तारका मंद्र सप्तकातुनी सतार चंद्र छेडतो
July 12, 2026
माझं तिच्यावरती प्रेम आहे..
तिचंही माझ्यावर प्रेम आहे..
तिला व्यक्त व्हायला वेळ नाही..
हेही एक अव्यक्त सत्य आहे..।।..१
सर्वांचीच मनांतरे जपण्याचा..
तिचाच निष्पाप स्वभाव आहे..
मला ती नेहमीच गृहीत धरते..
मीही सारे सारे जाणून आहे..।।..२
मुलं,सुना,नातवंड, सासुसासरे..
शेजारी पाजारी , नातेवाईक..
सर्वांनाच नेहमी ती जीव लावते..
निरपेक्ष सर्वांसाठी जगते आहे..।।..३
धावपळीत सरतो सारा दिवस..
थकून निपचित निजूनी जाते..
अशी श्रमिका भोळी भाबडी..
तिजवर माझे नितांत प्रेम आहे..।।..४
आनंद देण्यातच , सुख असतं..
तिच्या नजरेतुन मौन ओसंडतं..
म्हणते ,आपलं नातं युगांयुगांचं..
असेच मैत्रप्रेम मी जगतो आहे..।।..५
कधीही कसलंच मागणं नाही..
इथं आपलं तसं काहीही नसतं..
सत्य तिला कळून चूकलं आहे..
निर्मोही जगणं तिला जमलं आहे..।।..६
हे निर्व्याज निर्हेतुक प्रेम लाभणं..
हेच एक , भाळीचं संचित आहे..
सुख म्हणजे दुसरं असतं काय ?..
हे मी समजून उमजून जगतो आहे..।।..७
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
(गुढीपाडवा. शके १९४३)
रचना क्र. ५६ / १३ - ४ - २०२१
May 27, 2021
आजकाला थोडेच व्यक्त होण्यात मजा आहे
इथे उगा व्यर्थ वाचाळपंचविशिचे वावडे आहे
सर्वार्थीच हितावह मंत्र , मौनं सर्वार्थ साधनम
आज इथे कुणाचेच कुणाला काय पडले आहे
संसारी रोज रोज नवनवीन समस्यांचे कोड़े
चिंतित जीवाला नित्य सामोरी जायचे आहे
विज्ञानयुगी कालचेही आज कालबाह्य ठरते
जगणे आज सर्वार्थांने सर्वापुढे आव्हान आहे
केवळ पैशानेच कां ? सुखाचे रांजण भरती
अंतरिची निर्मल निष्पाप भावना सुखदा आहे
निःसंकोची साथ मानवतेची आधार स्पंदनाना
हा सत्यार्थ जीवनाचा उमजण्यात विवेक आहे
**********
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. 322
7/12/2022
December 18, 2022
May 5, 2022
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
February 22, 2013
बदलीत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी ।
पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी ।।
बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी ।
वडिलांची नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही ।।
पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी ।
तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी ।।
गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके जागी ।
देश वेळ आणि घरे निराळी, जगलो होतो विविध अंगी ।।
शरीर देखील असेच आहे, आत्म्याचे ते छोटे घरकुल ।
मिळवित असतां सत्व तेज ते, देह सोडूनी दूजात जाईल ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 3, 2020
तप्त हृदयाला शांतवी,
त्याला मित्र म्हणावे,
रुक्ष मनाला पालवी,
त्याला दोस्ती म्हणावे,--!!!
वियोगाचे दुःख भोगी,
त्यात समजावे त्याला,
याच दुःखा हलके करुनी,
प्रेम करे, तो सखा सोबती,--!!!
संतापलेल्या मनींचे,
ओरखाडे मिटवी तो,
जो अशी साथ देई,
त्याला मित्र म्हणावे,--!!!
कडक उन्हात जो गारवा,
आपणहून जिवां देई,
हाताला धरून सावलीला,
जो स्वतः आणून बसवी,--!!!
थेंबभर अश्रू पाहुनी डोळा,
आपसूकच ज्याचे डोळे भरती, चटकलेल्या हृदयावरती,
फुंकर घालण्या जे उठती,--
अशी दोन हृदये एक असती,
त्यांनाच मित्र म्हणावे,--!!!
कोसळणाऱ्याला सावरणे,
ज्यांना ठाऊक असते ,
अवघड प्रसंगी हात देऊनी,
मैत्री अलगद आधार देते,--!!!
माहीत ज्यांना,मधाळशब्दांनी, जखमेवर औषध लावणे,
संकटात मग पुढे येऊनी,
स्वतः फक्त मदत करणे,--!!!
दोस्त असे मैत्रीस पात्र,
अशी करावी खरी दोस्ती,
थंडीत बनती उब जे,---
उन्हाळ्यात घनगर्द सावली,--!!!
अडचणीत बनती दिलासा पावसात धरती छत्र,
रक्ताचे नाते नसूनही,
जे असती एकरूप ,--!!!
अशा एकजीवी सोबतीस,
खराच मित्र म्हणावे,
मीच्याही पुढेच जाऊनी,
एकमेकां तारत रहावे,--!!!
हिमगौरी कर्वे©
June 17, 2019
छान चाललंय सगळं आपलं,
फक्त थोडंसं वातावरण तापलं,
गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,
हळूच स्मृतींच गाठोड मापलं…
इतभर सुख गोड मानलेलं,
पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,
सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,
गुपीत तरी कोणी जाणलेलं?
झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,
आयुष्य भूरर्कन निघून गेलं,
रेसलींगच्या या वाटेवरती,
नेहमी भेटलं सारख्यास वारखं…
तूं तू – मी मी करता करता,
नात्यांचा धागा झीजुन गेला,
आपलेपणाचा काळा शालू,
माणुसकीने पांघरलेला……
– श्र्वेता संकपाळ
August 21, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti