क्षण क्षणाने रंगुन गेला,?
क्षण क्षणात भंगुन गेला,?
क्षण क्षणांत रोम दाटले,?
क्षण क्षणांचे मोती झाले !?
क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,?
क्षण क्षणात चिंब न्हाले,?
क्षण क्षणांत क्षणिक झाले !?
क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,?️
क्षण क्षणात स्मृती भासले,?
क्षण क्षणात वाहत गेले !?️
क्षणात हसले , क्षणात रडले,?
क्षणात रडूनी हासू उडवले,?
क्षण क्षणांत मुरून विरले,?
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !?
-- श्वेता संकपाळ.
२७-०६-२०१९
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१
मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,
आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,
खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,
दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पोलीस दलातील श्री प्रताप गावडे यांचे मनोगत…..!! काव्यमय रुपात..!!! भाग 1
आई, बघ ना कसा हा दादा?
मला चिडवायचं हाच याचा धंदा ! ।। धृ. ।।
लग्न बाहुलीचं लावतां आम्ही
म्हणतो, नवरदेव आहे मी
आतां मलाच मुंडावळि बांधा !' ।। १।।
कधीं मोठमोठे करतो डोळे
कधीं उगाच विदूषकि चाळे
भारी खट्याळ, नाहि मुळि साधा ! ।। २।।
दादा भलताच द्वाड आहे आई !
खोड्या करून छळतो बाई
याला ओवाळायचि नाहि मी यंदा ।। ३।।
दुष्काळानंतरचा पाऊसगारवा देणारा असतो,
प्रेयसीने प्रियकराच्याजखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा...
तापलेली जमिन पावसानेथंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते,
साखरपुड्यात नववधू नेसतेतसा...
सृष्टीचे हे बदलेले रूपशेतकरी डोळेभरून पाहातो,
प्रियकर आपल्याप्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा...
शेतकर्याच्यास्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो,
प्रेयसीशीच लग्नठरल्यावर प्रियकर होतो तसा...
©निलेश बामणे
ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल.
Copyright © 2025 | Marathisrushti