महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांचा बुरख्याबाबत दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. ज्या देशात बुरखा वापरणे सक्तीचे आहे अशा इराणमध्ये एक पत्रकार माशूकअली निजाद यांनी फेसबुकवर ‘माझे गुप्त स्वातंत्र्य’ या नावाने एक मोहीम सुरू केली होती. ज्यात काही इराणी महिला आपला पडदा काढताना दाखवले होते.
February 1, 2022

वृंदावनात गायींच्या सहवासात असे
दह्या दुधाचा मटका कमरेला
गोपीकांचा सहवास असे
गोकुळातील कृष्ण सखे
नटखट नंदलाल असे
गोकुळातील कृष्ण सखे
भग्वदगीतेच्या उपदेशात दिसे
राधेच्या प्रेमात दिसे
अन् शत्रुंच्या संहारात ही दिसे
गोकुळातील कृष्ण सखे
तुझ्या माझ्या प्रेमात ही दीसे
ले... उमेश तोडकर
January 14, 2024
हा चंद्रमा शारदीय पौर्णिमेचा
शीतल चंदेरी प्रीतचांदण्यांचा
साक्ष कोजागरती कोजागरती
स्वर्गीयस्पर्श अश्विनी पौर्णिमेचा ।।१।।
गवाक्षातूनी खुणावतो चंद्रमा
मनआभाळी चांदणे नक्षत्रांचे
धुंद बेधुंद, दरवळते रातराणी
प्रीतगंधाळ तो अवीट सुगंधाचा ।।२।।
तनमनी रमती गतस्मृतींचे रावे
निरवतेत अबोली रात्र धुंदवेडी
बरसते, शुभ्र चंदेरी कोजागिरी
जागर! पुनरुपी प्रीतभावनांचा ।।३।।
दुग्धपान!अमृती मनोमिलनाचे
सौख्यानंदी पुण्यपावन सोहळा
ज्येष्ठत्वाचे हृद्य स्मरण संस्कारी
आदर्श हाच भावनिक परंपरेचा ।।४।।
हा चंद्रमाच,शारदीय पौर्णिमेचा
शीतल शुभ्रचंदेरी प्रीतचांदण्यांचा.....
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १३६
१९ - १० - २०२१.
October 19, 2021
अगणित तारे जीव जीवाणूं ।
अथांग विश्व अणू रेणू ।।
रंगरूप हे नेत्री दिसती ।
भिन्न भिन्न राहूनी जगती ।।
रस गंध दरवळे चोहीकडे ।
जगण्याचा तो मार्ग सापडे ।।
हे जर आहे रूप ईश्वरी ।
बघती त्याला आमुच्या नजरी ।।
सुख दु:ख ही त्याची निर्मिती ।
फिरे सदा आमचे भोवती ।।
निराकार निर्गुण, म्हणती त्याला ।
म्हणूनच तो साऱ्यात सामावला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 29, 2016
कितीही सारी धडपड करशी
लाचार ठरतो अखेरी
जाण माणसा मर्यादा तव
आपल्या जीवनी परी ... ।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी
जीवन असे तुझे सारे
पतंगा परि उडत राहते
जसे सुटत असे वारे... ।।
निसर्गाच्याच दये वरती
जागत राहतो सदैव
कृतघ्न असूनी मनाचा तूं
विसरून जातो ती ठेव... ।।
निसर्गाच्या मदती वाचूनी
जगणे शक्य नसे तुजला
जीवन कर्में करीत असतां
आठवित जा त्या प्रभूला... ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 28, 2019
(गझलनुमा गीत)
रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ?
लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ?
हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा
रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?
रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो
दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?
नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी
वेड असें लावतोस भक्तांना, सांग, कसें ?
फक्त स्वानुभवानेंच आकळतें हें मनुजा –
‘पांडुरंग’ नाम मना आणतसे झिंग कसे ।।
दामाजीचा ‘महार’, नाथांचा श्रीखंड्या
विठुराया, नित्यनवें वठवतोस सोंग कसें ?
पंढरिच्या भेटीनें भीमा बनते ‘गंगा’
नवल नसे - अमृत बनती तिचे तरंग कसे ।।
बह्मांडाहुन विशाल तूं, धूलिकणच मी
तरि वसशी मम हृदयीं, फेडूं तव पांग कसे ?
शीश तुझ्या चरण नत, पुरव हेंच मागणें –
शिकव - ‘जन्ममृत्युचक्र करायचें भंग कसे’ ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
July 1, 2017
मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना ।।२।।
तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी ।।३।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
सेवा शक्ति मला छळे, तुला कांहीं न कळे, ।।३।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।४।।
उभा केलेस मजला तू टाकलेल्या विटेवरी,
मग्न आई-बाप सेवेत, निघूनी गेला दूरी ।।५।।
होऊनी गेली, अठ्ठावीस युगे,
आज देखील, मी वाट बघे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 25, 2020
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com
January 25, 2019
अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्यांनी धडा घ्यावा!
September 11, 2011
स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ
आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।।
रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं
येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।।
आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची
ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ?
धर्माच्या कुर्हाडीनं आईचं तुकडं कां ?
सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ?
जातपात अन् जमात, वाढतात अंतरं ऽ
आरक्षन हें कारन, लहान-मोठं तंडलं ऽ ।।
कोन जाइल खड्ड्यात, अन् वरती राहील कोन ?
आपनऽच पडूं , जिथं आपनऽच खांदलं ऽ ।।
देश किती जाइल पुढं, करा इचार, खरा इचार
जर समदं याच्यापुढं एकोप्यानं नांदलं ऽ ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti