(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • झिम्मा

    पिझ्झा बेकतो. वास सुटतो,

    मुंबईचा राजा डिस्को खेळतो

  • सत्कर्म फ़ळा यावे

    गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे
    जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...

    सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी
    नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे...

    असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी
    सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे...

    रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी
    प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे...

    आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा
    मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे...

    गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे
    जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...

    --वि.ग.सातपुते( भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २६७

    २१/१०/२२

  • भरताची निराशा

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल.......।।धृ।।

    लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।।

    झाली होती पितृज्ञा ती ।

    पाठवी रामा वनीं ।।

    माता कैकेयीच हट्ट करिते ।

    दूजे नव्हते कुणी ।।

    कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल....१,

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।

    उंचबळूनी हृदय भरता ।

    कंठी दाटला सारे ।।

    शब्द फुटती मुखा मधूनी ।

    जे होते हुंदके देणारे ।।

    थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील....२,

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

    विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
    चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग

    नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
    परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते

    अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
    विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी

    सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
    आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार

    आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
    लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे

    कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
    जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • कुणाची लायकी ठरते कधी ना जात धर्मावर

    कुणाची लायकी ठरते कधी ना जात धर्मावर
    इथे माणूस जातो पूजला आगाध ज्ञानावर
    कुणीही उच्च अथवा नीच नाही जन्मतः येथे
    इथे तर माणसा जाती तुझ्या पडल्यात कर्मावर
    कितीदा माफ केलेले पुन्हा करणार नाही मी
    पुन्हा येऊ नको देऊ गड्या तक्रार कानावर
    तुझ्या माझ्यामधी अंतर कधीही ठेवले नाही
    तुला का आठवेना जेवलो एकाच पानावर
    उभ्या जन्मात नाही मी तुझी फेटाळली आज्ञा
    जरासा ठेव ना ताबा सख्या तू फक्त रागावर
    तुझा समजून घेतो मी अनावर राग झालेला
    खऱ्याने राहिलो नाही तिथेही मीच भानावर
    नको तो घोळ केलेला कितीदा सांग निस्तारू
    नको घालू कुणाच्याही कधी तू घाव वर्मावर
    बबन धुमाळ,
    रोहाऊस नंबर-21, रौनक व्हीला, जगतापवस्ती,
    वाघोली, पुणे 412207
    मो नं 9284846393
  • आठवण

    अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली ।

    योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली ।।

    शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी ।

    विजयी झाले ऋणाणू बंध, बांधले होते हृदयानी ।।

    उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा ।

    स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा ।।

    मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी ।

    जगण्यासाठी उभारी देतील, शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ४

    पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर चटकन विश्वास बसत नाही. पूर्वी हे कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. कृषी विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर हे कॉलेज दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न झाले.

    पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कृषी / पशुवैद्यक या शाखांना येणारा विद्यार्थी वर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारा. बर्‍याच जणांकडे थोडी बहुत शेती असायची. बहुतेकांच्या घरी शेतीच्या कामासाठी बैल आणि थोडया फार गायी, म्हशी वगैरे जनावरे असायची. काही जणांचा कोंबडयांचा व्यवसाय असायचा. बहुतेकांनी ग्रामीण भागातलं पशुवैद्यकाचं जीवन जवळून बघितलेलं असायचं. या सगळ्या पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांमधे आमच्यासारखी नावापुरती थोडी शहरी मुलं / मुली असायची. पूर्वी पशुवैद्यक शाखेकडे जाणार्‍या मुलींचा कल फारच कमी होता. ७५ विद्यार्थ्यांच्या बॅचमधे क्वचित असली तर एखाद दुसरी मुलगी असायची. आमच्या आधीच्या बॅचमधे आणि आमच्या बॅचमधे १४-१५ मुली आल्या होत्या. आता सारं चित्रच बदलून गेलंय आणि वर्गातील जवळ जवळ निम्या किंवा थोडया अधिकच मुली विद्यार्थिनी म्हणून असतात.

    पशुवैद्यकीय महाविद्यालयात मित्र मिळाले ते शहरी तसेच ग्रामीण भागातले. त्यातला १५-२० जणांचा जिगरी दोस्तांचा ग्रूप तर आयुष्यभरासाठीचं मित्र मंडळ देऊन गेला. त्यांच्यातल्या बर्‍याच जणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची आणखी ओळख होत गेली. पुढे ६ महिने इंटर्नशिपसाठी ग्रामीण भागातच विविध ठिकाणी जाऊन काम केलं. वेगवेगळ्या NSS Camps आणि extension work निमित्ताने खेडयापाडयातून फिरुन ग्रामीण भागाशी अधिक जवळीक निर्माण झाली. आमच्या बॅचमधले बरेच जण पदवी घेऊन, महाराष्ट्र सरकारच्या सेवेत दाखल होऊन, महाराष्ट्रातल्या गावांत आणि खेडोपाडी पांगले.
    आपल्याकडे पशुवैद्यकीय पेशाला अजूनही म्हणावा तसा मान नाही. गावाकडे तर गाई म्हशींचा डॉक्टर म्हटला की “ढोर डॉक्टर” म्हणूनच संभावना व्हायची. नाटकं सिनेमामधे देखील माणसांच्या डॉक्टर ऐवजी ‘ढोर डॉक्टराला’ आणून एक हमखास हशा मिळवण्याची सोय केलेली असायची. यातून सुटका व्हायचा मार्ग म्हणजे पाळीव प्राण्यांचा, ‘कुत्र्या मांजरांचा’ डॉक्टर व्हायचं. त्यामुळे शहरात प्रॅक्टीस करता येते आणि समाजात थोडा अधिक मान मिळतो. माझ्या बहुतेक सार्‍या शहरी मित्रांनी सूज्ञपणे एकतर हा मार्ग पत्करला किंवा मार्केटींग सारखे पांढरपेशी क्षेत्र निवडले. मी मात्र पशुप्रजनन या विषयामधे पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करून गाई, म्हशी, घोडयांसारख्या मोठया जनावरांच्या जगामधे प्रवेश केला. त्या निर्णयाबरोबरच माझं पुढचं बरचसं आयुष्य गाई घोडयांच्या फार्मसवर आणि ग्रामीण वातावरणात जाणार हे देखील नक्की झालं.

    पुढे नोकरीच्या निमित्ताने पुण्याजवळ तळेगावला घोडयांच्या फार्मवर दीड वर्षे आणि गुजराथमधे आणंद जवळ गाई म्हशींच्या फार्मवर साडे सहा वर्षे घालवली. फार्मवरचे कामगार म्हणजे आसपासच्या खेडयांतले गरीब खेडूत. त्यांच्याबरोबर एक होऊन दिवस रात्र काम केलं. रात्री बेरात्री त्यांच्या खांद्याला खांदा लावून गाई म्हशींची आणि घोडयांची बाळंतपणं केली. उन्हातान्हात त्यांच्याबरोबर जीपमधून फिरलो. त्यांच्या खोपटांमधे, झोपडयांमधे बसून त्यांनी प्रेमाने दिलेला गुळाचा चहा आणि चटणी भाकरी खाल्ली. भुकेच्या वेळेला जीप थांबवून रस्त्याकडेच्या टपर्यांमधे त्यांच्याबरोबर जे मिळेल ते खाणं खाल्लं. महाराष्ट्र, गुजराथ आणि पंजाबमधे कामानिमित्त खेडयापाडयांत खूप भटकलो. खेडयातलं जीवन जवळून पाहिलं, अनुभवलं.

    या सगळ्या पार्श्वभूमीमुळे सर्वसाधारण शहरी माणसापेक्षा मला ग्रामीण भागाची अधिक जान पेहचान झाली. कदाचित याच पार्श्वभूमीमुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाशी माझी तार लवकर जुळली असावी. अमेरिकेतलं ग्रामीण जीवन मी भारतातल्या ग्रामीण जीवनाच्या चष्म्यातून पाहू शकलो, समजू शकलो. कदाचित भारतीय आणि अमेरिकन ग्रामीण जीवनात काही समान धागा दिसल्यामुळे, मी तो पकडायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे वाचकांनी ठरवायचं आहे. अर्थात मी कितीही ग्रामीण भागाशी जवळीक दाखवायचा आव आणला तरी शेवटी मी एक जातीवंत मुंबईकर आहे. माझ्याजागी जर एखादा खराखुरा गावकरी किंवा हाडाचा शेतकरी असता, तर कदाचित त्याच्या लेखणीतून ही ‘गावाकडची अमेरिका’ अधिक अस्सल उतरली असती.

  • हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)

    हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
    एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।

    कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
    कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
    सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।

    काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
    काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
    जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !

    तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
    तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
    राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।

    एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
    विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
    रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
    रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।

    - - -
    ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • अन्यायाचा अंधक्कार माजतां

    आमच्या नितीन नांदगावकर साहेबांवर केलेली एक कविता. ती वाचून विषयाचा संदर्भ आपणास लागेलच. धन्यवाद.

    अन्यायाचा अंधक्कार माजतां,
    एक हात पुढे येतो,--
    जुलुमांच्या बुजबुजाटां,
    तो इतिश्री देतो,--!!!

    कुणी रडे, कुणी कळवळे,
    कुणी आपल्या जिवाला खाई, अत्याचारांचे रान माजता,
    कुणी एकदम हाय खाई,--!!!

    असा हा:हा:कार होता,
    मदतीस येईना कोणी,
    वाली कोण आपुला आता,
    जनता दहशत घेई,--?

    जिकडेतिकडे सामान्य जनता,
    धूर्त वेठीस धरती,--
    लुबाडून लाखो रुपयां,
    स्वप्न धुळीस मिळवती,--!!!

    कुणी फसवे, कुणी लुटे,
    गोड किती बोलती,
    जरा कुठे संधी मिळतां,
    हात मारुन पळती,--!!!

    अशावेळी कोण त्राता,
    जनता न्यायाला तरसे,
    शिंगरे हेलपाट्याने मरती,
    धावती घोडे घालून डाकां,--!!!

    न्यायाला टांगून ठेवती,
    पण तो आहे मर्द खरा,
    हतबलता जाणून घेई,
    कृतीने दाखवी सक्रियता, --!!!

    रंजले गांजले दुवा देती,
    आशीर्वाद हे मिळती त्याला
    दुर्जना साऱ्या, शिक्षा मिळती न्यायही बघा मिळे सर्वां,--!!!

    वाममार्ग ज्याने पत्करला,
    त्याला तर ठोकूनच काढी,
    अपार प्रेम करी जनता,
    आपला आधारच मानी,--!!!

    देव दिनाघरी धावला
    तसाच तूही बघ धावशी,
    इतरांचे ठाऊक नाही,
    मज देवदूतच भासशी,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • पुण्य संचय करा

    ज्या ज्या वेळी येई संकट,

    धांव घेत असे प्रभूकडे ।

    संकट निवारण करण्यासाठीं,

    घालीत होता सांकडे ।।१।।

    चिंतन पूजन करूनी,

    करीत होता प्रभू सेवा ।

    लाभत होती त्याची दया,

    त्याला थोडी केव्हां केव्हां ।।२।।

    संकटी येता करी पूजन,

    उपयोग होईना त्याचा ।

    कामी येईल पुण्य ,

    विचार करीतां भविष्याचा ।।३।।

    संचित पुण्य आजवरचे,

    कार्य सिद्धीला लागते ।

    सुख दु:खाच्या हर समयीं,

    ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।४।।

    --डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com