डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो,
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।।
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण,
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।।
फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते,
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।।
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला,
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।।
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते,
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते ।।५।।
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ,
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या,
गोऱ्या रंगावरी आमुच्या,
जनहो नका हो भाळू,
टपोरेआकार पाहुनी,
मोहून नका हो हाताळू,
कौमार्य फुलते आमचे,
दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद,
मगच उमलेल फूल हे सुंदर ,
येईल मोगऱ्याला बहर,
स्पर्श न करता नेत्रसुख घेता,
घ्या हो आमुचा आस्वाद,
किती थोडे आमचे जीवन,--
बघता बघता येते मरण,--!!
फुलून कोमेजणे केवळ,
एवढेच काम या धरतीवर,
अशा अल्प जीवनात,
भरून राहतो सुगंधात,
आमचा असून वाटतो,
येईल त्याला या जगात,
स्त्रीच्या लाडके आम्ही ,
नका पुरुष हो इतके जळू*,
आमच्या सुगंधेभारुन, त्याही प्रेम लागतील करू,--
फुले मोगऱ्याची देऊनी,
आपल्या प्रेमा पटवती,-!
असे मिलन घडवतो,
अहो,भाग्यवानकिती,?
हिमगौरी कर्वे.©
माहोल हा प्रसन्नतेचा
तृप्त! कृतार्थ लोचने
आभाळ सप्तरंगलेले
ब्रह्माण्ड! सारे देखणे।
मनांतरी, मीरा! राधा!
कृष्ण! कृष्ण! अंतरी
हृदयांतरी, माधुर्यभक्ती
मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी।
निरभ्र! या निलांबरी
लपंडाव, भास्कराचा
साक्षी! लोभस निसर्ग
खेळ हाच दयाघनाचा।
रूप! निरागस निर्मल
भाव! मधुरम मधुरम
नेत्री कनवाळू कैवल्य
मुक्ती मोक्षाचा सागर।
सांजआभाळ, तुष्टलेले
मेघ आठवांचेच लोचनी
भास! सोज्ज्वळ हृदयी
ब्रह्मानंदी सोहळा जीवनी।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५५.
१७ - १२ - २०२१.
-- स्वाती ठोंबरे.
जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी
कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१,
भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील
जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२,
चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत
झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत...३,
जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे
विश्वाचा तो खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली..
तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले..
तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला..
वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१
सांग मना , आज तुज जवळ काय नाही..
तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा..
वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला..
अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२
आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी..
आत्माही भाळला श्रीरंगी मंजुळ वेणूवरती..
जीव आता मुक्तीच्या त्या विरक्त वाटेवरती..
तरी कां भासते जगायचे बरेच काही राहिले..।।..३
जन्मासंगेच मृत्यू , हेच सुर्यप्रकाशी सत्य..
त्या सत्याची दोरी त्या अनामीकाच्या हाती..
युगायुगांची पराधिनता ही तुझीच रे मानवा..
हव्यास कशाला अजुन काही जगायचे राहिले..।।..४
©️ वि.ग.सातपुते..(भावकवी)
9766534908
रचना क्र.५१/ २-४-२०२१
चकित झाले गोकूळवासी
बघून बाललीला
सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
विचारी यशोदेला ।।१।।
प्रासादातील मोदक खातां
तोंड ते उघडले
मुखामध्ये मोदक नसूनी
ब्रह्मांड ते दिसले ।।२।।
उच्छाद मांडूनी कालीयाने
पाणी केले दुषित
मर्दन करण्यासाठीं त्याचे
उडी टाकी डोहात ।।३।।
पूतना असूनी राक्षसिण
स्तनांत होते विष
स्तनपान करुनी त्यानें
तीला केले कासाविस ।।४।।
खोड्या बघूनी यशोदेनें
उखळाला बांधले
उखळासहीत झाडे पाडूनी
चकीत त्यानीं केले ।।५।।
अनेक अशा लीला करुनी
अचंब्यात पाडले
बालमुर्ति तो ईश असूनी
सर्वांस गुंगविले ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गरिब सुदामा बालमित्र तो, आला हरीच्या भेटीला
बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।
छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।
काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शेवटी साथ जर पाहिजे
माणसांची कदर पाहिजे
तूच असशील ज्याच्यामधे
स्वप्न ते रात्रभर पाहिजे
जीव तर लावतो गाव पण
माणसाला शहर पाहिजे
कर्जमाफी नको उद्धवा
शेतमालास दर पाहिजे
जीव होईल वेडापिसा
फक्त पडली नजर पाहिजे
फक्त एका क्षणाची नको
साथ आयुष्यभर पाहिजे
तू असे चुंब की आठवण
राहिली जन्मभर पाहिजे
काल होता हवा पायथा
आज त्याला शिखर पाहिजे
जी हवी ती दवा दे मला
व्हायला बस् असर पाहिजे
भोवती लाख असतात पण
आपला एकतर पाहिजे
- महेश मोरे (स्वच्छंदी)
9579081342
Copyright © 2025 | Marathisrushti