प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.
जनतेच्या सर्वाधिक आशा ज्या न्यायसंस्थेवर केंद्रीत असतात तिथेही भ्रष्टाचार चालतो. मागे सर्वोच्च न्यायालयानेच तशी कबूली दिली होती. तस्करीच्या आरोपाखाली अडकलेल्या अविनाश भोसलेला रात्रीतून जामिन कसा मिळू शकतो?
वारसा ही जतन करण्याचीच गोष्ट नव्हे तर संवर्धन करणंही त्यात अपेक्षित आहे. संवर्धनासाठी जतन आवश्यक. वारसा मग तो कोणताही असो सांस्कृतिक, नैसर्गिक त्याची वर्षावर्षाला घसरण होत चाललीय. शास्त्रीय संगीत नामशेष होत चाललं असून “स्त्री” या विषयाभोवती संगीत पिगा घालीत आहे. सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचे भावनिक प्रसंगाच सोनं करणारं संगीत आजही काहींच्या मनावर राज्य करुन आहे म्हणून “जतन” संवर्धनाच्या थोड्या आशा आहेत.
मुलींची जबाबदारी सरकारणे घ्यायला हवी. हे झाले मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत पण श्रीमंत वार्गाला एकच आपत्य हवे असते ते आपत्य ही मुलगा असावा अशी काहींची इच्छा असते. यातूनच त्यांच्याकडून मुलींचा गर्भात असतानाच जीव घेण्याचे प्रकार घडतात. मुलगा आपली म्हातारपणी काळजी घेईल या खोट्या आशेवर जगत असणारे मुलाचा अट्ट्हास करीत असतात.
तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत.
आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?
वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात.
हा लेख तुम्ही वाचत असाल तोपर्यंत भारताच्या मा. राष्ट्रपतींचा देशातील पहिला नागरी सत्कार आटोपलेला असेल. त्यांच्या गृहनगरीला हा सत्कार घडवून आणण्याचा मान मिळत आहे.
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
कधी-कधी योग्य बाबी अयोग्य प्रकारे हाताळल्यास त्याचे परिणाम किती विपरित होऊ शकतात, याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून आपल्या लोकशाहीप्रधान शासन व्यवस्थेकडे अंगुलीनिर्देश करता येईल. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा समजला जातो. परंतु आपल्याकडे हे विकेंद्रीकरण करताना देशाच्या हिताला, विकासाला दुय्यम महत्त्व दिले गेले.
Copyright © 2025 | Marathisrushti