(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भाजपला झाले तरी काय?

    लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.

      August 30, 2009


  • नितीन गडकरी आणि Route 66

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले.

      August 6, 2016


  • स्वच्छता

    स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

    साधी गोष्ट असते बसमधून उतरल्यावर लगेच तिकीट तेथे फेकणे. चणे-दाणे खाऊन कागद रस्त्यातच फेकणे. सिगारेट-विडी ओढून ती थोटके रस्त्यात फेकणे, वरच्या मजल्यावरून केसांचा गुंता टाकणे. अशा तऱ्हेने काम झाल्यावर त्या वस्तू निरुपयोगी होतात म्हणून त्या रस्त्यात फेकून जणूं तुम्ही तुमच्या अस्वच्छतेचा दाखलाच देत असता.

    आता आपण पाहतो, ४/५ मजली इमारती असतात. या आमच्या अशिक्षितच काय, पण सुशिक्षित बायकाही वरच्या मजल्यावरून केर खाली टाकतात. सकाळी फिरायला जाताना बघावे, गॅलऱ्या धुणे चालते. यातून आपला बचाव करत चालावे लागते. वरून खरकटे पाणी अंगावर कधी पडेल ते सांगता येत नाही. तुम्ही त्यांना काही बोलाल तर म्हणतात; त्यातले कण चिमण्या, उंदीर खातील. तुम्ही कशाला काळजी करता?

    अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, पण आमचे चांगले सुशिक्षित गृहस्थ त्या पाटीवर थुंकून तिलाच रंगवून पुढे गेले. बायका पिशवीत किंवा कागदात केर भरत नाहीत. अंडी, मासळी इ. सर्व केर रस्त्यात टाकतात. त्यावर माशा बसतात. उंदीर, घुशी, कुत्री यांचा सुळसुळाट होतो. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरून हवा दूषित होते.

    आमच्या भागात पोलीस कॉलनी आहे. येथे नेहमी पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. त्यांनी स्वच्छतेचे धडे लोकांना द्यावे असे म्हणावे तर हेच गाडीत बसून पान खाऊन रस्त्यावर थुंकत असतात. रस्त्यात पाण्याची बाटली घेऊन तोंड धुतात. तुम्हीच सांगा, ज्यांना स्वतःला शिस्त नाही ते दुसऱ्याला शिस्त काय लावणार?

    सर्वच पोलीस वाईट नसतात, त्यांतही काही आदर्श भेटतात. मध्यंतरी डोंबिवलीत राहणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर रूपाली आंबोरे यांनी स्वतःच्या बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर साफ करायला हातात झाडू घेतलेला पाहून थोरामोठ्यांनी हातात झाडू घेऊन ह्या स्वच्छतेत भाग घेतला. आता दर रविवारी सर्व जण स्वच्छता करून आपला परिसर स्वच्छ ठेवून मन प्रसन्न ठेवीत आहेत.

    अशा वेळी गाडगे महाराजांना आणि म. गांधींना विसरून चालणार नाही. स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, संडाससुद्धा साफ करून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान सुरू केले. स्वतः हातात झाडू घेऊन आपला परिसर साफ केला. बरेच मोठमोठे लोक त्यात सामील झाले. काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी कोणी नेते येणार म्हटले की, आधीच स्वच्छता करून ठेवली जाते. २/४ कागद ठेवले जातात. चला, फोटो काढून पेपरात आला हे महत्त्वाचे.

    स्वच्छता राखण्यासाठी दर वेळी सांगितले जाते की ओला कचरा, सुका कचरा बाजूला ठेवा; पण किती जण असे करतात? काही गावांमध्ये कचरा न्यायला गाडी येते. घंटेचा टण् टण् आवाज आला की ताबडतोब लोक हातात कचऱ्याच्या बॅगा-डबे घेऊन तेथे हजर राहून कचरा गाडीत टाकतात. नोकरीवाले लोक कचऱ्याच्या बॅगा खाली आणून ठेवतात. तेव्हा तो गाडीतून नेला जातो. त्यामुळे ही गावे बरीच स्वच्छ दिसतात. बागेत, नाट्य-सिनेमागृहाबाहेर व काही रस्त्यावर 'माझा खाऊ मला द्या' असे लिहिलेले विशिष्ट आकाराचे डबे ठेवलेले असतात. त्यामुळे बरेच लोक त्यांत केर टाकून आपण शिस्तशीर आहोत असे दाखवतात. काही बायका रेल्वेच्या डब्यात कधी चॉकलेट, कधी फळं खातात, भाज्या निवडतात; पण तो केर प्लास्टिक पिशवीत साठवून केराच्या टोपलीत टाकतात. आता तर बगीचे, समुद्रकिनारे साफ राखण्यासाठी रोबोचा उपयोग केला जाणार आहे. अशा तऱ्हेने स्वच्छता दिसली तर आपली मान गर्वाने उंचावेल.

    अशा ह्या कचऱ्यामुळे रस्त्यातून कुत्री, मांजर, उंदीर, घुशी हिंडू लागले. त्यातून हल्ली प्लास्टिक पिशव्यांनी तर कहरच केला आहे. गटारे तुंबू लागली, ठिकठिकाणी पिशव्यांचे ढीग दिसू लागले. अशा अस्वच्छतेअभावी स्वाइन फ्ल्यू, मलेरिया, टायफाइड, काविळीसारखे महाभयंकर रोग होऊ लागले. आपल्या नद्या पाहा, सतत गाळाने भरलेल्या. त्यांत गिरण्यांमधून रासायनिक पदार्थ टाकले जातात. गणपती विसर्जनावेळी नदी, विहीर, समुद्रात विसर्जन करून पाणी दूषित केले जाते. नाट्यगृह, सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेऊन तेथे सांडले की तेथे उंदीर व डासांची पैदास होते. मंदिरात देवावर दूध घालतात. स्वच्छतेअभावी दूध नासून हवा दूषित होते. अशी कितीतरी उदाहरणे द्यावी तेवढी थोडी आहेत.

    ही इतर स्वच्छता झाली. त्याबरोबर शारीरिक व मानसिक स्वच्छतेकडे पण लक्ष ठेवले पाहिजे. लहान मुलांना भूक नसताना बळे-बळे खायला घालणे. अखेर तो ओकला तर नीट न पुसणे. सगळ्या माशा तेथेच काय, मुलांच्या अंगावरही घोंगावत असतात. इतर पदार्थावर बसतात. आता मुले बाहेरून खेळून आली की हातपाय धुणे, रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, बाहेरचे कपडे घरी आल्यावर बदलणे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मुलांना घरीच स्वच्छतेचे धडे देऊन तिचे फायदे सांगितले पाहिजेत. म्हणजे औषधाला दूर ठेवले जाईल म्हणूनच म्हटलं आहे, स्वच्छता म्हणजे मेकअप करून अथवा परफ्युम लावून स्वच्छ होणे नव्हे.

    शरीराबरोबर मनाचीही स्वच्छता पाहिजे. खेळ म्हटले की, कोणीतरी जिंकणार; कोणीतरी हरणार. हारही स्वीकारायची तयारी पाहिजे. परीक्षेत गुण कमी मिळाले तर आपण कोठे चुकतो याचा विचार करावा. लोकांबद्दल वाईट विचार मनात येऊ देऊ नये. शिंक आली, खोकला आला तर रुमाल समोर धरावा. आपले मन स्वच्छ असेल तर वाईट विचार कधीच मनात येणार नाहीत.

    दुसऱ्या देशात गेल्यावर तिथली स्वच्छता बघितली की आपल्या देशाची लाज वाटते. तेथे दंड केला जातो. त्यामुळे लोक आपोआप सुधारले आहेत. त्यांच्याकडे स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम असे शब्द वापरावे लागत नाहीत. आपल्याकडे दक्षिणेत गेले तर देवळे किती स्वच्छ असतात. मी पाँडेचेरीला गेले होते तेथील ऋषितुल्य, अरविंदबाबू आश्रम खूपच स्वच्छ होता. हे पाहून असे म्हणावेसे वाटते 'स्वच्छता द्यावी सदा मनाची, आरोग्य लाभो सदा शांतिसुखाचे.'

    शेखर आगासकर

      November 20, 2023


  • शाश्वत विकास का अडला?

    ज्या वाटेने जाऊन आजपर्यंत सगळ्यांचाच कपाळमोक्ष झाला आहे, त्याच वाटेने जाऊन आपल्याला मोक्ष मिळेल, ही आशा केवळ भाबडीच नाही तर प्रचंड अज्ञानमुलक म्हणावी लागेल. परंतु देशाचा गाडा हाकणारे अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी( देशाचा गाडा लोकनियुत्त* सरकार चालविते, हीदेखील मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रद्धा किंवा अफवा आहे) हे समजून घ्यायलाच तयार नाहीत.

    बदल आणि गती हे दोन्ही घटक परस्परपुरक आहेत.

      February 14, 2010


  • आधुनिक आक्रमण!

    प्रकाशन दिनांक :- 28/03/2004

    नित्य नवीन बदलांना स्वीकारीत काळ झपाट्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य कोणता तरी नवा बदल घेऊन येत आहे. काही बदल अगदी सहज जाणवण्याइतपत ठळक आहे तर काही बदलांची प्रक्रिया अतिशय सुक्ष्म आहे.

      March 28, 2004


  • गृहरक्षक दलाचा सन्मान जपा!

    शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विषण्ण झालेल्या आर. आर. पाटलांनी या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गृहरक्षक दलाची मदत घेण्याच्या विचारात असल्याचे विधान नुकतेच केले.

      January 1, 2006


  • संवादाचं सुख

    परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते.

      March 23, 2022


  • घात सेनेचा झाला की मराठी माणसाचा?

    शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.

      November 1, 2009


  • करा उद्योग भरा कर!

    प्रकाशन दिनांक :- 31/10/2004

    ‘अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत म्हणून अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे’, एका नामवंत अर्थशास्त्रज्ञाचे हे विचार पुरेसे बोलके आहेत. एखादे राष्ट्र संपन्न होते ते केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीमुळेच, हा ठाह चुकीचा आहे.

      October 31, 2004


  • नाग पंचमी : एक चिंतन

    श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.

      August 5, 2017