(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

    मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.

    ‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’

    खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.

    ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

    सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

    थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

    थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.

    नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....

    मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.

    जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

    गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

    मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

    माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.

    म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

    ‘‘ कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत

    अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत.’’

    -- डॉ. दत्ता कोहिनकर यांचा हा लेख फेसबुकवरुन फॉरवर्ड केला आहे.

  • मैत्र जीवाचे

    मित्रभाव ही माणसामाणसांमधली सर्वात सुंदर भावना आहे… आपुलकी, विश्वास, प्रेम आणि सुरक्षितता जागवणारी… सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. आणि प्रसिद्ध लोकही यातून सूटलेले नाहीत. त्यांच्या अवतीभोवती सतत लोक असतात पण ते त्यांचे खरे मित्र नसतात.

  • भारनियमन नव्हे देशद्रोह!

    28रविवार, ऑक्टोबर 2007

    छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.

  • कबीर आणि risk

    मुंगेरीलाल स्विमिंग शिकायला स्विमिंग पुलवर आला. खोल पाणी पाहून घाबरला.
    पण कोचने धीर दिला, म्हणाला, ” मी तुला पोहायला शिकवेन. घाबरू नकोस. पाण्यात उडी मार!”
    जीव मुठीत धरून मुंगेरीलालने पाण्यात उडी मारली आणि व्हायचे तेच झाले. मुंगेरीलालने पाण्यात गटांगळ्या खायला सुरुवात केली. नकातोंडात पाणी गेले. जोरात ठसका लागला. कोचने त्याला काठावर आणले.
    मग मुंगेरीलालने एक प्रतिज्ञा केली,
    ” जोवर मला स्विमिंग येत नाही तोवर मी पाण्यात उतरणार नाही!!”
    आज मुंगेरीलाल ८० वर्षांचा आहे. अजूनही त्याला स्विमिंग येत नाही.
    आपली अवस्थाही अशीच होते. पाण्यात उतरायची हिंमत होत नाही आणि कोणत्याच लाटेवर स्वार होता येत नाही, कोणतही यश मिळत नाही.

  • अमिताभचे वडील

    प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन रोज सकाळी फिरायला जात असत. त्यांच्या रस्त्यात एक मोठा दगड पडलेला होता. हा दगड अनेकांच्या पायात येत होता. पण तो खूप मोठा आणि जड असल्यामुळे कोणीच हलवू शकत नसे. पण हरिवंशराय ह्यांनी तो स्वतःला जमेल तसा रोज थोडा थोडा हलवला आणि एक दिवस रस्त्याच्या कडेला नेला. वास्तविक त्यांचा मुलगा मेगास्टार होता. त्याला सांगून हा दगड हलवता आला असता. पण स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे हा हरिवंशराय ह्यांचा स्वभाव होता. त्यांच्या ह्याच कृतीचा त्यांच्या मुलावर प्रभाव पडला आणि तोही अथक प्रयत्न करून भारतातील सर्वात मोठा अभिनेता बनला. आपण ज्या अमिताभचा करिष्मा अनेक वर्षे पाहत आहोत, त्याच्या मागे हरिवंशराय ह्यांचीच प्रेरणा आहे. अमिताभ ह्याने अनेक मुलाखती, कार्यक्रमामधून तसं व्यक्तही केलं आहे.
    म्हणून अमिताभ आणि हरिवंशराय ह्यांच्यातील नाते आजच्या फादर्स डे निमित्ताने जरूर पाहायला हवे.

  • कापूस ठरला शेतकर्‍यांचे कफन!

    छोट्या शेतकर्‍यांच्या समस्यांकडे सरकार जाणीवपूर्वक वागत आहे आणि त्यामुळे तर शेतकर्‍यांनी शेती सोडावी किंवा आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करत आहे. कापसावरील निर्यातबंदीच्या आणि गरिबांना मोफत किंवा स्वस्तात धान्य या निर्णयाकडे त्या दृष्टीनेही पाहता येईल.

  • प्रेमाचा ओव्हरडोस

    मी आज ज्याविषयी लिहीणार आहे ते वात्सल्य किंवा ममता या सदरातील पालकांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम या बाबत आहे. जगातील प्रत्त्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते. पण सध्या आसपास जर पाहिले तर या प्रेमाचा ओव्हरडोस किंवा अतीरेक होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

  • कल्याण-डोंबिवलीचं “कल्याण ” झालं !, तुमच्या शहराचंही होणार!!

    काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्या नादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर, bankbook वैगरे करायला निघाले. मुंबईत लघुशंकेला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला.
    अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण-डोंबिवली शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. इथे सत्ता कोणाचीही असो, प्रत्येकाने कल्याण डोंबिवलीकरांचं “कल्याण” करून टाकलं.
    ह्या शहराची मजेदार सफर घडवत आहेत निरेन आपटे.

  • प्रेरणेच्या पायवाटा

    छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.

  • मायेचा पाश!

    आपल्या देशाच्या लोकसंख्येने शंभर कोटीचा आकडा केव्हाच पार केला आहे. ही वाढती लोकसंख्या सरकारला संकट वाटत आहे. एका दृष्टीने पाहिले तर ते संकटच आहे.