(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मूर्ख आणि शहाणे! शिका!

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

      October 6, 2002


  • सामूहिक दायत्वाची गरज!

    करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे?

      March 21, 2020


  • कोण जिंकले कोण हारले?

    प्रकाशन दिनांक :- 24/10/2004

    राज्य विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीचे फलित, त्याचे राजकीय परिणाम असे झाले असते तर तो पडला असता, तसे झाले असते तर हा आला असता, याच्यामुळे हा पडला, त्याच्यामुळे तो पडला, या जातीने त्याला मतदान केले, त्या जातीने याला मतदान केले, कुणाचे गणित कुठे चुकले, कुणाचे जुळून आले, या आणि अशाच प्रकारच्या चर्चांचे रवंथ सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीचा खरा अर्थ, निवडणुकीची खरी उपयुक्तता, निवडणुकीचे पावित्र्य या चर्चेच्या गदारोळात कुठेतरी हरवून गेलेले असते.

      October 24, 2004


  • निर्लज्ज

    भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...

    आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...

    माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!

    त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...

    आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...

    त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!

    रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...

    तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली

    तरीही मला लाज नाही वाटली ....

    लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!

    बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

    बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!

    एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

    फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

    मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

    त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!

    समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...

    पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...

    शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...

    प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!

    गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

    आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...

    डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!

    २६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...

    पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

    त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...

    माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

    आणि अजूनही मला लाज नाही वाटत....

    माझ्या निर्लज्जपणाची...!!!

      February 27, 2017


  • कोती : समाजातील तृतीय पंथीय मुलाची ह्रदयद्रावक कहाणी

    समाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो.

      June 16, 2020


  • नवा विचार नवी दिशा!

    एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल.

      July 24, 2005


  • बहिष्काराचे शस्त्र उपसा !

    बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ  लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्‍यांचे फावत असते.

      May 27, 2013


  • ओम पुरी नावाचा मच्छर

    आोम पुरी नावाच्या खटमलचा समाचार घेणारा हर्षद बर्वे यंचा हा लेख. खरंच अशा माणसांवर बहिष्कारच टाकायला पाहिजे. दोनचार सिनेमे चालले की यांच्या डोक्यात जातात. आणि मग कोणत्याही विषयावर बोलायला लागतात…

      October 21, 2016


  • व्यवस्थेचे बळी!

    प्रकाशन दिनांक :- 11/07/2004

    अलीकडील काळात आत्महत्यांचे प्रमाण अतिशय वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, पोलिसासारख्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि लहान-मोठे उद्योजकदेखील आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग चोखाळत आहेत. या घटना समाजाच्या सुदृढतेचे लक्षण आहेत, असे खचितच म्हणता येणार नाही.

      July 11, 2004


  • एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….

    मंडळी नमस्कार ....
    आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत... या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती....

    या ऊपक्रमाचे नाव आहे....

    " एक बाटलीभर पाणी.... एका झाडासाठी...."
    " One Bottle Water..... For one Tree ......"

    मंडळींनौ... या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला .... कार्यालयाच्या आजुबाजुला... व जाता... येता.... असलेल्या कोणत्याही लहान मोठ्या झाडांना किमान 2.5 लिटर च्या बाटलीने पाणी घालायचे आहे... थोड अजबच वाटेल... पण पहाना... आपल्या अवती भवती असलेल्या झाडांना जर भरपुर पाणी या ऊन्हाळ्यात मिळालच तर ही नामशेष होत चाललेली वृक्ष संपदा टीकुन राहीलच आणि आपल्या मार्फत होणाऱ्या प्रदुषणाच्या मोबदल्यात प्रत्येक झाड किमान बाटलीभर मिळालेल्या पाण्याने नक्कीच आपले प्रदुषण सोसुन भरभरून आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणावर "स्वच्छ प्राणवायु" नक्कीच देईल... आपल्या सहकार्याने जर प्रत्येक वृक्षाला दररोज पाणी मिळाले तर येणाऱ्या पावसाळ्यात नक्कीच भरपुर पाऊस पडुन आपल्याच शेतकरी बांधवांना याचा मोबदला मिळेलच...

    आपण आता हा ऊपक्रम हळुहळु वाढवण्यास प्रारंभ करुच.... व तुम्ही ईतरांनाही या ऊपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे... हीच मनापासुन नम्र व कळकळीची विनंती...... बळजबरी अजिबात नाहीच... पण हक्काची हाक....

    आपले वृक्षमित्र.....

    -- विवेक जोशी
    अवधुत कुलकर्णी

      March 10, 2016