हा देश आपले, आपण निवडून दिलेले सरकार चालविते या भ्रमात जनतेने राहण्याचे कारण नाही. या देशावर पूर्वी ब्रिटिशांची थेट सत्ता होती, आता बहुराष्ट्रीय कंपन्यांची अप्रत्यक्ष सत्ता आहे. मालक बदलले असले तरी हा देश गुलाम आहे, हे सत्य बदललेले नाही.
कोथरूड येथील दृष्टिहीनांसाठी, सर्वसमावेशक निवासी’ शाळा एकदा तरी भेट द्यायला हवी अशीच आहे. गांधी भवन, कोथरूड येथे ही शाळा आहे. डोळे असले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, हे येथील विद्यार्थ्यांकडून व त्यांनी केलेल्या वस्तू पाहून नक्कीच म्हणता येईल. केवळ वस्तूची निर्मिती नव्हे तर विक्री करून अर्थार्जनसुद्धा इथे केले जाते.
‘व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो’, असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.
स्वातंत्र्याचे साठावे वर्ष सगळ्याच नेत्यांनी ‘चिंता वर्ष’ म्हणून साजरे करायचे ठरविलेले दिसते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंता व्यत्त* करताना दिसत आहे. ज्याला कोणताच विषय सुचत नाही त्याच्यासाठी ‘शेतकऱ्यांची दयनीय अवस्था’ हा विषय ठेवलेलाच आहे.
एक पौराणिक कथा आहे. रघुराजाच्या दरबारात एक याचक आला. त्या याचकाने मागितलेले दान देण्याइतकी संपत्ती रघुराजाच्या खजिन्यात नव्हती. काय करावे, ही चिंता रघुराजाला पडली. याचक दारातून विन्मुख होऊन जाणे त्याकाळी अपमानास्पद समजले जायचे. याचकाला संतुष्ट तर करायचे होते, परंतु खजिन्यात तेवढे द्रव्य नव्हते. शेवटी एकच पर्याय होता.
अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.
आजच्या घराघरातील आई-वडिलांना खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ‘आमची मुलं बिघडली हो’ असा आक्रोश करण्याची वेळ येणार नाही आणि ‘सातच्या आत घरात’ सारखे चित्रपट निर्माण करण्याची गरजच भासणार नाही !
अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं.
एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या दिवसापासूनच खात्री वाटू लागली ! दुकान तयार होऊन बरेच दिवस झाले तरी त्याचा शुभारंभ का होत नाही याबद्दल उत्सुकतेपोटी चौकशी केली तेव्हा कळलं की ‘गुरुमहाराज’ जे अक्षर ठरवतील त्या अक्षरापासूनच दुकानाचं नाव निश्चित होईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी काढलेल्या कर्जावरील महागड्या व्याजाचं मीटर फिरू लागलं आणि तब्बल एक महिन्यानंतर दुकानावर पाटी झळकली. पण तरीही दुकान सुरू होण्याचं काहीही चिन्ह दिसेना. तोटा झाला तरी चालेल, पण गुरुमहाराजांनी मुहूर्त ठरवल्याशिवाय दुकान सुरू करायचं नाही असा निर्णय घेण्यात आल्याचं कळलं.
अखेर महाराजांनी मुहूर्त पक्का केला आणि तब्बल तीन महिन्यांनंतर दुकानाचा शुभारंभ झाला. ग्राहकांच्या गरजांपेक्षा गुरूंच्या सल्ल्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाराजांच्या मठाकडे दुकानमालकाच्या चकरा वाढल्या व त्याचे दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अनेक ‘हितचिंतकांच्या’ अपेक्षेनुसार हळूहळू आचके देत दुकानाने एक दिवस शेवटचा श्वास घेतला व त्याचे शटर खाली ओढण्यात आले.
असे आम्ही कसे? वैचारिक स्पष्टतेला महत्त्व देण्याऐवजी भावना, प्रेम, विश्वास, श्रद्धा, व्यवहार या गोष्टींची सरमिसळ करत व वैचारिक गोंधळात गटांगळ्या खात आम्ही जाणूनबुजून आमच्या आयुष्याचं दिवाळं का काढतो? आयुष्यात प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असणे आवश्यक आहे याबाबतीत दुमत असू शकत नाही. पण म्हणून आपल्या सगळ्यांसारख्या हाडामांसाच्या एखाद्या सामान्य माणसाला ‘महाराज’ ही उपाधी चिकटवून त्याच्या किती आहारी जायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? ‘महाराजांच्या सल्ल्याशिवाय आमच्या घरातलं पानही हलत नाही,’ असे कौतुकाने ओथंबलेले शब्द अनेक घरांमधून जेव्हा ऐकू येतात तेव्हा मती गुंग होऊन जाते.अशा घरांमधील कर्त्या माणसांनी स्वत:च्या डोक्याचा, विचारशक्तीचा व निर्णयशक्तीचा वापर करणे कायमचे थांबवून टाकले असेल का? एखाद्याला देव्हाऱ्यात बसवून त्याच्याकडे आपली अक्कल आणि अख्खं आयुष्य गहाण टाकण्याइतकं कोणाचं आयुष्य स्वस्त असतं का? इतर कुणाहीपेक्षा आत्मपरीक्षणाला आपला खरा गुरू मानून व आत्मविश्वासात अफाट वाढ करून जर प्रगतिपथावर दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली तर घरोघरी विवेकानंद निर्माण होण्यास किती वेळ लागणार आहे?
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.
Copyright © 2025 | Marathisrushti