(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वंश

    वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू शकतो कि, हा लेख ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असे हे लोक आहेत.

    ज्या लोकांना भ्रूण हत्येची भीती वाटते असे लोक अश्या पणत्याना उकिरड्यावर फेकतात, अथवा अनाथ आश्रमामध्ये रवानगी करतात, किव्वा घरात पणत्यांची आरास तयार करतात. आता इतक्या पणत्या घरात आल्यावर त्यांच्या उजेडात हा वंशाचा दिवा कोणते दिवे लावणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

    यातील बहुतेक पणत्या पिताश्री घाटावर जाईपर्यंत सासरी जात नाहीत, कदाचित त्या न जाण्यामुळेच चिंतेने हाय खाऊन पिता यमाच्या दरबाराकडे प्रस्थान करतो, आणी या वंशाच्या दिव्याला अग्नी देण्याचे दिव्य कर्तव्य बजावावे लागते.

    खऱ्या अर्थाने कथा इथे सुरु होते, मागे राहिलेल्या कुटुंबाची बाप जिवंत असताना सुरु झालेली ससेहोलपट वेग धरू लागते. मुली सासरी न जाता वडिलांचा अर्धवट संसार आपल्या माऊलीकडे व या दिव्याकडे पहात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नशिबाला दोष देतात.

    आजच्या जगात पणत्या काय कमी सक्षम आहेत का? त्या सर्व ठिकाणी खांद्याला खांदा भिडवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत, मग त्या काय अग्नी देण्यासारखी क्रिया करू शकत नाहीत? आजकाल वर्तमानपत्रात मुलीनी आपल्या वडिलांना अग्नी दिला, अश्या बातम्या वारंवार छापून येत आहेत, हे समाज परिवर्तनाचे सुंदर उदाहरण आहे, यालाच आपण धर्म मानला पाहिजे. मुक्ता दाभोळकर, पंकजा मुंडे, यांच्या सारख्या असंख्य मुलींनी समाजविरोध पत्करून आपल्या पित्याला अग्नी दिला, यांनी २१व्या शतकातील आदर्श प्रथा सुरु केली असे वाटत नाही का? या महिलांचा आदर्श समाजाने सशर्त स्वीकृत केला पाहिजे, आणि अश्या मुक्ता, पंकजा प्रत्येक घरात जन्माला आल्या पाहिजेत.

    ज्या काळात अग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा अस्तित्वात आली, त्या काळी कुटुंब नियोजन प्रथा अस्तित्वात नव्हती, पाच ते आठ अपत्य असणे हेच कुटुंब नियोजन मानले जात असे, त्यामुळे त्यात किमान एक मुलगा जन्माला येतच असे. एकंदरीत, त्या काळी मुली, व बायका घराबाहेर फारश्या जात नसत, त्यामुळे मुलगे अग्नी देण्याचे काम बजावत असत, यात कोणताही कर्मकांडाच्या भाग नाही, तर ही एक सर्वसामान्य रूढी होती.

    केवळ अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे असे म्हणून सर्व घरावर देशोधडीला लागण्याची पाळी येऊ देऊ नका असे या लेखाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे, त्याच बरोबर हे हि सांगणे अपरिहार्य आहे कि, अश्या बऱ्याच प्रथा आपण मागे सोडून दिल्या आहेत, हे एकविसाव्या शतकातील लोकांनी विसरायला नको.

    हे लक्षात राहूद्या स्थल-काल-परत्वे ज्या मुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे, अश्या पौराणिक प्रथा व परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तसेच नवीन लोकहित प्रथा अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच लोक धर्माकडे आदराने पाहतील. धर्म म्हणजेच रूढी परंपरा काळानुसार तयार करून त्या नुसार जगणे, यात काही रूढी हजारो वर्षांपूर्वी योग्य असतील, पण आज त्यांची गरज नाही, तर त्या एक तर सोडून द्याव्यात, किव्वा त्यात काळानुसार बदल करावा.

    डार्विन ने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे, यात जो सक्षम आहे तोच जिवंत राहतो आणी सक्षम तोच असतो जो आपल्यात निरंतर बदल घडवितो. धर्मातही आज उत्क्रांतीची नितांत गरज आहे, अन्यथा कर्मठ, अघोरी धर्म डायनासोर सारखे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.

    धन्यवाद
    विजय लिमये (9326040204)

  • ऊर्मीला एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व

    संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.

  • “मोले घातले रडाया….”

    एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.

  • कोण म्हणतो भारत गरीब आहे?

    सध्या भारतीय लोकांना कोणत्या प्रश्नाने अस्वस्थ केले आहे, असा प्रश्न कुणी विचारला आणि तुम्ही महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यापैकी एक किंवा हे सगळेच उत्तर पर्याय म्हणून निवडले, तर दोनच गोष्टी सिद्ध होतील आणि त्या म्हणजे एक तर तुम्ही भारतात राहत नसावे किंवा भारतात राहूनही तुम्हाला भारतीय लोकांची अजिबात ओळख पटलेली नसावी.

  • एक सामान्य करदात्याच पत्र

    मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात.

  • हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन 

    हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्‍त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत.

  • प्रथम आम्ही भारतीय आहोत..!

    प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…!

    भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’

    भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची उन्नती –अवनती आहे, हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे.आम्हाला कितीही जन्म मिळाले तरी, मातृभूमिचे ऋण मात्र आम्ही फेडू शकत नाही. परंतु त्या ऋणांची जाणीव ठेवून, मातृभूमीसाठी काही करता आले तर, ʻʻस्वातंत्र्ययज्ञात प्राणाहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल .ʼʼ

    भारतमातेच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या हृदयात लक्ष-लक्ष भावनांचे हिमालय उचंबळून येतात. आपल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी हक्काचे स्थान असले की, राहवत नाही. हृदयातील प्रेमभरतीला शब्दांचे स्वरूप प्राप्त होते. हेच शब्द आपल्या विचारांचे प्रकटीकरण ठरावे. हे प्रकटीकरण कोणावर आरोप-प्रत्यारोप करणारे, अश्लील, असभ्य नसावे. तसेच भारताची एकता, एकात्मता, अखंडता, सुरक्षितता, संप्रभूता, विविधता, सार्वभौमिकता यांना बाधा पोहचविणारे नसावे ही मनापासून अपेक्षा आहे.

    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

  • सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

    मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.

    ‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’

    खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.

    ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

    सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

    थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

    थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.

    नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....

    मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.

    जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

    गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

    मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

    माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.

    म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

    ‘‘ कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत

    अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत.’’

    -- डॉ. दत्ता कोहिनकर यांचा हा लेख फेसबुकवरुन फॉरवर्ड केला आहे.

  • देवाचं देणं

    पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात.

  • समस्या २००अपंगांच्या सुटल्या प्रेरणेतून

    सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.