विक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….
हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.
आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे !
कर्ज किंवा नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्त्या, हे मर्यादित वर्णन बातमी म्हणून ठीक असले तरी या बातमीआड दडलेल्या काळोख्या वास्तवाचा वेध कोण घेणार? सरकार? सरकार आणि सरकारातल्या स्वनामधन्य पुढाऱ्यांना तेवढी फुरसत कुठे आहे? राजकारणाची दुकानदारी अव्याहत चालू राहण्यासाठी भांडवल उभारणीतून त्यांना वेळ मिळेल तर ना! शिवाय त्यांच्यासमोर एक-दोन पिढ्यांचा प्रश्न नसतो. पुढच्या सात पिढ्यांची सोय करायची असते. कुठल्यातरी कोपऱ्यात कोणत्या तरी शेतकऱ्याने जीव दिला म्हणून हातातली ‘महत्त्वाची’ कामं सोडून पळण्याइतके का ते मूर्ख असतात? एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतले, त्याला ते फेडता आले नाही आणि म्हणून त्याने आत्महत्त्या केली. या सर्व प्रकारात आमची भूमिका येतेच कुठे, आम्ही दोषी कसे ठरू शकतो, असा कोडगा सवाल उपस्थित करायला ते मोकळे असतात. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...
आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...
माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!
त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...
आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...
त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...
तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!
बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...
बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!
एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...
फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...
मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...
त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!
समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...
पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...
शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...
प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!
गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...
आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...
डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!
२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...
पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...
त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...
माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
आणि अजूनही मला लाज नाही वाटत....
माझ्या निर्लज्जपणाची...!!!
तुलना करणे योग्य की अयोग्य ? या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे आहे. तुलना करणे हे चुकीचेच आहे. वागणूक बद्दल बोलायचे झाले तर वागणूक ही माणसाने प्रत्येक लहान मुलांसोबत चांगलीच ठेवायला हवी. कधीही कोणी पण कोणाची तुलना दुसऱ्या व्यक्ती सोबत करू नये. पण दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या मुलांसोबत दररोज घडत असते. मी अनुभवलेल्या समाजातील काही गोष्टी आपणास सांगणार आहे.
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.


सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात शास्त्रज्ञांची ,संशोधकांची निर्मिती झपाट्याने होते विज्ञान असो वा तंत्रज्ञान आधि अमेरिकेत निर्माण होतं आणि मग जगात प्रसार होतो. अशी खंत आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन हा “विकसनशील देश” असाच असला तरी भारतीयांना आपला देश विकसीत आहे असच म्हणावं लागेल
Copyright © 2025 | Marathisrushti