(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भुकेला धर्म नसतो

    बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो .. बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ.. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

    कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम. बाजारातून आणलेल्या जिन्नसांच सोडा पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवित बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं. उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागते. कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ?. नाही ना , कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते. एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगा नंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं. एखाद्याच्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तूम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

    कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते...किती धांदल असते तिची .. काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही ...इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते. कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणीक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते.. टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.
    भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते , चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते. चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी ती चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते.

    विचार करा

    पटतंय ना तुम्हाला...

  • पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन !

    ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!!

  • मध्यरात्रीच्या अंधारातले कायदे!

    पाण्यावर पहिला हक्क शेतकर्‍यांचाच आहे आणि तो कायम राहायलाच हवा. सरकारला अत्यंत घाईघाईने, अगदी मध्यरात्री जल विधेयक पारित करून घेण्याची काहीच गरज नव्हती. सरकारची भूमिका पारदर्शक असती तर असले गनिमी कावे खेळण्याची आवश्यकता सरकारला का भासली? इतर अनेक विधेयके, ज्यांचा सामान्य जनतेशी अगदी जवळचा संबंध आहे ती महिनो न महिने रखडतात, तेव्हा सरकारची तत्परता कुठे जाते?

  • मिसिंग टाइल थेरपी

    मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

  • आता उरलो गोंधळापुरता !

    मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.

  • पायव्याचे दगड

    भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.

    असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

    आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे ? या एका प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थ्याचा लेखाजोखा आणि आलेख मांडला जातो. ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी मुक्तपणे शिक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यास मुक्तपणे शिक्षण मिळत नाही म्हणून मग ते मानवतेच्या शिक्षणात मागे पडतात.

    खाजगी क्लासेस, शिकवणी यांचे वाढते पेव आर्थिक शोषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत. अशा काळात जी मुले गरीबीतील आहेत. आर्थिकदृष्टीने कमकुवत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय ? कित्येक कुटुंब मागास आहेत. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत किंवा त्यांना ते दार सापडत नाही.अशा अधांतरी आणि दोलायमान अवस्थेत अनेक मुलं शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी झगडतात. मग भारताचे सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. शालेय शिक्षणाची उपयोगिता लक्षात न आल्याने पिढ्यानपिढ्या परंपरागत अज्ञान, अडाणीपणा यामध्ये जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाची शिकार बनतात. त्यांना पुरक पोषण आहार न मिळाल्यास त्यांना मृत्यू ओढावतो. अपयश हे कुणी सांगत नसते.उघड झाले तरी सारवासारव होते.हा मानवी स्वभाव सोडला तर मुख्य प्रवाहापासून वंचित राहणारांची संख्या आजही मोठी आहे. शालाबाह्य मुल कळवा आणि हजार रूपये मिळवा अशा काही घोषणा समाजाकडून मिळणार्या सहानुभूतीसाठी केलेल्या असतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आजही कित्येक बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. शालाबाह्य मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात. त्यात शिक्षक एकाकी पडतात. समाजाचा आधार मिळत नाही. शाळेत मुल न पाठवणार्या पालकांना कोणतीही शास्ती अथवा सक्ती कायद्याने नाही. नोकरीसाठी शिक्षण एवढीच शिक्षणाची मर्यादित व्याख्या आज करून ठेवलेली आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कमी पडताहेत त्या ठिकाणी कित्येक मुलं शालाबाह्य ठरतात. अशी मुलं शाळेत दाखल असतात. परंतु वास्तव असे आहे की सतत भटकत असतात. आठवीपर्यंत गैरहजर असली तरीही त्यांना ढकलपास करून पुढे पाठवण्याची व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेत आहे . त्यामुळे त्यांच्या दाखल्यावर स्पष्ट उल्लेख येतो सतत गैरहजर नाव कमी . असे नाव कमी झालेली बालके भरपूर पहायला मिळतील. ती सर्वच मुले अपयशी ठरतात असे नाही. तर ती मुलं समाजाच्या , निसर्गाच्या शाळेत शिकत असतात. पण सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शाळा जे कार्य करतात. त्याचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

    उदरनिर्वाहासाठी जी कुटुंब स्थलांतरीत होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळला पाहीजे. सध्याचा शिक्षणाचा बाजार हा थांबत नसेल तर मग गरीबांच्या लेकरांसाठी असणार्या शाळा प्रयत्नपुर्वक सुधारल्या पाहिजेत. शासन आणि समाज हे करू शकते.

    प्रकाशझोताचा झगमगाट सोडून खरे संस्कारक्षम शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचायला हवे. अच्छे दिनचे स्वप्न वास्तवात उतरावयाचे असेल तर त्याची सुरूवात शिक्षणापासूनच व्हायला हवी. कालपरवा एक विद्यार्थी भेटला . कितवीला आहेस ? असा सहज प्रश्न केला. तर आठवीला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत जातोस का ? तर नाही म्हणाला. मग काय करतोस ? जेसीबी चालवतोय . शाळा का शिकत नाही. असं विचारल्यावर तो गप्प ... म्हणजे एकतर शाळेत नाही गेलं तरी पास होतय असा समज असावा किंवा

    उदरनिर्वाहासाठी जेसीबी चालविणे योग्य वाटले असेल.दुसरा एक त्याचाच मित्र सोबत होता . त्यालाही विचारले ' तू जातोस का शाळेत ? '

    तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. ' तू पण जात नाहीस वाटतं शाळेत .'

    ' सर , त्याने साखर कारखान्यावर कोयता लावलाय. उचल घेतलीय. त्यो पण आठवीलाय.'

    ती दोन्ही मुलं मागास प्रवर्गातील होती. हे वास्तव चित्र आहे. शाळेऐवजी जेसीबी चालविणे किंवा मग कारखान्यावर ऊस तोडणे योग्य का वाटते? या प्रश्नावर विचारवंतांनी विचार करायला हवा.

    अशी कितीतरी मुलं आहेत की ती शाळेच्या पटावर आहेत पण शाळेत उपस्थित नाहीत. अशा कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच त्यावरच्या उपाययोजना सुचतील. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, शासन, समाज आणि प्रशासन व्यवस्थेने हा प्रश्न समन्वयाने घेतला तरच मार्ग निघू शकतो नसता पुढील पिढी बरबाद करण्याचे काम चालूच राहील!

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    मो.9421442995

  • तरीही पुढे जायचेच आहे!

    एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो.

  • कालाय तस्मै नमः

    पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी ‘ टेलिव्हिजन शाप की वरदान ‘ या विषयावर दहावीला निबंध असायचा. साठीला आलेल्या शिक्षकाकडे पेपर तपासायला गेला की टेलिव्हिजन वरदान नसुन शाप आहे , असे लिहिणार्‍या निबंधाला जास्त मार्कस पडायचे. तर विशीच्या नवीनच नोकरी लागलेल्या शिक्षकाकडे पेपर गेला तर टेलिव्हिजन शाप नसुन वरदान आहे , असे लिहिणार्‍या निबंधाला जास्त पडायचे. यात विद्यार्थीवर्गाची चांगलीच गोची व्हायची. हा धोका माझ्या वेळीच लक्षात आला आणि मी या विषयावर निबंध लिहायचे टाळुन ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ या विषयावर निबंध लिहिला. ( माझ्या बर्‍याच मित्रांनी या विषयात झीनत अमान विषयी लिहिले, पण हा निबंध झीनत अमानवर नसुन गांधीजींवर लिहायचा होता ) असो. हळुहळु टिव्हीमधेही अनेक बदल होत गेले,नवीन नवीन चैनल्स आले , चोवीस तास न्युज चैनल नावाच्या प्रकाराचा जन्म झाला . सुरुवातीला सातच्या बातम्या या प्रकाराला सरावलेल्या आम्ही चोवीस तास बातम्या काय दाखवणार ? याची चर्चा करायचो. हळुहळु या सर्व चर्चा मागे पडल्या आणि न्युज चैनल या प्रकाराने आपला पाय टिव्हीविश्वात भक्कमपणे रोवला .

    पुर्वीच्या काळी चैनल्सची सुरुवात ही सकाळी सव्वापाचला होत असे. आजकाल ही सगळी न्युज चैनल चोवीस तास . त्यामुळे चैनलची सुरुवात म्हणजे आपली झोपेतुन उठण्याची वेळ असे आपण ठरवावे. सर्व न्युज चैनलची सुरुवात ही भक्तीरसाने होते . वेगवेगळे महाराज , ज्यांची नावेपण आपण कधी ऐकली नसतात , ती या चैनल्सवर ब्रम्ह , जीवन किंवा अध्यात्मिक प्रतीरोध अशा अत्यंत दुर्बोध विषयावर बोलत असतात . समोर प्रेक्षकगण माना डोलावत असतात . त्यांचे एकसुरी निरुपण ऐकुन आपल्याला झोप येते . त्यामुळे हे कार्यक्रम कदाचित रात्रपाळी करुन आल्यावर लोकांना शांत झोप येण्यासाठी लावत असावेत , अशी एक शंका माझ्या मनात आली. काही चैनल्सवर योगासने चालु असतात . ती मात्र आपण फक्त बघायची असतात . त्याप्रमाणे आपण करायला गेल्यास आपले हातपाय विचित्र अवस्थेमधे अडकुन बसतात , हा माझा स्वानुभव आहे.अत्यंत धोकादायक स्टंट्स केल्यावर ” हे स्टंट्स प्रोफेशनल लोकांनी सुरक्षिततेची सर्व साधने वापरुन केलेले आहेत , लोकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नये ” अशी पट्टी खाली येते , तशी पट्टी योगाच्या कार्यक्रमात दाखवायला हवी असे माझे मत आहे.

    या सर्व न्युज चैनलवर बघण्यासारखी कोणती गोष्ट असते , तर ती त्यावरील निवेदिका. या मात्र अत्यंत सुंदर असतात. त्यांचा मेकप अत्यंत व्यवस्थित असतो. मात्र बातम्या सांगताना त्यांच्या चेहेर्‍यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव नसतात. कुणाला पुरस्कार मिळाल्याची बातमी जितक्या निर्विकारपणे त्या सांगतात , त्याच निर्विकारपणे कुणाचे निधन झाल्याचीपण सांगतात . आदला जन्म संताचा घेतल्यानंतर कदाचित पुढल्या जन्मी त्या निवेदिका बनत असाव्यात . संतांच्या वागण्यात निर्विकारपणा असायचा , यांच्या चेहेर्‍यात असतो. सहा महिन्यापुर्वीच एकदा एका नविन चालु होणार्‍या न्युज चैनलच्या निवेदिकेसाठी जाहिरात आली , ती अशी

    ” अडिचशे कोटी टर्नओव्हर असणारा क्ष ग्रुप न्युज चैनलच्या व्यवसायात पदार्पण करीत आहे . या नवीन चालु होणार्‍या न्युज चैनलसाठी निवेदिका हव्यात . वय वर्षे वींस ते पंचवीस. दिसायला सुंदर हव्यात . भाषेचे उत्तम ज्ञान हवे. संपर्क करा . “ पुढे एक मोबाइल नंबर दिला होता . आता विचार करा , ही जाहिरात “ मिस इंडीया स्पर्धेसाठी स्पर्धक हवेत “, यासाठीपण चालली असती. जागतिक घडामोडींचे चांगले ज्ञान हवे, अशी त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती .

    आजकाल कुठल्याच न्युज या नुसत्या न्युज नसतात , तर त्या ब्रेकींग न्युज असतात. कुठलीही न्युज घ्या , ब्रेकींग न्युज . आता ही ब्रेकींग न्युज म्हणजे काय ? हा प्रश्न मी माझ्या न्युज चैनलमधे काम करणार्‍या मित्राला विचारला . तेव्हा त्याने ” हार्ट ब्रेक करणारी न्युज म्हणजे ब्रेकींग न्युज” असे उत्तर दिले. मराठीत त्याला ” आतडे पिळवटुन टाकणारी बातमी “असे म्हणतात , हेही त्याने मला सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी ”मुंबईच्या आयएएस अधिकार्‍याचा कुत्रा गेस्ट्रोने आजारी , रुग्णालयात दाखल , ” अशी ब्रेकींग न्युज ऐकुन आतडे खरोखर पिळवटुन निघाले.
    या चैनल्सवर काही नेत्यांच्या सतत मुलाखती चालत असतात . हा मात्र खरोखर विनोदी प्रकार असतो . उदाहरणार्थ , एका न्युज चैनलवर य या नेत्याची मुलाखत चालु आहे . हे चैनल स्वतःला सर्वोतम असे म्हणवुन घेते.
    निवेदक - आज आपल्या या वाहिनीवर राज्याचे तरुण तडफदार नेते मिस्टर य आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत बिझी शेड्युलमधुन त्यांनी ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलला दिली आहे. पुन्हा एकदा, ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलवर आहे. कारण आम्ही सर्वोत्तम आहोत.
    ( साहेबांवर कैमेरा ) सर , राज्याच्या सद्यपरिस्थितीबद्दल आपले मत काय ?
    य - सरकार बदल केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. ( मिस्टर य हे विरोधी पक्षात आहेत हे आपल्या लक्षात आले असेलच )
    निवेदक - पण सर , यापुर्वी पाच वर्षे आपण सत्तेत होतात ?
    य - त्या काळात एकही दंगल झाली नाही .
    निवेदक - दंगल करणारे लोकच सत्तेत होते , म्हणुन झाली नाही असे सगळे म्हणतात ?
    य - कोण म्हणतो असे ? स्साला हराम - ( आपण टीव्हीवर आहोत हे लगेच जाणवुन ) म्हणजे हे चुक आहे .
    निवेदक - राज्याचा विकासपण झाला नाही ?
    य - हे चुक आहे , माझे कार्यकर्ते पुर्वी सायकलवर फिरायचे. आजकाल ते टाटा सफारीत फिरतात . आमचे कार्यकर्ते हे सामान्य लोक आहेत . सामान्य लोक सायकलवरुन टाटा सफारीत आले तर तुम्हा लोकांना वाईट का वाटते ? म्हणजे विकास झाला .
    निवेदक - तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो ?
    य - आम्ही खासदार आहोत , हे खरे आहे . मात्र आमदारपद आम्ही घराणी वेगळी असणार्‍या आमच्या जावयांना दिली आहेत, त्यामुळे आम्ही घराणे शाही करतो , हा आरोप खोटा आहे …..आम्ही एकाच घराण्यात पदे वाटत नाही .

    ही मुलाखत अशीच चालु रहाते. अर्धा तास संपल्यावर एकदाची मुलाखत संपते, आणि तरुण तडफदार नेत्याला शुभेच्छा देउन निवेदक एकदाचा आपला निरोप घेतो. या मुलाखतीतुन आपल्या हाती काहीच लागत नाही. नेत्यांचे चेहेरे बदलतात, वाक्ये मात्र तीच रहातात.
    तरीही शेवटी ही चैनल्स आपण का बघतो ? हा प्रश्न उरतोच . त्याचे उत्तर म्हणजे , हल्ली आपल्यालाही असेच आवडते . दिखाउपणा आवडतो , कुठल्याही गोष्टीच्या खोलात जायला आवडत नाही . त्यामुळे दोष शेवटी आपणावरच येतो .त्यामुळे चैनलवाल्यांची सध्या चलती आहे . ’ पिकते ते विकते ‘, या जुन्या म्हणीपेक्षा ‘ जे विकते ते लोक पिकवतात ‘ हेच खरे ! शेवटी काय , तर कालाय तस्मै नमः !

    -- निखिल नारायण मुदगलकर

  • खिचडीची बाधा

    रेंद्र मोदी या नावाला आंग्लाळलेल्या आणि पक्षीय भाटगिरी करणाऱ्या प्रसार माध्यमांनी केवळ अतिरेकी हिंदुत्ववादी या एकाच रंगात रंगविण्याचे काम सातत्याने केल्यामुळे एखाद्याने मोदींचे नाव घेतले की लगेच त्याच्याकडे संशयाने पाहण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. नरेंद्र मोदींची राजकीय भूमिका काय आहे, त्यांचा हिंदुत्ववाद काय आहे किंवा धर्मनिरपेक्षतेबद्दल त्यांचे काय विचार आहे, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी कितपत यशस्वी ठरले यावर चर्चा करण्यात, राज्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांची कामगिरी कशी आहे यावर विचार करण्यास हरकत काय आहे? परंतु मोदी म्हटले की गोध्रा आणि त्यानंतरची दंगल या पलीकडे जाण्यात बऱ्याच जणांना फारसे स्वारस्य नसते.