एकच शिक्षणपध्दती, एकच प्रतिज्ञा पुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतभर असतांना मूल्यांमध्ये जमीन आसमानचा फरक का? काश्मीरमध्ये विद्यार्थी लष्करावर दगडफेक करतात, काही ठिकाणी देशद्रोह, काही ठिकाणी देशभक्ती झिरपते. काही ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन, काही ठिकाणी अंधश्रध्दा झिरपते, असे कां?
आपल्या पैकी प्रत्येकजण स्वप्न पाहतो पण ती स्वप्नं साकार करण्यासाठी गरज असते ती निर्धार, शिस्त आणि प्रयत्नांची. ऑलिम्पिक म्हटलं की आपल्या मनात विचार येतात ते जबरदस्त मनोरंजनाचे. पण जरा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की ऑलिम्पिक खेळांमधून आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकता येतील..
आठव्या वर्गात त्याला बर्यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्या-तिसर्या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.
साचलेल्या पाण्याचे नेहमीच डबके होते, कालांतराने त्यात शेवाळ साचते, घाण आणि चिखल यापलीकडे तिथे काही उरत नाही; परंतु प्रवाहित असलेले पाणी नेहमीच ताजे, स्वच्छ, पारदर्शक असते. आपल्या समाजाचेही असेच डबके होऊ पाहत आहे. विचारांचा प्रवाह कुंठीत झाला आहे, जुन्या रूढी-परंपरा, त्यांची जळमटे या समाजाचे चित्र अधिकच भेसूर करीत आहेत.
‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.
प्रकाशन दिनांक :- 04/01/2004
सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत.
जेव्हा-जेव्हा विकासाबद्दल चर्चा होते, मग तो एखाद्या खेड्याचा असो अथवा एखाद्या देशाचा प्रत्येक वेळी उपलब्ध साधनसंपत्ती, दळणवळणाच्या सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो. अर्थात विकासाच्या संदर्भात या सगळ््या गोष्टींचे महत्त्व नाकारता येत नाहीच; परंतु यापेक्षाही अधिक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची मानसिकता! ही मानसिकता असेल तर साधनसंपत्तीची उपलब्धता नसणे ही अडचण ठरत नाही आणि ही मानसिकता नसेल तर कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी विकासाच्या केवळ गप्पाच होऊ शकतात.
‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे.
आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.
१९७२ च्या म्युनिक आॅलिंपिक्स मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंना क्रूरपणे मारलं. इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांनी आपल्या दुःखाचं,संतापाचं जाहीर प्रदर्शन न करता मोस्साद ला फक्त हुकूम दिले. पुढे या हत्याकांडाशी संबंधित असलेली एक-एक व्यक्ती मारली गेली. हे प्रतिशोध सत्र एक दोन नाही, तर वीस वर्षं सुरू होतं...वीस वर्षं ! याला म्हणतात राष्ट्राने घेतलेला बदला!!
इस्रायली जनतेने आपल्या पंतप्रधानांना हे कधीही विचारलं नाही, की मोस्साद ने गोळ्या कुठल्या वापरल्या?, या कामासाठी कुणाला नेमलं?, त्यांच्यावर खर्च किती केला?, मारण्याऐवजी खटला का भरला नाही?......नेशन वाँटस् टु नो ऽ... वगैरे!! .त्यांनी त्यांच्या पंतप्रधानावर विश्वास ठेवला होता!
राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, तेव्हा पंतप्रधान भारताचे असतात...भाजप चे किंवा काँग्रेसचे नसतात हे समजायला देशाला आणखी किती किंमत चुकवावी लागणार आहे?
उमर, कन्हैय्या सारखे हलकट विद्यार्थी, बरखा दत्त सारखे वचकट पत्रकार आणि प्रकाश बाळांसारखे कुजकट बुद्धिवादी,सलमान शहारुख सारखे हरामखोर कलावंत, इस्रायलच्या नशिबी नव्हते, आणि भारतमातेच्या नशिबी आहेत....काय करणार?
२०१६ च्या हत्याकांडाचा बदला भारत कसा घेणार आहे, हे काळालाच माहीत....
मला उगीचच ' गाॅडफादर' कादंबरीतलं एक वाक्य आठवलं - " सूड ही एक अशी डिश् आहे, जी थंड करून खाल्ली तरच चांगली लागते ! "
-- WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेले एक पोस्ट
Copyright © 2025 | Marathisrushti