सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? "तुम्ही केलेल्या कामावर बोला", "विकासाच्या मुद्यावर बोला", "तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला" अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध नाही ही बाब चुकीची आहे. काश्मिर मधून विस्थापित झालेले अनेक काश्मिरी पंडीत महाराष्ट्राचे नागरिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ३७० हटवल्यानंतर काश्मिर मधे जमीन घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते, MTDC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार काश्मिरमधे दोन Resort बांधायची योजना बनवत आहे. याचा फायदा काश्मिरी आणि मराठी युवकांना रोजगाराच्या दृष्टीने होऊ शकतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ३७० हे काँग्रेसने केलेल्या काही मोठ्या पापांपैकी एक आहे आणि ते हटवण्यासाठी जेव्हा मतदान केले तेव्हा ते देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या खासदारांनी मत दिले ज्यात महाराष्ट्रातील खासदार पण आहेत. पण या देशहिताच्या कार्यातही महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदारांना भाग घ्यावासा वाटला नाही. आज भाजपा ३७० वरून बोलतो तेव्हा काहींना होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण हे आहे की यामुळे पक्षाचा जनाधार आणि विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की भाजपा फक्त ३७० विषयावर प्रचार करतो हे कितपत योग्य आहे??
तर मुळात हे अर्धसत्य आहे. भाजपाचे नेते जेव्हा प्रचारा दरम्यान भाषण करतात तेव्हा ते आपल्या सरकारने केलेली कामे मांडतात. त्या केलेल्या अनेक कामांतील एक म्हणून ३७० मांडले जाते पण भाजपाचा प्रचार तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांत भाजपा नेत्यांच्या ज्या काही सभा झाल्या त्यात मांडल्या गेलेल्या निरनिराळ्या विकास कामांची यादी करायची झाल्यास ती खालीलप्रमाणे होते.
१) ३०,००० किमी रस्तेबांधणी
२) १८,००० गावांचा पाणी प्रश्न सोडवला
३) ग्रामीण आवास योजने अंतर्गत गरिबांसाठी ७ लाख घरे
४) २०२१ पर्यंत सर्व गरिब कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट
५) शिक्षणात महाराष्ट्र क्रमांक ३ चे राज्य
६) दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील
७) १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत २०,००० कोटी तर भाजपा युती सरकारने ५ वर्षांत दिलेली मदत ५०,००० कोटी
८) आघाडी सरकारच्या काळात शेतकरी बोनस रू.५० असायचा, भाजपा सरकारने २०१४ ते २०१७ रू.२०० तर २०१८-२०१९ मधे रू.५०० बोनस दिला.
९) मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू. दीड वर्षात पूर्ण होणार
१०) ३८ जलप्रकल्पांचे काम जोमाने सुरू
११) रायगड हे आगामी Industrial Hub बनणार
१२) मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
१३) धनगर आणि आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले
१४) ST समाजाच्या योजनांचा वाभ धनगर समाजालाही होणार
१५) OBC समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती
१६) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हजारो कोटींची कामे
१७) क्लस्टर बांधकामाचा प्रश्न सोडवला
१८) मेट्रोचे जाळे
१९) १,६०,००० विहिरींचे बांधकाम
२०) ५ लाख शेतकऱ्यांना पंप पुरवले
२१) १९,००० गावे दुष्काळमुक्त
२२) आगामी काळात गरिबांसाठी १० लाख घरे बांधणार
२३) ४० लाख लोकांना वैद्यकीय सहाय्यता
२४) जल जीवन मिशनसाठी ३.५ लाख कोटी रूपयांची तरतूद
२५) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ लाख कोटींची तरतूद
२६) गरिब शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना
२७) Direct Benefit Transfer मुळे थेट १००% मदत शेतकऱ्या पर्यंत
२८) किसान निधीचा शेतकऱ्यांना फायदा
२९) शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी Vaccination Programme
३०) कौशल्य विकास आणि मुद्रा लोन सारख्या योजनांचा ग्रामीण भागातील युवकांना फायदा
३१) One Ticket Policy साठी प्रयत्न (Local/Metro/Best etc. साठी एक टिकीट)
३२) कोळीवाडा आणि गावठाणांसाठी नवीन योजना
३३) Airport लगतच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास
३४) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३०० चौ.फुटांची घरे देणार.
३५) आशियातला सगळ्यात मोठा पूनर्विकास धारावीत होणार
३६) उज्वला योजनेचा १.५ कोटी गरिब कुटुंबांना लाभ
३७) बांद्रा-वर्सोवा Sea Link
३८) विविध ठिकाणी रिंग रोडचे बांधकाम
३९) जलवाहतूकीला चालना
४०) जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
हि केंद्र आणि राज्य सरकारची 'काही' कामे ज्यांचा उल्लेख 'काही' ठिकाणच्या भाषणांमधे झाल्याचे मी नोंदवून ठेवले. या व्यतिरिक्त अनेक भाषणे झाली आहेत आणि त्यात अनेक वेगळे मुद्दे आणि कामे मांडली आहेत ज्याचा वरिल यादीत समावेश नाही. तसेच यात एका विशिष्ट शहरासाठी/प्रदेशासाठी केलेल्या किंवा प्रत्येक उमेदवाराने त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख नाही. मग आता विचार करा की त्या सगळ्या मुद्द्यांना जोडले तर किती मुद्दे होतील??
मग जर एवढे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडून जर भाजपा नेते ३७० वर ३-४ मिनीटे बोलत असतील तर त्याचा एवढा बाऊ का??
पण तरिही तो होत आहे आणि निवडणूक संपपर्यंत जाणीवपूर्वक चालू राहील. पण भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नम्रपणे सांगतो की आम्हाला फरक पडत नाही. कारण आमच्यावर अटलजींचे संस्कार आहेत. अटलजी भर संसदेत म्हणाले होते, "सत्ता का खेल तो चलता रहेगा,सरकारे आएगी-जाएगी,पार्टियां बनेगी-बिगडेंगी पर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" हा देश आणि या देशातील लोकतंत्र टिकवण्यासाठी आम्ही ३७० हटवण्याचे काम केले आहे आणि त्याविषयी भरभरून बोलणार कारण त्यासाठी आमच्या नेत्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मग त्याने आमच्या विरोधकांना पोटदूखी होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही. आम्ही एकच जाणतो की 'राष्ट्र प्रथम'!!! आणि हो आणखीन एक जाणतो, आएगा तो देवेंद्र ही!!!
- SwaG
(स्वानंद गांगल)
“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.
सर्वच दैनिक,'सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक' असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,'गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण' दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते.
'आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव
नेता ' असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. 'पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी' अशा हजारों कंपन्या असतांना
निर्धास्तपणे लिहिले जाते.
तसेच 'थंड रस मिळण्याचे एकमेव ठिकाण'
सगळ्याच ठिकाणी असतात. एखाद्या माणसाचा गौरव करतांना अतिशयोक्ती केली जाते.रिटायर कर्मचाऱ्याच्या बाबतीत,'आपल्या सेवेत एकही रजा न घेणारा एकमेव कर्मचारी .' लोक दबक्या टाळ्या वाजवतात कारण रजा न घेता गायब रहाणारा तो ख्यातीप्राप्त कर्मचारी असतो.
'एकमेव'चे फार कौतुक असते. गावामध्ये असे
खुप एकमेव असतात. फक्त अमुककडे बुलेट आहे. तो एकटाच पास झाला. तो एकमेव निवडून आला.त्याच्या एकट्याच्या विहिरीला पाणी आहे.तो एकमेव माणूस कुणालाच भित
नाही. अनेक गावात'एकमेव' बस असते. गावात जाण्याचा एकमेव रस्ता असतो.कुठे
एकमेव दुकान असते.
एकमेव असले की जास्त महत्त्व असते. पर्याय असला की महत्त्व कमी होते. अनेक
असले तरी एकमेव अशी जाहिरात करावी लागते.क्लासेसवाले शुद्धा ,'आपल्या पाल्याच्या यशाची खात्री देणारे एकमेव ' अशी जाहिरात करतात.' खात्रीचे सोने मिळण्याचे एकमेव ठिकाण' पण काही केल्या
ते एकमेव दुकान सापडत नाही. एका ठिकाणी,'ताजा खवा मिळण्याचे एकमेव ठिकाण'असे लिहिलेले होते. बघतो तर काय
चांगला महिनाभराचा शिळा खवा त्याने आमच्या माथी मारला.
'शेती औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण' त्या
ठिकाणी गेलो.कोणतीही वस्तू मागितली की
आताच संपली,उद्या नवा माल येणार आहे,सध्या तुडवडा आहे, नोकराने कुठे ठेवली त्यालाच माहीत. ती चांगली नाही, आता ती बंद झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो आम्हाला कटवतो.जातांना
'एकमेव ठिकाण' फलक बघण्याचा मोह मला आवरत नाही.
'आमच्या गावातील शिकलेला एकमेव माणूस' लगेच छाती फुगते. अनेकांना एकमेव
असल्याचे भाग्य लाभलेले आहे. ज्यांना नाही
लाभले तेही एकमेव असल्याचा प्रचार करत
आहेत. प्रेमी देखील एकमेकांना ,'माझ्या जीवनात तु एकमेव आहे.' अशी खात्री दिली
जाते. तशी ती अनेकांना दिलेली असते. पण
हे उभयतांना माहीत असल्याने त्या खात्रीची
कुणी खात्री बाळगत नाही.
एकमेव असल्याचा तोरा वेगळाच असतो.मग
तो शिरा हलवायचा चाटू की असेना.
कौशल्याच्या बाबतीतही एकमेव असल्याचा
गाजावाजा असतो.खंब्यावर चढणारा एकमेव
माणूस,दाताने लाकूड उचलणारा वगैरे. किंवा
संचालन किंवा भाषण करणारा एकमेव व्यक्ती. उर्दू जाणणारा एकमेव व्यक्ती. खेड्यात असे एकमेव अनेक असतात. शहरात मात्र खुप पर्याय असतात.खेड्यात
एकमेव दवाखाना असतो.एकमेव शाळा असते. जिथे एकच आहे तिथे एकमेव लिहिले
जात नाही ,त्याची गरज नसते कारण ते खरेच
असते. परंतु अनेक असतांना 'एकमेव'असा प्रचार करणे हास्यास्पद आहे.
-ना.रा.खरा
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.
काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या नावाखाली आता राजकारणही सुरू झालेले दिसते.
सध्या मालिकांची निर्मिती समाज हितासाठी केली जाते हा गोड गैरसमज कोण बाळगत असेल तर तो वेळीच दूर व्हायला हवा !
मालिका निर्मिती हा व्यावसाय आहे लोकांच मनोरंजन करण हाच त्याचा उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी म्ह्णून जर मालिकांची निर्मिती झाली असती तर चांगले कथानक असणार्या पण टी.आर.पी. नसणार्या मालिका बंद झाल्या नसत्या नाही का ? मालिकेतील कथानक मला पटलं नाही म्ह्णून ती मालिका बंद व्हावी असा आग्रह होत राहिला तर सर्वच मालिका बंद कराव्या लागतील आता काही पुरुषांना नाही आवडत पुरुषांनी साड्या नेसलेल्या म्ह्णून ते जर म्हणाले,’ ‘ज्या मालिकांत साड्या नेसलेले पुरुष आहेत त्या मालिका बंद कराव्या तर ते शक्य आहे का ?’ एका मालिकेत एक मराठी मुलगी एका हिंदी भाषिक तरुणाच्या प्रेमात पडताना दाखवली म्ह्णून मालिका बंद करावी अथवा त्यामुळे मराठी अस्मितेला धोका पोहचला हे कसं शक्य आहे त्या मालिकांतील ती एक काल्पनिक तरूणी करोडो मराठी मुलींची प्रतिनिधी होऊच कशी शकते ?
हया मालिका पाहतोय कोण मराठी प्रेक्षकच ना ? याचा अर्थ त्यांना या कथानकात काहीच चुकीच वाटत नाही का ? त्या मालिका पाह्णार्यांना त्यात काही चुकीच वाटत नसेल तर इतरांनी उगाच आदला - आपट करून काही उपयोग आहे का ? मालिकांची कथा कधीही पूर्ण लिहलेली नसते त्यामुळे त्यात कधीही कोणताही बदल करण शक्य असतं. त्यामुळे अशा मालिकांना फक्त विरोधासाठी विरोध करणारे तोंडघशी पडण्याची शक्यताच अधिक असते.
आता काही दिवसापुर्वी भुताखेतावरील एका मालिकेला विरोध झाला होता त्याच काय झालं आता कथानकाने अचानक जे वळ्ण घेतल त्यामुळे अचानक विरोध मावळला उलट त्यामुळे कदाचित त्या मालिकेचा टी.आर.पी. वाढायलाही मदत झाली असेल.
ज्या मालिकेतील कथानक आपल्या आवडत नसेल ती मालिका आपण पाहावीच का ? आणि ती इतरांनी पाहू नये असं आपल्याला वाटत असल्यास ते का करावे हे पटवून देण्याची क्षमताही आपल्यात असायला हवी नाही का ? या मालिकांत काम करणारे कलाकारही मराठीच आहेत ना ? त्यांना भान नसेल का आपण काय करत आहोत याचे ? विरोधासाठी विरोध करण्याची समाजाची मानसिकता आता या बाबतीतही बदलायला हवी. न आवडणार्या मालिका आता आपोआप बंद होतात कारण टी.आर.पी. या मालिकांना आवर घालण्याचे हत्यार आहे. मालिका बंद करण्याचे आवाहन करण्यापेक्षा मालिका पाहू नका असे आवाह्न करणे सोप्पे आहे नाही का ? त्यामुळे कोणाचेच काही नुकसान होणार नाही आणि आपला उद्देश जर योग्य असेल तर तो साध्य ही होईल नाही का ? फक्त विरोधासाठी विरोध केल्याने या मालिकांचा टी.आर.पी. वाढण्यास मदतच होते. म्ह्णजे विरोधकांचा विरोध फक्त विरोधासाठी असेल तर याचा त्या मालिकेला फायदाच होतो आणि मग चुकीचे पायंडे पडायला सुरुवात होते.
टी.आर.पी. जास्त असणार्या सर्वच मालिका पाहण्यासारख्या असतातच असं नाही त्यांच्यातही बर्याचदा कल्पनातीत आणि अशक्यप्राय असणार्या गोष्टी दाखविण्याचा अट्ट्हास केलेला असतो. या मालिकांना विरोध करणार्यांची भुमिका बरोबर असेल पण तो व्यक्त करण्याची पद्धत बदलायला हवी ! विरोधासाठी म्ह्णून विरोध न करता आपला विरोध या मालिका डोळे फाडून पाहणार्यांना पटवून देत राहायला हवं तोपर्यत जोपर्यत ते त्यांना पटत नाही. या अशा मालिकांमुळे समाजमनावर फार मोठा परिणाम वगैरे होईल असं कोणाला वाटत असेल तर तसं काही होत नाही. कारण मालिका आवडते म्ह्णून पाहणारे जितके असतात तितकेच आवडत नसतानाही पाहणारे असतात. मालिकेला टी.आर.पी. मिळतोय म्ह्णजे त्या मालिकेला समाजमान्यता मिळतेय असं ही या मालिकांची निर्मिती करणार्यांनी समजू नये.
आज समाजातील एक गट या मालिकांच्या विरोधात बोलतोय. भविष्यात संपुर्ण समाज बोलू लागला तर मालिकांची निर्मिती करणे अवघड होऊन बसेल याच भानही मालिकांची निर्मिती करणार्यांनी ठेवायला हवं आज जरी फक्त विरोधासाठी विरोध होत असला तरी तो तसाच राहील याची खात्री देता येत नाही...
-- लेखक – निलेश बामणे
मो. 8652065375
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
दिनांक – 15 मे 2016
निमहकीम लोकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. रोगी मरणार नाही तर काय? कुणी सांगते पॅकेज द्या, कुणी सांगते सबसिडी द्या, कुणी स्प्रिंकलरसाठी अनुदान देण्याचा उपाय सुचवतो, तर कुणी बियाणे मोफत पुरवायला सांगतो आणि सरकारदेखील फारशी शहानिशा न करता हे सगळे उपाय करून पाहते, त्यासाठी कोट्यवधींची उधळण करते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..!
प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.
हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.
गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी हताश, उदास, गरीब, अत्यंत कष्टप्रद काम करणा-या व नेसत्या वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या महिलांचे भलेमोठे फोटो प्रसिद्ध करून या वर्तमानपत्रवाल्यांना त्यांच्या वाचकांपर्यंत नक्की कोणता संदेश पोहोचवायचा असतो, हे आजपर्यंत मला कळलेले नाही. आज जर ‘जागतिक महिला दिन’ आहे तर ‘जागतिक पुरुष दिन’ केव्हा साजरा करत असतील?, असा एक विचार विनाकारण मनाला चाळवून गेला. महिलांचे फोटो, त्यांच्या यशोगाथा व मुलाखतींने पेपरची सर्व पाने ओसंडून वाहत होती. टीव्हीवर काही वेगळे बघता येईल म्हणून प्रयत्न केला, तर ए नावाच्या चॅनेलपासून तर झेड नावाच्या चॅनेलपर्यंत एकूण एक वाहिन्या महिलांनी व्यापून टाकल्या होत्या. ‘कसा तुमच्या लक्षात राहत नाही आजचा दिवस तेच बघतो’, असा आज सर्वांनी चंगच बांधला असावा ! या सर्वांपासून दूर जाऊन एखादे आवडीचे पुस्तक वाचावे म्हणून उठणार, एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी प्रचंड वैतागलो. आजची सुंदर सकाळ आपल्या मनाप्रमाणे घालवता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे कपाळावर आठ्यांचे जाळे विणत अत्यंत अनिच्छेने दरवाजा उघडला, तर समोर आनंदाने निथळत असलेल्या चेह-याने हातात कसलातरी बॉक्स घेऊन तो उभा होता. दोन वर्षांपूर्वी इमारतीत वास्तव्यासाठी आलेल्या या व्यक्तीने कोणाशीही संबंध न ठेवल्यामुळे आज प्रथमच व अचानक तो स्वत: भेटायला आल्यानंतर माझा चेहरा प्रश्नचिन्हांनी भरून गेला. त्याने एकही क्षण वाया न घालवता तो बॉक्स माझ्या हातात ठेवला व त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले, ‘सर, पेढे !’ ‘अहो, पण कशाबद्दल?’ मीही वेळ वाया न घालवता प्रश्न विचारला. ‘मुलगा !’ त्याचे टेलिग्राफिक उत्तर ऐकून मी जवळपास ओरडलोच- ‘अहो, केव्हा झाला आणि इथे कोणालाच कसे माहीत नाही?’ गेली दोन वर्षे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून त्याची बायको आम्हाला सतत दिसायची व त्या काळात ती गर्भवती असल्याचे एकदाही लक्षण दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या तोंडून ‘मुलगा’ हा शब्द ऐकल्याबरोबर मी उडालोच. माझी अवस्था त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, ‘सर, मुलगा अजून झाला नाही, होणार आहे. डिलिव्हरीला अजून काही महिने वेळ आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी अवाक् होऊन आळीपाळीने एकदा त्याच्याकडे व एकदा त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो आणि त्यानंतर हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला. माझ्या कोणत्याही प्रश्नाची वाट न बघता त्याने बोलायला सुरवात केली.
‘सर, तुम्हाला तर माहीतच आहे की मला शाळेत जाणारी एक मुलगी आहे. आम्हाला मुलगा नाही म्हणून काही वर्षांपासून आम्ही दोघेही खूप दु:खी होतो. शेवटी मी निर्णय घेतला की, आता आपल्याला मुलगा झालाच पाहिजे. माझी बायको गर्भवती आहे असे कळले, की मी डॉक्टरांकडे जाऊन तिची टेस्ट करून घ्यायचो. मुलगी असल्याचे कळले की लगेच गर्भपात. गेल्या तीन वर्षांत तिचा चारदा गर्भपात केला. पाचव्या खेपेला मुलगा असल्याचे कळले आणि वेळ वाया न घालवता सर्वांना पेढे वाटण्यास सुरुवात केली !’
त्याच्या बोलण्यातली सहजता व न लपवता येणा-या आनंदामुळे मला एका प्रचंड अस्वस्थतेने घेरून टाकले. माझ्याशी बोलत असलेला व स्वत:ला सुशिक्षित समजणारा एक माणूस पराकोटीच्या अशिक्षित व असंस्कृतपणाचे अत्यंत निर्विकारपणे प्रदर्शन करत माझ्यासमोर उभा होता. गप्प बसून ते सर्व सहन करणे अशक्य झाल्यामुळे माझ्या तोंडून नकळत प्रश्न निघून गेला, ‘साहेब, गर्भाचं लिंग ओळखण्याच्या चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे नं?’ तो मोठ्याने हसला व हसताहसता म्हणाला, ‘सर, अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? अशी बंदी आणल्याने का कधी काही गोष्टी थांबत असतात आपल्या देशात? तुमच्या दृष्टीने जी बंदी आहे ती अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. दारूबंदी असो की गर्भजल परीक्षेवर आणलेली बंदी, त्यात होत असते अनेकांची चांदी ! बंदी येण्याआधी ही चाचणी किती स्वस्त होती? पण बंदी आली आणि तिने अनेकांच्या बंगल्यांवर सोन्याची कौलं चढवली.’ माझ्या चेह-यावरील अविश्वास बघून त्याने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबईतील चाचण्यांची ‘रेट लिस्ट’च मला ऐकवली. मी सुन्न होऊन त्याच्या चेह-याकडे बघत असताना त्याने माझा केव्हा निरोप घेतला हे माझ्या लक्षातही आले नाही. पुत्रप्राप्तीसाठी चार मुलींचा गर्भावस्थेतच खून पाडणारा एक सुशिक्षित बाप जागतिक महिला दिनाच्या दिवशी बिनदिक्कत सर्वत्र पेढे वाटत फिरत होता !
आपल्या महान देशाच्या उत्तरेकडील राज्यात मुलगी जन्माला येताच तिला दुधात बुडवून ठार मारण्यात येते, हे अनेक वर्षांपूर्वी ऐकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत नाही तोच राजस्थानात नवजात मुलींना मारण्यासाठी त्यांच्या तोंडात जळजळीत कॉस्टिक सोडा टाकण्यात येतो, तर काही स्त्रीलिंगी गर्भांना जन्म होताच यमसदनी पाठवण्यासाठी त्यांना गरम वाळूच्या पोत्यात भरून व त्या पोत्याचे तोंड करकच्च बांधून त्याला कडक उन्हात ठेवण्यात येते, हे वाचल्यानंतर माझा मनुष्यप्राण्यावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली. मला कळेना की या जगात सर्वात क्रूर नक्की कोण? या पृथ्वीवरील ज्यूंना नामशेष करण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करणारा हिटलर, की मुलीला आईच्या पोटातच संपवणारे किंवा तिचा जन्म होताच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करणारे तिचे सख्खे जन्मदाते, की त्या हत्या करण्यासाठी घसघशीत फी आकारून उत्साहाने मदत करणारे पांढ-या डगल्यातील सोफिस्टिकेटेड राक्षस?
पेढे वाटणा-या शेजा-याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून वर्तमानपत्रात व टीव्हीवर सावित्रीबाई फुले, मादाम क्यूरी, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला व अनेक जगप्रसिद्ध महिलांचे गायले जात असलेले गोडवे माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. सतत गर्भपात करणे अत्यंत धोकादायक असते व त्यात स्त्रीला स्वत:चा जीवही गमवावा लागू शकतो, ही माहिती चार गर्भपातांनंतर मुलाला जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या त्या गर्भवतीपर्यंत पोहोचवण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचे उत्तर होते - ‘माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, पण मलाही मुलगाच पाहिजे होता !’
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti