वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल.
सरकार कोणतीही चांगली योजना आणते, त्यात भ्रष्ट अधिकारीच योजनेचा बट्टयाबोळ वाजवण्यास पुढाकार घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, पण या वेळेस मात्र, घर फिरले कि घराचे वसे हि फिरतात, अशीच काहीशी गत या अधिकाऱ्यांची झाली आहे. चोरांना मदत करताना, आपले उखळ कसे पांढरे करून घेता येईल, हे पाहताना, आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते याचा थोडाही विचार या नतद्रष्ट लोकांच्या मनाला शिवला नाही, आता भोगा कृत्याची फळे.
या आधी सुद्धा, असे बरेच बँक अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंगेत अंघोळ करून बाहेर आले आहेत. NP अर्थात नॉन परफॉर्मिंग संपत्तीला कुवत नसताना भरमसाठ कर्ज देणे, आणि हे सिक युनिट बंद पडते, किव्वा पाडले जाते, नंतर हप्ते थांबतात, आणि दिलेल्या कर्जाची वसुली होणे अशक्य होते, अश्या अनेक घटना गेल्या काही वर्षात उदयास आल्या आहेत. विजय मल्ल्या हा कानफाट्या झाला, परंतू असे अनेक प्रतिमल्ल्या आजही समाजात ताठ मानेने फिरत आहेत, फक्त आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही.
आज अशातल्याच काही महाभागानी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अंगलट आला आहे.
-- विजय लिमये
December 28, 2016
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
September 20, 2017
उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत.
January 7, 2014
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.
वो हुआ कुछ इस प्रकार...
एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.
असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !
कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !
कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.
हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !
त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.
या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.02.2017
February 28, 2017
स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत.
March 9, 2013
रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते.
September 15, 2013
सोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं..
February 18, 2018
राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.
जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह' हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची वेळ' लिहिलेली असते. म्हणजे तुमचे तुम्हीच ठरवा काय खायचे ते!
परंतु हल्लीहल्लीपर्यंत छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे.
सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र अशा कोटिंग केलेल्या चकचकीत पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात. कारण उन्हात या पत्रावळींवरचा मेणाचा थर वितळायला लागतो आणि तो थेट आपल्या पोटात जातो. थर्माकोलपासून बनवलेल्या पत्रावळींमुळेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही अगदी आयुर्वेदातही दिलेली दिसते. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना किडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्व असलेल्या या पत्रावळीच भोजनसमारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे तर अगदी रोजच्या घरातल्या जेवणातसुद्धा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळींच्या वापरामुळे अनेक फायदे होत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जेवल्यानंतर बायकांनासुध्दा ताट-वाट्या घासण्याचा त्रास कमी होत असे. पूर्वी घरातली पुरुष मंडळी संध्याकाळी घरी येताना येताना शेतावरची भाजी, फुले आणि कधीकधी पत्रावळीसाठी पळसाची पानेही घेउन घरी येत असत. काही घरांमध्ये पत्रावळी लावणे हा एक कार्यक्रम असे.
पत्रावळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत. पळसाच्या पानाची पत्रावळ तर ऑल टाईम फेव्हरिट असायची पण त्याचबरोबर वडाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्या चाफ्याची पाने यांच्याही पत्रावळी बनवल्या जायच्या. मोहाच्या पानांचीही पत्रावळ काही ठिकाणी श्राध्दाला मुद्दाम लावली जात असे. कोकणात अनेक बायका चातुर्मासात आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. थर्माकोल आणि मेणाचा मुलामा दिलेला कागद यांचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ `रेडीमेड'च्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे.
पळसाची पत्रावळ बनवणे हा एक ग्रामोद्योग होता. या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही आता बुडाली आहे.
थर्माकोल, प्लास्टिक वगैरेचे विघटन पूर्णपणे होत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील `वापरा आणि फेका' या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. लग्नसमारंबात पाण्यासाठी सर्रासपणे मिनरल वॉटरच्या बॉटल्स किंवा पाऊच वापरले जातात.
अर्थात आता यावर उपाय कठीणच आहे कारण प्लास्टिक, थर्माकोल वगैरेचा वापर आपल्या एवढा अंगवळणी पडला आहे की ती सवय चटकन मोडणार नाही.
August 5, 2015
हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !
December 12, 2020
मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
January 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti