(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संरक्षण क्षेत्राला अपेक्षा भरीव तरतुदींची

    2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे आणि या क्षेत्रासाठी नवी पावले टाकत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात या उपाययोजनांना मूर्त रूप येताना दिसत नाही. याचे कारण त्यासाठी असणारी अपुरी अर्थतरतूद. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत केवळ 5 टक्क्यांची वाढ झाली होती. देशासमोरील संरक्षण आव्हानांच्या तुलनेच ती अगदीच कमी होती. त्यामुळे यंदा त्यामध्ये भरीव वाढ व्हायला हवी.

      January 29, 2018


  • पांघरूण’ – बा मांजरेकरा, हे ‘क्षालन’ शब्दातीत झाले आहे रे !

    चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे.

      February 25, 2022


  • किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

    जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

      October 2, 2023


  • सारे आपलेच बंधू !

    परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं.

      December 8, 2019


  • प्लास्टिकचा इतिहास – भाग १

    मायकेल फेरेडेने असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक (मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता.

      February 10, 2023


  • नागरिकांच्या जीवाशी खेळ…!

    लहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते.

      August 5, 2015


  • काळ – क्रोनॉन ते सेकंद

    1 या आकड्यावर 43 शून्ये लिहीली असता जी संख्या होते तितके क्रोनॉन म्हणजे 1 सेकंद. जितक्या अल्पकाळात घडणारी कोणतीही व्यवहार्य घटना आढळत नाही.

      April 1, 2023


  • लेडी विथ द लॅम्प’

    परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं.

      May 12, 2021


  • स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या, तसेच धर्मनिरपेक्षता : एक टिपण

    (०१.०४.२०१६)

    मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ; व २) धर्मनिरपेक्षता ; या, एकमेकांशी संल्लग्न असलेल्या दोन गोष्टीबद्दल मी इथे कांही माहिती पुढे ठेवीत आहे.

    • रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितलें म्हणजे, देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची कल्पना येते, तिचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता रहात नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नांवानें इंग्रजीत लिहिला , व त्याचे मराठी भाषांतर नंतर झालेले आहे, हे ध्यानीं घ्यावे. इंग्रजीत कां , तर इंग्रजी ही संपर्क-भाषा (लिंक-लँग्वेज) असल्यामुळे, कुठलीही मातृभाषा असलेल्या शिक्षित माणसाला तें लेखन सहज वाचता व समजता यावे ; तसेंच, पाश्चिमात्यांपर्यंतही (त्यात नवमतवादी ब्रिटिश आले, व अमेरिकनही आले), ते विचार पोचावेत.
    • ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण, तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला (कॉइन केला) . याचे कारण असे की, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, अजूनही जोडला जातो. पण , सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसें ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे ; तसेंच, त्यांना अभिप्रेत असलेलें ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदुपण’ .
    • सावरकारांची हिंदुत्वची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाहीं. याउलट ती, भाषा, जाती, ‘मतें’ (जसें, बुद्धिझम, जैनिझम इ. ) वगैरे सर्वांच्या पलिकडे आहे. ती व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे. याचे पहिले कारण म्हणजे, वेगवेगळ्या मातृभाषा असलेले भारतीय लोक तिचा अर्थ समजू शकतील. अर्थातच, ही व्याख्या भारतीय जनांसाठी असल्यामुळे, (आणि, संस्कृत ही शतकानुशतकें भरतखंडातील संपर्क-भाषा असल्यामुळे), सावरकारांना ही व्याख्या इंग्रजीपेक्षा संस्कृतमध्ये करणें अधिक योग्य वाटले. दुसरें, आणि अधिक महत्वाचें, कारण म्हणजे, संस्कृतमध्ये अगदी थोड्या शब्दांत अतिशय चपखल, सुस्पष्ट, अॅप्ट् अशी वाक्यरचना करता येते. (कुणीही हीच सावरकर-रचित परिभाषा, इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा अन्य भाषेत, पूर्ण अर्थ सुस्पष्ट होईल अशाप्रकारें करून पहावी, म्हणजे याचा प्रत्यय येईल).
    • काय आहे ही परिभाषा :
      आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
      पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुर् इतिस्मृत: ।।

    थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिन्धुसागरापासून ते सिन्धु नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात, आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात, ते सर्व लोक हिंदू आहेत.

    • सावरकरांनी या व्याख्येत ‘मातृभू’ असा शब्द कां वापरला नाहीँ ? ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा केलेलाच आहे. पण , इथें आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, संस्कृतमध्ये ‘पितरौ’ असा उल्लेख केल्यावर माता-पिता (parents) असा अर्थ होतो ; ‘पितर:’ अशा उल्लेख केल्यावर पूर्वज (ancestors) असा अर्थ होतो. म्हणजेच, ‘पितृभू’ असा उल्लेख केल्यावर, दोन्हीकडील सर्व पूर्वजांचा संबंध आपोआपच जोडला जातो. ( आतां मी जें उदाहरण देत आहे, त्याचा धार्मिक संदर्भ हा, संस्कृतृ-भाषिक अर्थामधून निर्माण झालेला आहे, हें ध्यानीं घ्यावें. भाद्रपदाचा वद्यपक्ष हा ‘पितृपक्ष’ मानला जातो ; येथें संदर्भ सर्व पूर्वजांचा आहे, ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल). त्यामुळे, पितृभू असा शब्द योजल्यावर, ‘ज्यांचे पूर्वज पिढ्यान् पिढ्या या भूभागातले रहिवासी आहेत ’ , असा अर्थ साहजिकच ध्वनित होतो.
    • ‘पुण्यभू’ हा शब्द सावरकरांनी निर्माण केलेला आहे. तो पाश्चिमात्यांच्या ‘होली लँड’ (Holy Land) या कल्पनेवरून घेतलेला आहे, हे उघड आहे. म्हणजे, ‘जे लोक या भूभागाला पुण्यभूमी मानतात, महान मानतात ’, असा अर्थ येथे स्पष्ट आहे. मात्र, सावरकांच्या व्याख्येतील ‘पुण्यभू’ वाटणें , हें धार्मिक संदर्भातील नाहीं, तर तिचा महत्तेशी, थोरवीशी संबंध आहे.
      (उदाहरण द्यायचें झालें तर, ‘आई’ हें नातेंच पवित्र आहे, असा शब्दप्रयोग अनेकदा केला जातो; तेव्हां त्या ‘पवित्रते’चा अर्थ धार्मिक नसून, थोरवीशी जोडलेला आहे. त्याचप्रमाणें, ‘पुण्य’ असें म्हटल्यावर त्याचा अर्थ धार्मिकच असतो असे अजिबात नाहीं. ‘दुष्काळात दामाजीपंतांनी गरिबांना धान्य वाटून टाकले, हें पुण्यकृत्य केलें’ ; इथें धार्मिक कृत्य केलें असा अर्थ मुळीच होत नसून, सत्कृत्य केलें, महत्-कृत्य केलें, असाच अर्थ होतो. ‘पुण्यश्लोक’ असा शब्दप्रयोग केल्यावर त्याचा अर्थ ‘धार्मिक’ असा होत नाही, तर सद्वर्तनी, सद्प्रवृत्त असा होतो. संभाजीपुत्र शाहू यांस ‘पुण्यश्लोक’ म्हणतात, तें या अर्थानें ).
      म्हणजेच, सावरकरांच्या या व्याख्येत, ‘जे लोक या देशाला थोर समजतात, ज्यांची महत्तापूर्ण स्थळे या भारत-भूभागात आहेत ’ , असा अर्थ अभिप्रेत आहे. (काशी-प्रयाग वगैरे स्थानें आपल्याला महत्तापूर्ण वाटतात, तितकीच , शिवाजी महाराजांची राजधानी रायगड , परकीयांपासून या भूमीला वाचविण्यासाठी प्राण देणार्‍या मराठ्यांची युद्धभूमी पानिपत , जिथे शिवपुत्र संभाजी औरंगझेबाच्या कैदेत ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला तें वढू गाव , अशी स्थळेंसुद्धा आपल्याला महत्तापूर्ण वाटतातच ना ! ).
    • याहून अधिक खोलात जाऊन चर्चा करण्याचें ही जागा नव्हे. पण, यावरून हा मुद्दा स्पष्ट आहे, की, ही सावरकरीय व्याख्या, जातपात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, वेदप्रामाण्य मानणारे-न मानणारे, अस्तिक (ईश्वराचे अस्तित्व मानणारे, या अर्थाने), एकेश्वरवादी-अद्वैतवादी-द्वैतवादी, इहवादी (जसे की चार्वाकपंथीय) , निरीश्वरवादी, जैन-बौद्ध-शीख-लिंगायत इत्यादी भिन्नभिन्न ‘मतें’ असलेले पंथ, चातुर्वर्णवादी, दलित, आदिवासी, वगैरे वगैरे सर्वांच्या पल्याड गेलेली आहे, सर्वसमावेशक आहे. इतकी विस्तृत व सुस्पष्ट व्याख्या दुसरी कुठली असेल असे वाटत नाहीं.
    • एका अर्थी, भारतीय संविधानानें, (तसें स्पष्ट न म्हणताही), ही व्याख्या स्वीकारलेली आहे, असें म्हणतां येईल. संविधानातील ‘ हिंदू लॉ ’ कुणाकुणाला लागू होतो, ते पहावे, म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल.

    धोडेसे धर्मनिरपेक्षतेबाबत.

    पाश्चिमात्यांनी १९ व्या शतकात, ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ (Religion) असा अर्थ गृहीत धरला. भारतीयांच्या ‘धर्म’ या संकल्पनेचच्या विस्तृततेची त्यांना कल्पनाच नव्हती. परंतु, धर्म या शब्दाचा अर्थ खरें तर ‘रिलिजन’हून फार व्यापक आहे. शरीरधर्म, शेजारधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म, युगधर्म, मानवधर्म, कर्मधर्मसंयोग, अशा अनेक शब्दांतून ही गोष्ट स्पष्ट होते. ‘धर्म’ या संकल्पनेचे महत्वपूर्ण विश्लेषण कुणाला समजून घ्यायचें असेल तर त्यांनी, ख्यातकीर्त विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा, ‘शिवराज्याभिषेक त्रिशतकमहोत्सवा’च्या समयींच्या ग्रंथात लिहिलेला लेख वाचावा. ‘धर्मा’चे विविध अर्थ कोणते हें कुरुंदकरांनी विशद केलें आहे, आणि, शिवाजी महाराज कुठल्या अर्थाने धार्मिक होते व कुठल्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते, याचा ऊहापोह कुरुंदकरांनी तेथे केलेला आहे.

    • महात्मा गांधीजीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून, नंतर हें सांगावेसें वाटतें की, ते व्यक्तिगत जीवनात ‘धार्मिक’ होते, व त्यांनी स्वत: तसा निर्वाळाही दिलेला आहे. पण, सामाजिक व राजकीय पटलावर ते ‘सेक्युलर’ मानले गेले आहेत (त्या बाबीच्या योग्यायोग्यतेची चर्चा तूर्तास करायची नाहींये, फक्त, तसे वास्तव आहे, एवढीच नोंद इथें करायची आहे ). सावरकर हे व्यक्तिगत जीवनात निरीश्वरवादी, जातिभेद न मानणारे, विज्ञानाची कास धरणारे असे होते. पण, त्यांची हिंदुत्वाची मूलभूत व्याख्या नीट न समजून घेतांच, किंवा पूर्वगृहदूषित (biased) वृत्तीने, त्यांना नॉन्-सेक्युलर ठरवलें गेले ! (सावरकरांचा राजकीय स्टॅन्स् --- stance --- काय होता व कां होता, हा वेगळा मुद्दा आहे. ती चर्चा तूर्तास अभिप्रेत नाहीं ).
    • कांहीं दशकांपूर्वी श्री. विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘सेक्युलरिझम’ या विषयावरील एक पुस्तिका प्रकाशित करून ती पार्लमेंटच्या सभासदांना वाटली होती (सर्क्युलेट केली होती). तिच्यात, त्यांनी, ‘सेक्युलर’ या शब्दाच्या संदर्भात, ‘निधर्मी/धर्मनिरपेक्ष आणि ‘सर्वधर्मसमभाव’ या बाबींची चर्चा केली होती. भारत हा देश सेक्युलर आहे, म्हणजे काय, तर इथें त्याचा, ‘निधर्मी’, ‘धर्मनिरपेक्ष’ असा अर्थ नसून, ‘सर्वधर्मसमभाव मानणारा’, असा अर्थ आहे, अशी त्यांनी मीमांसा केली होती.
      या सर्व विवेचनातून हाच अर्थ निघतो की, सावरकरांची ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या पूर्णपणें नॉनरिलिजियस (non-religious) आहे. लखनऊच्या शियांनी सावरकरांना अॅप्रोच् केलें असतां, तुमच्याशी आम्ही सहकार्य करू, अशीच भूमिका सावरकरांनी घेतली होती, याचा अर्थ उघड आहे. सिंधमध्ये तर कांहीं काळ हिंदुमहासभा पार्टी व मुस्लिमांचे संयुक्त सरकार होते, याच्या मागील खरा अर्थ आपण खोलात जाऊन समजून घ्यायला हवा.
    • समारोप : कुठल्याही कारणांनी का होईना पण, स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल अनेक अपसमज आहेत ; आणि ते अपसमज, अपुर्‍या महितीमुळे, किंवा पूर्वग्रहांमुळे, बायस् मुळे (bias) झालेले आहेत. पण सावरकारांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वच उचललें होतें. (‘की घेतलें व्रत न हें अम्ही अंधतेनें …… बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’ असें त्यांनी म्हटलेलेंच आहे). पण त्या गैरसमजांमुळे होणारे नुकसान आपल्या सर्वांचे आहे. सावरकरांची मतें आपल्याला मान्य असोत वा नसोत, पण आपण निष्पक्षपणें त्यांचा संदर्भ आणि पूर्ण सुस्पष्ट अर्थ नीट समजून घ्यायला हवा, यात शंका नाहीं.
      सेक्युलरिझमचेंही तसेंच आहे. त्यासाठी व्यर्थचें ‘शंख फुंकणें’ व शड्डू ठोकणें नको ; त्यासाठी योग्य तो ‘वैचारिक चश्मा’ लावणें गरजेचें आहे. विचारी जन आज ना उद्या तसें करतील, अशी आशा आपण बाळगूं या.

    - सुभाष स. नाईक.
    सांताक्रुझ (प.), मुंबई.
    M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in.
    website : www.subhashsnaik.com

      April 21, 2016


  • जागतिक टेलिव्हिजन दिवस – २१ नोव्हेंबर

    १९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबर ला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्वा दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

    जॉन लॉगी बेअर्डने १९२५ साली टेलिव्हिजनचा शोध लावला, तेव्हा प्राथमिक अवस्थेतील दूरदर्शनचा वापर शिक्षण, मनोरंजन नि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित होता. टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे. ‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजनचा खोका होय. टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे. अलिकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सी.सी.टी.व्ही.) हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे.

    प्रारंभीचा टेलिव्हिजनचा अवतार हा यांत्रिक स्वरुपाचा होता व तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो- – स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. १८८४ मध्ये जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने स्कॅनिंग डिस्क शोधून काढली व त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती. मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली हेही तितकेच खरे आहे. ही क्रांती १९३५ पूर्वीची, १९३५ ते १९४१, दुसरे महायुद्ध, १९४६ ते १९४९, १९५० ते १९५९, १९६०-२००० अशा टप्प्यात होत गेली. आज तर टी.व्ही. कुटुंबाचा घटक बनून गेला आहे. दूरदर्शनमुळे वाचनसंस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 21, 2018