(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • गोमुत्र 

    सहज आणि मोफत उपलब्ध असणारे गोमुत्र. आपण फक्त त्याचा वापर धार्मिक विधी करिता वापरतो. आज औषध म्हणून गोमुत्राचा कसा उपयोग होतो ते अभ्यासू या.

    गोमूत्राने जखमा फार लवकर धनुर्वात न होता बऱ्यां होतात.
    चमच्याभर गोमूत्रामधे 2 थेंब मोहरी तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणं सहज होते.

    गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व् कापुर मिसळून, कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ वितळून मोकळा होतो.
    सायटिका, गुढ़गे, कोपर, पोटर्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यावर गोमूत्रापेक्षा मोठे दूसरे औषध नाही.

    संधिवात, हाडं ठिसुळ होणं, रुमेटिका फिव्हर आणि अर्थरायटिसमधे सर्व औषधे निष्फळ होतात.

    80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी आर्धाकप गोमूत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुल अथवा महायोगराज गुग्गुलच्या 2 गोळ्या मिसळून पाजावे.

    शौचाला साफ़ न होणे हे सर्व रोगांना निमन्त्रण देते. गोमूत्र लघवी व् शौच, मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.

    गोमूत्रात एरंडतेल 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.

    लहान मुलांना शौचचा त्रास असल्यास २ चमचे गोमूत्रात १ चमचे मध मिसळून पाजावे.

    गाइच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भावती महिलांना मलारोध होत नाही.

    डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.

    यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व् पुनर्नवा मंडूर घ्यावे.

    एलोव्हेराच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून पिल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.

    2 ग्रॅम ओवाचूर्ण अथवा जायफळ वाटून गोमूत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे ठीक होते.

    मुळव्याधींच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र पिल्याने फायदाच् होतो.
    खरुज, एक्झिमा, पांढरेडाग, कुष्ठरोग यामधे गोमूत्रात 2 वेळा गुळवेलीचा रस मिसळून पिल्याने त्वरित फायदा होतो.

    त्वचेवर बटमोगर्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.

    हार्टविकारामधे गोमूत्र पिल्याने रक्तातील गुठळया होत नाहीत. हायब्लड प्रेशर व् लोब्लड प्रेशरमधे गोमूत्रातील लैक्टोज जबरदस्त परिणाम करतं. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.

    गोमूत्र शिरा व् धमन्यामधे कोलेस्टेरोल साठू देत नाही.

    किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.

    प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या. किडनी व् प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमूत्र सुधारते.

    गोमूत्रासारखे दूसरे कुठलीही औषध नाही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त कोणत्याही रोगां शिवाय नियमित घेऊ शकता.
    गोमूत्र नेहमी 8 पदरी कॉटनच्या कापडाने गाळून घ्यावे. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने टिकून रहते. 1 ते 2 महीन्याने व्यायला येणाऱ्या अथवा विल्या नंतर 1 महीने घेऊ नका. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नका. गोमुत्र हे फक्त देशी गाईचेच वापरा.

    सगळे उपाय एकत्र करू नयेत.

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ञ
    9820584716

  • टाच दुखी

    एच.आय.व्ही. किंवा हिपेटायटिस बी हे आजार पन्नास वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हते. आजकाल हे आजार माहिती झाले. त्यावर संशोधन चालू झाले आणि काही प्रमाणात आटोक्यात आणण्यापर्यंत यश पण मिळते आहे. तसाच एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते. टाचदुखी काही जीवघेणा आजार नाही म्हणून त्यावर फारसे संशोधन करण्याची धडपड फारशी कोणी करत नाही. पण ज्याची टाच दुखत असते त्यालाच समजते की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते.

    ही टाच दुखी आजकाल का वाढली आहे? त्याला कसा आळा घालता येईल? पेन किलर औषधे न घेता फक्त काही सवयी बदलून टाच दुखीवर कसा इलाज करता येईल? ह्या सर्व प्रश्नांचे “अनुभविक बोल” समजून घेऊया.

    पूर्वी ज्यांच्या घरी फ्रीज आहे ते श्रीमंत समजले जात. आजकाल फ्रीज म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू बनली आहे. फ्रीजचा आणि टाच दुखीचा काय संबंध असा विचार आता आपण नक्कीच सुरु केला असेल. लहानपणा पासून आपण बघत आलो आहोत की कुठेही दुखत असेल तर शेकण्यामुळे बरे वाटते. खेळता खेळता चेंडू जरी डोळ्याच्या आसपास लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने थोडी ऊब निर्माण करुन लगेच डोळ्यावर धरतात हे आपण बघितले असेल. पाठ दुखी, कंबर दुखी होत असेल तर गरम लाईट किंवा रबरी पिशवीतून गरम पाणी भरुन शेकण्यामुळे आराम पडतो हे आपण नेहमी अनुभवतो. म्हणजेच उष्णता ही वेदना घालवते ह्या उलट थंड पाण्यामुळे वेदना वाढते हे समजले पाहिजे. थंड गार सरबत किंवा पाणी पिताना दातांमध्ये कळ येते हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मग त्या थंड पाण्यामुळे शरीरात इतर ठिकाणी वेदना होणं शक्य आहे हे आपल्याला का लक्षात येत नाही.

    उत्तरेकडे अती थंडीच्या वातावरणात चालता चालता हाता-पायाला जरा धक्का लागला तरी किती जोरात ठणका लागतो. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आमच्या लहान पणी वडील एप्रिल-मे महिन्यात आम्हाला आईसक्रीम खायला घेऊन जात त्या काळात आईसक्रीम हा पदार्थ फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत खायचा असतो असे आमच्या डोक्यात ठाम बसले होते. आजकाल कोणताही ऋतु असो, अगदी धो धो पाऊस कोसळत असला तरी आणि कडाक्याची थंडी असली तरी “आईसक्रीम चालते.” फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांच्या मनात कोण भरुन देते हेच कळत नाही. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि जोडीला टाचा दुखणे चालू होते. हा विचार सांगितल्यावर काही विद्वान म्हणतात, “आम्ही इतके वर्ष फ्रीजचे पाणी पितो, तेव्हा काही नाही झालं, मग आता का?” ह्याचं उत्तर काहीही कुपथ्य केलं तर शरीर दीर्घकाळ पर्यंत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतं. आणि एक वेळ अशी येते की शरीर संपावर जातं अत्याचारांना साथ देणं सोडून देतं.

    ह्याचा दुसरा भाग म्हणजे थंड पदार्थ अति प्रमाणात वारंवार घेण्यामुळे वजन वाढते. वाढलेल्या वजनाचा सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल गुडघे नंतर कंबर व शेवटी मणके. गरज नसताना उगाचच पाणी पिण्यामुळे हे पाणी हाडांच्या भागात जास्त ओलावा निर्माण करतात आणि हाडांमध्ये सूज येऊ लागते. हा प्रकार समजण्यासाठी पावसाळ्यात लाकडी दरवाजे कसे फुगतात ते आठवून पहा. ओलावा वाढला की लाकूड जसे फुगते तशीच हाडे पण फुगतात, म्हणजेच सुजतात अशा वेळी आपण कोणतेही पेन किलर औषध घेतले की वेदना कमी होते. पण औषधाचा परिणाम होताना भरपूर घाम येतो म्हणजेच शरीरात ठोसलेलं जास्तीचं पाणी औषधाने बाहेर फेकून देण्याची क्रिया होते. हे उदाहरण देण्याचे प्रयोजन फक्त विषय समजण्यापुरते नव्हे तर हा प्रयोग असंख्य रुग्णांच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे. पूर्वीच्या काळी “संध्या” करण्याची पद्धत होती. ह्या संध्येच्या पद्धतीमध्ये पळी पळीने घेऊन आचमन आणि काही मंत्रोच्चानकरण्याची पद्धत होती. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी संध्या करावी अशी शिकवण होती. म्हणजेच सूर्यास्तानंतर जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असा संकेत होता.

    फ्रीज सारखा दुसरा टाचांचा शत्रू म्हणजे ए.सी. वेदना शामक गोळी घेतली की घाम येतो ह्याचाच उलट अर्थ असा की घाम येण्याचे थांबवणारी क्रिया वेदना वाढवण्यास कारण होते. मग हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल? वातानुकुलित ऑफिस, घर,गाडी असताना कसलाच वापर करायचा नाही का? ह्याचे उत्तर “वापर जरुर करावा पण मर्यादेत”. दिवसातून वीस तास आपण जर ए.सी. मध्ये असाल तर किमान ४० मिनिटे असा काही व्यायाम करा की ज्यामुळे आडवून ठेवलेला सर्व घाम औषधाशिवायचबाहेर पडेल. स्टीम, सोना हे प्रकार करण्यासही हरकत नाही पण बॅडमिंटन, टेनिस, सायकलिंग सारखा व्यायाम केला तर तसा घाम तर बाहेर पडेलच पण सांधे पण लवचिक राहतील.

    टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.

    १) टाच दुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात मीठ टाकून १० मिनिटे पाय बुडवून बसावे.

    २) फ्रीज शी चक्क कट्टी करावी.

    ३) कोल्ड ड्रिंक किंवा आईसक्रीम फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्याचे पदार्थ आहेत असे समजावे.

    ४) “बर्फ” हा शब्द पण उच्चारु नये.

    ५) सूर्यास्तानंतर पाणी किंवा थंड पदार्थ घेण्याचे टाळावे.

    ६) ए.सी. चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही तेथेच करावा.

    शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की ह्या गोष्टींचा वापर ह्या सवयी गेल्या २५ वर्षांत अति प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून वाढते आहे टाच दुखी.

    -- आर.बी.पाटील
    संयोजक
    फिटनेस मूवमेंट ऑफ़ इंडिया

  • बायोफीडबॅक

    तुमच्या शरिराकडून येणारे संदेश ओळखण्यासाठी बायोफीडबॅकची मदत होते. त्यामुळे मुत्राशयाजवळच्या स्नायूंवर संयम आणण्यासाठी सुद्धा मदत होते. पेल्विक स्नायूंचा व्यायामासाठी सुद्धा बायोफीडबॅकचा उपयोग केला जातो.

    मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा एकच मार्ग नसून इतरही अनेक मार्ग आहेत. काहीजणांना असंयमनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर औषधे देतात. त्या औषधांनी नुसते नियंत्रणच येते असे नाही, तर स्नायू बळकट होतात, मुत्राशय पूर्ण रिकामे व्हायला मदत होते. परंतु ह्या औषधांचे काहीवेळा दुष्परिणामही दिसून येतात. तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे इत्यादी.

  • व्यायाम करणे हि कला, स्थुलतेची टाळे बला

    अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा !
    हाss हाsss
    काय झालं हसू आलं ना?

    पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते –
    1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही

    2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही (हे विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत )

    3. मला रात्री झोपच येत नाही मग मी सकाळी उशिरापर्यंत झोपायलाच हवे, त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार

    4. मला तर शिफ्ट ड्युटी असते माझा ताळमेळ जमतच नाही

    5. माझे कंपनीत खूप चालणे होते त्यामुळे मला व्यायामाची गरज नाही

    6. व्यायाम केला कि माझे अंग दुखते

    7. मी तर रोज ४ कि.मि. चालतो /चालते पण माझे वजन काही कमी होत नाही, लठ्ठपणा हि माझी टेंडन्सी आहे.

    8. मी मुळात जेवणच खूप कमी करते आणि माझे आठवड्यातून ३ उपास असतात त्यामुळे मी व्यायाम नाही केला तरी चालतो.

    9. मला डॉक्टरांनी व्यायाम करायचा नाही असे सांगितले आहे

    खरोखरीच हि कारणे ऐकून समोरच्याची कीव येते. व्यायाम हि एक कला तर आहेच पण व्यायाम हा फार चतुराईने आणि स्मार्ट पणे करायला हवा तरच त्याचा योग्य तो फायदा आपल्याला मिळतो. स्नायूंचे बळ वाढवायचा, वजन वाढवायचा, वजन कमी करण्याचा, एखादा आजार बरा करण्याचा, मन शांत करण्याचा, हृदय मजबूत करण्याचा, फुफ्फुसांची शक्ती वाढवायचा, सौष्ठव मिळवण्याचा, फिगर बनवण्याचा इतकच काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असे व्यायामाचे प्रकार आहेत. आणि हे सगळ स्मार्ट व्यायामाने शक्य आहे. खाली मी काही स्मार्ट व्यायामाच्या टिप्स दिल्या आहेत –

    1. सुरुवातीला तुम्हाला किती वेळ व्यायामासाठी देणे शक्य आहे ते ठरवा. हि वेळ सुरुवातीला अगदी १५ मि पण पुरेशी आहे.

    2. व्यायाम करताना हृदयाची गती वाढवणे व शांत करणे या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे

    3. चालणे हा शरीरासाठी व्यायाम नाही. तुमच्या जर पोटावर कमरेवर चरबी असेल तर त्यासाठी काही स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.

    4. आपल्या जीवनशैलीनुसार व्यायाम बदला. जर आपण सतत समोर वाकून काम करत असाल तर आपल्याला मागे वाकणारे व्यायाम आवश्यक आहेत हे लक्षात घ्या.

    5. घरकाम म्हणजे व्यायाम नाही (स्त्रियांनी हे विशेष लक्षात घ्यावे ). घरकामाने आपण थकतो, व्यायामाने आपण प्रसन्न होतो.

    6. व्यायाम आज केला तर त्याचा फायदा आजच मिळतो, त्यामुळे रोज व्यायाम करावा.

    7. व्यायामात कायम बदल करावा. व्यायाम हा कॉम्बीनेशन मधे करावा. म्हणजे कधी दोरीच्या उड्या आणि योगा, तर कधी धावणे चालणे व पॉवर योगा, कधी फक्त योगा आणि मेडीटेशन, सुटीच्या दिवशी डोंगर चढणे.

    8. नुसताच व्यायाम नाही तर रोजच्या हालचाली पण वाढवणे गरजेचे असते. जसे जिना चढणे उतरणे, स्वतः पाणी प्यायला जाणे, जड वस्तू उचलणे, घराची साफ सफाई करणे.

    9. हल्ली आपल्याला मानसिक थकवा खूप येतो. पण लक्षात घ्या मानसिक थकवा घालवण्यासाठी शारीरिक थकवा खूप आवश्यक असतो.

    10. आपल्याला हव्या त्या वेळी, हवा तेवढा वेळ व्यायाम करता येतो. माणूस श्रीमंत असो कि गरीब त्याला दिवस हा २४ तासांचाच मिळतो हे लक्षात घ्या, आपल्यापेक्षा फिल्मस्टार आणि बिझनेसमन हे खूप बिझी असतात परंतु ते वेळेचे नियोजन करून व्यायामासाठी वेळ काढतात आणि आपण मात्र कारणे देतो.

    व्यायामाच्या आणि आहाराची योग्य धरा कास
    नाहीतर शरीरामध्ये आपल्या रोगाचा होईल वास
    कदान्न खाण्याचा करू नका हव्यास
    सुडौल शरीराचा घ्या जरा ध्यास !!

  • गायीच्या दूधाचे महत्व

    आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.

    जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.

    डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.

    आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !

    रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.

    बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.

    आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेनेरिक औषधे

    रुग्णांना चांगल्या आणि स्वस्त दरातील आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने सरकारने स्वस्त औषधांची उपलब्धता आणि अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारने जेनेरिक औषधांच्या माध्यमातून जनतेसाठी स्वस्त पण दर्जेदार जीवनावश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

    स्वस्त उपचारांसाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. या कायद्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे लिहून देणेही बंधनकारक होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

    आज काल आपण सर्वजण विविध माध्यमातून जेनेरिक औषधांविषयी ऐकतो आहोत.

    पण काय आहेत ही जेनेरिक औषधे?
    खरंच परिणामकारक आहेत का?
    कुठे उपलब्ध आहेत?
    मी आत्ता घेत असलेल्या औषधांसाठी कोणता जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत ?
    व ती तुलनेत एवढी स्वस्त कशी?
    जेनेरिक औषधे म्हणजे काय?

    ‘जेनेरिक औषधे’ म्हणजे ब्रॅँडेड नसलेली स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषध व त्याचे ब्रॅण्डेड औषध यात खालील साधम्र्य असते. मुख्य घटक पदार्थ शरीरात शोषले जाण्याचा वेग आणि रक्तातली पातळी औषधाचे डोसेज फॉर्म (उदा. टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप)

    अनेक वर्षांच्या संशोधनातून शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषध तयार केले जाते. दरम्यान, या औषधांचा उत्पादन करण्याचा खर्च जरी कमी असला तरी संशोधनावर झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्या कंपनीला त्या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी देण्यात येतो, म्हणजेच पेटंट देण्यात येते. या औषधाला कंपनी विशिष्ठ नाव देते, त्यालाच आपण ‘ब्रँडेड औषध’ असे म्हणतो. पेटंटचा कालावधी सात ते वीस वर्षांदरम्यान असतो. या कालावधीनंतर इतर औषध कंपन्या त्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून व तिच्या परवानगीशिवाय त्याच गुणवत्तेचे औषध वेगळ्या नावाने म्हणजेच जेनेरिक नाव देऊन तयार करू शकतात. हे तयार केलेले औषध म्हणजेच ‘जेनेरिक औषध’ होय.

    जेनेरिक औषधांची किंमत कमी का असते?

    जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने पेटंटच्या कालावधीत वसूल केलेला असतो. अर्थातच औषध निर्मितीचा खर्चही कमी असल्याने त्याची किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी होते. यामुळे नागरिकांनी स्वतःहून जेनेरिक औषधांची मागणी करायला हवी. यामध्ये पैशांचीही बचत आणि उपचारही उच्च दर्जाचा असेल.

    उदा. डोकेदुखी, अंगदुखी, ताप यांपासून आराम देणारे ‘पॅरासिटॅमॉल’ नावाचे एक औषध आहे. ‘पॅरासिटॅमॉल’ हे जेनेरिक नाव झाले. तर क्रोसिन, मेटॅसीन, कॅलपोल आदी ब्रँडेड औषधे आहेत. ही जी निरनिराळ्या ब्रँडनेमखाली मिळतात त्यांना ‘ब्रँडेड-जेनेरिक’ असे म्हणतात. भारतात सुमारे ९०० जेनेरिक औषधांपासून बनलेली ६०००० ‘ब्रँडेड-जेनेरिक’ औषधे आज भारतात विकली जातात.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त

    अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते.

    जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..

    संत्रा - संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.

    पपई - पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्‍या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.

    डाळिंब - पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे
    पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.

    सफरचंद - सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

    केळी - शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.

    नाशपाती - या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.

    पीच - या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर
    चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.

    किवी - या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.

    (आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन)

  • मधुमेहापासुन मुक्ती

    मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत.

    अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.

    मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.

    सगळ्या मधुमेहीनी हे जाणणे गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.
    टाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.

    या सर्व मुद्यावर मात करण्यासाठी "फ्रिडम फ्राँम डायबेटीस" या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.

    "रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा." हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.

    स्मूदीची पाककृती अशी आहे-

    १. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.
    २. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.
    ३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.
    ४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.
    ५. "रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा." कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.
    ६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.
    ७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.

    हे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.

    स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.

    या व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा. "पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा" जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.

    'फ्रीडम फ्राँस डायबेटीस' च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

    या लोकांनी चक्क "ग्लुकोज टोलरन्स टेस्ट" ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.

    या स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.

    संकलन,
    विकास दांगट,
    पुणे. 9423094303

  • आरोग्यासाठी गोमातेची उपयोगिता

    गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख.. 

  • केमिकल फ्री’ अन्नासाठी…

    १. नैसर्गिक पद्धतीनं शेती केलेलं अन्न खाणं चांगलं. म्हणजेच ऑरगॅनिक फूड. त्यात रसायनं असण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या-ज्या वेळी शक्य असेल त्यावेळी ऑरगॅनिक फूड घ्या.

    २. साखर कमीत कमी वापरावी किंवा बंदच करावी. थोडी तरी साखर शरीराला हवी, हा गैरसमज आहे; कारण नैसर्गिक साखर आपल्याला गहू, भात, फळं यातही मिळत असतेच. साखरेऐवजी गोडीसाठी शुद्ध मध किंवा 'केमिकल फ्री' गूळ वापरावा.

    ३. तेल-रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध केलेलं तेल वापरण्यापेक्षा मशिनच्या माध्यमातून शुद्ध केलेलं तेल वापरावं. गाळलेलं किंवा घाण्यावरचं तेल वापरलं तर उत्तम.

    ४. कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वापरा. उदाहरणार्थ, सफरचंद नुसतं खाणं उत्तम, त्याचा रसही ठीक; पण त्याचा जाम मात्र भरपूर प्रक्रिया केलेला, निःसत्त्व आणि साखरेमुळे खूप जास्त कॅलरीजचा असतो. म्हणूनच पदार्थ जास्तीतजास्त त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात खावं. बाहेर स्ट्रॉबेरी, मँगो असे ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम मिळतात; परंतु त्यात केवळ कृत्रिम स्वाद वापरलेला असतो

    ५. भाज्या ताज्या आणि त्या त्या मोसमात खालेल्या जास्त चांगल्या; कारण त्यावेळी त्यांच्यात जीवनसत्त्वं आणि क्षार जास्तीत जास्त असतात. साठवलेल्या, पावडर केलेल्या, फ्रोझेन भाज्यांमध्ये नैसर्गिक सत्त्वं कमी आणि रसायनं अधिक असू शकतात. भाज्यांच्या सूप पावडरचं पाकीट वाचल्यावर त्यात किती अनैसर्गिक गोष्टी आहेत, ते आपल्याला कळेल.

    ६. घरचं अन्न घेणं कधीही चांगलं. हॉटेलमधील भाज्या छान दिसण्यासाठी त्यात रंग वापरले जातात.

    ७. मिठाई वरचा वर्ख आणि त्यातील कृत्रिम रंगही शरीराला हानिकारक ठरतात. असेच रंग केक, पेस्ट्रीज, बर्फाचा गोळा, गोळ्या यातही वापरले जातात म्हणून यांचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्यावा. घरी केलेला नाचणी केक वगैरे उत्तम.

    ८. मासे किंवा फिश यात ओमेगा फॅट्स असतात. आकारानं मोठ्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं. यासाठी आकारानं लहान मासे घ्यावेत.

    गजानन वैद
    whats app -7775871809

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)