वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भाकरी मिळत नाही तर या लोकांनी ब्रेड खावा, केक खावा; रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची काय गरज आह!’ रशियाच्या झारने भाकरीसाठी आंदोलन करणाऱ्यांना सुनावलेल्या या उत्तराची इतिहासाने दखल घेतली आहे. आजही कुणी राज्यकर्ता जनतेच्या प्रश्नांकडे उर्मट दुर्लक्ष करीत असेल तर त्याला या झारची उपमा दिली जाते.
June 10, 2007
बुद्धीच्या कक्षेत न येणारे ज्ञानही श्रद्धायुक्त अंतःकरण असल्यास प्राप्त होते असे म्हटले जाते. आयुष्यात श्रेष्ठतम गणलेले सम्यम् ज्ञान कसे प्राप्त होईल? त्यासाठी काय असणे आवश्यक आहे?
April 27, 2024
पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत धरायला हरकत नसावी, की पुराणांमधील उल्लेखांच्या खूप आधीपासूनच, गणेशावतारांची संकल्पना व माहिती जनमानसामधे रूढ झालेली आहे.
अवतार घेणें म्हणजे धरतीवर पुनरामन करणें. अर्थातच, गणेशावतार म्हटलें की, गजाननाचे धरतीवर पुन्हापुन्हा आगमन आभिप्रेत आहे. त्या संकल्पनेचा वैज्ञानिक अर्थही आपण शोधायला हवा.
एक महत्वाची शक्यता अशी : अवकाशप्रवासात ‘टाइम-डायलेशन’ होतें. म्हणजेच, पृथ्वीवर अनेक शतकें लोटलेली असली, तरी अवकाशयानातील प्रवाशासाठी फक्त अल्प वर्षेंच गेलेली असतात. (अशी सापेक्ष कालगणना भारतीय परंपरेमधेसुद्धा आहे. मानवाची अमुक-लक्ष वर्षें म्हणजे ‘ब्रह्म्याचे’ एक वर्ष, असें भारतीय परंपरा सांगते.) म्हणजे असें पहा, हा अवकाशयात्री (किंवा त्याची टोळी) एकदा येऊन गेल्यानंतर, पुढील वेळी जेव्हां पृथ्वीवर उतरला असेल, तेव्हां तो स्वत: फक्त थोडीशी वर्षेंच व्यतीत करून आलेला असेल, परंतु पृथ्वीवर मात्र कैक शतकें व अनेक पिढ्या गेलेल्या असतील. त्यामुळे, अवकाशप्रवासी ही व्यक्ती स्वत: तीच जरी असली तरी, पृथ्वीवासीयांना तो नवीन ‘अवतार’ वाटणें स्वाभाविक आहे.
दुसरी एक शक्यता : आपण आणखीही एक अन्य गोष्ट आपण ध्यानात घेऊं. आपण हें पाहिलेंच आहे की, ‘विशालकाय गजानन’ म्हणजे ‘स्पेस-सूट घातलेला अवकाशप्रवासी’ आहे. आतां, एक गोष्ट उघड आहे की, स्पेस-सूट हा एकप्रकारचा ‘युनिफॉर्म’च (गणवेश) आहे. आणि, आपणां सर्वांना ठाऊकच आहे की, गणवेश घातलेल्या सर्व व्यक्ती, दुरून नजर टाकल्यावर ‘एकसारख्याच’ दिसतात. उदाहरणार्थ, पोलिस, फायर-ब्रिगेडवाले, सैनिक, वगैरे. त्यामुळे, आधी व कालांतरानें पृथ्वीवर उतरलेल्या व असा युनिफॉर्म म्हणजे स्पेस-सूट घातलेल्या अवकाशयात्री व्यक्ती जरी भिन्न भिन्न असल्या, तरी बघणार्याना ‘ती एकच व्यक्ती पुन्हा अवतरली आहे’, असे वाटणें सहज शक्य आहे.
हल्लीचे उदाहरण : आपण हल्लीचे एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. काहीं दशकांपूर्वी पृथ्वीवासी ‘ऍस्ट्रॉनॉट’ आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरला होता. तेव्हां त्यानें स्पेस-सूट घातलेला होता. आपण त्याची तशा वेशातील, चंद्रावरील छायाचित्रेही पाहिलेली असतील.
समजा, चंद्रावर त्यासमयीं जर कोणी अप्रगत जीव वास करत असते, तर त्यांना आर्मस्ट्राँग हा गजाननासारखा, व आकाशातून उतरलेला, ‘देव’ वाटू शकला असता.
आणि, कांही दशकांनंतर,. किंवा शतकांनंतर, जर दुसरा एखादा, तसाच स्पेस-सूट घातलेला ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर उतरला, तर तेथील जीवांना तो ‘त्या देवाचा अवतार’ आहे, त्या देवाचें ‘पुनरागमन’ झालें आहे, असेच वाटलें असते.
म्हणूनच, आपल्याला गजाननाच्या अवतारांचा उल्लेख मिळतो ; गजानन अनादि आहे, अनंत आहे, असें मानलें जातें.
विविध अवतारांची भिन्नभिन्न वाहनें :
पुराणांनुसार, गजाननाच्या प्रत्येक अवताराचें वाहन भिन्न आहे. जसें, उंदीर, सिंह, मोर. तें कां, याचाही विचार करायला हवा.
याचें स्पष्टीकरण सोपें आहे. आजही, मोटारींचे वेगवेगळे आकार आपण पाहतोच. तसेंच, फक्त-जमिनीवर पळणारी मोटार, पाण्यात-चालणारी होडी किंवा बोट, व ‘ऍम्फिबियस’ (भूमी व पाणी, दोन्हीवर प्रवास करू शकणारें) हॉवरक्राफ्ट यांचे स्वरूप भिन्नभिन्नच असते.
ज़रासे-वरती, आकाशात प्रवास करू शकणार्या, हवाई-बलून (एअर-शिप), ग्लायडर व हेलिकॉप्टर यांचे स्वरूपही एकमेकांपेक्षा वेगळें असतें. जमिनीवरून टेक्-ऑफ् घेऊन उंच-उंच उडणार्या जेट-विमानांचा आकार अगदीच वेगळा असतो. असेच ‘फ्लाइंग-सॉसर्स’चें होतें आहे. अशा ‘उडत्या तबकड्या’ वस्तुत: अस्तित्वात आहेत की नाहींत, हा एक वेगळाच विषय आहे, परंतु, एक मात्र खरें की, ज्यांना अशी ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑबजेक्टस्’ (UFOs) ‘दिसलेली’ आहेत, ते लोक त्यांच्या आकाराचें भिन्नभिन्न वर्णन सांगतात, जसें, बशीसारखें, चिरूटासारखें, गोळ्यासारखे- गोलाकार (speherical), इत्यादि.
त्याप्रमाणेंच, अवकाशप्रवासी वापरत असलेल्या ‘ग्राउंड-कार्स’चें (पृथ्वीग्रहावरती, जमिनीवर, पाण्यात, किंवा काहीं उंचीवर आकाशातून, प्रवास करू शकणार्या वाहनांचें) स्वरूप कालानुसार किंवा आवश्यकतेनुसार, भिन्नभिन्न असूं शकेल; व त्यामुळे, भूतलवासियांना त्या वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणें दिसल्या असाव्यात.
गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजाननाची विज्ञानयुगीन प्रार्थना, आरती :
गजमुख देव गणपतीची स्तोत्रे, प्रार्थना, नमन, वंदना, आरत्या, हें सर्व आपण वाचलेलें-ऐकलेलें आहे. पण, परग्रहवासी-अवकाशप्रवासी अशा गजाननासाठी जुनी स्तोत्रें इत्यादी कितपत उपयोगी ठरतील ? त्यासाठी, त्याची ही विज्ञानयुगीन नूतन स्तुती, नूतन आरती :
‘व्योमातुन अवतरला गजमुख’
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
असे हें, कालातीत गजाननाचें, अवकाशयात्री-गण-पतीचे व गणेशाच्या अवतारांचे विज्ञानयुगीन स्पष्टीकरण. वाचल्याबरोबर, लागलीच तें पटो न पटो; पण काहीं अवधीनंतर तें सर्वांच्या विचारांना नक्कीच चालना देईल, अशी खात्री वाटते. काही काळाने, एखाद्या गणेशोत्सवात वरील आरतीचा गजर घुमला तर आश्चर्य वाटायला नको.
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
August 5, 2016

आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं… आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा ठिकाणचं. शहरात अर्थात असं आकाश दिसणं शक्यच नाही.
February 28, 2023
नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)
वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
ताणतणाव म्हणजे,
" ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). ""ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).
वाईट घटनांमुळे निर्माण होणारा ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.
स्व-संकल्पना म्हणजे ,
"स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय." ताण निर्माण करणाऱ्या घटना :
जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.
समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .
मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .
समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .
दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .
व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :
स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात समस्येचे मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .
बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही. पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती . सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .
तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे. जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .
ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.
-- प्रा. हितेशकुमार पटले
ExamVishwa
April 23, 2017
‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे .
तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; दिल्लीतील Law & Order हें केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. दिल्लीच्या राज्य- सरकारला कांहीं गोष्टींसाठी दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरची परवानगी घ्यावी लागते ; दिल्लीचे पोलिस केंद्राच्या गृह-मंत्रालयाच्या एकप्रकारें आधीन आहेत. केजरीवालांचं दिल्ली-पोलिसांच्या मुख्याशी पटत नाहीं ; केजरीवाल यांचें दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरशी पटत नाहीं, केजरीवाल यांचें केंद्राच्या गृहमंत्रालयाशी पटत नाहीं. नुसतेंच या सर्वांशी पटत नाहीं असें नव्हे, तर संघर्ष आहे. केजरीवाल हे म्हणताहेत की दिल्लीला संपूर्ण statehood मिळालें पाहिजे , म्हणजे सगळें राज्य-सरकारच्या अखत्यारीत येईल. दिल्लीच्या इलेक्शनमध्ये AAP ला मोठें बहुमत मिळालें आहे. त्यामुळे, आतां ‘ब्रेक्झिट’च्या धर्तीवर, दिल्लीला संपूर्ण ‘स्टेटहुड’ मिळावें यासाठी, referendum, जनमत, घ्यायला हवें अस प्रचार केजरीवाल करत आहेत . तसें झाल्यास , आपल्या मताला बहुमत मिळेल, अशी त्यांना कदाचित खात्री वाटत असावी.
अमेरिकेतही (USA) राजधानी वॉशिंग्टन डी.सी. हें शहर क्रेंद्राच्या ( फेडरल सरकारच्या) अखत्यारीत आहे. तेथेंही कांहीं नेते, त्या शहरासाठी ‘स्टेटहुड’ची मागणी करताहेत, पण तेथील फेडरल सरकारनें अजून तरी त्यांना दाद दिलेली दिसत नाहीं. भारत सरकारनेंही ही गोष्ट ध्यानात ठेवावी, आणि दिल्लीची सुरक्षा या विषयावर अजिबात compromise करूं नये.
केजरीवालांची AAP जेव्हां इलेक्शनसाठी उभी होती, तेव्हांही त्यांना दिल्ली राज्याचें ‘स्टेटस’ काय आहे, हें पूर्णपणें ठाऊक असणारच. त्यांनी ‘दिल्लाला संपूर्ण राज्याचा दर्जा हवा’ या प्रश्नावर निवडणूक लढवली असती , व त्या मुद्द्यावर त्यांची पार्टी जर बहुमतानें निवडून आली असती, तर मग , हा प्रश्न धसास लावण्यासाठी केले त्यांचे प्रयत्न , ‘योग्य प्रयत्न’ या सदरात मोडले असते. पण एखाद्या प्रश्नाची आधीच माहिती असणें , व ती प्रत्याप्रक्षरीत्या स्वीकारणें, आणि नंतर जनमताचा आग्रह धरणें कितपत योग्य आहे , खास करून ‘ब्रेक्झिट’चें उदाहरण देऊन ?
मात्र प्रत्येक गोष्टीसाठी जनमत घ्यायलाच हवें, असें नाहीं ; खास करून प्रश्न जेव्हां सुरक्षेशी संबंधित असेल तेव्हां. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तेथें आपली पार्लियामेंट आहे, व राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकानेक महत्वाच्या व्यक्ती तेथें रहातात, परदेशीय वकिलाती तेथें आहेत. म्हणूनच, दिल्लीची सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतच असली पाहिजे, राज्य सरकारच्या नव्हे. आणि, या गोष्टीचा संबंध केवळ सिक्युरिटीशीच संबंधित आहे, आणि, असायला हवा ; केंद्रात कोणाचें व दिल्लीत कोणाचें सरकार आहे, या प्रश्नाशी तो अजिबात निगडित नाहीं, आणि नसावाही.
केजरीवाल यांचा व माझा कांहींच संबंध नाहीं ; आणि बादरायण संबंध जोडायचा असलाच तर, आम्ही दोघेही आय्. आय्. टी. खरगपुरचे विद्यार्थी आहोत , एवढाच तो आहे. पण मी त्यांना ( आय्. आय्. टी. मधून पास कधी झालो, या निकषावरून) बराच सीनियर आहे ; त्यामुळे त्यांचा माझा तेथेंहीं संबंध येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. तसेंच, मी AAP चाच काय, कुठल्याही राजकीय पार्टीचा सभासद नाहीं. हे सर्व सांगायचा हेतू इतकाच की, माझें वरील analysis हें केवळ तर्काधिष्ठित आहे, त्याचा संबंध देशाच्या राजधानीच्या सुरक्षेशी आहे, अन्य कशाशीही नाहीं.
‘दिल्लीला संपूर्ण स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे न देणे’ या प्रश्नाचे राजकीय व अन्य पैलू तपासणें हा या लेखाचा उद्देश नाहीं. मात्र, ब्रिटनमधील ‘ब्रेक्झिट’साठीचें जनमत, हें दिल्लीसाठी योग्य उदाहरण, किंवा precedent, असूंच शकत नाहीं. देशाच्या राजधानीच्या सुरक्षेचा विचार करून, इतकें नक्कीच वाटतें की, केंद्र सरकारनें कोणाच्याही कसल्याच दबावाला बळी पडूं नये, व दिल्लीची सुरक्षा-व्यवस्था स्वत:च्याच हातात ठेवावी.
-- सुभाष स. नाईक.
June 25, 2016
१८७७ : ब्रॅडमनपूर्व ऑस्ट्रेलियातील सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा जन्म.
१९०८ : विचित्र पवित्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेड बेक्वेलचा जन्म.
October 29, 2010
पृथ्वीभोवतालच्या अंतराळात बराच कचरा जमा झाला आहे. आपणच निर्माण केलेला हा कचरा, आज आपल्याच उपग्रहांना घातक ठरतो आहे. आपल्या भोवतालच्या अंतराळाचा, आपल्या सुखसोयींसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करायचा असेल, तर या कचऱ्याचा वेळेवर निचरा होणेही गरजेचे आहे. या ‘अंतराळ कचऱ्याच्या संदर्भातील विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख…
October 6, 2023
October 28, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार
कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, "आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा." उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या "ज्ञानी" व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.
उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.
अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.
भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.
अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.
आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.
जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.
सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.
विषारी धुरापासून होणारे हे "स्लो पाॅयझनिंग" आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.
भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील.......
म्हणून तर ही "रिस्क" कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.06.2017
June 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti