वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कौन बनेगा करोडपती
अतिशय छान असा हा कार्यक्रम आहे याबद्दल वादच नाही.
पण थोडा फार बदल केला तर नक्कीच बघायला मजा येईल.
१) जर प्रश्न तो मनुष्य करत असलेल्या व्यवसायाबद्दल विचारले तर नक्कीच त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि जरी तो जिंकू शकला नाही तरी आपण आपल्या पेशात किती मागे आहोत आणि आपण स्वताला अजून किती प्रगत केले पाहिजे याची नक्कीच कल्पना येईल.
२) जनरल माहिती असणे गरजेचे आहे पण दैनंदित जीवनात आवश्यक नाही.
३) लोंकाचे मत जेव्हा घेतले जाते त्यावेळी एक अजून Option असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे माहित नाही. त्यामुळे किती लोकांना ते उत्तर माहित आहे याचा अंदाज येईल.
४) Expert हे माहितगार लोकांनाच बोलावले पाहिजे जसे MPSC , UPSC झालेले उमेदवार, हिरो कशासाठी ?
५) एक प्रश्न आपल्यासाठी सुद्धा असतो त्यावेळी SMS चे रेट दिले जातात पण दे रेट किती आहेत हे समजत देखील नाही त्यामुळे मोठा font घेऊन जर ते दाखवले तर फार बरे होईल.
-- सचिन सदावर्ते
October 15, 2010
आयुष्यात कधीकधी कामाच्या संदर्भात, काही खास घटना घडतात किंवा काही वेगळीच माणसे भेटतात. त्यामुळे तुम्ही करत असलेले काम जास्त अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या विचारांना एक नवीनच दिशा मिळते. असाच, ध्येय स्पष्ट असण्याचे महत्व आणि ते पूर्तीस नेण्यासाठी लागणारा ध्यास यावरील एक जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आला.
July 17, 2026
भारतामध्ये वांगी हे बारा महिने येणारे पीक आहे. बाजारात कोणत्याही वेळी गेले तर तुम्हांला वांगी सहज कोठेही मिळू शकते. गेल्या चार हजार वर्षांपासून वांगे भारतात उपलब्ध आहेत. जंगलामध्ये काही वेळा वांगी येतात. कारण वांग्याचे बी कोठेही मिळू शकते. आणि म्हणूनच गरीब लोक गोळा करून खात असतात
December 18, 2023
रत्नागिरी केळशी गावात हे स्थान असून, हे ठिकाण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे; मंदिर अगदी लहान असलं तरीपण ते अनेक शतकांपूर्वीचं आहे;
October 5, 2013
युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे १२०० मुले रोज मृत्यूमुखी पडतात. मलेरिया हा विषाणूंपासून संक्रमित होतो. अॅहनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही मलेरीया हा एक धोकादायक आजार ठरू शकतो.
April 25, 2021
पठाणकोट येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक एकत्र आले होते, त्यावेळचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
January 14, 2016
स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे
शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये ।
लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥
येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
स्थित्वा स्थाने सरोजे - ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन,
प्रणवमय - ओंकार ब्रह्मस्वरूप भगवान शंकरांचे ,
मरुत्कुण्डले - जेथे प्राणवायु प्राणशक्ती मध्ये विलीन होतो त्या कुंडामध्ये,
सूक्ष्ममार्गे- कुंडलिनीच्या सूक्ष्म मार्गाने प्रवास करून, तेथे निवास करणाऱ्या,
शान्ते - काहीही मिळवायचे नसल्याने परमशांत असलेले,
स्वान्ते- स्वतःच्याच स्वरूपात असणारे,
प्रलीने- आत्मरूपात लीन असणारे,
प्रकटितविभवे - बाहेर आपल्या संपूर्ण वैभवाला प्रकट करणारे,
ज्योतिरूपे - चैतन्यस्वरूप तेजस्वी,
पराख्ये- परमतत्व असणारे,
लिड्गज्ञे - शिवलिंगाच्या माध्यमातून ज्यांचे ज्ञान घडते असे,
ब्रह्मवाक्ये - उपनिषदातील महा वाक्यांमध्ये ज्यांचे तत्त्ववर्णन केले आहे असे,
सकलतनुगतं- सर्व ईश्वर महेश्वर यांच्याद्वारे सेवा केली जात असणारी,
शड्करं न स्मरामि - असे जे भगवान शंकर आहेत त्यांचे मी कधीही स्मरण देखील केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभू शंकरा ! माझ्या या अपराधाकरिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 29, 2020
प्रकाशन दिनांक :- 24/10/2004
राज्य विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीचे फलित, त्याचे राजकीय परिणाम असे झाले असते तर तो पडला असता, तसे झाले असते तर हा आला असता, याच्यामुळे हा पडला, त्याच्यामुळे तो पडला, या जातीने त्याला मतदान केले, त्या जातीने याला मतदान केले, कुणाचे गणित कुठे चुकले, कुणाचे जुळून आले, या आणि अशाच प्रकारच्या चर्चांचे रवंथ सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीचा खरा अर्थ, निवडणुकीची खरी उपयुक्तता, निवडणुकीचे पावित्र्य या चर्चेच्या गदारोळात कुठेतरी हरवून गेलेले असते.
October 24, 2004
लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता विमाने लँड करु शकतील.
November 9, 2019
वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत.
April 29, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti