वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो.
या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.
कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.
माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
January 16, 2017
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता.
October 15, 2021
सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण हे रस अनेकजण पितातच.
खरंच असे रस रोज पिणं हे आरोग्यवर्धक असतं?
नियमित फिरायला जाणारे आणि नियमित ज्यूस / रस घेणारे असे अनेकजण कधी विचार करतात की, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यासाठी कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? मी कोणता रस घेऊ? किती घेऊ? किती दिवस घेऊ? आणि घेऊ की नको? असं कुणी विचारतं का डॉक्टरांना? छे.छे.! असा सल्ला घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, कारण सेल्फ मेडिकेशन करणा:यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण निदान त्याबद्दल वाचन, नेटवरून काही माहिती तरी घेतो का? तर नाही. ते औषधी आहे ना? मग सर्वाना चालते, असाच एक समज. पण ते औषधी आहे म्हणूनच प्रश्न आहे, कारण औषध म्हटलं की त्याला डोस म्हणजे मात्र / प्रमाण आले. कालावधी आला आणि मुख्य म्हणजे तुम्हाला याची गरज आहे का हे तपासणं आलं.
मधुमेह नसणा:यानं मधुमेहाचं औषध घेतलं तर चालेल का?
जेव्हा पहाटे आपल्याला रस विकत मिळतात, तेव्हा ते कधी काढले आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची साठवण करताना, वाटप करताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे का हे बघणंसुद्धा आवश्यक आहे. रस काढताना ती वनस्पती स्वच्छ धुवून, निवडून नंतर रस काढला जातो का? ते ही बघा. जर औषधांवर पेस्टिसाइडचे फवारे मारले जात असतील तर ते साध्या पाण्यानं धुवून निघत नाहीत. त्यांचे अंश रसातही येतात. म्हणून ही द्रव्यं कुठून आणली जातात त्याचीही माहिती घ्यावी. अनेक जण स्वत:च्या घरीच ज्यूस काढतात. आणि विचारतात, हे तर चालेल ना प्यालं तर? पण त्यांनीसुद्धा काळजी घेणं, सल्ला घेणं आवश्यकच आहे. आपण जे काही खाणार आहोत त्याची पूर्णत: शास्त्रीय माहिती घेणं आवश्यक आहे. साधे कपडे खरेदीला गेल्यावरही आपण किती चौकसपणो खरेदी करतो? आणि सेवीय पदार्थाबाबत मात्र फारच उदासीन असतो. म्हणूनच आधी सारासार विचार करा, तो महत्त्वाचा!
कुठल्याही प्रकारचे रस पिताना ऋतू, वय, प्रकृती, आजार, वनस्पतीचे गुणधर्म या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी/वैद्यांनी सुचवलं असेल, सांगितलं असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसारच हे रस घेणं योग्य. स्वत:च्या मनानं, आपल्याला वाटतं म्हणून किंवा सगळे पितात म्हणून हे रस पिऊ नका.
आयुव्रेदामध्ये रसचिकित्सा सांगितली आहे. याचे दोन अर्थ होतात.
1) रस - स्वरस, एखाद्या वनस्पतीचा अंगचा रस.
2) रस+षड्रस- चव जिभेलाच ‘रसना’ असे म्हणतात.
कारण यामुळे चवीचं ज्ञान होतं. या चवी सहा प्रकारच्या असतात. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू आणि तिखट. या प्रत्येक चवीचे शरीरावर परिणाम होत असतात. या चवीसुद्धा ठरावीक प्रमाणात घेणं आवश्यक असतं. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आजार होतात.
उदा. गोड चव ही फक्त मधुमेहींनाच वज्र्य नाही तर ज्यांचं वजन वाढते आहे, ज्यांना सर्दी-खोकल्यासारखे कफाचे आजार सतत होतात त्यांनीसुद्धा गोड जास्त खाऊ नये. याचप्रमाणो कडू चव जरी आवश्यक असली तरी त्याचं प्रमाण अत्यल्प असावं, अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरात रुक्षता वाढते. सतत तहान लागणं, त्वचा कोरडी होणं, हे त्यातूनच घडतं. रोज कारल्याचा रस घेण्यानं त्या बाईंचं काय झालं, हे आता तुम्हालाही समजलं असेल! औषध ही दुधारी तलवार आहे. स्वत:च्या मनानं औषधं घेऊन स्वत:वर प्रयोग करणं, स्वत:ला ‘गिनिपिग’ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे औषधींचा / वनस्पतींचा रस वापरून चिकित्सा करणं. यात ज्या वनस्पतींमध्ये भरपूर रस असतो, प्रामुख्यानं त्यांचा रस वापरला जातो. विविध स्वरूपात औषधं वापरली जातात. उदा. चूर्ण, काढा, गोळ्या यापैकी एक म्हणजे रस. ज्या वनस्पतींमध्ये दृवांश कमी असतो त्यात थोडं पाणी टाकून, कुटून हा रस काढला जातो. यास अग्निसंस्कार नसतो यामुळे रस टिकाऊ नसतात. 2-3 तासांपेक्षा अधिक टिकत ते टिकत नाहीत. ते फसफसतात. आंबट होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी हृदयाला बल्य म्हणून दुधी भोपळा रस उपयोगी आहे. पण तुम्ही रोज घेत असाल तर त्यावर किटकनाशकं फवारणी किती प्रमाणात आहे याची माहिती घ्या. रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यासाठी अनेक जण गाजर, बीट दुर्वाचा असे रस घेतात. गाजर रस स्वरूपात किंवा त्यासह स्निग्ध पदार्थ तेल, तूप इत्यादि असल्यासच शरीरात शोषला जातो. सलाड म्हणून गाजर कच्चं खाल्यास शरीरास काहीही मिळत नाही. त्याऐवजी तेलाची फोडणी असलेली कोशिंबीर किंवा गाजर हलवा खाणं योग्य. त्याचप्रमाणं गाजर रसही सतत घेत राहिल्यास शरीरातील केरॅटिन वाढते. त्वचा तांबूस होते. बीट रससुद्धा रोज घेऊ नये. मधूनमधून खंड करावा. गाजर-बीट एकत्र घेतल्यास 1/4 भाग बीट व 3/4 भाग गाजर रस असं प्रमाण ठेवावं. कोरफड रस नियमित घेणा:या व्यक्तीही आहेत. त्याचा ब्रँडेंड रसही आता बाजारात मिळतो. कोरफडीचं कार्य मुख्यत: यकृत, गर्भाशय यावर होतं. सतत कोरफड रस घेण्यानं मूळव्याध होण्याची शक्यता असते. तसेच गर्भिणी, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्रव होणा:या स्त्रिया, यांनी हा कोरफड रस घेऊ नये.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वैद्य रजनी गोखले
October 1, 2016
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
November 21, 2016

हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.' 'गँग' ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता 'ट्रॅकमन' व 'खलाशी' म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे २४ तासासाठीचे वॉचमन असतात. वेळप्रसंगी मार्गावर कोणताही धोका आढळल्यास जिवावर उदार होऊन भरधाव येणाऱ्या गाडीला दूरवरून इशारा देत हे कर्मचारी ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर सुमारे ८ ते १० किलो वजनाची विविध हत्यारं असतात. ३५ किलो एवढं वजन १०० मीटर अंतरापर्यंत २ मिनिटांत एका फेरीत, तशीच वेळ पडल्यास अवजारांसकट १५०० मीटर अंतर ७ मिनिटांमध्ये धावून गाठण्याची क्षमता असेल, तरच या कामाकरता त्यांची निवड केली जाते. ट्रॅकमनना त्यांची सर्व कामं दोन समांतर मार्गांच्या मध्यात उभं राहून तळपत्या उन्हात किंवा गारठून टाकणाऱ्या थंडीत वा कोसळणाऱ्या पावसात करावी लागतात.
रुळांच्या दोन मार्गामध्ये उभं राहण्यास जेमतेमच जागा असल्यानं बाजूनं वेगात जाणाऱ्या गाडीचा धोका सततच असतो. मुंबई शहरात तर दर मिनिटाला लोकल जात असतात. त्यामुळे अनेक वेळा धक्का लागून हे ट्रॅकमन गंभीररीत्या जखमी होतात वा मरणही पावतात. गेल्या तीन वर्षांत मुंबई व आसपासच्या ट्रॅकवर जवळजवळ ३० लाईनमन बळी पडले. त्यातही प्रवासी गाडी वा मालगाडीपासूनचा धोका जास्तच असतो. लष्करातील जवान ज्याप्रमाणे सरहद्दीवर संरक्षण करताना बळी जातात, तसेच हे ट्रॅकमन आपली सर्वांची जीवनरेषा बिनात्रासाची व्हावी म्हणून आपला जीव गमावतात. खरं पाहता,
हे रेल्वेचे शूर सैनिक असून, त्यांच्या शौर्याची गाणी कधीच गायली जात नाहीत ही शोकांतिका आहे.
दिल्लीजवळील मांडवली या छोट्या रेल्वेस्टेशनजवळील भोला नावाच्या लाईनमननं त्यांच्या रोजच्या कामाचा दिनक्रम कसा असतो ते लिहिलं आहे. हा दिनक्रम त्याच्याच शब्दांत वाचण्यासारखा आहे. त्यानं जे लिहिलं आहे त्याचं सारं असं आहे: वयाच्या १७ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यातून रेल्वे ट्रॅकमनच्या कामावर त्याची निवड झाली. आज वयाच्या ५२व्या वर्षांपर्यंत, म्हणजे ३५ वर्षे तो हे काम मनापासून करीत आहे. रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (यामध्ये २ तासांची सुटी) तो कामावर असतो. रोज अंदाजे १० ते १२ किलोमीटर चालावं लागतं. रोजचा हाच मार्ग असल्यानं लाईनची इंचाइंचाची त्याला माहिती आहे व त्यामुळे काम चोख बजावलं जातं. या ट्रॅकमनच्यावरची जागा 'की' मनची आहे, परंतु ते पद मिळविण्याची भोलाची इच्छा नाही; कारण तिथे जबाबदारी जास्त असते. कधी अपघात झाला तर संपूर्णपणे त्या पदावरील व्यक्तीला जबाबदार धरलं जातं. रेल्वेलाईनला लागूनच त्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या असून, तिथे नातवंडांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. महिना १५ ते १८ हजार रुपये असा पगार असल्यानं भोला त्यावर खूश आहे. 'आमच्याशिवाय रेल्वेगाड्या चालणं कठीण आहे, पण आमच्या जागी दुसरे कोणी केव्हाही मिळू शकतात' याची सतत जाणीव असल्यानं रेल्वेच्या इतर १३ लाख कामगारांप्रमाणे संपाचे विचार डोक्यात आणता येत नाहीत. खरं तर रोजच आम्ही मरणाच्या वाटेवरून चालत असतो, परंतु शेवटी माझं नशीब देवाच्याच हातांत आहे. माझी देवावर अढळ श्रद्धा आहे. घरात वा कामावर सतत २४ तास इंजिनचे कर्कश्श आवाज कानांवर पडत असतात, तेच आमचं जीवन आहे.'
प्रवाशांचा प्रवास निर्धोक ठेवणारे हे गँगमन नावाचे रेल्वेचे जणू शूर सैनिकच! त्यांच्या तत्परतेला आणि कष्टांना प्रत्येक प्रवासादरम्यान मनोमन सलाम करायला हवा.
डॉ. अविनाश वैद्य
July 21, 2022
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.
January 22, 2020
मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो, परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते.
October 9, 2018
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले.
December 1, 2010
रेल्वेप्रवासाचं नियोजन
साधारण १९५५ सालापासून तिकिटाचं रिझर्व्हेशन करणं प्रवासीमंडळींमध्ये रुळू लागलं होतं. त्या तिकिटावरचा पेननं लिहिलेला डबा क्रमांक आणि सीट क्रमांक वाचणं म्हणजे एक दिव्यच असे. पुढे गाडीत हमखास जागा पकडून देणारे स्टेशनवर उभेच असत. त्यांचं जाळंच तयार झालेलं होतं. त्यांच्यातील काही जण गाडी यार्डातून निघून फ्लॅटफॉर्मला लागतानाच अनेक जागा अडवून येत. मग काय? सीट देण्याचा लिलावच! जो प्रवासी जास्त पैसे देणार तो वजीर. काही वेळा दोन बाकांच्या मध्यातही पथारी पसरत. भांडणं, कलकलाट यानं प्रत्येक डबा दुमदुमून निघत असे. ही स्थिती बदलत जाऊन, आज आपण घरबसल्या संगणकाद्वारे तिकिटाचे आरक्षण आज करू शकण्याइथपर्यंतचा टप्पा रेल्वेनं गाठला आहे.
संगणकावरून आरक्षण (Computer Rail Reservations) ही भारतीय रेल्वेच्या अभूतपूर्व यशाची सर्वोत्तम घटना मानावी लागेल. काही वर्षांत याचं जाळं भारतभर पसरलं. कुठल्याही स्टेशनवरून, भारतभरातील कोणत्याही गाडीचं जाण्याचं-येण्याचं तिकीट क्षणात प्रवाशांच्या हातात पडू लागलं. भारतातील अनेक प्रादेशिक भाषांना डावलून संपूर्ण इंग्रजीत हजारो 'बुकिंग क्लार्क्स'ना याचं उत्तम शिक्षण देणं हे एक जिकरीचं काम होतं. गेल्या अनेक वर्षांत मी रेल्वेने भरपूर प्रवास केला, पण संगणकीय तिकिटात एकदाही चूक झालेली मला आठवत नाही. याकरता वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर अतिशय उच्च दर्जाचं आहे. आरक्षण दोन महिने, तीन महिने, सहा महिने आधीपासून होत असल्यानं (ही कालमर्यादा सारखी बदलत असते) प्रवास-नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे.
आपल्याला ज्या गावाला जायचं आहे, तिथपर्यंत कोणकोणत्या गाड्या जातात याची व्यवस्थित माहिती (गाडी क्रमांकासकट) रेल्वे टाईमटेबल वा संगणकाद्वारे आपल्याजवळ असणं आवश्यक असतं. आजकाल भारतभरातून असंख्य गाड्या सर्व दिशांना जात असतात, तेव्हा योग्य गाडी शोधण्याचा अभ्यास केल्यास प्रवास सुखकर होतो. बऱ्याच वेळा महत्त्वाच्या गाड्या अगदी पहिल्या दिवशीच तासभरात पूर्ण भरतात, पण विशेष प्रसिद्ध नसलेल्या गाडीमध्ये आरामात जागा मिळू शकते.
वेटलिस्ट आणि रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलायझेशन (आर.ए.सी.) ही तिकिटं काढून ठेवणं व पुढील संपूर्ण प्रवासाचं नियोजन करणं हे व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण काही वेळा आपला तिकीट क्रमांक अगदी गाडी सुटण्याच्या दिवसापर्यंत पुढे जात नाही, पण जे सारखे प्रवास करत असतात ते बेधडकपणे अगदी पन्नासावा क्रमांक असेल तरी गाडीवर हजर होतात. काही वेळा जागा मिळतेही, पण हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतं.
विविध प्रवासी कंपन्या सुरुवातीला रेल्वे तिकिटाची सोय प्रवाशांना करून देत असत. त्यावेळी फॉर्मवर विविध नावं व वयं लिहून आधीच तिकिटं मिळविली जात असत. जे प्रवासी उशिरा नोंदणी करत, त्यांच्या हातात निराळ्या नावाची व वयाची तिकिटं दिली जात. तिकीटचेकरनं नाव विचारलं तर फॉर्मवरचं नाव बेधडकपणे सांगावं लागे, पण काही वेळा वयाचा गोंधळ होत असे. आता एसी कोचेसमध्ये ओळखपत्रं विचारू शकतात.
एकदा पुण्याहून येताना मला तिकीट मिळालं होतं, मिस्टर जे. एच. शाह नावाचं, वय ७६. मी जेमतेम ५० वर्षाचा. डब्यावरील चार्ट पाहून मी थक्कच. गाडी सुरू झाली; चेकर माझ्यापर्यंत आला, पण एकाएकी डब्यात गडबड गोंधळ झाला, अनेक प्रवासी घुसले आणि मग तपासनीस जो गायब झाला तो उगवलाच नाही. माझं नशिब बलवत्तर हे खरंच, पण माझ्या एजंटनी मला साफ बनविलं होतं हेही तेवढंच खरं! एजंटकडून रिझर्व्हेशन करताना असं बनवलं जाण्याची शक्यता गृहीत धरावी लागत असे.
एकदा आमचा २५ जणांचा ग्रूप जम्मू तावी एक्सप्रेसनं मुंबईकडे परत येणार होता. चक्की बँक स्टेशनवर आम्ही सर्व चढणार होतो, आम्हा सर्व प्रवाशांची नावं, वयं व्यवस्थित भरलेले फॉर्ड्स जम्मू येथील एजंटकडे पाठविण्यात आले होते. तेथील एजंटनी रेल्वेक्लार्कशी संधान बांधलेलं होतं, भारतभर रिर्झव्हेशन बरोबर सकाळी ८ वाजता सुरू होतात; पण जम्मू येथील क्लार्कनी सकाळी ७.४५ ला कॉम्प्युटरवर नावं टाकण्यास सुरुवात केली. खिडकी तर बंद होती, त्याचवेळी त्या ऑफिसवर रेल्वे व्हिजिलंट फोर्सची धाड पडली, त्यांनी सर्व फॉर्मूस जप्त केले. आमच्यापैकी एकाही प्रवाशाचं तिकीट निघालं नाही. मुंबईच्या टूर ऑफिसला कळताच त्यांनी ताबडतोब दिल्लीच्या एजंटला गाठलं व दुसऱ्या दिवशीची सर्वांची 'स्वर्णजयंती मेल'ची तिकिटं दिल्ली ते मुंबई अशी काढली. आमची टूर हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे संपणार होती व तेथून चक्की बँक स्टेशन अगदी दोन-तीन तासांच्या अंतरावर होतं, पण आता सर्वांना डलहौसी ते दिल्ली असा ६८० कि.मी. चा प्रवास बसनं करावा लागणार होता. बरं, हे सर्व घडलेलं रामायण टूर प्रमुखांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं. १६ दिवसांची सहल आनंदात झालेली, रात्री हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना या घोळाची कल्पना देण्यात आली. प्रत्येक जण मनातून बिथरलाच, पण उपाय काहीच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता डलहौसीहून सर्व प्रवासी निघाले ते रात्री दीड वाजता दिल्लीत पोहोचले. तिथून पहाटे साडेपाच वाजताच दिल्ली स्टेशनात हजर. गाडीची वेळ ७ वाजता, त्यात काही जणांची तिकिटं वेगवेगळ्या डब्यात, परत तिकीटचेकरची दाढी कुरवाळत, दक्षिणा देत सर्वांची तिकिटं एका डब्यात आली आणि निःश्वास टाकला. या अशा अनेक अडचणींमुळे 'टूर ऑपरेटरां'ची फारच दमछाक होते.
कोणत्याही प्रवासात योग्य गाडीची तिकिटं बिनबोभाट मिळण्यासारखं सुख नाही. त्यासाठी नियोजन आवश्यकच असतं. जरी हे सर्व व्यवस्थितपणे पार पडलं तरी काही वेळा काहीतरी अनपेक्षित घटना घडतात आणि आपण पेचात पडतो. हा अनुभवदेखील आम्ही एकदा घेतला.
तेव्हा शेगाव ते मुंबई असा प्रवास आम्ही ५ जण करत होतो. त्यात आमची १८ वर्षांची नात बरोबर होती व एकत्रित तिकिटावर तिचं नाव पहिलं होतं. रात्री ११ वाजता तिकीट तपासनीस आले त्यांनी नातीला ओळखपत्र विचारलं. नेहमी ज्येष्ठ नागरिकांजवळ कार्ड असणं आवश्यक असतं हे सर्वांना माहीत असतं, पण कॉलेज विद्यार्थी असं कोणतंही कार्ड बरोबर ठेवत नाहीत. तिकिटावर तिचं पहिलं नाव असल्यानं ते आवश्यक आहे, बाकीच्यांनी कार्ड दाखवून उपयोग नाही असं सांगून त्यांनी सरळ सरळ २५०० रु. दंड भरा असं फर्मान काढलं. प्रत्येकानं बॅगेतून पैसे शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला दंड भरावा लागणार असं सांगत तो पुढील डब्यात चेकींग करता गेला. आम्ही सगळेच खट्ट झालेलो. गजानन महाराजांचं दर्शन चांगलंच महागात पडणार होतं. तासाभराने तो परत आला. आल्या आल्याच गोड शब्दांत त्यानं आम्हाला सांगितलं, की 'मी तुम्हाला दंड लावणार नव्हतो. हे प्रथमपासूनच ठरविलं होतं. तुमची चूक नक्कीच आहे, पण परत अशी चूक करू नका हे लक्षात राहावं म्हणून मी एका तासानं परत आलो.' अशीही देव माणसं भेटतात हे आमचं भाग्यच होतं.
-– डॉ.अविनाश वैद्य
October 23, 2022
भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा आग्रह धरण्यात आला. हा कायदा अस्तित्वात येताच विविध प्रकारे मिळवलेल्या माहितीद्वारे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. असे असताना माहिती मिळवणार्यांवर दबाव आणण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, याला जनताच प्रखर विरोध करेल आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची नवी पहाट पहायला मिळेल असे वाटते.
January 10, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti