वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं
चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् |
कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं
शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖
भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत.
कसे आहेत हे भगवान गणेश?
गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत आहे. कोणतीही गोष्ट तेव्हाच ओसंडून वाहते, ज्यावेळी ती आत परिपूर्ण भरलेली असते.
मिलद्भृंगषंडं- अशा या मदमत्त गंडस्थळावर मुनी मानसरूपी भुंग्यांचा समुदाय सतत एकत्रित येऊन गुंजारव करीत असतो.
चलच्चारुशुंडं- भगवान गणेशांचा सगळ्यात आगळावेगळा अवयव म्हणजे ज्यांची सोंड. तिची हालचाल चारू म्हणजे अत्यंत आकर्षक आहे. जगत्त्राणशौंडम् - असे हे भगवान गणेश संपूर्ण विश्वाचे संरक्षण करण्याच्या सामर्थ्याने युक्त स्वरूपात, शौंड आपल्याच आनंदात डुलत आहेत.
कनद्दंतकांडं- भगवान गणेशांच्या दातांवर जी आभूषणे लावली आहेत त्यांना छोटी छोटी घुंगुरे लावली असल्याने त्याचा आकर्षक किण् किण् आवाज होत आहे.
विपद्भंगचंडं- ही भगवान गणेश सर्व विपत्तींचा विनाश करण्याच्या बाबतीत चंड अर्थात प्रचंड सामर्थ्य संपन्न आहेत.
शिवप्रेमपिंडं - ते भगवान शंकरांच्या प्रेमाचा जळून एकत्रित आविष्कार आहेत. जसे एखाद्या पिंडात म्हणजे गोळ्यात तो एकच पदार्थ ठासून भरलेला असतो तसे भगवान शंकरांचे सर्व प्रेम श्री गणेश यांच्या ठिकाणी परिपूर्णरीत्या एकवटले आहे.
भजे वक्रतुंडम् - अशा भगवान वक्रतुंडांचे मी भजन करतो.
वक्र असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे अक्षरश: फुंकरीने उडवून लावतात त्यांना श्री वक्रतुंड असे म्हणतात.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 10, 2020
नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.
December 24, 2006
मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
November 21, 2017
परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.
June 6, 2022
पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला.
December 14, 2021
कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते.
August 8, 2015
भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते.
September 9, 2025
हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते.
March 5, 2023
आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
March 20, 2022
जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71||
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही |
महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72||
देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||73||
बहूतांपरी संकटे साधनांची | व्रते दान उद्यापने ती धनाची |
दिनाचा दयाळू मनी आठवावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||74||
समस्तामध्ये सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधूनि पाहे |
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||75||
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही | नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही |
म्हणे दास विश्वास नामीं धरावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||76||
करी काम निष्काम या राघवाचे | करी रुप स्वरुप सर्वा जिवाचे |
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता | हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||77||
अहो ज्या नरा रामविश्वास नाही | ताया पामरा बाधिजे सर्व कांही |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता | वृथा वाहणे देहसंसारचिंता ||78||
मना पावना भावना राघवाची | धरी अंतरी सोडि चिंता भवाची |
भवाची जिवा मानवा भूलि ठेली | नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||79||
धरा श्रीवरा त्या हरा अम्तराते | तरा दुस्तरा त्या परा सागराते |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते | करा नीकरा त्या खरा मत्सराते ||80||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti