वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजही भगवान विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर भगवान श्री ढुंढिराज भक्तांच्या विघ्नाना दूर करीत विराजमान आहेत.
बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…!
असा प्रश्न विचारला तर लोक पटकन सांगतील, अहो त्यात काय एवढे कठीण? मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. पण हे बरोबर आहे का? इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का? जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का? एकदंत कसा?
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे.
हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा.
मराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय?
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय.
लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातीळ भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते. प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्त्व खूपच भिन्न आहे. व्यापार,राज्यशास्त्र, आयुर्वेद,दर्शने,बुद्धिबळ यात तो पारंगत होता. संगीताचा रसिक दशानन रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता. देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता. एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती. काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता. संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाशम्, शिवतांडव स्तोत्रम् इ. रचना केल्याचे सांगितले जाते.
सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो; केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे.
गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti