वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लिली सरगयू हि दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर होती . तिने डबल एजंट म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
आधी आपण डबल एजंट म्हणजे काय समजून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
ती “ ट्रेजर” या नावाने प्रसिद्ध होती. तिचा जन्म रशियातील सेंट पिटसबर्ग गावी २४ जानेवारी १९१२ रोजी झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीच्या वेळी त्यांचे कुटुंबाने फ्रांसला पलायन केले. तिचे शिक्षण पॅरिस येथे झाले. ती पत्रकारीतेत पारंगत होती. तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.तिला १९३७ मध्ये जर्मनीद्वारे गुप्तहेर खात्यात भरती होण्याविषयी विचारले होते पण तिने नकार दिला. पण फ्रान्सच्या पडवानंतर तिने जर्मनीला गुप्तहेर खात्यात काम करण्यास होकार दिला.
मेजर एमील किलमनने तिला शिक्षण दिले. १९४३ ला ती आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन स्पेनला गेली. तिने लगेच इंग्लंडच्या मादरीद येथील m15 या गुप्तहेर संघटनेशी संपर्क केला. आपण जर्मन गुप्तहेर असल्याचे सांगून इंग्लंडसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. ती मागणी मान्य होऊन तिला लगेच इंग्लंडला रवाना केले. लिलि ला “treasure” नाव देण्यात आले व बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर कामाची संधि दिली. तिने डबल एजंट संबंधी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितले.
१९४४च्या मेमध्ये तिला बातमी समजली की तिच्या आवडत्या कुत्र्याचे निधन झाले. यावर तिला प्रचंड राग आला. तिने m15ला कळवले की तिच्याकडे काही गुपिते आहेत. तिने त्यातील काही फोडली.त्यावर तातडीने बैठक बोलावण्यात आली. पण तीला m15 मध्ये काम करू देण्यात आले. ती जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत राहिली. नंतर तिला संघटनेतून काढून टाकण्यात आले. इंग्लंडचे काही संदेश जर्मनीच्या एगनीमा यंत्राने पकडले १९४४ च्या शेवटी ती फ्रांसला परतली व फ्रेंच वूमन आर्मी सर्विस मध्ये काम करू लागली. ती रशियन भाषेची दुभाषी म्हणून काम करू लागली. १९४६ मध्ये तिने मेजर जॉन बारटन कॉलीन याच्याशी पॅरिसमध्ये लग्न केले. ते सोलोन येथे स्थायिक झाले.
१७ मे १९५० रोजी तिचे किडणीच्या आजाराने निधन झाले.
--रवींद्र शरद वाळिंबे
July 16, 2023
भगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते.
November 10, 2020
हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं.
September 19, 2017
स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे.
February 13, 2020
भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).
September 6, 2022
आई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
November 14, 2023
‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा किस डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल बघू.
किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल ठोस माहिती कोणालाच नसली तरी अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाली असणार.
रोमन लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द वापरले. जसे हात किंवा गालावर घेतलेल्या चुंबनाला बासीयम (basium) म्हणत तर चुंबन घेताना तोंड बंद केल्यास त्या चुंबनाला ऑस्कूलम (osculum) म्हणून संबोधले जात असे. तर उत्साहाने (उत्कट भावनेने) घेतलेल्या चुंबनाला सेव्हील्यूम (saviolum) म्हणून ओळखले जात असे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 13, 2022
काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.
जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.
जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.
पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.
शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.
जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.
कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !
मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.
जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
जगणेच संपले असते.
जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!
"HE" is simply great !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.09.2016
September 29, 2016
रंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.
October 1, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti