(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हनुमान जयंती

    हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.

  • वेळ हीच खरी संपत्त्ती !

    विसाव्या शतकात बदलाचा वेग झपाट्याने वाढला. आता 21 व्या शतकात तर हा वेग आपल्या अत्युच्च पातळीवर पोहोचला आहे. इथे ‘बदल’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरलेला आहे.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन

    पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते.

  • कोकणभूमीतील औषध निर्मिती आणि आयुर्वेद विकास

    येवा कोकण आपलाच आसा ही टॅगलाईन सांगणारी आमची सिंधुसंस्कृती ! शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांची अनुभूती देत मन आत्मा आणि इंद्रियाना सुखावून टाकणारी इथली लाल माती…. इथेच दिसेल,कोणत्याही संकटांचा सहजपणे सामना करण्यासाठी  आवश्यक असलेली निधडी छाती… आणि मना मनाने जोडून ठेवलेली कोकणची नाती…

  • आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ३

    Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्‍या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्‍या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्‍या फार्मवर पाठवली जातात.

    जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्‍या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.

    एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्‍या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्‍या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री - लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्‍यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.

    डॉ. संजीव चौबळ

  • विषाणू हटवा जिवाणू वाढवा

    सध्या पावसाळा सुरू आहे. डॉक्टर मंडळींच्या भरभराटीचा हा मोसम असल्याचे गंमतीने म्हटले जाते. अर्थात ते सत्यही आहे.

  • आईस्क्रिम

    उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही.

    आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला खोकला, घश्याला त्रास, जुलाब होतात. आपण थंडीत आईस्क्रीम खाल्ले तर त्रास होत नाही असा माझा ३० वर्षाचा अनुभव आहे. आम्ही थंडी मध्ये भरपूर आईस्क्रीम खातो. थंडीत दुकानात आईस्क्रीम पटकन मिळत नाही म्हणून मी बासुंदी फ्रिजर मध्ये ठेऊन कुल्फी करून खातो.

    ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊच नका असे नाही पण एक पथ्य पाळा. जेवण झाले की लगेच (एक तासाचे आत) खा. म्हणजे त्याची उष्णता अन्न पचायला उपयोगी पडते व बाधत नाही.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३५

    अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
    पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
    अमौलौशशांकादवामेकलत्राद-
    हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖

    एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
    आचार्यश्री म्हणतात,

    अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
    अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
    अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
    अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
    अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
    अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
    अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.

    मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
    हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
    त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्‍ठेची घोषणा करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • सुखाचा शोध

    सुखाच्या प्रत्येकाच्या विविध परिभाषा असतात,प्रत्येकजणाचे सुखाचे परिमाण सुद्धा वेगवेगळे असतात पण सुखाची व्याख्या खूप सोपी व छान आहे,जे समोर आहे ते जगता आल पाहिजे.

  • महादेवाच्या पिंडीचे रहस्य

    भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..