(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णू सहस्त्रनाम: हिंदू धर्मातील एक पवित्र स्तोत्र

    अत्यंत प्रभावी व सामर्थ्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्तोत्रांमद्ध्ये श्री विष्णुसहस्त्रनाम हे एक महत्वाचे स्तोत्र आहे. त्यात भगवंताच्या एक सहस्त्र गुणवाचक नावांचा संग्रह आहे. नामांचा पाच सहस्त्राहून अधिक वर्षे या परमपावन स्तोत्राने कोट्यवधी भक्तांचे कल्याण केले आहे. आयुर्वेदाच्या चरकसंहिते सारख्या श्रेष्ठ प्राचीन ग्रंथाने श्रीविष्णुसहस्त्र नामाचे ठिकाणी ज्वरादि व्याधी दूर दूर करण्याचे सामर्थ्य आवर्जून सांगितले आहे. आणि ते यथार्थ आहे असा अनेकांचा अनुभव आहे.

      May 15, 2026


  • पक्षीपरीचय ४

      September 22, 2015


  • १८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

    १८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.

    सामना १९७५ सामाजिक
    ३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू

    निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
    निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
    दिग्दर्शक :जब्बार पटेल
    कथा :विजय तेंडुलकर
    पटकथा :विजय तेंडुलकर
    संवाद :विजय तेंडुलकर
    संगीत :भास्कर चंदावरकर
    छायालेखन :सूर्यकांत लवंदे
    संकलक :शा. वैद्य
    गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
    कला :दिनानाथ चव्हाण
    रंगभूषा :निवृत्त दळवी
    वेषभूषा :पांडुरंग खटावकर
    नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
    स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
    गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
    ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
    निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
    रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज

    कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा

    पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू

    गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
    कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.

    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo

    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

      April 19, 2017


  • कॅलरीज रिसट्रीकशन फायद्याचे की नुकसानीचे?

    जगात सगळीकडे बदलाचे वारे वाहताना दिसतात. खेडोपाडी वागण्या बोलण्यात अगदी खाण्या पिण्यातही शहरीकरणाचा प्रभाव होताना दिसत आहे. सध्या लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि साखरेचे पदार्थ, मीठ/मीठाचे पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो तसेच फळ व भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. ह्या सर्वांनाचा परिणाम म्हणून आहारातून तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी होताना दिसतोय. ह्या सर्व जीवन पद्धतीचा एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतोय. मधुमेह, ह्रदय रोग, हाइपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, आणि ह्या मुख्यत्वे करून लठ्ठपणा वाढवताना दिसतोय. ह्या सर्वांवर मात करण्यासाठी बहुतेकदा कमी कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. कुपोषण (malnutrition) न होता केलेले कमी कॅलरीजचे सेवन दिर्घायुष्य लाभण्यास आणि आरोग्य तारुण्यातच राखण्यात मदत करताना दिसतात, पण आयुष्य किती काळ वाढवू शकेल ह्याचा मात्र निश्चित अंदाज बांधता येत नाही.

    कॅलरी रिसट्रीकशन ही अशी खाण्याची पद्धत आहे कि ज्यात आहारातील कॅलरीजचे सेवन कमी केले जाते. कॅलरीज किती कमी करायच्या हे मात्र त्या व्यक्तीच्या पूर्वीच्या कॅलरीजच्या सेवनावर किंवा त्या व्यक्ती सारख्या इतर व्यक्तीच्या सरासरी कॅलरीजच्या सेवनावर अवलंबून असते.

    Calorie Restriction with Optimal Nutrition (CRON) हा आहार कॅलरीज मध्ये कमी असूनही इतर अन्नघटकांनी समृद्ध असतो. नुसत्या कॅलरीज रिसट्रीकशन आहारापेक्षा CRON आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्य दिर्घकाळ सुस्थितीत राखण्यात मदत करताना दिसतात. ह्यामुळेच अशी व्यक्ती आपले आयुष्य दिर्घकाळ सुंदररित्या जागताना दिसतात.

    CRON आहाराचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम
    - लठ्ठपणा टाळण्यास व वजन कमी करण्यासाठी मदत
    - मधुमेह, हाइपरटेंशन, कॅन्सर टाळण्यास/आटोक्यात आणण्यासाठी मदत
    - ह्रदयरोग व रक्तवाहिन्यावरील ताठरपणा कमी करण्यास तसेच ह्रदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतात. ह्रदय व इतर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, ह्या गोष्टीं ह्रदयरोगाशी निगडित आहेत आणि ह्या अपायकारक गोष्टींवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने CRON आहार महत्वाचे ठरतात.

    - CRP, triglycerides, Low Density Lipoprotein (LDL), high density lipoprotein (HDL) आणि रिकाम्या पोटीची रक्तातील साखरेवर नियंत्रण सुधारल्याने इतर रोगांचा धोका कमी करण्यात मदत.

    - कॅन्सरचा धोका निर्माण करण्याशी निगडीत असलेले विविध मेटाबॉलिक घटक आणि हार्मोन्स कमी करण्यात यश त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत
    - शरीरातील आणि मुख्यत्वे करून पोटात आढळणाऱ्या चरबी मध्ये घट
    Circulating insulin, testosterone, estradiol and inflammatory cytokines ह्या सारखे घटक जे कॅन्सरशी निगडित आहेत त्यामध्ये घट
    - Insulin like growth factor I आणि IGFBP -3 मध्ये घट परंतु जर प्रथिनांचे सेवन गरजेपेक्षा (dietary reference intake) जास्त केल्यास मात्र हा फायदा मिळताना दिसत नाही.

    colories-2कमी कॅलरीजचे सेवन अयोग्य पद्धतीने केल्यास होणारे दुष्परिणाम
    - कुपोषणास निमंत्रण
    - रक्तक्षय, पायाच्या तळव्यावर सूज येणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, सुस्ती येणे, डिप्रेशन मध्ये जाणे ह्या सारख्या परिणामांना तोंड द्यावे लागते
    - माणसांवरील काही छोट्या प्रयोगात असे आढळले आहे कि मसल मास, स्ट्रेंथ (ताकद) कमी होणे, bone mineral density कमी होणे; middle aged आणि वृद्ध व्यक्तींमधे मृत्युच्या प्रमाणात वाढ होताना दिसते
    - कोल्ड सेन्सिटिव्हीटी चा धोका वाढतो
    - आठवड्याला 1/2 ते 1 किलो पेक्षा जास्त वजन घटवल्यास पित्ताशयात खडे निर्माण होणे, किंवा रक्तातील इलेकट्रोलाईट मधील संतुलन बिघडणे ह्या सारखे धोके वाढतात
    - 21 वर्षाखालील मुलामुलींनी, लहान मुलांनी खूप कमी कॅलरीजचे सेवन करून वजन घटवू नये कारण त्यांची शारीरिक वाढ खुंटते, मानसिक वाढीवर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. किशोर वयातील मुलांच्या मेंदूत भौतिक (physical) बदल घडून येऊ शकतात.
    - Underweight मातांमध्ये दिवस भरण्यासाठी अगोदरच प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी असणे ह्या सारखे धोके वाढतात म्हणूनच गरोदरपणात स्त्रियांनी अतिशय कमी कॅलरीज असलेला आहार घेणे टाळा.
    - एखादी स्त्री गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर आशा स्त्रीने सुद्धा असा कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये कारण बीएम्आय आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास इनफरटीलिटीचा (वंध्यत्व) धोका वाढतो, मासिकपाळी वेळच्या वेळी न येणे, तसेच हार्मोन्समधे बदल होणे ह्या सारखे धोके वाढतात.
    - जसे गरोदर स्त्रियांना त्रास होतो तसाच त्रास स्तनपान करणार्या स्त्रीला ही होतो. जो पर्यंत स्त्री स्तनपान करत असेल तो पर्यंत त्या स्त्रीने कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये, तर स्तनपान बंद केल्यावरच कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये. आयुष्याच्या सुरवातीलाच म्हणजे बाळाच्या जन्मापासूनच त्याला मिळणारा आहार हेल्दी असावा. बाळाच्या योग्य वाढीसाठी, cognitive development सुधारण्यासाठी आईचा आहार हेल्दी असावा. कारण पहिले काही महिने बाळाला सर्व अन्नघटक आईच्या दूधातूनच मिळत असतात. तसेच स्तनपानाचा दिर्घकाळ होणारा फायदा म्हणजे त्या बाळाच्या पुढील आयुष्यात लठ्ठपणा किंवा स्थूलता न वाढणे, आणि Non Communicable Disease (NCD) चा धोका ही कमी होतो.

    आयुष्यभर हेल्दी आहार घेतल्यास वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण तर थांबवतेच आणि त्या बरोबर मधुमेह, ह्रदयरोग, स्ट्रोक आणि कॅन्सर सारख्या NCD रोगांपासूनही बचाव करण्यासाठी मदत करतात.

    colories-3हे फायदे मिळवण्यासाठी काही उपयुक्त टीप्स

    - जेवढ्या कॅलरीज खाल तेवढ्या खर्च केल्यास वजन नियंत्रणात राहते
    - वजन वाढू न देण्यासाठी एकूण कॅलरीजच्या 30% पेक्षा कमी कॅलरीज फॅटस (स्निग्ध पदार्थ) मधून घ्याव्यात.
    - साखर शक्यतो कमी प्रमाणातच घ्या. एकूण कॅलरीजच्या 10% पेक्षा कमी कॅलरीज साखरेतून घ्याव्यात. आरोग्य आणखीन सुधारण्यासाठी फक्त एकूण 5% कॅलरीज साखरेतून घेतल्यास उत्तम.
    - प्रौढ व्यक्तिंनी 5 ग्रॅम पेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये. मीठाचे सेवन कमी झाल्यास हाइपरटेंशन टाळण्यास किंवा ते उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ह्रदयरोग आणि स्ट्रोक चा धोका ही कमी होऊ शकतो.

    ह्या सर्व फायद्यांसाठी कमी कॅलरीजचे सेवन करावयाचे असल्यास CRON (Calories Restriction with Optimal Nutrition) आहाराचे सेवन करा.

      June 8, 2015


  • अष्टविनायका तुझा महिमा कसा

    अष्टविनायका तुझा महिमा कसा

    गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.

      August 27, 2023


  • १ जानेवारी २००२ – युरोपातील चलनबदल

    १ जानेवारी २००२ – युरोपातील चलनबदल

    १ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.

      January 5, 2019


  • घरी उटणे कसे बनवाल ?

    भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे.

    पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात.

    खाली दिलेले सर्व सामान आपणाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळु शकेल. त्यात गुढळ्या असल्यास फोडून घेऊन , चांगले चाळून घ्यावे व हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

    साहित्य

    मसूर डाळ पीठ 110 ग्राम
    आवळकाठी 10 ग्राम
    सरीवा 10 ग्राम
    वाळा 10 ग्राम
    नागर मोथा 10 ग्राम
    जेष्टमध 10 ग्राम
    सुगंधी कचोरा 10 ग्राम
    आंबेहळद 2 ग्राम
    तुलसी पावडर 10 ग्राम
    मंजीस्ट 10 ग्राम
    कापूर 2 ग्राम

    हे घरी बनवलेले उटणे आपण सणासुदीला वापरु शकता. उटणे फक्त दिवाळीतच का वापरायचे? घरच्या घरी बनवलेले उटणे केव्हाही वापरता येईल.

      October 28, 2016


  • सालार जंग संग्रहालय जनतेसाठी खुले केले गेले

    सालार जंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तुंपासुन तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. सालार जंग संग्रहालयात अंदाजे ४३,००० वस्तु व ५०,००० पुस्तके आहेत.

      December 16, 2021


  • मलेरिया – एक जीवघेणा आजार

    मलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो.

      September 10, 2018


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ४

    शिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

      September 22, 2020