वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा तो घुसखोरांनाही नसतो, असं कुणाला वाटत नाही का? की म्यानमारमधून भारतात घुसलेल्या त्या घुसखोरांच्या आडून त्यांच्या ‘मुसलमान’ असण्याचं राजकारण केलं जात आहे? घुसखोर हा घुसखोरच असतो, असं कुणाच्या मनात कसं येत नाही.
September 23, 2017
राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.
March 1, 2024
युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.
June 24, 2017
चर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.
October 20, 2012
शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
October 6, 2016
जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.
February 5, 2013

दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
१९६०च्या दशकात उभारल्या गेलेल्या या दुर्बिणीत आणि तिच्यावरील विविध उपकरणांत वेळोवेळी दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या गेल्या. परंतु, दुर्बिणीवरील सांगाडा तोलणारे दोरखंड हे काळानुरूप खराब होत होते. तसंच २०१४ सालच्या जानेवारी महिन्यातील भूकंपामुळे आणि २०१७ सालच्या चक्रीवादळामुळेही या दुर्बिणीच्या बांधणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर या दुर्बिणीवरचा एक दोरखंड गेल्या ऑगस्ट महिन्यात एक आणि तर आणखी एक दोरखंड नोव्हेंबर महिन्यात तुटला. आता जर यापुढे आणखी दोरखंड तुटले तर पुर्ण सांगाडाच तबकडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच या अवस्थेतील दुर्बिणीची दुरुस्तीही शक्य नव्हती. त्यामुळे दुसरा दोरखंड तुटल्यानंतर, या दुर्बिणीचा वापर बंद केला जात असण्याची घोषणा, या दुर्बिणीची मालकी असणाऱ्या, अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन या संस्थेनं केली. त्याचबरोबर या दुर्बिण विविध भाग कसे वेगळे करायचे, याचा विचारही सुरू झाला. परंतु, दुर्बीण उतरवण्याचा हा विचार सुरू असतानाचा या दुर्बिणीवरली साधनं ज्यावर बसवली आहेत तो सांगाडा खालील तबकडीवर पूर्णपणे कोसळला व दुर्बिणीचं आयुष्यच संपुष्टात आलं.
प्युर्तो रिकोवरील डोंगराळ भागातील एका घळीत उभारलेल्या या रेडिओ दुर्बिणीची बांधणी १९६३ साली पूर्ण झाली. त्यानंतरची पाच दशके ही दुर्बीण एकाच तबकडीचा वापर करणाऱ्या दुर्बिणींमध्ये सर्वांत मोठी दुर्बीण ठरली होती. या प्रचंड दुर्बिणीनं रेडिओ खगोलशास्त्रात मोठी कामगिरी केली आहे. बुध आणि शुक्राच्या पृष्ठभागाचे सविस्तर नकाशे याच दुर्बिणीद्वारे तयार केले गेले, तसेच बुधाचा स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा ५९ दिवसांचा काळही याच दुर्बिणींद्वारे मोजला गेला. स्पंदनांच्या स्वरूपात रेडिओलहरी उत्सर्जित करणाऱ्या, स्पंदक ताऱ्यांच्या जोडीच्या निरीक्षणांद्वारे गुरुत्वीय लहरींचा अप्रत्यक्ष पुरावा याच दुर्बिणीनं मिळवून दिला. स्पंदक ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध याच दुर्बिणीद्वारे सर्वप्रथम लावला गेला.
रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अरसिबो दुर्बिणीच्या निकामी होण्यानं खगोलशास्त्रज्ञ अत्यंत व्यथित झाले आहेत. कारण अरसिबो दुर्बीणीचा शेवट झाल्यानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळातील रेडिओस्रोत यांच्यात संवाद साधून देणारा एक महत्त्वाचा दूवा नष्ट झाला आहे!
चित्रवाणी:
https://www.youtube.com/embed/b3AASKr_iHc?rel=0
-- डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: SPACE.com / Twitter
November 30, 2021
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे,
October 5, 2013
एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल.
August 9, 2024
नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास त्याचे रुपांतर ‘ताडी’ म्हणजेच सौम्य प्रकारच्या दारूमध्ये होते. ताडी चवीला आंबट आणि उग्र चवीची असते.
नीरा पिण्याचे फायदे
ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक नीराचा आस्वाद घेतात.
सकाळ सकाळ काढलेल्या पाण्याचे म्हणजेच निराचे सेवन केल्याने रिफ्रेशिंग वाटते. निरादेखील आरोग्यदायी आहे. एका दिवसात १-२ ग्लास निरा पिणे फायदेसहीर ठरते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पण तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर नियमित नीरा पिणे अडथळा ठरू शकतो. निरामध्ये साखर आणि कॅलरीज अधिक असतात. निराऐवजी साखर,मीठ घातलेले लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते
पण हल्ली आरोग्य व उत्साहवर्धक नीरा या पेयाकडे लोकांचा कल कमी होताना दिसतो आहे.
कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही नीरा हे पेय लोकप्रिय झाले आहे. नागरिक उन्हाळ्यात पहाटे नीराचा हमखास आस्वाद घेत असतात.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti