(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

    वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..

      November 27, 2016


  • इमान पगारासोबत, की देशासोबत?

    सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या दुष्टपणापेक्षा अधिक घातक आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की त्यांची बांधीलकी त्यांच्या नोकरीपेक्षा अधिक या समाजाशी, या देशाशी आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या घामातून जो पैसा उभा होतो, त्यातूनच त्यांना पगार, भत्ते वगैरे मिळत असतात. अशा परिस्थितीत जिथे सामान्य लोकांच्या हक्कावर गदा आणणारे, सामान्यांचे शोषण करणारे भ्रष्टाचार होतात तिथे त्यांनी मौन बाळगणे म्हणजे बेइमानी ठरते.

      April 11, 2011


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २६

    यदापारमच्छायमस्थानमद्भि-
    र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् |
    तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं
    महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖

    यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात.
    किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात,

    यदा - ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील,
    अपारम् - प्रचंड लांब असणाऱ्या, त्यामुळे चालून-चालून कष्ट देणाऱ्या,
    अच्छायम् - मार्गात सावली देणारे वृक्ष इत्यादी नसल्याने छाया विरहित. उन्हाच्या त्रासाने अधिकच क्लेशदायी होणाऱ्या,
    अस्थानम् - मध्यंतरी विश्राम करण्यासाठी कोणतेच आराम स्थान नसलेल्या,
    अद्भिर्जनैर्वा विहीनं - पाणी किंवा माणसांनी विहीन असणाऱ्या, अर्थात शारीरिक तृप्तता मिळावी यासाठी आवश्यक असणारे जल किंवा मानसिक शांती मिळावी यासाठी आवश्यक असणारे जन यापैकी कोणतेही साधन नसणाऱ्या,
    गमिष्यामि मार्गम् - मार्गाने मी जेव्हा जाईल.
    तदा - त्यावेळी
    तं निरुंधं
    कृतांतस्य मार्गं - त्या कृतांत म्हणजे यमराजाच्या मार्गाला बाजूला सारून,
    महादेव - हे भगवान महादेवा !
    मह्यं मनोज्ञं प्रयच्छ - मला मनोहारी असा, आपल्या परम वैभवशाली आणि आनंददायी कैलास लोकाचा मार्ग प्रदान करावा.

    शास्त्रात एका बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे कोणतेही सुख साधन नसलेले, उलट सर्व दुःखदायक गोष्टी असणारे यम नगरीचे वर्णन आहे. तर दुसरीकडे सकल सौख्यदायक कैलासाचे वर्णन. आचार्य यमलोकाचा मार्ग सोडून त्या मार्गावर नेण्याची प्रार्थना करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 5, 2020


  • काळ्या पैशाचे गणित

    काळ्या पैशाचा संग्रह सामान्यपणे ‘हाय डिनॉमिनेशन’ चलनी नोटांमध्ये केला जातो. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चलनी नोटांमध्ये व्यवहार करण्यासाठी चलनी नोटांमध्ये आर्थिक व्यवहार रोखीने करताना, व्यवहारात चलनी नोटांच्या रोख किमतीवर मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याला दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

      January 5, 2023


  • निरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…

    नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.

      September 22, 2020


  • इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG)

    हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते.  यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात.  हे  इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.

      October 29, 2022


  • श्री आनंद लहरी – भाग १२

    आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात…..

      February 16, 2020


  • बेजबाबदारपणाचा कळस!

    एक नागरिक म्हणून सरकारने पुरविलेल्या सगळ्या सुविधांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर या देशाने स्वीकारलेल्या न्यायव्यवस्थेचा, शासनव्यवस्थेचा आदर करणे तुमची जबाबदारी ठरते. एक आदर्श नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबाबत जितके जागृत असायला हवे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक जागृत आपल्या कर्तव्यांबाबतही असणे गरजेचे आहे. आपले हित साधताना इतरांच्या हिताला बाधा पोहचत तर नाही ना, आपल्यासाठी ज्यांचा काहीही दोष नाही असे इतर अनेक लोक विनाकारण फरफटले तर जात नाहीत ना, याची खातरजमा आपणच करायला हवी.

      September 13, 2009


  • इतिहास आणि आजचे जीवन

    खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे.

      February 2, 2022


  • भगवान श्री गौतम बुद्घ

    माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
    कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।

    गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
    दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।

    दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
    भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।

    बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
    नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।

    उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
    शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।

    प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
    मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।

    गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
    ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।

    ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
    धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।

    सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
    चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।

    धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
    घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।

    गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
    लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।

    कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
    प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।

    केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
    प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।

    बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
    अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।

    कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
    परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।

    मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
    ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।

    साधू संत जमती कांही भविष्य जाणती
    आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।

    हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
    विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।

    बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
    पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।

    बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
    संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।

    न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
    महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।

    जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
    न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।

    सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
    विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।

    राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
    बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।

    नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
    बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।

    राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
    सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।

    दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
    एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।

    सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
    न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।

    सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
    लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।

    उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
    प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।

    आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
    विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।

    उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
    दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।

    माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
    जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।

    जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
    निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।

    सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
    लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।

    रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
    उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।

    तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
    लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।

    नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
    सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।

    उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
    सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।

    त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
    मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।

    हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
    परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।

    सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
    तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।

    म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
    दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।

    सर्वची सोडोनी गेला तो वनीं
    एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।

    निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
    तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।

    एकाग्र करुनी मन लावले ध्यान
    केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।

    अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
    सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।

    अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
    रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।

    शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
    भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
    षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।

    संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
    सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।

    फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
    तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।

    नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
    तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।

    मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
    मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।

    अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
    तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।

    तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
    आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।

    सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
    आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।

    बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
    अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।

    गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
    महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।

    बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
    जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १७- १०११-८३

      January 17, 2018