(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक होतं गाव

    एक होतं गाव.
    "महाराष्ट्र" त्याचं नाव.

    गाव खूप छान होतं,
    लोक खूप चांगले होते.

    "मराठी" भाषा बोलत होते,

    गुण्यागोविंदानं नांदत होते.
    त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं.
    वृत्ती खूप दयाळू होती.

    दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
    आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ
    देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,

    महाराष्ट्रात होता एक भाग.
    "मुंबई" त्याचं नाव.

    मुंबईसुद्धा छान होती;
    महाराष्ट्राची शान होती.

    सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
    आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.

    इथं आले, की इथलेच होऊन
    राहत होते.

    "अतिथी देवो भव...!"

    या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
    पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

    हळूहळू परिस्थिती बदलू
    लागली. "अतिथी"
    जास्त आणि "यजमान" कमी झाले.

    मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.

    मराठी आपली वाटत नव्हती.

    प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

    त्यांना एक युक्ती सुचली.
    दूरदेशीची परदेशातील
    भाषा त्यांना जवळची वाटली.

    त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

    आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
    आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,

    आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,
    बोलीभाषा ही बदलली.

    सगळ्याचा नुसता काला झाला.
    शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

    अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर

    माफ करा हं........

    आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.

    चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.

    त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

    इतक्यात त्या मुलानं
    विचारलं, (त्याच्या भाषेत)
    "मम्मी" कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?''

    'मम्मी' खूप सजग होती,
    मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

    पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस, "मराठी भाषा" प्रचलित होती; आता कोणी नाही ती बोलत.

    पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले;
    पण...................

    हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.!!

    महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!!

    मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....??? आणि,
    मी त्यांना एवढंच म्हटलं,

    आमच्या घरात "तुळस"आहे,
    'Money plant'नाही.

    आमच्या घरच्या स्त्रीया "मंदीरात" जातात,
    'PUB' मध्ये नाही.

    आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

    आम्ही "मराठी" आहोत,
    आणि मराठीच राहणार !!!

    तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय
    मराठीतूनच देतो,

    याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,

    अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.

    अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...

    "तुळशी" ची जागा आता
    'Money Plant' ने घेतलीय...!!

    "काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!!

    'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.

    अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....???

    "भाऊ" 'Bro' झाला...!!
    आणि "बहीण " 'Sis'...!!!

    दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!

    दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!!

    घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...

    ५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!!

    माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....

    आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करा !!!

      July 26, 2017


  • पांघरूण’ – बा मांजरेकरा, हे ‘क्षालन’ शब्दातीत झाले आहे रे !

    चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे.

      February 25, 2022


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुनर्नवा – (वसुची भाजी /घेटुळी)

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुनर्नवा – (वसुची भाजी /घेटुळी)

    ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.

    हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी हि चवीला तिखट,कडू,तुरट,व गोड असते.हि उष्ण गुणाची असते व शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.

    हिचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)व्रणातील स्त्राव कमी करायला वसुच्या पानांचा रस काढुन तिचा लेप लावावा.

    २)सुज आली असल्यास पुनर्नवा+देवदारू+सुंठ+वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.

    ३)कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.

    ४)पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमीत काही दिवस घ्यावा.

    ५)कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महीना घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.

    ६)घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते व त्वचेवरील लव देखील गळू लागते त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.

    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघ्वी होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 27, 2016


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४२

    भगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,

      January 14, 2021


  • मनाचे श्लोक – ८१ ते ९०

    मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो |
    समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81||

    बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना |
    विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82||

    जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी अती आदरे गूण गातो |
    बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे | परी अंतरी नामविश्वास तेथे ||83||

    विठोने शिरी वाहिला देवराणा | तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
    निवाला स्वये तापसी चंदमौळी | जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||84||

    भजा राम विश्राम योगेश्वराचा | जपू नेमिला नेम गौरीहराचा |
    स्वये नीववी तापसी चंदमौळी | तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ||85||

    मुखी राम विश्राम तेथेचि आहे | सदानंद आनंद सेवूनि राहे |
    तयावीण तो सीण संदेहकारी | निजधाम हे नाम शोकापहारी ||86||

    मुखी राम त्या काम बाधू शकेना | गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना |
    हरीभक्त तो शक्त कामास मारी | जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||87||

    बहू चांगले नाम या राघवाचे | अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
    करी मूळ निर्मूळ घेता भवाचे | जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||88||

    जनी भोजनी नाम वाचे वदावे | अती आदरे गद्य घोषे म्हणावे |
    हरीचिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||89||

    न ये राम वाणी तया थोर हानी | जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी |
    हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी | बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||90||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 6, 2016


  • बट्ट्याबोळ!

    आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.

      May 15, 2005


  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ३

    प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्‌।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्‌॥३॥

    यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत.

    प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना.

    कशी आहेत ही चरणकमले?

    भक्तेष्टदाननिरतम् - भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे.
    यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले ,समर्पक. आई जगदंबेच्या चरणाशी योग्य तेच मिळते. आपल्याला हवे ती नाही. कारण अनेकदा आपल्याला जे हवे असते ते आपल्यासाठी योग्य नसते. मात्र आईला नेमके समजते की आपल्या बाळाला काय योग्य आहे? आई ललितांबेचे चरण साधकांना इष्ट ते प्रदान करतात.

    भवसिन्धुपोतम्‌- हे चरण साधकांच्या साठी, भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर, पार करण्यासाठी साधन असणारी, पोतं म्हणजे नाव,बोट ठरत असतात.

    पद्मासनादि- आईची ही चरणकमले कमळावरच स्थापित असतात.

    सुरनायक पूजनीयम्- सुर म्हणजे देवता. त्यांचे नायक अर्थात देवराज इंद्र. त्यांच्या द्वारे पूजन केल्या गेलेले.

    अशा त्या आईचा सुंदर चरणकमलांवर असणाऱ्या चिन्हांची सूची देतांना आचार्यश्री म्हणतात, पद्म- कमळ
    अंकुश,ध्वज,सुदर्शन अर्थात चक्र यांच्या लांछन- अर्थात चिन्हांनी

    आढ्यम्‌- अर्थात सर्वश्रेष्ठ ठरणारी ती आईची चरणकमले मी प्राप्त काळी वंदितो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 30, 2020


  • किचन क्लिनीक – हळद

    पी हळद हो गोरी' ही म्हण मराठी मध्ये रूढ आहे.म्हणूनच तर भारतीय संस्क्रूती मध्ये हळदीला एक वेगळे स्थान आहे.अगदी आपल्या हिंदू धर्मात देवकार्या पासून ते लग्ना पर्यंत हिचा वापर होतो.बहुधा हिच्या मधल्या रक्षोघ्न ह्या गुणांमुळे अर्थात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी हिचा वापर भोजना व्यतिरिक्त ब-याच अन्य कार्यात देखील केला जात असावा.

    देवपूजेत देवाला हळद कुंकू वहातात,नव्या नवरा नवरीला हळदीच्या दिवशी हळद लावतात,तसेच लग्नामध्ये नवरा नवरीच्या हातालाहळदीचे गाठवळ बांधतात कारण त्यांना कोणतीही दुष्ट शक्तीच्या बाधा होऊ नयेत म्हणून.तसेच सुवासीनीची ओटी भरताना अथवा मानपान करताना तिच्या कपाळाला हळद कुंकू लावले जाते.

    हे झाले हळदीचे बाह्य उपयोग पण हिच हळद जेवणात वापरली असता जेवण दिसायला सुंदर,रूचीकर,सुपाच् बनविते.उसळ,वरण,भाजी,आमटी,फोडणीचा भात,मासे,चिकन,मटण असे नानाविध पदार्थ बनवताना हळद हि लागतेच.थोडक्यात काय तर ह्या हळदी शिवाय आपल्या स्वयंपाक घराला देखील पूर्णत्व येणार नाही.

    अशी हि बहूगुणी,बहूउपयोगी हळद.अहो प्रत्यक्ष महादेवाला देखील प्रिय असणारी अर्थात जेजूरीच्या खंडेरायांच्या भालमस्तकी भंडारा म्हणून मिरवणारी ही हळद,बरेच जण घरगुती औषधांमध्ये हिचा वापर करत असतातच.अहो घरच्या ग्रूहलक्ष्मीचे बोट स्वयंपाक करताना कापले तर ती प्रथम कापलेल्या बोटावर हळद दाबून धरते.

    चला तर हिची थोडक्यात माहिती आणी घरगुती औषधांमध्ये वापर ह्या बद्दल जाणून घ्यायचे ना?
    हळदीचे बहुवर्षायू क्षुप असते.आणी आपण वापरत असलेली हळद हा त्याचा कंद होय.हि चवीला कडू,गोड असते,आणि उष्ण असते.हि शरीरातील वात आणि पित्तदोष कमी करते.

    उपयोग:

    १)खरूज आली असता हळद+ आवळकाठी+ कडूनिंबाचा काढा घ्यावा.

    २)हळद लोण्यात खलून त्वचेला लेप केल्यास त्वचा मऊ मुलायम होते.

    ३)ब-याच बायकांना अंगावर पांढरे जाण्याची सवय असते त्यांनी हळदीचा काढा मधासोबत घ्यावा.

    ४)मुळव्याधी मध्ये हळदकुंड भाजूनतिची पूड करावी आणी हि पूड १/२ चमचा + कोरफडीचा गर १/२ चमचा असे मिश्रण दिवसातून दोन वेळेस असे सलग सात दिवस घ्यावे.

    ५)आंघोळ करताना साबणा एवजी हळद+ बेसन+ कापूर हे मिश्रण वापरल्यास त्वचा नितळ व सतेज होते.

    ६)पायाला भेगा पडण्याची सवय असणा-यांनी हळद एरंड तेलात कालवून भेगांवर लावावी.

    ७)डोक्यात ज्यांना वारंवार कोंडा होतो त्यांनी हळद+रिठे +शिकेकाई घालून काढा बनवावा व ह्या काढ्याने केस धुवावेत.

    ८)मधुमेहामुळे जर फार लघ्वी होत असेल तर हळद १ चमचा+ काळेतीळ २ चमचे /हळद १चमचा+बेल पानांचा रस ४ चमचे घ्यावा.

    हळदीच्या अतिसेवनाने संडासला पातळ होणे,तसेच स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 16, 2016


  • पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

    माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत.

      March 12, 2023


  • अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

    अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

    भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं.

      October 16, 2025