वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.
April 1, 2022
रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय.
मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी संगणकासमोर बसण्याची आपली पद्धत कारणीभूत ठरते. अनेकदा संगणकाचा ‘मॉनिटर’ डोळ्यांच्या सरळ रेषेच्या तुलनेत वरच्या किंवा खालच्या पातळीवर ठेवलेला असतो. मॉनिटरकडे पाहण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की तो असा वर किंवा खाली आहे हेही लक्षात येत नाही. मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतच हवा. तो काही मिलिमिटर वर किंवा खाली चालू शकेल, पण मॉनिटरकडे पाहताना वर किंवा खाली पाहावे लागू नये अशी त्याची जागा असावी. संगणकासमोर काम करताना काही जणांना एकदा की- बोर्डकडे आणि एकदा मॉनिटरकडे असे सतत खाली आणि वर पाहावे लागते. सहसा कागदपत्रे वाचून ती टाईप करताना असे होते. हे देखील मानदुखी वाढवणारे ठरते. अनेकदा की- बोर्ड आणि मॉनिटर यांच्या जागांचा काही मेळच नसतो. एकीकडे की- बोर्ड आणि त्याच्या समोर नव्हे तर थोडासा दूर तिरक्या रेषेत मॉनिटर अशी परिस्थिती असते. यात नुसते वर-खालीच नाही तर उजवीकडे- डावीकडे असेही सारखे पाहावे लागते आणि मानेच्या स्नायूंवर वाढीव ताण येतो.
संगणकासमोर बसल्यावर मॉनिटरवरील मजकूर वाचण्यासाठी खुर्चीतून पुढे वाकावे लागू नये हा पहिला नियम. त्यामुळे खुर्ची सहजपणे पुढे किंवा मागे हलवता यावी. काही खुच्र्याना हाताचे कोपर टेकवायला जागाच नसते. माणसाची उंची अधिक असेल तर की-बोर्ड वापरताना कोपरे सतत हवेत लटकल्यासारखी राहतात. असे करताना खांदे वर उचललेले राहतात आणि मानेच्या बाजूला असलेला स्नायू सतत दाबला जातो. यामुळे काही वेळाने मान दुखायला लागते. त्यामुळे खुर्चीच्या दोन्ही बाजूंना कोपर टेकवायला आधार असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर खुर्चीच्या हातांची उंची कमी-जास्त करण्याची सोय असलेली खुर्ची निवडल्यास उत्तम. की- बोर्डवर टाईप करताना कोपरांना आधार मिळाला तर खांद्यांवर ताण येत नाही. पाठदुखी टाळण्यासाठी खुर्चीला चांगला ‘लंबर सपोर्ट’ असायला हवा. खुर्चीची पाठ सहसा केवळ पाठीला आधार देण्यापुरती असते. पण हा आधार खांद्यांपर्यंत मिळणे गरजेचे असते. खुर्चीची पाठ तुमच्या खांद्यांपर्यंत असेल तर संपूर्ण पाठीला आधार मिळेल. अशी खुर्ची वापरल्यास पाठदुखीबरोबरच मानदुखीलाही प्रतिबंध करता येऊ शकतो. सातत्याने संगणकावर काम करायचे असेल त्यांनी काही वेळ गेल्यावर पाठ आणि मानेच्या स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. हे व्यायाम अगदी साधे, कार्यालयात देखील करण्यासारखे असतात. आपल्या डॉक्टरांकडून ते जरूर शिकून घ्यावेत. या हालचालींमुळे पाठ, कंबर आणि मानेवरचा ताण हलका होतो. काहींना तासा- दोन तासांनी ब्रेक घेतलेला पुरेल तर काहींना दर अध्र्या तासाने ‘विश्राम’ स्थितीत यावे लागेल. ब्रेक घेणे म्हणजे काम थांबवून पुन्हा संगणकावरच फेसबुक किंवा तत्सम काहीतरी करणे नव्हे! ब्रेक घेतल्यावर ती पाच मिनिटे तुम्ही संगणकापासून दूर राहायला हवे. या काळात उभे राहून पाठीचे व्यायाम करा किंवा कार्यालयात या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मारून या.
चष्म्याचा क्रमांकही तपासून घ्या.
नेहमी संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला चष्म्याचा नंबर बरोबर आहे ना हे ठराविक काळाने तपासून घेतलेले बरे. चष्म्याचा नंबर बदललेला असला तर डोळ्यांवर वाढीव ताण येतो. मानदुखी आणि डोकेदुखीसाठीही हे कारणीभूत ठरू शकते. चाळिशीनंतर बहुतेक जणांना वाचताना चष्मा लागतो, पण ही मंडळी चष्मा घालायचे टाळतात. त्यामुळे आपल्याला चष्मा असेल तर संगणकावर काम करताना तो घालायचे विसरू नका. चष्मा असताना तो न वापरणे हे देखील मान दुखण्याचे एक कारण ठरू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- संपदा सोवनी / सकाळ
January 18, 2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठ्ठावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
दिलेले दान कळू नये
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे.
आणखी एक दान सत्पात्री असावे, असे बाबापण म्हणतात. ज्याला दान देणार तो त्यासाठी लायक आहे, की नाही, हे तपासून मगच दान द्यावे, नाहीतर त्याच्या पापात आपल्यालाही सहभागी व्हावे लागते. अगदी चौकातल्या देवळासमोरील भिकाऱ्यांना दान देताना, या दान मिळालेल्या पैशातून तो जर दारू पिणार असेल, आणि गुटका खाणार असेल तर असे दान पाप वाढवेल. म्हणून दान सत्पात्री असावे असे बाबा म्हणतात. एकदा दान दिले की आपला त्यावरचा हक्क संपला असे होत नाही. कर्माचा सिद्धांत इथेही काम करतो.
विशेषतः सामाजिक क्षेत्रात वावरताना एखाद्या संस्थेला जेव्हा दान द्यायची वेळ येते, तेव्हा तिचा विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे का, हे आधी पहाणे जरूरीचे असते.
कोणावर कृपा, उपकार म्हणून मी दान देत नाहीये, तर "त्याने" देण्याची ऐपत दिली, म्हणून मी दान देऊ शकतोय. दान करताना हा भाव मनात असावा.
हेची दान देगा देवा, "तुझा" विसर न व्हावा, हा भाव मनात ठेवला तर अहंकाराची बाधा होण्याची भीती उरत नाही. असे तुकाराम महाराजांनी देखील मागितले आहे.
धर्मशाळेत जेवू नये
अनेक ठिकाणी ज्या अन्नछत्रातून जेवण मिळते, ते कोणासाठी असते ? तिथे आलेल्या भाविकांसाठी ज्यांची भोजनाची सोय त्यांना स्वतःला करणे शक्य नसते, अशाकरीता असते. ज्यांना शक्य असते, त्यांनी असे अन्नछत्रातील भोजन घेणे टाळल्यास, अत्यंत गरजू लोकांना तिथे जेवता येईल.
प्रसाद म्हणून अन्न स्विकारले जावे, पण पोट भरण्यासाठी म्हणून धर्मशाळेतील अन्नछत्रात जेवू नये.
समजा अशा ठिकाणी जेवल्यास, तिथे तेवढेच यथाशक्ती आर्थिक दानही द्यावे, म्हणजे दोष लागत नाही.
धर्मशाळा म्हणजे जिथे दान दिले जाते, त्यातून अन्नदान चालते. अशा ठिकाणी जेवल्याने, दान देणाऱ्याचा संकल्प जसा असेल तसे फळ मिळते. किंवा जेवण बनवणाऱ्याच्या मनातील संकल्प जसे असतात, तशी स्पंदने तयार होत असतात. आईने केले जेवण आणि बाईने केलेले जेवण यात फरक पडतोच ना !
म्हणून शक्यतो माहिती नसलेल्या ठिकाणी जेवायला जाऊ नये. आपली पत, प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता जिथे असेल, अशा ठिकाणी सुद्धा भोजन घेऊ नये.
दुसऱ्या अर्थाने पाहायचे झाल्यास, कोणाचे फुक्कटचे खाऊ नये. जे खायचं ते श्रम करून खावे. देणारा आहे, म्हणून त्याच्या जीवावर चैन किती दिवस करणार ना ! एक दिवस देणे बंद झाले की, पुढे काय, याची भ्रांत पडू नये. थोडक्यात परावलंबी राहू नये. स्वतः कष्ट करून खावे. असे आईला सांगायचं असतं.
आणि सार्वजनिक ठिकाणी जेवल्याने जंतुसंसर्गामुळे आजार वाढण्याची भीती असते ती वेगळीच.
म्हणजेच शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिणामांचा विचार केला तर, फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
थोडे तारतम्य बाळगून, विवेक वापरून, आई बाबांनी सांगितलेल्या या काही गोष्टीतून काही नवीन गोष्टी निश्चितच शिकता येतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१७.०८.२०१७
August 17, 2017
कर्नाटकामध्ये मधुकेश्वर मधील बनवासी येथे गेलो असताना वेगळाच अनुभव आला.
August 24, 2021
पहिल्या अवस्थेच्या सुरुवातीला पाय जड होतात, कंबर दुखते, पोटात कळा येऊ १२ आठव लागतात. हळूहळू कळ जास्त वेळ राहते, दोन कळांमधले अंतर कमी होऊ लागते. दहा मिनिटांमध्ये २-३ कळा येत असतील तर प्रसूती समाधानकारक आहे, असे समजावे. कळ आलेली असताना मातेने दीर्घ श्वास घ्यायचा. सर्व अंग सैल सोडायचे. दोन कळांच्या मधल्या वेळात स्वस्थ पडून राहायचे.
June 30, 2023

October 12, 2015
आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो.
June 24, 2011
बरोब्बर अकरा वर्षांपूर्वीची म्हणजे २०१२ सालची गोष्ट. लोकसत्ता दिवाळी अंकासाठी सहाय्यक संपादक प्रवीण दीक्षित यांचा फोन आला, एक काळ गाजवलेले काही स्टार नंतर ‘पडद्याआड’ झाले. ते सध्या नेमके काय करताहेत, कुठे आहेत याबाबत अनेकांना कुतूहल आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राखी! तिची मुलाखत हवीय…
January 26, 2024
"मै दीनदार बुत-शिकन..!"
"मै दीनदार कुफ़्र-शिकन..!"
("मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!")
असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..!
असा अफजलखान पठाण हा केवळ सीमा विस्तारायला आला होता, त्याला धर्माचा प्रचारक म्हणून तुम्ही त्याची दुष्कीर्ती केलीत.. आणि शिवाजी महाराजांना घरात नेऊन बसवलंत !
हे संतापजनक वक्तव्य ऐकलं..
हिंदूंच्या विजयी इतिहासाचं नुसतं स्मरण आणि यथाशक्य अनुकरण करून हा देश विश्वविजयी होऊ शकतो इतका तो इतिहास प्रेरणादायी आहे..
आणि म्हणूनच देशद्रोही, इतिहासाचं विकृतीकरण करू पाहतायत..
त्याच देशधर्मबुडव्या पाप्यांच्या यादीत हा मुंब्र्याच्या गळ्यातला ताईत बसू पाहतोय..
या इतिहासाचं विकृतीकरण व्हायच्या आत सगळ्या जगाला ओरडून सांगूया..!
अफजलखान हा इस्लाम चा प्रचारकच होता..
त्यासाठी त्यानी अतिशय क्रूर पद्धतीनी हिंदू स्त्री पुरुषांवर अनंत अत्याचार केले, अनेक देवळं फोडलीत, शेकडो गाईंचं रक्त सांडलं..
आणि गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदूधर्मसंरक्षक, शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि हा क्रूरकर्मा ठार केला..
त्या शिवरायांना आम्ही नुसतं घरात नाही आमच्या देवघरात ठेवतो आणि त्याही पलीकडे त्यांची प्रतिष्ठापना आमच्या हृदयात करतो...
आणि अशी प्रतिज्ञा करतो की ही शिवज्योत सदैव तेवत ठेवू आणि एका ज्योतीनी अश्या अनेक ज्योती पेटवत राहू.
-- गीता उपासनी
June 20, 2017
भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖
या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
मयैवं - मी अशा प्रकारे
भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
एति - प्राप्त करेल.
या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.
जय भोलेनाथ !
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 19, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti