(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १

    कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं,
    नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |
    नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां,
    त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१||

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी.
    बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते.
    या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती असणारी आई जगदंबा कदंब वृक्षाच्या वनामध्ये विचारण, भ्रमण करणारी. मुनिकदम्बकादंबिनीं- मुनी अर्थात ऋषीमुनी. कदंब शब्दाचा दुसरा अर्थ आहे समूह. तर कादंबिनी म्हणजे मेघमाला. ऋषीमुनींच्या समूहाला आपल्या कृपा वर्षावाने तृप्त करणारी मेघमाला.
    नितंबजितभूधरां- आपल्या नितंब प्रदेशाच्या गोलाई आणि पुष्टतेने पृथ्वीला जिंकणारी. सुरनितंबिनीसेविताम् - सुर म्हणजे देवता. त्यांच्या नितंबिनी अर्थात सुंदरींच्या द्वारे सेवा केली जात असणारी.
    नवंबुरुहलोचनाम् - नव अर्थात नवीनच उगवलेल्या, अंबुरूह म्हणजे कमळाप्रमाणे, लोचन म्हणजे नेत्र असणारी.
    अभिनवांबुदश्यामलां- अभिनव अर्थात नवीनच तयार झालेल्या, अंबु म्हणजे पाणी, अंबुद म्हणजे मेघ, श्यामल म्हणजे सावळी. नवीन तयार झालेल्या अर्थात पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे घन:श्याम असणारी.
    त्रिलोचनकुटुम्बिनीं- त्रिलोचन अर्थात ज्यांना तीन नेत्र आहेत असे म्हणजे भगवान श्रीशंकर. त्यांची कुटुंबिनी अर्थात सहधर्मचारिणी. त्यांच्यासह संपूर्ण ब्रह्मांडाची संचालिका, असणाऱ्या,
    त्रिपुरसुंदरीमाश्रये - श्री जगदंबा त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो. तिच्या चरणकमली शरण जातो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 2, 2020


  • श्री गणेशस्तोत्र

    श्री गणेशस्तोत्र

    श्री गजाननाच्या पूजेत श्रीगणेशस्तोत्राचे स्थान मोठे आहे. नारदमुनींनी रचलेले हे स्तोत्र मराठीतही भाषांतरीत झाले आहे.

    श्रीगणेशाय नम । नारद उवाच ।

    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
    भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिेये ।। 1।।

    प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
    तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवत्रं चतुर्थकम् ।। 2।।

    लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
    सप्तमं विघ्नराजेन्दं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।। 3।।

    नवमं भालचन्दं च दशमं तु विनायकम् ।
    एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।। 4।।

    द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य पठेन्नर ।
    न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभुः ।। 5।।

    विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
    पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।। 6।।

    जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
    संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशय ।। 7।।

    अष्टेभ्यो ब्राह्म्णेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् ।
    तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत ।। 8।।

    ।। इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम् ।।

      August 26, 2014


  • इलेक्ट्रॉनिक पेपर

    इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते.

      September 23, 2023


  • डोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर!

    सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे.

      August 26, 2019


  • कल्याणवृष्टिस्तव – ७

    सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूतॆ
    दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः ।
    किं च स्फुरन्मकुटमुज्ज्वलमातपत्रं
    द्वॆ चामरॆ च महतीं वसुधां ददाति ॥ ७ ॥

    आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की कोणकोणते अतिदिव्य लाभ होतात, हे सांगतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः- हे आई जगदंबे तुझ्या अंघ्री म्हणजे चरण, सरसीरूहयो: म्हणजे कमलावर जो कोणी वंदन करतो, त्याला या जगात,

    सर्वज्ञतां - सर्व प्रकारच्या विद्या आणि कलांमध्ये अक्षुण्ण गती,

    सदसि वाक्पटुतां- सभेमध्ये वाक कौशल्य,

    प्रसूतॆ- प्राप्त होते.
    यातील सभेतील वाक् कौशल्य हा शब्द महत्त्वाचा आहे. बोलता तर सगळ्यांनाच येते. पण सभेत याचा अर्थ विद्वानांच्यासमोर, शास्त्रशुद्ध, मुद्देसूदरीत्या, अकाट्य तर्कपूर्ण रीतीने बोलता येणे. अशावेळी अनेकांची फक्त त -त ,प -प होते. आई च्या कृपेने माणसाला अशा ठिकाणी वक्तृत्व संपन्नता येते.

    किं च- आईच्या कृपेचे आणखीन काय लाभ सांगू? शेवटी सर्व एकत्र करून सांगण्याची माऊलींची 'किंबहुना' शब्द रचनेतील भूमिका या 'किं च' मध्ये आली आहे.

    स्फुरन्मकुट- देदीप्यमान मुकुट अर्थात साम्राज्य पद.

    उज्ज्वलमातपत्रं- चमचमते छत्र. त्यात उज्ज्वल शब्दात पांढरा रंग अपेक्षित आहे. एकछत्री सम्राटाचे छत्र पांढऱ्या रंगाचे असते.तो भाव.

    द्वॆ चामरॆ च - दोन्ही बाजूला चवऱ्या. राजाच्या दोन्हीकडे उभ्या राहून त्याला वारा घालणाऱ्या सेविका, हा सामान्य अर्थ. हा कोणत्याही लहानसहान राजाला लागू पडतो.
    येथे जणू सूर्य आणि चंद्र याच दोन चवऱ्या आहेत महान अर्थ अपेक्षित आहे.

    महतीं वसुधां - विशाल पृथ्वी. अर्थात समुद्र वलयांकित साम्राज्य.

    ददाति- आईची कृपा हे सर्व काही प्रदान करते.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 18, 2020


  • ट्रेक ऑन

    ऋतू फूड्स आणि Trendy Bytes Ladoowala हे व्यवसाय सांभाळून गेली २८ वर्षे सह्याद्रीमध्ये भ्रमंती, २०० हून अधिक गडकिल्ल्यांवर भ्रमंती, ‘शिवकाव्य’ हे शिवचरित्र प्रकाशित.

      June 25, 2022


  • कोपराचा सांधा

    या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे.

      May 10, 2023


  • श्रीपांडुरंगाष्टकम् – मराठी अर्थासह

    वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम् भुजंगप्रयात वृत्तात गुंफलेले असून गावयासही सोपे आहे.

      July 17, 2021


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017

      May 25, 2017


  • जागतिक बाल कामगार विरोधी दिन – १२ जून

    आंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आयएलओ)नुसार जगभरात २१ कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतल्या जाते. संपूर्ण जगातून ७१पेक्षा जास्त देशांत बालमजूरी होते. विकासशील देशांत बालमजूरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे.

      June 12, 2021