(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कथा कर्जत स्टेशनची

    दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली.

  • नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

    जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती गाडी सहजपणे पकडू शकतात. अतिशय संथ, आरामदायी असलेला हा रेल्वेप्रवास अगदी निसर्गाच्या कुशीत पोहोचतो.

    ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारतातील उन्हाळा सहन करणं फारच कठीण जात असे, त्यामुळे त्यांनी भारतभरातील काही डोंगररांगांमध्ये थंड हवेची ठिकाणं शोधून तिथे टुमदार गावं बनविली. तिथपर्यंत पोहचण्याकरता नॅरो गेज रेल्वे नेली. ह्या रेल्वे बांधणीचं काम महाजिकीरीचं. बांधण्यास लागणारा कालावधी मोठा व अतिशय खर्चीक; पण या सर्व अडचणींवर ब्रिटिशांनी मात केली, कोणतंही काम अर्धवट सोडलं नाही. या सोयीमुळे सामान्य भारतीय नागरिकांनाही थंड हवेच्या जागांची गोडी लागली. यांमधील काही मार्गाना 'जागतिक वारसा' (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि आजही ही खर्चीक रेल्वे चालविली जात आहे.

    सिलीगुडी - दार्जिलिंग (बंगाल), कलका - सिमला (हिमाचल प्रदेश), मदुराई-कुन्नुर उटकमंड (उदगमंडलम) (तामिळनाडू), नेरळ - माथेरान (महाराष्ट्र), असे चार प्रमुख मार्ग ब्रिटिशांनी प्रारंभी जिद्दीने बांधले. याशिवाय, भारतातील संस्थानिकांनी आपापल्या संस्थानांमध्येही नॅरोगेज व मीटरगेज मार्ग सुरू केले. बडोदा राजवाड्याची रेल्वे, मोरेना भिंड संस्थान (मध्यप्रदेश), जोगिंदरनगर (पठाणकोट), जयपूर आणि हैदराबाद ते औरंगाबाद, असे हे पाच मीटरगेज व नॅरोगेज मार्ग होते.

    सन १८७८ मध्ये सिलीगुडी ते दार्जिलिंग हा ५१ मैल लांबीचा सर्पाकृती वळणं असलेला अतिशय खडतर मार्ग बांधला गेला. या बांधणीत बोगदे न बांधता वळणावळणांच्या मार्गाचा अवलंब केला गेला. या वळणांची वेटोळी ही काही ठिकाणी ५९ फूट व्यासाची आहेत आणि इथल्या प्रत्येक वळणावरून दिसणारा निसर्ग हा इतका वेगवेगळा दिसतो, की त्याची नोंद ठेवणंच कठीण आहे. चहाचे मळे, भातशेती, पाम, बांबू, ओक, फर्न, मॉसेस, चेस्टनट्स या सर्वांची विविधता, त्यांमधून डोकावणारी हिमशिखरं, असा हा एकूणच डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रवास आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या प्रवासामध्येच रवींद्रनाथ टागोरांना 'गीतांजली'तील काव्यरचना स्फुरल्या.

    जगप्रसिद्ध लेखक मार्क ट्रेन याने १८९६ मध्ये दार्जिलिंगपर्यंतचा प्रवास टॉय ट्रेननं केला होता.८ तासांच्या प्रवासात हिमाच्छादित कांचनझोंगा पर्वत शिखरांचं दर्शन, ७४०७ फूट उंचीवरील 'धूम' हे नॅरो गेज मार्गावरील जगातील सर्वांत उंचीवरील स्टेशन, दोरीच्या वेटोळ्यासारखे पर्वतमाथ्यावरून दिसणारे रुळांचे वेटोळे (बटालिया लूप) हे सर्व पाहून तो अतिशय भारावून गेला. तो लिहितो, 'हा आठ तासांचा प्रवास आठ दिवसांचा असावयास हवा.' स्टीव्ह मॉकरी नावाच्या फोटोग्राफरचा रेल अॅक्रॉस द सबकॉन्टिनेंट' नावाचा भारतीय रेल्वेवरील लेख फोटोसहित नॅशनल जिओग्राफिक १९८४ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यामधील रेल्वेसंबंधी सर्वच फोटो अप्रतिम आहेत. त्यांतील ‘बटालिया लूप' हा फोटो जगप्रसिद्ध फोटोंपैकी एक आहे.

    १९०३ मध्ये कलका-सिमला हा ६० मैल लांबीचा मार्ग बांधला गेला. हा मार्ग २८०० फूट उंचीवरून ७००० फुटांपर्यंत वर जातो. मार्गावर छोटे-मोठे १०३ बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी जवळपास ५ मैल भरेल.

    १९०८ सालात मेटुपलम (मदुराई) ते उदकमंडलम (उटकमंड) हा २८ मैलांचा मार्ग बांधण्यात आला. १५०० फुटांवरून ७५०० फूट उंचीपर्यंत वर जाणारा हा मार्ग वर चढण्यासाठी एक कठीण मार्ग मानला जातो. या मार्गावर गाडी वर चढण्याची 'कॉगव्हिल' त-हेची पद्धत वापरली जाते. या मार्गावरील कुनुरपासून उदकमंडलम हा ब्ल्यू माउंट एक्सप्रेस प्रवास हा एक सुरेख अनुभव असतो. हा प्रवास आम्ही आवर्जून केला होता आणि आमच्यासाठी हा एक अतिशय अविस्मरणीय असा अनुभव होता.

    या प्रवासात क्षितिजापर्यंत पसरलेल्या निळसर-हिरवट डोंगररांगा, रुळांच्या दोन्ही बाजूंची गर्द झाडी, मधूनच डोकावणारी लाल कौलांची घरं, असं लोभस दर्शन होत राहतं. गाडीचा वेग बेताचा असेल, तर तो दुग्धशर्करा योगच असतो इथे. निसर्गाचे विविध आविष्कार मनापासून अनुभवता येतात. वाटेतील वेलिंग्टन स्टेशन हे भारतीय सैनिकी शिक्षणाचे दक्षिणेतील महत्त्वाचे ठिकाण, त्यामुळे चढणारे व उतरणारे थोडेफार सैनिक प्लॅटफॉर्मवर दिसतात. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कोवळ्या उन्हात सैनिकांसाठी हिरव्या छताच्या बराकी, त्यामधील आखीव पांढऱ्या पट्ट्यांनी रंगविलेले रस्ते, जिप्स, ट्रक्स आणि रुबाबात फिरणारे तरणेबांड सैनिक. वातावरणात नि:स्सीम शांतता असते. आमची गाडी तर प्लॅटफॉर्मवर बराच वेळ शांतपणे उभी होती आणि क्वचितच मिळणारा एक अनुभव आमच्या गाठीशी जमा होत होता. वेलिंग्टन ते उटी हा प्रवास म्हणजे अखंड बदलत राहणारा निसर्गाचा चलतपट आहे. हा पट प्रत्येक भारतीयानं अनुभवायला हवा.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • अगत्य

    आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

  • राशोमान – सत्य असत्याचा विलक्षण खेळ

    राशोमान हा केवळ चित्रपट नाही. तो एक आरसा आहे. माणसाच्या स्वार्थी विचारांचा, आचरणाचा व दुट्टपीपणाचा.

  • तुमचं आमचं ‘सेम’ असतं !

    झांझीबारला जाणार्‍या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे.

  • बदलती जीवन शैली व शिक्षण

    एका अदृश्य शक्तीने दोन वर्ष शाळा बंद ठेवल्या व भविष्यातही त्याचं अस्तित्व राहणारच आहे, हे लक्षात घेऊनच आता मुल्यमापनाच्या निकषांचा नव्याने विचार करावा लागणारच आहे. अशीच वर्ष वाया गेली तर विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वें पोकळीत वाढतील व हे व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरेल.

    तातडीने मूल्यमापनाच्या संबंधी खालील काही मार्गदर्शक सूचना पालकांना कळवाव्या लागतील.

    १) तज्ञांच्या सहाय्याने मूल्यमापन आराखडा तयार करून राज्य स्तरावर सर्व जिल्ह्यांचे संकलन करून एक आदर्श मूल्यमापन आराखडा, शाळा भरणार नसतील त्या परिस्थितीत कसा असावा व शाळा जर भरत असतील तर आराखडा कसा असावा याबाबत काही उपाय ताबडतोब अमलात आणावे लागतील, त्यासंबंधी शाळांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागेल.

    २) अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यात कशी आणि कोणत्या घटकाने वाढेल हे ठरवावे लागेल. पाठांतर व घोकंपट्टी पेक्षा प्रत्यक्ष कार्य व त्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा याचे नियोजन हवे.

    ३) प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण करून किती विद्यार्थी ऑनलाइन ने शिकू शकतात याची नोंद ठेवावी.

    ४) ऑनलाइन ने शिकवण्याचे वेगळे विषय व घटक ठरवावेत.

    ५) ऑनलाईन व ऑफलाईन असे वेगवेगळे नियोजन करून पाहावे लागेल.

    ६) स्वयं अध्ययन नें काय शिकता येईल हे परिपत्रक काढणे व शाळेने पालकांना कळवावे.

    ७) होम स्कूलींग साठी किती पालक तयार आहेत त्या दृष्टीने त्यांना वेळोवेळी सूचना पाठवाव्यात.

    ८) इंटरनेट सुविधांचा अभाव आहे, पालक लक्ष व वेळ देऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना साठी वेगळे नियोजन करून त्यांना मूळ प्रवाहात आणणें, याकडे लक्ष द्यायला हवे ते कसे करायचे हे त्या त्या स्थानिक पातळीवर ठरवावे.

    ९) प्रत्येक पाठा मागें स्वाध्याय म्हणून जे दिलेले असते ते व अजून नवीन स्वाध्याय देऊन नियोजनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी घरी व समाजात काय काय करावे याचे नियोजन त्यांना कळवावे व त्याची नोंद त्यांनी ठेवावी.

    १०) स्वयंमूल्यमापन वर जास्त भर देत त्याचे रेकॉर्ड कसे ठेवावे याचे नियोजन करावे.

    विषाणूनें अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला व शिक्षणाचाही प्रश्न नर्माण केला आहे.शिक्षणच शिक्षणाचे प्रश्र्न सोडवू शकतनाही ही परिस्थितीआहे.शिक्षणाचे बदलते संदर्भ, शिक्षणाचा आशय, प्रक्रिया काळानुसार बदलतें तेंव्हा आपण शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत असे म्हणतो,व त्यानुसार आपल्याला स्वतःला तडजोड करून घ्यावी लागते. संदर्भ बदलण्याआधी आपण बदलायला हवं नाहीतर आपण प्रवाहा पासून दूर फेकले जाऊ. काळ बदलला की संदर्भ बदलतात मानवी हस्तक्षेपामुळे किंवा निसर्गाच्या आपत्तीमुळे किंवा भौगोलिक रचनेतील बदलामुळे नवीन घटनांची नोंद घ्यावीच लागते. इतिहासातल्या गोष्टीपासून सुधारणा करावी लागते, झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून नव्याने आखणी करावी लागते या सर्व प्रक्रियेत जुन्या गोष्टींना चिकटून चालणार नाही.

    नवीन आराखडा, नवीन संकल्पना रूजवायलां लागतीत, माणसे बदलली की सत्ता बदलते, सत्ताबदलली की विचारसरणी बदलतें आणि ती विचारसरणी कळत-नकळत शिक्षण प्रक्रियेत रूजतें.परंपरेला छेद देण्याची वेळ आली आहे, त्यानिमित्ताने एक वेगळेच प्रारूप तयार करण्याची संधी आली आहे.

    एक विषाणू मानवजातीला उध्वस्त करायला निघतो तेव्हा जीवनपद्धती तर बदलतेच, शिक्षण घेण्याच्या देण्याच्या प्रक्रिया ही बदलतात. तडजोड नाही केले की अस्तित्व संपतं.

    जगायचं असेल तर जीवनशैली बदलावी लागते. शिकायचं असेल तर शिक्षण प्रक्रियेत बदल करावा लागेल. मूल्य चिरंतन असतात, मूल्ये बदलत नाहीत पण ती देण्याची व घेण्याची प्रक्रिया राबवताना नवीन परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. संकल्पना स्पष्ट करताना नवीन दाखले द्यावे लागतात.जिवन पद्धती बदलू शकतें, शिक्षण पद्धती कां नाही?

    पूर्वी शिकलेल्या अनुभवाच्या शिदोरीवरच नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून घ्याव्या लागतील.शाळेत शिकून व विसरल्यानंतर जो शैक्षणिक अनुभव त्यांना मिळाला असेल त्याच्यावरच त्यांची शैक्षणिक अनुभूती ठरणार आहे.

    शिक्षणाचे संदर्भ इतके बदलले आहेत की विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव पुस्तकांच्या बाहेरचेही शिकावे लागणार. करोना पूर्व शिक्षण व करोना उत्तर शिक्षण याचा वेगळा विचार करावा लागेल. कोरोना च्या काळात कळत नकळत मुलांनी अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक चांगल्या गोष्टी, तंत्र कौशल्य, कला, छंद जोपासले. हा अभ्यासक्रमांचा भागंच समजला गेला पाहिजे. अनौपचारिकपणे जे कौशल्य, मूल्य मुले शिकतात त्याची नोंद व्हायलाच पाहिजे.

    सजग पालक home schooling मध्ये अभ्यास,छंद पुर्ण करून घेतातच.पालकांच उदबोधन करून याची व्याप्ती वाढवावी.

    आता ऑनलाईन मध्ये पालक जास्त सज्ज,सजग झाले आहेत.हे चित्र सार्वत्रिक झाल तर?खरंच मुले शिकली, तंत्रज्ञानाच्या जवळ गेली. काहीना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती केली. काही शाळांनी त्यांचा वेळ रिकामा जाऊ दिला नाही. केवळ पाठ घेणारी, अभ्यासक्रम शिकविणारी औपचारीक पद्धत इथून पुढे आपल्याला सोडून द्यावी लागेल का? निदान काही काळासाठी तरी, यादृष्टीने नियोजन हवें आहे

    शैली आणि सवयी, पध्दती बदलाव्या लागतील.शिक्षण औपचारिकच नव्हें तर अनौपचारिक पद्धतीनेही राबवावे लागेल. की काय अशी परिस्थिती आपल्यासमोर आहे.अशी ही निरीक्षणे पाहायला हवीत जिथे काहीच एक घडले नाही,घडत नाही.२००५च्या शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण ही वाटण्याची भौतिक गोष्ट राहिली नाही. मुले अनुभवातून, कृतीतून, व्यक्त होण्यातून चर्चा करण्यातून प्रश्न विचारण्यातून, ऐकण्यातून,निरीक्षण करण्यानं शिकत असतात असे म्हणले आहे,आणि आताही शिकायलाही हवेत. काहीशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, कामाचा अनुभव घेता येणे, कौशल्य निवडणे, कलाप्रकार याचे रसग्रहण करता येणे, सर्जनशीलता वाढवणे ही शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ही ध्येय साध्य होतील अशी साधने व संधी शिक्षण व्यवस्थेने,समाजव्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी प्रेरणा द्यायची गरज आहे.

    आज पर्यंत हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही, पण आता करायचेआहे.अशाही विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल ते शाळेत जातच नाहीत,अभ्यास करत नाहीत, त्यांना कोणी काही म्हणत नाही. जिथे पालक शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत, जिथे आर्थिक विवंचना आहे जिथे विद्यार्थ्यांची गरज पालकांना हवी आहे.

    जिथे आई वडील घरी नसतील कामानिमित्त बाहेर असतील तिथे मुले मोबाईल सहवासात राहणार. शिकवणे कंटाळवाणे असेल तर मुले ऑफ स्क्रीनहोणार.सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर,sanitiser वापर साठी नवीन नवीन योजना आखाव्या लागतील. शाळे शिवाय अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांनी शिकावं असं वाटत असेल तर अभ्यासक्रम बदलावा लागेल. अचानक अभ्यासक्रम बदलता येणार नाही, पण काही मार्गदर्शक सूचना वितरित करता येतील. अभ्यासक्रमातून अनौपचारिक शैक्षणिक अनुभव त्यांना कसा मिळेल याची तरतूद करायला हवी.शिकण्याच्या संधी मुलांना आपण किती आणि कशा उपलब्ध करून देतो यावरही ते अवलंबून आहे. राहू दे तुला जमणार नाही असाच पालकांचा कल असतो. किती मुले भाजी आणतात ,व्यवहार करतात, घरात उपकरणांची दुरुस्ती करतात ,घरात स्वयंपाकात मदत करतात, नवीन म्हणून एखादा पदार्थ करणं वेगळं आणि आईला मदत करणं वेगळं. भांडे घासायला मदत करतात का? श्रम प्रतिष्ठा कशी व किती रूजते. मुले घर झाडतात कां,अंगण झाडतात का ? सुट्टीत मुलं काही गोष्टी करतात.ते नेहमीच करतील तरच मूल्यं रुजतील.

    आपल्याला वेगळ्या मूल्यमापनाचा विचार करता येईल का? ज्याच्यामुळे विद्यार्थी काही कौशल्य शिकु शकतील, याची नोंद घेता येईल .काही ज्ञान त्यांचे वृद्धिंगत झाले काय याची चाचणी घेता येईल. हे सगळं नवीन करण्याची संधी आहे. एकीकडे स्क्रीन टाईम वर वेबिनार घ्यायचे व त्यांच्या हातात जास्त वेळ स्क्रीन द्यायचा हे बदलायला हवं.

    निर्जीव समूह संपर्क साधनातून विद्यार्थ्यांना शिकावे लागणार. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया एकतर्फी चालेल. ऑफलाईन मध्ये संवादाला जास्त वाव आहे. अनेक द्रोणाचार्य ऑनलाईन उपलब्ध होतील पण मुलांना ऑफलाइन एकलव्य व्हावं लागेल. मूल्य बदलले की व्यवस्था बदलावी लागते. समान मूल्य अभ्यासक्रमात असतांना मूल्ये समान झिरपली नाहीत,याची जबाबदारी कोणाची? मूल्य झिरपले पाहिजेत,केवळअभ्यासक्रम नाही.

    अभ्यासक्रम माहीत आहे पण मूल्यें माहीत नाही अशी आज अवस्था आहे.अभ्यासक्रम केव्हा ही पूर्ण करता येतो. पूर्ण झाला असं लिहिता येतं. मूल्यात्मक बदल होतोच असं नाही. ते होण्याची संधी आली आहे. शैक्षणिक संदर्भ बदलतील याची कल्पना कोणीही केली न्हवती. शिक्षणाचे आता दोन प्रवाह झाले आहेत एक ऑनलाईन व दुसरे ऑफलाईन. शिक्षण परिस्थितीजन्य झाले आहे. शिक्षणतज्ञा पासून ते पालक, विद्यार्थ्यां पर्यंत सर्वांनाच परिस्थितीस सामोरे कसे जायचे हा प्रश्न पडला आहे.पुस्तक जेव्हा निरुपयोगी ठरतं, आयुष्यातले प्रश्न सोडायला तेव्हा, मस्तकच कामाला येतं. परिस्तिथी संधी बनून आली आहे.आपत्ती मध्ये शिक्षण वरदान ठरू शकतं. प्रत्येक जण आपल्या गतीने, सजग होऊन, स्वअनुभवाने, स्वयंअध्ययनाने शिकणार आहे. ऑनलाईन चे प्रश्न वेगळे व ऑफलाइन चे प्रश्नवेगळे. प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संदर्भात सोडवावे लागतील. आता सरसकट एकच फुटपट्टी शिक्षण क्षेत्राला लागू करता येणार नाही. मूल्यमापनाच्या मापदंड बदलावे लागतील.शिकवण्यापेक्षा शिकणे याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करावे लागेल. काही घटक स्वयंअध्ययनासाठी गृहपाठ सारखे विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.

    आता समंत्रणcouncelling ही मुक्त विद्यापीठातील पद्धत अंमलात आणता येईल. केवळ सगळं शिकवायचे नाही, वाचून शंका निरसन करायचे.तास कमी करून त्या तासांमध्ये आधी मुलांना वाचायला सांगून, नंतर एक दिवस चर्चेचा ठेवता येईल. हुशार ,मध्यम व अभ्यासात कच्ची असणारे विद्यार्थी यांची उत्तरे ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेता येतील.,आणि त्याच्यावर चर्चा करता येईल. शिकवायचं नाही.पाठावर चर्चा करायची. मुलांच्या शंकेचे निरसन करायचे. मुक्त विद्यापीठात सर्व अभ्यासक्रम हा शिकवला जात नाही तर समंत्रणा मार्फत शिकवला जातो.विद्यार्थ्यांनी वाचून तो अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्या दिवसात फक्त चर्चा करायची.

    अनेक घरात पुस्तकें काय, खायला भाकरी नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीचाही आपल्याला विचार करावा लागेल. काही बाबींचेअजून सर्वेक्षण करून पाठबळ मिळाले पाहिजे. होम लर्निंग साठी चांगली संधी आहे.जिथे शक्य आहे तिथे सुशिक्षित पालकांच उदबोधन अभ्यासक्रमाबाबत ऑनलाईन करता येईल. मग तो मुलाकडून करून घ्यायला सांगा. काही ठिकाणी हे घडतं ते सार्वत्रिक व्हायला हवं. प्रत्येकाचं जगणं हाच अभ्यासक्रम व प्रत्येकाचे अनुभव हेच त्याला उत्तर. अशा रीतीने जिवनानुभावावर आधारित मुलांना व्यक्त होऊ द्या. मुलांच्या कृतीतूनही त्यांचे

    मूल्यमापन करावे लागेल,केवळ अभ्यासातून नाही.

    मुले काहीच शिकणार नाही त्याचा बाऊ नको.अभ्यासक्रम शिकणार नाही,पण जीवनानुभव शिकतील तो महत्त्वाचा आहे. कौशल्य शिकतील ती महत्त्वाची आहेत. करोना सुट्टीत मुलांनी केले ते नाविन्याची कास धरणारं आहे पण त्यात सातत्य हवं. कोणती मूल्यं मुलांमध्ये रुजली हे पाहायला हवं, व्यवहारात ते दिसायला हवं. तात्पुरती प्रसंगानुरूप एखादी गोष्ट करणं वेगळं व अंगवळणी पडणं,रुजणं वेगळंं. जे जे रूचतं ते रुजतं.

    शिक्षकांना,पालकांना,विद्यार्थ्यांना प्रयोग करायला वाव आहे. सृजनात्मक काहीतरी करण्यासाठी वावआहे.प्रत्येकाला आपापल्या पातळीवर जे करायचे आहे ते करू द्या.

    अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकास लिहलेल्या पत्रातल्या प्रमाणे विद्यार्थी घडायला हवेत, केवळ परीक्षेत यशस्वी असणारी मुले नको, जीवनात यशस्वी होणारी हवीत,केवळ पुस्तकी नको.प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यापुढील प्रश्नचिन्ह काढायचे असेल तर शिक्षणाचा वेगळ्या संदर्भात विचार करावा लागेल.

    काहीतरी व सूजनात्मक नक्कीच घडेल,फार काही भयंकर घडणार नाही, पण सुंदर घडेल. थोडं पाठबळ हवं.

    शिक्षणाने प्रक्रियेचाच पराभव केला आहे.शिक्षणाची कोंडी करणारे घटक अजून कितीतरी आहेत.शिक्षणाने खरंतर व्यवस्थेची,माणसांची कोंडी केली आहे.अजून कितीतरी महाविद्यालयें नॅक पासून दूर आहेत, स्वयंमूल्यमापन पासून दूर आहेत.विनाअनुदान,कसल्याच सुविधा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अपात्र प्राध्यापकांनी अध्यापन केले याचे उत्तरदायित्व कोणाचे? प्राध्यापकांना आवश्यक असणाऱ्याअंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर छापवून आणणाऱ्या यंत्रणा आहेत.अनेक प्रश्नांनी शिक्षण व्यवस्थेला ग्रासलें आहे. आधी अस्तित्व मग शिक्षण असा प्राधान्यक्रम आता ठरवावां लागणार आहे.सामाजिक अंतर ठेवावं लागणार आहे पण अध्यापनाला अंतर देवून चालणार नाही. प्रवेशाचे वय, शिक्षण हक्क कायदा, त्याची अंमलबजावणी न होणें, परीक्षा न घेता पास करणे, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय, अंतर्गत गुण रद्द करणे, अशा अनेक धरसोड निर्णयाने शिक्षणाची कोंडी झाली आहेच.

    आरोग्य व वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणात रूजलाच नाही. तो रूजवण्याची संधी आता आली आहे. आरोग्य हेच आता शिक्षण असणार आहे. अस्तित्व हेच आता शिक्षण राहणार आहे.

    अध्ययन अध्यापन प्रक्रिया व मूल्यमापन अडचणीचे होऊन बसले आहे. निर्जीव समूह संपर्क साधनाने एकतर्फी अध्यापन प्रक्रिया होत आहे.

    मूल्यमापन करताच येत नाही अशी परिस्थिती आहे. स्वयंम अध्ययन व स्वयंमूल्यमापन यानेच आता व्यक्तिमत्व विकास होणार आहे.

    शिक्षणाने परिवर्तन घडलेच नाही.तकलादू शिक्षणामूळे माणसें कोलमडून पडतायेत.

    शिक्षणानेच माणसांची कोंडी केली आहे.

    शिक्षणाने शिक्षणाची उकल करता येत नाही,अशी परिस्थिती आहे. समृद्ध नसलेली, अनेक प्रश्न असलेली आपली शिक्षण व्यवस्थाआहे.

    समाजाचे वैचारिक दारिद्र्य वाढलेंच आहे.

    शिक्षण व्यवस्था कागदांवरच आहे.

    शिक्षण प्रक्रियेत एवढे प्रश्न निर्माण झाली आहेत की त्याची उकल करण्यास मनुष्यबळ असमर्थ ठरत आहे.

    प्रवेश ते परीक्षा व K.G to P.G.येवढाच शिक्षणाचा प्रवास आहे. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार केला तरच व्यक्तिमत्व विकास होणार आहे.

    बदललेली शिक्षणपद्धती, निरीक्षण, विविध संकल्पनांचे विश्लेषण, स्वहस्ते सांघिक प्रयोग, स्थानिक पातळीवर सृजनात्मक संशोधनात्मक जे घडत आहे त्याची नोंद घेणे. परीक्षांपलीकडे शिक्षणाला नेण्यासाठी वैचारिक, चिकित्सक, संशोधक आणि निरीक्षणात्मक शिक्षणाची आवश्यकता या गोष्टीच आता शिक्षणाला तारणार आहेत. केवळ शिक्षण पद्धती बदलून चालणार नाही तर शिक्षणाच्या पद्धती बदलाव्या लागतील हे आजचं वास्तव आहे.

    -- डॉ. अनिल कुलकर्णी.

    ९४०३८०५१५३

    anilkulkarni666@gmail.com

    पुणे.

  • कोणत्याही गोष्टीत पॅशन कसं अनुभवाल

    आपल्या संस्कृतीत एक मोठा गैरसमज आहे की पॅशन हे (Spontaneeu) च बसतं तुम्हाला तुमचं काम आवडतं किंवा आवडत नाही. तुम्हाला व्यायाम करायला आवडतो किंवा आवडत नाही. तुम्हाला पुस्तकं वाचणं आवडत किंवा कंटाळवाणं वाटतं. पॅशन ही गोष्ट निर्माण केली जाऊ शकत नाही.

  • नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

    असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही 'डोंगरमाथ्यावरील जंगल' असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध 'चौक' या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका एतद्देशियाच्या मनात आली. त्याचे नाव अब्दुल हुसेन. सर आदमजी पीरभॉय या यशस्वी उद्योजकाचे ते चिरंजीव. माथेरानचं वर्णन ऐकून त्यांचं कुतूहल जागं झालं..दोघे बापलेक मुंबईहून लोकलनं थेट नेरळला उतरले, परंतु त्यांना वर माथेरानला जाण्यास ना बग्गी होती ना घोडा होता! काहीच न मिळाल्याने हिरमुसले होऊन ते दोघे नेरळहून थेट मुंबईत परतले. या एका घटनेमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाची आखणी सुरू झाली. या परतीच्या प्रवासात अब्दुल्लांनी मनात निश्चय केला, की ते पुढच्या वेळी 'स्वत: बांधलेल्या रेल्वे मार्गाने' माथेरानला पोहोचतील आणि मग खरोखर भगीरथ प्रयत्नांनी 'माथेरान रेल्वे प्रकल्प' साकारला गेला. या प्रकल्पाला प्रत्यक्ष प्रारंभ व्हायला १९०४ साल उजाडलं. प्रथम वडलांच्या मागे लागून त्यांनी १० लाख रुपयांचं भांडवल उभारलं. हळूहळू सर्व थरांतून पैसे जमा होऊ लागले. अतिशय घनदाट जंगल, वेडेवाकडे डोंगरकडे आणि अवघड असलेल्या दऱ्या यांतून मार्ग काढणं फार मुश्कील काम होतं. अशा वेळी नुकताच कलका-सिमला रेल्वे मार्ग बांधून झाला होता. त्याचा अनुभव गाठीला असलेल्या रावसाहेब हरिचंद्र यांना बोलावून घेण्यात आलं. अब्दुल्ल हुसेन स्वत: जातीने नेरळमध्ये वास्तव्यास गेले व हे सर्व काम त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली सुरू केलं. मार्गात सापांची अनेक बिळं होती. अंधश्रद्धेमुळे कामगार सापांना मारण्यास तयारही होत नसत. अखेर साप मारण्याकरता एका सापामागे एक रुपया बक्षिसी देण्यास सुरुवात झाली आणि मार्ग सापमुक्त झाला. ब्रिटिश सरकारनं पुणे-मुंबई येथून सैन्याची मदत पाठवली. कामानं वेग घेतला. या रेल्वेमार्गाचं स्वप्न पाहणारे, अब्दुल हुसेन हे स्वत:च या छोट्या मार्गावर चालणारी छोटी इंजिनं आयात करण्याकरता जर्मनीला गेले. डब्यांची बांधणी भारतातच झाली आणि हा स्वप्नवत मार्ग तयार झाला. गाडी सज्ज झाली, पण एक अडथळा यानंतरही समोर उभा, ठाकलाच. उभ्या कड्याच्या बाजूनं जाणाऱ्या गाडीवर भुताटकीचा प्रयोग होईल या भीतीपोटी कोणी प्रवासी तयार होत नव्हते. शेवटी इंजिनमध्ये ड्रायव्हरसोबत स्वतः अब्दुल हुसेन बसले आणि लोकांची भीती त्यांनी दूर केली. सर्व कामगार रुळांच्या दोन्ही बाजूला उभे राहून गाडीचं संरक्षण करत होते. पहिल्याच प्रवासात अब्दुल यांच्या अंगातील कोट फाटला, परंतु तसाच प्रवास करीत ते माथेरानला उतरले. मार्गावरील कामगारांना त्यांनी प्रेमापोटी आपल्या खिशातील सर्व नाणी वाटली. गंमत अशी, की पैसा आदमजींचा (वडलांचा), मेहनत अब्दुल्लांची (मुलाची) व लाभ मात्र पर्यटकांना मिळाला. या मार्गाच्या उद्घाटनाचं साल होतं १९०७ आणि महिना होता मार्च.

    हा प्रवास करताना, वॉटर पाईप व जुम्मापट्टी स्टेशनांजवळ स्वागताला उभी असलेली माकडांची फौज, करवंदं-जांभळांचे वाटे पानातील द्रोणात घेऊन खिडकीशी लटकून चालत्या गाडीत शिरणारी आसपासच्या खेड्यांतील मुलं-मुली, त्यांच्या चेहऱ्यांवरचे निरागस भाव, हे चित्र मनावर खोलवर कोरलं जातं. माथेरान जवळ येऊ लागतं, तसे दोन्ही बाजूंनी तांबड्या मातीचे रस्ते, घोडेवाले, माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षा, हिरवी गर्द झाडी, हिल स्टेशनचा जाणवणारा थंडगार वारा, हे वातावरणच मोहित करत सामोरं येतं. त्यात इंजिनाची दीर्घकाळ वाजणारी शिटी सुरू झाली, म्हणजे माथेरान स्टेशन जवळ आल्याची खूण पटते. अडीच तासांचा प्रवास कसा संपतो ते कळतच नाही.

    श्रीमंत लोकांसाठी स्पेशल रेल्वे मोटारकोच लावण्याचा मान प्रारंभकाळात या गाडीला मिळाला होता. मुंबईहून शुक्रवारी पुण्याकडे जाणारी डेक्कन क्वीन व सोमवारी पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन नेरळला थांबत असे, कारण बडे रईस लोक त्या काळात शनिवार-रविवारी माथेरानला जाऊन आपल्या बंगल्यावर आराम करीत असत.

    पावसाळ्यात हा मार्ग बंद असे, पण हळूहळू या मार्गावर अनेक दरडी कोसळल्याने वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा मार्ग पूर्णपणे बंद पडला व पुढे तर तो कायमचाच बंद पडण्याची शक्यता वाटू लागली. रेल्वेला हा मार्ग चालू ठेवण्याचा खर्च परवडत नव्हता, मात्र 'जागतिक वारसा' यादीमध्ये ‘माथेरान टॉय ट्रेन'चं नाव झळकलं, चक्रं वेगात फिरली आणि आता नेरळ ते माथेरान गाडीचा मानाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे...

    नॅरोगेज ट्रेनचं विश्वच निराळं आहे आणि ते एकदा अनुभवलं, की पुन:पुन्हा साद घालणारं आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • ५ जून २०२२ – ‘जागतिक पर्यावरण दिन’

    दोनच दिवसांनी , ५ जून २०२२ रोजी, ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे,  हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. सतराव्या शतकात ‘संत तुकारामांनी’, वृक्षाचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’, असा अतिशय सुंदर अभंग रचून सामाजिक संदेश  दिला. 

  • सामना’ चित्रपटातील मास्तर

    चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही.