वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात.
October 17, 2017
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?
May 3, 2011
आई जगदंबेच्या चरणी असलेली आपली अनन्य शरणता आचार्य श्री येथे आर्तपणे सादर करीत आहेत. भक्ताच्या भक्तीचे ते सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. भक्ती ही पतिव्रतेसमान एकनिष्ठ असायला हवी. या अनन्यशरणतेने आचार्यश्री म्हणतात….
February 15, 2020
अलीकडे ग्राहकांची फसवणूक करण्याला वैद्यकीयक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. डॉक्टरांकडे किवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णाची फसवणूक झाल्याच्या किवा त्याला मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा तक्रारींना आळा घालायचा तर त्या संदर्भात ग्राहक मंच वा विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांवर नजर टाकायला हवी.
December 21, 2010
काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
May 17, 2016
निद्रानाश असल्यास पेरू, सफरचंद़ आणि गाजर किंवा बटाट्याचा रस पालक रसाबरोबर सायंकाळच्या पूर्वी घ्यावा.
झोपण्या पूर्वी सोसवेल ईतक्या गरम पाण्यात १०/१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल चोळून जिरवावे. तळहातावरही ते लावून जिरवावे. तळपाय काशाच्या वाटीने घासावेत, गुण खात्रीने येतो. मात्र या गोष्टीत सातत्य आवश्यक आहे.
गरम दुधात दोन चमचे मध घेऊन झोपावे
गाईचे तूप व जायफळाची पावडर हातापायांना व कपाळावर घासल्याने उष्णता कमी होऊन शांत झोप लागते.
डोके व पाय यांना खोबरेल तेल किंवा गाईचे तूप काशाच्या वाटीने घासावे.
रोज रात्री खुरासनी ओव्याची पावडर चिमुटभर तोंडात टाकून त्यावर भांडेभर पाणी प्यावे त्यामुळे झोप चांगली येते. खुरासनी ओवा काष्टौपधीच्या दुकानात मिळतो. या उपायाने मानेतील आखडलेल्या शिराही मोकळ्या होतात.
शुद्ध माक्याचे ब्राह्मी तेल झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावे
साजूक लोणकडे तूप चमच्यात घेऊन गरम करून झोपताना ३/४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे.
नैवेद्याच्या अर्धी वाटी दुधात जेष्टमध उगाळून गंधासारखे दाट करावे व त्यात तितकेच खोबरेल तेल घालून हे तयार केलेले तेल झोपण्यापूर्वी डोक्यास लावावे.
दुधी भोपळ्याचा रस तीळाच्या तेलात मिसळून डोक्यास मसाज करावा.
सॅलड पत्यांचा रस गुलाब तेलात म्सळून कपाळावर चोळल्यास शांत व चांगली झोप येते.
भरपूर दही खावे व डोक्यात चोळावे. ......रात्री मात्र दही खाऊ नये.
दिर्घ श्वसन करावे त्यामुळे देखिल झोप शांत लागते.
वरील सर्व कारणांमुळे झोप लागेल अर्थात वरील सर्व उपाय सर्व प्रकारच्या तब्बेतीच्या लोकांना उपयोगी पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक औषधाचे परिणाम प्रकृति-प्रकृतीनुसार बदलत असतात. अर्थात वरील पैकी कोणत्यातरी एकाद् दोन उपायांनी गुण निश्चित येईल.
झोप न येणे हे जसे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तसेच झोप जास्त येणे हे देखिल अपायकारक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 20, 2017
वायस पुराण ही एक फॅन्टसी आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि वृद्धाश्रमात खितपत पडलेल्या सर्वांना ही फॅन्टसी समर्पित करीत आहे.
November 17, 2023
मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात.
July 17, 2017
कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही.
September 22, 2017
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत.
दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला.. अगदी महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांचा संहार करणार्या मोरारजी देसाईसारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.
राहूल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांची पलटण यांनी कधीतरी सावरकर काय होते त्याचा अभ्यास केला आहे का? सावरकरांनी ज्या नरकयातना भोगल्या त्या भोगायची कल्पना तरी राहूल गांधी करु शकतात का?
अगदी परवाचेच साधे उदाहरण. राहुल गांधींनी मोठा गाजावाजा करुन मुंबईच्या डम्पींग ग्राऊंडचा दौरा आखला. डम्पींग ग्राऊंडवरच्या दुर्गंधीने त्रासून त्यांनी अक्षरश: पाच मिनिटात त्या ठिकाणाहून पळ काढला. असे हे आमच्या देशाचे “युवराज”. सावरकरांनी अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये उमेदीची वर्षे काढली तिथे आमचे आजचे नेते दोन दिवस तरी राहून दाखवतील का?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी अनेकदा सरकारकडे केली गेली. मात्र राजकीय कारणांसाठी कॉंग्रेस सरकारने त्याचा कधीच विचार केला नाही. भाजप सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली खरेतर पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर भारतरत्न किताब देण्यात कोणतीही इतर औपचारिक शिफारस आवश्यक नसते. त्यामुळे यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न मिळतोय का ते बघायचे.
-- मराठीसृष्टी टिम
July 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti