(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • डभईची लढाई (भाग एक)

    बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे.

  • जोसेफ सिरिल बमफोर्ड – जेसीबीचा निर्माता

    ‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं.. साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. इंजिनाचं नाव होतं जेसीबी..हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याची अद्याक्षरं होतं.. शोधकर्त्याचं नाव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’.

  • मुंबई ते दिब्रुगड (आसाम): प्रवास राजधानी एक्सप्रेसचा

    भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक वेळ त्यावर अवलंबून होती; सिमेंटचे स्लीपर्स हे आता आलेले आहेत. अशा या आसाममधील सर्वांत शेवटचं स्टेशन दिब्रुगड. इथून अरुणाचलमध्ये बस, मोटार वा नदीमधून मोटरबोटीने शिरावं लागतं. त्याकरता 'इनर लाईन परमिट' घ्यावं लागतं.

    अरुणाचल प्रदेशाची संपूर्ण माहिती गोळा करत आम्ही आठ जणांनी रेल्वेनं दिब्रुगडपर्यंत जाण्याचं ठरविलं. हा प्रवास आरामात करायचा व जलद गाड्या पकडायच्या असंही ठरलं. मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते दिब्रुगड अशा दोन राजधानी एक्सप्रेसनी प्रवासनियोजन केलं. मुंबई-दिल्ली १७ तास, ६ तास दिल्ली स्टेशनवर थांबणं, असं करत दिल्ली ते दिब्रुगड ४० तास, असा हा एकूण प्रवास काळ ६३ तासांचा होता.

    भारतात राजधानी एक्सप्रेसचं युग साधारण ३५ ते ४० वर्षांपूर्वी सुरू झालं. प्रथम मुंबई-दिल्ली व कलकत्ता-दिल्ली या दोन गाड्या सुरू झाल्या आणि हळूहळू प्रत्येक राज्याच्या राजधानीतून एक वा दोन गाड्या दिल्लीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. या गाड्या सुरू झाल्या तेव्हा त्याबाबत अनेक उलट-सुलट मतं पेपरमध्ये येत होती, पण आता राजधानी एक्सप्रेस गाड्या ह्या भारतीय रेल्वेवरील सर्वांत मानाच्या व कायम मागणी असलेल्या गाड्या आहेत. नवी दिल्ली स्टेशनमध्ये लालचुटूक व पिवळसर रंगाच्या डब्यांच्या गाड्यांची सतत ये-जा चालू असते. संपूर्ण वातानुकूलित (ए.सी.) गाडीला जनरेटर्स. चहा-नाश्ता, लज्जतदार जेवण यांचा समावेश तिकिटातच असल्यामुळे प्रत्येक प्रवासी हा आनंद मनसोक्त लुटत असतो. मुंबई-दिल्ली राजधानी ५०० ते ६०० कि.मी. अंतर न थांबता धावत असते. या मार्गावर आता जर्मनीत बांधलेले डबे आहेत. त्यांत काही सोयी जास्त आहेत, पण भारतात बांधलेले डबेच लोकांच्या जास्त पसंतीस येतात.

    या गाडीचा पहिल्या वर्गाचा प्रवास म्हणजे जेवणा-खाण्याची चंगळच असते. घडीची टेबलं मांडून खाण्याच्या पदार्थांचा मारा रेल्वे कर्मचारी तत्परतेने व प्रेमाने करत असतात. झोपण्याचे बर्थ अगदी आलिशान आहेत. धांदलीत विमानाने प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास सुखद अनुभवाचा आहे.

    राजधानी एक्सप्रेसने दिल्ली ते दिब्रुगड प्रवास ४० तासांचा, दोन रात्रींचा!

    दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, अशी राज्ये ओलांडत जाताना प्रत्येक राज्याची विविधता पाहता येते. या गाडीतील प्रवासीसुद्धा वेगवेगळ्या ढंगांचे! त्यांच्या निरनिराळ्या भाषा प्रवासभर कानांवर पडत असतात. लखनौ, मुगलसराई, बरौनी, न्यु जलपईगुरी, गौहत्ती, अशा भव्य स्टेशनांवर तिला थांबे आहेत. गौहत्ती येण्याअगोदर विशाल ब्रह्मपुत्रेवरील १।। कि.मी. लांबीचा अतिभव्य -कम-मोटाररोड ब्रिज पाहून आपण अवाकच होतो. ब्रिजवरून जाताना गाडीच्या कानांत घुमणाऱ्या कर्कश आवाजाची लय, खोलवर दिसणारं नदीचं संथ पात्र, हे सर्व व्हिडिओमध्ये घेण्याकरता आम्ही दोघे मित्र एकमेकांना घट्ट पकडून दारात उभं राहून शूटिंग केलं होतं. तो एक अविस्मरणीयच अनुभव होता.

    गौहत्ती ते दिब्रुगड हा संपूर्ण रात्रभराचा प्रवास. यावेळी गाडी अतिशय कमी वेगात जाते. हा संपूर्ण प्रदेश अशांत आहे आणि त्यात एकेरी मार्ग (सिंगल लाईन)! हा प्रवास करून पहाटे ५ वाजता न्युतीनसुखिया स्टेशनवरील एका छोट्या स्टॉलवरच्या गरम वाफाळलेल्या चहाची लज्जत औरच होती. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार भातशेती, मध्यात माशांच्या पैदाशीकरता तयार केलेली छोटी तळी, बांबूंवर उभारलेल्या छोट्या झोपड्या, मधून जाणाऱ्या लालचुटुक मातकट पाऊलवाटा, क्षितिजाला भिडलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, मध्येच भुरभुरणारा पाऊस, काही रस्त्यांच्या कडेनं झालेला चिखलाचा रबाडा. निसर्गाचं असं वेगळं, अविस्मरणीय दृश्य पाहत ३९०० कि.मी.चा प्रवास दिब्रुगडमध्ये पुरा झाला. हा प्रवास पूर्ण केला, की भारताच्या दुसऱ्या टोकाला पावलं लागल्याचा आनंद ओसंडून वाहतो. केवढा पसरलेला भारत आणि त्याच्या कानाकोपऱ्यांत पोहचणारी भारतीय रेल्वे! ६५ तासांच्या प्रवासाचा शिणवटा अजिबात जाणवत नाही. पावलं समाधानानं विशाल ब्रह्मपुत्रेच्या काठाकडे वळतात.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

    हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.' 'गँग' ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता 'ट्रॅकमन' व 'खलाशी' म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे २४ तासासाठीचे वॉचमन असतात. वेळप्रसंगी मार्गावर कोणताही धोका आढळल्यास जिवावर उदार होऊन भरधाव येणाऱ्या गाडीला दूरवरून इशारा देत हे कर्मचारी ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर सुमारे ८ ते १० किलो वजनाची विविध हत्यारं असतात. ३५ किलो एवढं वजन १०० मीटर अंतरापर्यंत २ मिनिटांत एका फेरीत, तशीच वेळ पडल्यास अवजारांसकट १५०० मीटर अंतर ७ मिनिटांमध्ये धावून गाठण्याची क्षमता असेल, तरच या कामाकरता त्यांची निवड केली जाते. ट्रॅकमनना त्यांची सर्व कामं दोन समांतर मार्गांच्या मध्यात उभं राहून तळपत्या उन्हात किंवा गारठून टाकणाऱ्या थंडीत वा कोसळणाऱ्या पावसात करावी लागतात.

    रुळांच्या दोन मार्गामध्ये उभं राहण्यास जेमतेमच जागा असल्यानं बाजूनं वेगात जाणाऱ्या गाडीचा धोका सततच असतो. मुंबई शहरात तर दर मिनिटाला लोकल जात असतात. त्यामुळे अनेक वेळा धक्का लागून हे ट्रॅकमन गंभीररीत्या जखमी होतात वा मरणही पावतात. गेल्या तीन वर्षांत मुंबई व आसपासच्या ट्रॅकवर जवळजवळ ३० लाईनमन बळी पडले. त्यातही प्रवासी गाडी वा मालगाडीपासूनचा धोका जास्तच असतो. लष्करातील जवान ज्याप्रमाणे सरहद्दीवर संरक्षण करताना बळी जातात, तसेच हे ट्रॅकमन आपली सर्वांची जीवनरेषा बिनात्रासाची व्हावी म्हणून आपला जीव गमावतात. खरं पाहता,

    हे रेल्वेचे शूर सैनिक असून, त्यांच्या शौर्याची गाणी कधीच गायली जात नाहीत ही शोकांतिका आहे.

    दिल्लीजवळील मांडवली या छोट्या रेल्वेस्टेशनजवळील भोला नावाच्या लाईनमननं त्यांच्या रोजच्या कामाचा दिनक्रम कसा असतो ते लिहिलं आहे. हा दिनक्रम त्याच्याच शब्दांत वाचण्यासारखा आहे. त्यानं जे लिहिलं आहे त्याचं सारं असं आहे: वयाच्या १७ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यातून रेल्वे ट्रॅकमनच्या कामावर त्याची निवड झाली. आज वयाच्या ५२व्या वर्षांपर्यंत, म्हणजे ३५ वर्षे तो हे काम मनापासून करीत आहे. रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (यामध्ये २ तासांची सुटी) तो कामावर असतो. रोज अंदाजे १० ते १२ किलोमीटर चालावं लागतं. रोजचा हाच मार्ग असल्यानं लाईनची इंचाइंचाची त्याला माहिती आहे व त्यामुळे काम चोख बजावलं जातं. या ट्रॅकमनच्यावरची जागा 'की' मनची आहे, परंतु ते पद मिळविण्याची भोलाची इच्छा नाही; कारण तिथे जबाबदारी जास्त असते. कधी अपघात झाला तर संपूर्णपणे त्या पदावरील व्यक्तीला जबाबदार धरलं जातं. रेल्वेलाईनला लागूनच त्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या असून, तिथे नातवंडांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. महिना १५ ते १८ हजार रुपये असा पगार असल्यानं भोला त्यावर खूश आहे. 'आमच्याशिवाय रेल्वेगाड्या चालणं कठीण आहे, पण आमच्या जागी दुसरे कोणी केव्हाही मिळू शकतात' याची सतत जाणीव असल्यानं रेल्वेच्या इतर १३ लाख कामगारांप्रमाणे संपाचे विचार डोक्यात आणता येत नाहीत. खरं तर रोजच आम्ही मरणाच्या वाटेवरून चालत असतो, परंतु शेवटी माझं नशीब देवाच्याच हातांत आहे. माझी देवावर अढळ श्रद्धा आहे. घरात वा कामावर सतत २४ तास इंजिनचे कर्कश्श आवाज कानांवर पडत असतात, तेच आमचं जीवन आहे.'

    प्रवाशांचा प्रवास निर्धोक ठेवणारे हे गँगमन नावाचे रेल्वेचे जणू शूर सैनिकच! त्यांच्या तत्परतेला आणि कष्टांना प्रत्येक प्रवासादरम्यान मनोमन सलाम करायला हवा.

    डॉ. अविनाश वैद्य

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १ – वटवृक्ष

    वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.

  • डभईची लढाई (भाग दोन)

    बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली.

  • दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

    शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत.

  • मुंबई-डेहराडून एक्सप्रेस

    भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात.

    मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व आहे. ही गाडी १७०० कि.मी.चं अंतर ४६ तासांत आपल्या धीम्या गतीनं पार करते. या मार्गावरील सर्वांत महत्त्वाचं धार्मिक स्थान हरिद्वार. त्यामुळे या गाडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गाडी दिवसा पॅसेंजर आणि रात्री एक्सप्रेस असते. या गाडीच्या प्रवासात जितकी विविधता अनुभवता येते, तेवढी अन्यत्र कुठेच अनुभवता येत नाही.

    जुन्या दिल्ली स्टेशनवर ही गाडी चांगली तासभर थांबते, प्लॅटफॉर्मवर मोठ्या कढईत गरमागरम तळल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या व बरोबर झमझमित बटाट्याचा रस्सा! आरामात उभं राहून खात बसावं. गाडी सुटण्याची घाई नसतेच. एकदा मी एकटाच प्रवास करत होतो. गाडीकडे पाठ करून आरामात मस्तपणे पुरी रश्श्याचा फडशा पाडत होतो, आणि मागे वळून पाहतो तो डेहराडून गाडी नाहीशी झालेली व रुळांवर कोणतीच गाडी नव्हती. ते रिकामे रूळ पाहून माझी गाळणच उडाली. कावराबावरा झालो. सर्व सामान आणि तिकिटं गाडीतच. खाण्यापायी गाडी घालविली. मी पुढे पळण्यास सुरुवात करणार, तोच पुरी तळणारा माणूस देवदूतासारखा शांतपणे म्हणाला, 'घबराना नही, साहब. यहाँके प्लॅटफॉर्म इतनेऽ लंबे होते है! आपका डब्बा आगे खडा है। आप आरामसे नाश्ता कर लेना।' जिवात जीव आला, पुढे बरंच अंतर चालत गेल्यावर माझा प्रिय डबा माझ्या प्रतीक्षेत उभा होता, संपूर्ण डब्यात मी एकमेव प्रवासी होतो. असा आनंद क्वचितच आणि तोही बहुधा डेहराडून गाडीच देत असेल.

    दिल्ली सुटल्यावर मेरठ जवळच्या एका लहान स्टेशनवर अनेक दूधवाले आपले मोठाले कडीवाले अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन उभे असायचे आणि या नंतरचं दृश्य तर अफलातून दिसायचं. डब्याच्या दोन्ही बाजूंनी विजेच्या दिव्यांच्या माळा लावाव्या तसे दिसणारे खिडकीच्या बाहेर लटकणारे सर्व कॅन आणि दूधवाले 'आत' आरामात बसलेले! याचा उत्तम फोटो एकदा नॅशनल जिओग्रॉफिक मासिकात आलेला होता. या मार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन स्टेशन आहे सहाणपूर. येथे गाडी एका बाजूनं आत शिरते व बाहेर पडताना इंजिन विरुद्ध बाजूस लागतं, त्यामुळे गाडी दुसऱ्या मार्गाने बाहेर पडते. प्रथम प्रवास करताना मी चक्रावूनच गेलो. असाच प्रकार पुढे गजरोला स्टेशनशी होतो. ह्याचं कारण, गंगा नदीच्या अनेक उपप्रवाहांनी इथली जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे तो भुसभुशीत परिसर टाळून हे रेल्वेमार्ग भक्कम जमिनीवरून टाकलेले आहेत. ही गाडी या भागात आपल्या लोकलसारखी असल्यामुळे मधून मधून अनेक प्रवाशांची चढ-उतार चालू असते. त्यांची गडबड व डब्याभोवती कचो-या, ब्रेड, भजी, विकणारे विक्रेते. या सर्व माहौलाला एक लय आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंचा प्रदेश हिरवागार गहू, तांदूळ, कडधान्य यांनी सजलेला असतो. शेती, ऊसाचे मळे, ट्रॅक्टर्स, गाई-बैल, विटांची छोटी घरं, मध्येच पाण्याचे छोटे प्रवाह, या सर्वांतून या भागाची नैसर्गिक सुबत्ता प्रतीत होते.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • तिकीट तपासनीस (तिकीट चेकर)

    रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.

    प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.

    या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:

    १. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.

    २. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.

    ३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.

    ४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.

    ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.

    ५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.

    ६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.

    ७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.

    ८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.

    ९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.

    १०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.

    ११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.

    १२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.

    लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.

    बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.

    मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.

    डॉ. अविनाश वैद्य

  • गुरुतत्त्वाची सेवा अखंड घडत राहो! (संपादकीय)

    नामस्मरण” म्हणजे फक्त मुखाने नाम घेणे नव्हे तर त्या नामईश्वराला अभिप्रेत असलेले कर्म करीत जीवन जगावे म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख न देता सत्कर्म करीत जीवन जगणे हेच नामाशी अनुसंधान साधणे आहे.