(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – २

    नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
    काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥

    नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर.

    आई अन्नपूर्णा अशा अनेक अत्यंत सुंदर रत्नांनी बनविलेली आभूषणे धारण करते म्हणून तिला नानारत्नविचित्रभूषणकरी असे म्हटले आहे.

    हेमाम्बराडम्बरी- हेम म्हणजे सोने. अंबर म्हणजे वस्त्र. आडंबरी म्हणजे झाकलेली. सोनेरी जरकाम केलेले वस्त्र धारण केलेली.

    मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी- आई अन्नपूर्णेच्या विश्वक्षुधाशांतीकारक स्तनकुंभांच्या वर तथा मध्यभागात, मुक्ताहार अर्थात मोत्याच्या माळा रुळत असतात.

    काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे- काश्मीरागरु म्हणजे काश्मीर प्रांतात सापडणारे आगरू नावाचे काळ्या रंगाचे विशेष चंदन. त्यासोबत काश्मिरातील केशर आणि हिमालयाच्या पायथ्याशी मिळणारी कस्तुरी. यांच्या उटीच्या सुवासाने अंग आकर्षक असणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी - हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्णे ! मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      February 28, 2020


  • दातासंबंधीचे समज-गैरसमज

    दातासंबंधीचे जे समज-गैरसमज दातांच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून बऱ्याचदा आपण या समज-गैरसमजामुळे परावृत्त होतात. दातांच्या बाबतीतला सर्वात लोकप्रिय गैरसमज जर कुठला असेल तर दात काढल्यानंतर नजर कमी होणे किंवा डोळ्यांची बघण्याची क्षमता कमी होणे हा होय. आणि या बाबतीत लहानथोरांपासून सर्व जनमाणसांत एकवाक्यता आहे. खरं म्हणजे दात काढल्यानंतर डोळ्यांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याला शास्त्रीय आधार आहे.

    दाताला आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तसेच संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. हा गैरसमज पसरण्याला काही कारणे आहेत. बऱ्याचदा दातांची समस्या आपण प्रौढ वा चाळिशीत असताना होते. (खरं म्हणजे चाळिशीत सर्वच अवयवांची थोडय़ाफार प्रमाणात कुरकुर चालू होते.) त्यातच दात काढल्यानंतर आपल्या मनात असलेल्या गैरसमजामुळे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला जातो. या चाळिशीत इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचीही क्षमता थोडीफार कमी झालेली असतेच (कदाचित यामुळेच चष्म्याला ‘चाळिशी’ असंही काही ठिकाणी म्हणतात.) त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्मा लावायला सांगताच आपण दातांचा काढण्याचा व डोळ्यांचा खराब होण्याचा संबंध लावतो. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा हे खरे नाही. अगदी लाखात एखादा पेशंट जो वरच्या दातांवर प्रचंड सूज येऊन ती डोळ्यापर्यंत पोहचेपर्यंत जर डॉक्टरांकडे गेला नाही किंवा त्याचे इन्फेक्शन अनियंत्रित होऊन डोळ्यापर्यंत गेले तरच डोळ्यांना इजा होऊ शकते. परंतु हे प्रमाण लाखात एखादा वा त्याहूनही कमी असते. कारण हल्ली सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.

    दातांबद्दलचा अजून एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यानंतर दात हलतात. हा गैरसमज पसरण्यामागची पाश्र्वभूमी आपण समजून घेऊ या. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दात साफ करण्यासाठी जातो किंवा डेंटिस्ट आपल्याला दात साफ करण्याचा सल्ला देतात तेव्हा दातांमध्ये किंवा हिरडय़ांमध्ये अन्नकण अडकून त्याचा ‘प्लाक’ (एक प्रकारचा छोटासा चिवट दगडासारखा घट्ट पदार्थ) तयार झालेला असतो व तो दातांच्या फटीमध्ये व हिरडी व दात यांमध्ये घट्ट चिकटलेला असतो. त्यामुळे हिरडय़ांना इन्फेक्शन होऊन हिरडय़ांतून/दातांतून रक्त वाहते वा मुखदरुगधीचा त्रास संभवतो. ज्यावेळी डेंटिस्ट आपले दात साफ करतो त्यावेळी हा ‘प्लाक’ काढणे गरजेचे असते. हा प्लाक काढल्यानंतर दात व हिरडी येथे एक प्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ आपल्याला दात थोडेसे हलल्यासारखे वाटू शकतात. परंतु ही तात्पुरती जाणीव असते. काही तासांत ती जागा भरून येऊन हिरडी व दात एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. उलट दातांच्या व हिरडय़ांच्या आरोग्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केल्याने त्यांचे आयुष्य वाढतेच.

    प्लाक काढल्यानंतर दातांच्या व हिरडय़ांमध्ये पोकळी भरून येणाऱ्या काळात अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत. कारण या काळात दातांच्या व हिरडय़ांच्या मधला भाग संवेदनशील असतो वा जेथे चेतातंतू जास्त उद्दीपित होतात तेथे थंड व गरम पदार्थाने काही काळ दाताला ठणके बसू शकतात. परंतु हाही तात्पुरता बदल असून काही काळाने त्रास जाणवत नाही. शिवाय यात एक फायदा असाही आहे की डेंटिस्टला दात साफ करताना आपला एखादा दात जर किडण्यास सुरुवात झाली असेल तर तो प्राथमिक अवस्थेत ध्यानात येऊन कमी खर्चात व कमी वेळेत तो वाचण्याची शक्यताही असते.

    दात साफ करताना एक भीती मनात घर करून असते ती म्हणजे आपले दात झिजतील का किंवा साफ केल्याने पातळ होतील का? हा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे डेंटिस्ट दात अल्ट्रासोनिक स्केलरसारख्या मशीनने साफ करतात.

    शिवाय दात साफ केल्यानंतर काही वेळा थंड पाणी व गरम चहा पिताना दात सळसळतात. यातील पहिले कारण प्रथम शोधू. अल्ट्रासोनिक स्केलर हे जरी मशीन असले तरी ते फक्त व्हायब्रेशन या तत्त्वावर काय करते. त्यात दात घासण्याच्या किंवा दात कटिंग करण्याच्या उपकरणाचा समावेश नसतो. फक्त व्हायब्रेशन होऊन दातांमधला फ्लक किंवा डाग काढले जातात. हे अतिशय नाजूक व चांगले मशीन असून यामुळे दातांची व हिरडय़ांची कुठलीही झीज होत नाही. मात्र दुसरे कारण काही प्रमाणात खरे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 11, 2017


  • परमेश्वराचे अस्तित्व

    …. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

      June 22, 2020


  • कोकण प्रांतातील औद्योगिक वाढ

    हवाई वाहतुकीसाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळाबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ, रत्नागिरी येथील थोड्याच कालावधीत सुरू होणारा विमानतळ व सिंधुदुर्ग येथील चिपी-परुळे विमानतळ जोडले जातील. संपूर्ण भारतात ही हवाई वाहतूक आणि सागरमाला उपलब्ध होणार येत्या काही वर्षात! याचाच अर्थ माल वाहतूक त्वरेने भारतभर किंवा जगभर होऊन भारतात तयार होणाऱ्या नाशिवंत मालाला विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होणार!

      February 14, 2023


  • जानेवारी २७ : डॅनिएल ल्युका वेटोरी

    जगातील सर्वोत्तम डावखुरा फिरकीपटू असलेल्या डॅनिएल वेटोरीचा जन्म.

      January 27, 2016


  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ९

    जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही.
    प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते.

    भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते ती निसर्गाच्या विरोधात नसते, उलट हे निसर्ग पूरक काम असते. अन्नधान्य फळं मिळवण्यासाठी लावलेली झाडे वगैरे आपल्याला प्राणवायुच पुरवतात. कार्बन शोषून घेतात. वातावरणाचे रक्षण करीत असतात. निसर्गाला पूरक कार्य चाललेले असते.

    मालकाच्या विरोधात जाऊन केलेले काम आणि मालकाचा फायदा होईल असे केलेले काम. यात मालकाला कोणते काम अधिक आवडेल ?

    पोट भरण्यासाठी शाकाहार हा स्वस्त आणि मस्त होतो. आज हाॅटेलमधे मिळणाऱ्या कोणत्याही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या डिश पहा. जगात कुठेही जाऊन शोधा, मांसाहारी डिश महाग आहेत.
    असे का ?
    त्यांचे निर्माणमूल्य जास्ती आहे म्हणून !
    ज्या वस्तू कोणाचे नुकसान न करता तयार होतात, त्या स्वस्त बनतात.

    एक परिक्षण असे सांगते की, एक किलो मांस तयार करण्यासाठी किमान सत्तर किलो चारा वा खाद्य पशुंना खावे लागते. हे खाद्य ज्या जमिनीवर तयार केले जाते, त्याच जमिनीवर जर धान्य उत्पादन केले गेले तर दरदिवशी किमान सत्तर जणांचे एका वेळेस पुरेल एवढे भोजन तयार होऊ शकते.

    मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे परावलंबी रहावे लागते. निसर्गदत्त मांस देणारे प्राणी कमी होत आले आणि खायला दुसरे अन्न निसर्ग देत नाही, अशा विपरीत स्थितीमधे माणसाला कृत्रिमपणे प्राण्यांची पैदास करावी लागली. निसर्गाच्या विरोधात जाऊन, निसर्गावरच त्यांच्या पोषणाचा अनावश्यक भार टाकून, कृत्रिमपणे तयार केलेल्या प्राण्यांचे मांस माणसाचे पोषण कसे बरे करील ? आज जे मांस उत्पादन कारखाने दिसत आहेत ती केवळ पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे. पण यातून कधीही शांती मिळत नाही. म्हणून ही शांती अनुभवण्यासाठी भारतामधे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे.

    मांसाहार करणाऱ्या प्रदेशात शांती कुठुन मिळणार ? आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कुठुन येणार ?
    त्यांची सुरू असते फक्त धडपड,
    जगण्यासाठी.
    सतत अस्वस्थपणे....
    केवळ स्वतः जगण्यासाठी !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    9.10.2016

      October 9, 2016


  • माओवाद्यांच्या तावडीतुन सर्वसामान्य स्त्रियांना सोडवण्याची गरज

    लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये माओवाद्यांविरुद्ध एक अक्षर लिहीले गेले नव्हते. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माओवाद्यांना विरोध हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय बनला पाहिजे.

      June 29, 2019


  • सौंदर्याचा साक्षात्कार

    आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं.

      February 28, 2022


  • नोटाबंदीचे फायदे

    नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .

      December 5, 2016


  • स्वागत मोनोरेलचे !

    मुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का? तिचे मनोगत…!

      July 13, 2014