(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग १

    भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून.....


    मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं !
    कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !!
    अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं !
    नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!!

    भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दकळा साकारतात,

    मुदा करात्तमोदक- मुदा अर्थात आनंदाने. ज्यांनी आनंदाने हाती मोदक धारण केला आहे असे. आतून, आपला आपल्याला होणारा आनंद म्हणजे मोद. भगवान स्वत: त्या आनंदाने युक्त आहेत आणि भक्तांच्या जीवनात तो आनंद देण्यासाठी त्यांनी हातात मोदक घेतला आहे. मोद म्हणजे आनंद , तो निर्माण करतो तो मोद-क.
    सदाविमुक्तिसाधक- हा आनंद प्राप्त होणे हेच मुक्‍तीचे स्वरूप. साधकांना सदैव मुक्ती प्रदान करणारा आहे माझा मोरया.

    कलाधरावतंसक - कलाधर म्हणजे चंद्र. त्याच्या विविध कला असतात. ती चंद्रकला मस्तकावर धारण करून सौंदर्यपूर्ण असणारे ते कलाधरावतंसक.

    विलासिलोकरञ्जक- स्वर्गाला विलास लोक असे म्हणतात. तेथे देवता तथा स्वर्गीय जीव विविध आनंदांचा चा उपयोग घेत विलास करीत असतात. त्या सगळ्यांना आनंद प्रदान करणारे मोरया विलासिलोकरञ्जक संबोधिले जातात.

    अनायक-एकनायक- त्यांच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही म्हणून त्यांना म्हणतात अनायक. तसेच ते एकटेच सगळ्या विश्वाचे नायक असल्याने त्यांना म्हणतात एकनायक .

    विनाशितेभदैत्यक- इभ म्हणजे हत्ती. हा सर्वाधिक बलशाली जीव. तसे जे भयंकर दैत्य ते इभदैत्य.

    श्री मुदगल पुराणात आपल्याच आत असणाऱ्या काम, क्रोधादिक षट् विकारांना आणि ममत्व तथा अहंकार यांना राक्षस रूपात वर्णिले आहे. यासर्व महाभयानक राक्षसांचा विनाश करणारे श्री गणेश विनाशितेभदैत्यक असतात.

    नताशुभाशुनाशक- नत अर्थात शरण आलेल्यांचे अशुभ अर्थात दुःख, दैन्य, दारिद्र्य, पीडा, व्यथा इ. आशु म्हणजे तत्काल नष्ट करणारे भगवान गणेश भक्तांसाठी नताशुभाशुनाशक आहेत असे भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत.

    भगवान श्री गणेशांच्या याच स्वरूपाने आनंदित होऊन ते म्हणतात- नमामि तं विनायकम् !

    भगवान गणेशांवर कोणाचीही नायकत्व चालत नाही त्यामुळे त्यांना वि-नायक म्हणतात. तसेच ते एकटेच सगळ्यांचे विशेष नायक असल्यानेही त्यांना वि-नायक म्हणतात.

    अशा विनायक भगवान गणेशांना मी वंदन करतो.!! १!!

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      January 1, 2020


  • जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

    महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

    ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
    मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
    याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

    त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'

    “ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

    "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
    वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,

    "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
    संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

    " महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
    वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
    "महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
    "नक्कीच, ऐक तर,"
    वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

    "पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

    संजयाने मानेने नकार दर्शवला.
    "कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"

    संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
    "तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"

    वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
    "भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."

    संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"

    वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
    " याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
    तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
    मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."

    संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

    "वा!"
    वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"

    "कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'

    संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

    पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!

      August 6, 2017


  • बाळगुटी एक वरदान: भाग ९- वावडिंग

    वावडिंग एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. वावडिंगामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील विषारी द्रव्ये कमी होतात आणि पोटातील कृमींचा नाश होतो. दुसऱ्या झाडाभोवत विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.

      January 29, 2026


  • अंतर्वक्र आरसे

    सगळेच आरसे गुळगुळीत असले तरी सपाट असतीलच असं नाही. काही आरसे गोलाकार असतात. किरणांना आल्या दिशेनं परत पाठवणारे त्यांचे पृष्ठभाग एखाद्या गोलाच्या कापलेल्या भागासारखे असतात.

      June 24, 2011


  • सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना

    भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.

      January 3, 2019


  • कर्तव्यांचे अधिवेशन..

    कर्तव्यांचे अधिवेशन..

    कोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे.

      September 15, 2020


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्यछंदी

    प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.

      October 31, 2022


  • दातांच्या स्वच्छतेसाठी ‘टूथपेस्ट’

    तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट, सजल अल्युमिना, पोटॅशियम टाटरेिट, बेंटोनाइट इत्यादी न विरघळणारे अनेक पदार्थ यासाठी वापरतात. या पदार्थांमुळे बऱ्याच वेळा टूथपेस्टला आम्लता किंवा क्षारता (अल्कलिनिटी) येते. टूथपेस्ट आम्लधर्मी असेल, तर तोंडाला जास्त लाळ सुटते व क्षारधर्मी असेल तर अन्नकण कुजून तयार झालेल्या आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया होते. उदा. कॅल्शियम फॉस्फेटने आम्लता व पोटॅशियम टाटरिटाने क्षारता येते.

    टूथपेस्ट दातांच्या फटींमध्ये पोहचावी म्हणून त्यात प्रक्षालकाचा (मळलेला पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापर करतात. सोडियम लॉरिल सल्फेटचा वापर प्रक्षालक म्हणून केला जातो. कॅल्शियम व मॅग्नेशियम परबोरेट किंवा मॅग्नेशियम पेरॉक्साइड यांचाही अंतर्भाव टूथपेस्टमध्ये असतो. या रासायनिक पदार्थांचे अपघटन होऊन ऑक्सिजन बाहेर पडतो आणि त्यामुळे जंतुनाश होतो आणि तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

    याशिवाय मेंथॉल, थायमॉल, यूजेनॉल, मिथिल सॅलिसीलेट इ. सुगंधी द्रव्ये टूथपेस्टमध्ये घालतात. त्यामुळे उत्साहवर्धक स्वाद निर्माण होतो व टूथपेस्टमध्ये एखादे उग्र वासाचे द्रव्य असल्यास त्याचा वास झाकला जातो. ही द्रव्ये काही प्रमाणात जंतुनाशकही आहेत.

    काही टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा समावेश असतो. फ्लोराईडमुळे दातात कॅव्हिटी (कीड लागण्यास) होण्यास प्रतिबंध होतो. लेमन, मिंट अशा वेगवेगळ्या स्वादामध्ये टूथपेस्ट उपलब्ध असतात. बहुतेक वेळा मिंट फ्लेवरचा उपयोग मुख्यतः केलेला असतो. मुलांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॉबेरी, बबलगम या फ्लेवरचा उपयोग करतात. हे फ्लेवर आइसोअमाईल अॅसिटेट आणि इथाईल, मिथाईल, फिनाईल, ग्लाइसिडेट या रसायनांमुळे येतात. टूथपेस्टला असणारा गोडवा सोडियम सॅकरीन किंवा सॉरबिटॉल सॅकरीनमुळे येतो. मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडचा वापर जिवाणूरोधक म्हणून केला जातो.

      May 6, 2023


  • नावडतीची लेकरे!

    सरकारकृपेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याच प्रमाणात उत्पन्न कमी झाले आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. आता सरकारने शेती फायद्याची कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने तसे लक्ष दिले तर शेतीसोबतच इतर अनेक प्रश्न आपोआप सुटतील.

      July 5, 2009


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ९

    या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत.

      January 21, 2020