वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्मार्टफोन म्हणजे हातातला पर्सनल कॉम्प्यूटर होय. या स्मार्टफोनचे मूळ हे टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान यांच्या एकमेकांशी संलग्न होण्यात दडलेले आहे. १९७३ साली टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान एकमेकांजवळ येऊ लागले आणि १९९४ मध्ये सेलफोन बाजारात आला.
प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक ॲसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे दारू असते असेच मानले जात असे. त्यामुळे काही लोक लपूनछपून नीरा पीत असत.
मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं?
हिरा हे कार्बन या मूलद्रव्याचं, स्फटिकाच्या स्वरूपातलं एक रूप आहे. हिऱ्यांना रंग हे त्या स्फटिकांतील, अपद्रव्यांमुळे प्राप्त होतात. उदाहरणार्थ, निळ्या आणि पिवळ्या हिऱ्यांना त्यांचे रंग हे, त्यांतील बोरॉन, नायट्रोजन यासारख्या अपद्रव्यांमुळे मिळाले आहेत. मात्र गुलाबी आणि तपकिरी हिऱ्यांना त्यांचे रंग अपद्रव्यांमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे प्राप्त झाले आहेत.
कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही.
भविष्यातला, पारंपरिक इंधनाच्या अभावी जहाज वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नवी इंजिने तयार केली जात आहेत. यांतली काही इंजिने ही नव्याने विकसित होत असली तरी काही इंजिनांत पूर्वीच्याच तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. अशा या विविध प्रकारच्या आधुनिक इंजिनांचा आणि इंधनांचा हा वेध.
सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला
पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं.
स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti