(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (३) /११

    संस्कृत भाषेला ‘देववाणी’ कां म्हणत याच्या मागचा इतिहास आपण आधीच पाहिला आहे. तिचें वर्चस्व लादण्यासाठी तसें नांव ठेवलें गेलें नाहीं. ‘देव’ या टोळीची (clan) जी भाषा, तिला ‘देववाणी’ म्हणणें हें अगदी स्वाभाविक आहे.

      September 25, 2016


  • स्पेशल एक्स-रे (बेरियम स्वॅलो / एनेमा)

    अन्न, अथवा पाणी गिळताना अडचण येत असल्यास, अन्न वर येत असल्यास, सारखी उचकी लागत असल्यास किंवा आवाजामध्ये झालेला एकदम बदल म्हणजे बेरियम स्वॅलो करण्यास आमंत्रण.

      October 2, 2010


  • प्रकाशन व्यवसायातील स्थित्यंतरे

    पुस्तकाच्या छापील किंमतीवर ७०,८० व (खोटं वाटेल पण) ९०टक्के कमिशनचा हट्ट धरणे, स्वीकृत हस्तलिखीत प्रकाशकाडून हरवले गेल्यास, त्याचे सोयरसुतक न मानता त्याबद्दलची कसलीही भरपाई न देणे, पुस्तक प्रकाशनाचे समारंभ लेखकांला त्यांच्यश खर्चाने करायला लावून, त्याद्वारे आपल्याच प्रकाशन संस्थेची विनाखर्च जाहिरात करणे; अशा कटू अनुभवांना नवलेखकांना सध्या सामोरे जावे लागते.

      April 24, 2022


  • शेतकर्‍यांना दिलासा पीककर्जाचा

    शेतीक्षेत्रातील अनिश्चिततेवर तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पीककर्ज महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पीककर्ज वाटपाचे मोठे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाची रक्कम २० टक्क्यांनी वाढवून मिळणार आहे. याबरोबरच घेतलेले आणखी काही निर्णय शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.

      June 24, 2010


  • फेब्रुवारी ०४ : आर्ची जॅक्सनचे पदार्पणातील शतक

    आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.”

      February 4, 2011


  • गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

    प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले तरी, जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने व्यावसायिक स्वरूप देणे आवश्यक आहे.

    विज्ञानाच्या प्रगतीबरोबर आजारांचेही प्रमाण वाढले, त्यामुळे औषधांची मागणी वाढली. आवश्यकते ऐवढे औषधी-वनस्पतींचे उत्पादन होत नसल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणत काळाबाजार होत आहे. पर्यायाने ग्राहकांची फसवणूक होते. ह्या सर्व बाबींचा विचार केल्यास औषधी-वनस्पतींच्या शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

    औषधी निर्मितीमध्ये जेष्ठमध या वनस्पतीची, भारतातील मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्याने दर वर्षाला दहा ते बारा हजार टन जेष्ठमध आयात करावा लागतो. जेष्ठमधाचे उत्पादन वाढविल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता लाभेल तसेच परकीय चलनही वाचविता येईल. जेष्ठमधासंदर्भात प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पुढील उल्लेख आढळतात -

    १) " यष्टी हिमा गुरुः स्वाव्दी,चक्षुष्या बलवर्णकृत् |
    सुस्रीग्धा शुकला केश्या स् वर्या पित्तानिलास्राजित् ||
    ब्रणशोथविषच्छर्दी तृष्णाग्लानिक्षयापहा | " (भावप्रकाश)

    २) " या वेदना शश्त्रानिपातजाता त्रीव्र शरीरं प्रदुनोतिजन्तोहः |
    घृतेन स शान्ति मुपैति सिक्ता कोष्णेन यष्टीमधुकान्वितेन् || " (सुश्रत)

    असे विविध उल्लेख असलेल्या ह्या वनस्पतीची नवे पुढीलप्रमाणे आहेत -

    कुळनाव - Papilionaceae,

    शास्त्रीय नाव / Latin Name - Glycyrrhiza Glabra Linn,

    संस्कृतनाव - मधुयष्टिका, यष्टीमधु, मधुक, मधुरस

    मराठी नाव - जेष्ठमध, जेष्ठीमध

    हिंदी नाव - मुलेठी, मधुयष्टिका

    English Name - Liquorice root

    पाच ते सात फुट वाढणारे जेष्ठामधाचे वृक्ष बहुवर्षीय असून, दोन ते तीन वर्षे उत्पादण देते. ह्याच्या मुळांचा औषधी निर्मितीत उपयोग होतो, जास्तीत-जास्त वनस्पती विदेशातून आयात केली जाते. ह्या वनस्पतीला उष्ण व समशीतोष्ण हवामान उपयुक्त असते, फेब्रुवारी किवा जुलै महिन्यात जेष्ठमधाची लागवड केली जाते.

    रासायनिक घटक - जेष्ठमधाच्या मुळांमध्ये ग्लेसराईझिन व ग्लीसराईजीक एसिड असते, तसेच सुक्रोज, ग्लुकोज, स्टार्च, वसा, प्रोटीन, डेक्स्ट्रोज, रेझिन, अस्पराईजीन, इस्ट्रोजेन आणि एक उडनशील तेल असते.

    गुणधर्म - वात-पित्तशामक, कंडूघ्न, चर्मरोग नाशक, केश्य, शोथहर, कंठ्य, चक्षुष्य, शुक्रवर्धक, बल्य, ज्वरघ्न, आदी गुणांनी युक्त.

    उपयोग - डोकेदुखी, नेत्रविकार, स्वरभंग, सर्दी, खोकला, अल्सर, घसा व घशाचे रोग, पोटाचेविकार, श्वासनलिका विकार, तृष्णा विकार, हृदयरोग, अपस्मार, दुग्धवर्धन (दुध वाढीसाठी), यकृत विकार, शुक्र वाढीसाठी, हिचकी (उचकी), रक्त वमन, लघवीचे विकार, उन्हाळी, रक्त विकार, प्रदर, रक्ताची कमतरता (अनिमिया), पार्किनसन्स, मज्जातंतू विकार, क्षय, रक्तमुळव्याध, जखम, फोडे फुन्सी अशा विविध आजारांवरील औषधी निर्मितीत जेष्ठमधाचा वापर होतो.

    याशिवाय अन्नपदार्थ, पानमसाला, तंबाखू, चाकलेट व तत्सम पदार्थ तसेच बियर ह्यांना गोडी निर्माण करून स्वादिष्ट बनविण्यासाठी जेष्ठमधाचा वापर होतो.

    अशी बहुउपयोगी असलेले ही वनस्पती शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी वरदान ठरणारी आहे. सावलीत वाळवलेल्या जेष्ठाधाच्या मुळ्या १०० ते १५० रुपये प्रती किलो दराने बाजारात विकल्या जातात, ह्या वनस्पतीचे दर एकरी २० ते २५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते. लागवड करण्यासाठी ' हरियाणा मुलहटी नंबर-१, एम.एच.-१, इसी-२१९५० ह्या जाती उपयुक्त आहेत.

    आयुर्वेदाची अशी अप्रतिम देणगी असलेली ही वनस्पती भारतीय शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरू शकते.

    प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, 'भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत. महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करायोगच ठरेल.

    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

      December 26, 2015


  • सिर्फ खिलौना छीना हैं

    १८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर - बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी " लाजते , पुढे सरते , फिरते " अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा - बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ - उताराचे आहे हो !

    हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि " ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि " तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर - बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० - २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .

    पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .

    एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि " सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं "

    असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर - बाजार आणि " ऐ दिल हैं मुश्किल " या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव " अली " . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !

    तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .

    त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .

    गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .

    पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) " रोने और हँसने के बीचवाला रास्ता " असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर - बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात " . . . . दिल नही टूटा हैं " असं असतेच .

    " असन्गाशी संग , प्राणांशी गाठ " अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर - बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही " पाकिस्तान " असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच " ऐ दिल हैं मुश्किल " अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .

    याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर " अमीर - रईस " , " इजाजत - जसबात " , " मोहोब्बत - आदत " यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं " .

    अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! " फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं " ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .

    हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक - आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर " वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता " हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . " या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )

    नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि " कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते " . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर " रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना " तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " ?

    तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण " एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं " . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचा चक्रव्यूह .

    या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण " मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे " हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .

    पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे " तुझे नसणे मला अजमावत राहते " अशी अनुभूती देणारी .

    कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?

    नसणे की नडण हे तर नाहीच नाही .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की " मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . "

    आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग " ऐ दिल हैं मुश्किल " चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे " अधूरे इश्क का जिक्र " , " प्यार मे जुनून ( वेडेपणा ) " , " दोस्ती मे सुकून ( दिलासा ) " असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . " गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं " हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , " जख्मों के कर्ज अदा नही होते " हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . " तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! " . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !

    तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की " आज जाने की जिद ना करो " . कारण

    " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल - ९८२०२९२३७६
    Email - tilakc@nsdl.co.in

      November 22, 2016


  • देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

    एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!

      November 29, 2017


  • आर एच टी डी’ ते ‘रॉकेट्री’ – तोच धमाल, नैसर्गिक, खोलवर आर एम !

    बाय द वे – शाहरुखचा येथे दुसऱ्यांदा पराभव झालेला दिसला – माधवन कडून ! पहिल्यांदा तो हरला होता “बिल्लू “मधील इरफान खान कडून ! अर्थात हे दोन्ही पराभव त्याच्यासाठी “मिरविण्यासारखे “खचित आहेत. एक पुसटती जखम त्याला “रईस “मध्ये नक्कीच झाली होती -नवाजुद्दीन सिद्दीकी कडून !

      July 16, 2022


  • ड्रॅक्यूलाचे अश्रू

    ड्रॅक्यूलाचे अश्रू

    सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या, व्लाद (तिसरा) या क्रूर लष्करी सरदारावर बेतलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण, या कांदबरीलाही आजच्या रोमानिआची पार्श्वभूमी लाभली आहे आणि तिसरा व्लाद हा स्वतः ‘ड्रॅक्यूल्ये’ या नावानंही ओळखला जायचा.

      September 8, 2023