(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डिसेंबर २६ : शेवटच्या जोडीचे त्रिशतक आणि रोहन कन्हाई

    अखेरच्या गड्यासाठीचे भागीदारीचे विक्रम आणि रोहन कन्हाईचा जन्म

      December 21, 2010


  • मुळाक्षरे आणि आरोग्य

    आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.

    षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं शं षं सं बं भं मं यं रं लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.

    लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.

    सातार्याला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले आणी स्वस्थ झाले

    एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता. डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’

    डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा

    पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!

    आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.

    मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमाणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बर्याचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते

    मूलाधार चक्राची अक्षरे -
    वं, शं, षं, सं

    स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -
    बं, भं, मं, यं ,रं, लं

    मणिपूर चक्राची अक्षरे -
    डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं

    अनाहत चक्राची अक्षरे-
    कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं

    विशुद्ध चक्राची अक्षरे-
    अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः

    अज्ञा चक्राची अक्षरे-
    हं, क्षं

    अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.

    -- अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

    WhatsApp वरील वैद्य सुविनय दामले यांच्या आरोग्यदूत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

      January 27, 2017


  • प्लॅस्टिकचा शोध आणि बोध !

    प्लास्टीकचा आपण आपल्या दैनदिन जीवनात चांगला उपयोग करून घेत आहोत. पण आपला आळस, बेशिस्तपणा, कुठेही, कधीही, केंव्हाही रत्यात, ट्रेनमध्ये गुटका, पान खाऊन थुंकण्याची, समुद्र व नदीत प्लास्टिक कचरा टाकण्याची वाईट सवयी निसर्ग साखळीचा आणि पर्यावरणाचा बिकट प्रश्न निर्माण करीत आहे, त्याला काळिमा लावत आहे.

      January 15, 2018


  • किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

    १)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे,
    ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे.

    २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा.

    ३)अंगावर सुज येण्याची सवय असल्यास बिनसाईचे दही घुसळून लोणी काढावे व त्या ताकामध्ये मिरी,सुंठ,हिंग,लसूण असे पदार्थ घालून ते ताक जर सुजेवर दाबल्याने खड्डा पडत असेल तर त्या व्यक्तिला द्यावे.

    ४)तोंडला रूची नसल्यास जेवताना मध्ये मध्ये फोडणी दिलेली ताकाची कढि प्यावी.

    ताक प्यायचा अतिरेक केल्यास कफ व पित्ताचे आजार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 16, 2017


  • आंगणेवाडीची श्री भराडीदेवी

    मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.

    p-34368-bharadideviश्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.

    देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
    या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.

    मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.

    नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
    साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

    जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.

      March 15, 2017


  • आज कार्तिक शुद्ध एकादशी….!

    आज कार्तिकी एकादशी. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
    हिंदू पंचांग नुसार कार्तिक मासे शुक्लपक्षी येणाऱ्या एकादशीला, म्हणजेच दिवाळीतल्या भाऊबीज सणानंतर बरोबर दहाव्या दिवशी पंढरीच्या विठ्ठल नामे आस्था ठेवून त्याच्याच जयघोषात, उपासांतर्गत प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावयाचा सण म्हणजेच आज ३१ आक्टोबर ला अखंड भारतात साजरी होणारी "कार्तिकी एकादशी" होय.
    खरतर हिंदवी वर्षाच्या प्रत्येक मासी दोन एकादशी येतात.आणि ह्या दोन्ही दिवशी भगवान विष्णू निवासी वैकुंठाचे महाद्वार उघडे असते असे म्हणतात. आणि श्रीविष्णु तर आपले व ह्या सृष्टीचे पालनहार, म्हणूनच कित्येक भक्तजनां कडुन बाराही महिन्यातल्या ह्या दोन्ही दिवशी श्रीविष्णुची आराधना व उपासना करण्याची पध्दत आपल्या हिंदू धर्मात परंपरागते रुजवात आहे.परंतु फक्त आषाढातल्या आणि कार्तिकेतल्या आद्य एकादशीलाच फार महत्व असल्याने, या दोन्ही दिवशी कुणीही आत्मश्रध्देने केलेली श्रीविष्णुची उपासना त्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात.
    ह्या दोन एकादशींचे महत्त्व काय असेल ..? आणि ह्याच दोन दिवशी खासत्वे मध्य व दक्षिण भारतातील कित्येक कित्येक लाखो लोक आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर गांवी येऊनच श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यात धन्यता मानतात. असे का..? काय असेल रहस्य ..??
    ऋग्वेदात तर असे लिहिलेले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णु निद्रिस्त होवून चार महिन्यां नंतर म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशीच निद्रेतून उठतात. म्हणूनच त्यांच्या ह्या चार महिन्याच्या विश्रांतीलाच चातुर्मास म्हणण्याची प्रथा पूर्वापार रुजुवात आहे.
    ह्यामुळेच तर आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" आणि कार्तिक एकादशीला "देवउठनी/प्रबोधिनी एकादशी" असे पूर्वापार संबोधिले जाते. शरीर जरी निर्दिस्त असले तरी श्रीविष्णुंचा आत्मा कायम जागृत असल्याने मानवसृष्टी च्या जगत्पालनेत तसूभरही त्यांच्या कडुन दुर्लक्ष होत नाही. म्हणूनच ह्या चातुर्मासात त्यांच्या आत्मलहरीने संपूर्ण ब्रम्हांड व्यापले गेले असल्याने खासत्वे ह्या दिवसांत त्यांच्याप्रती आस्था ठेवून त्यांच्याच नांवे केलेली भक्ती/उपासना/आराधना अत्यंत फलदायी ठरते असे वेदवचनही आहे.
    उत्तर भारतातील जगन्नाथ पुरी, दक्षिणेकडील वेंकटरमणा तिरुपती,आणि मध्य भारतातील पांडुरंग पंढरी ही तर श्रीविष्णुंची स्वयंभू व ज्वलंत अशी युगानुयुगे मान्यता असलेली पवित्र देवस्थाने असल्याने त्यांच्या भेटी दरम्यान साक्षात भुलोकी वैकुंठ दर्शनाच्या अनुभूतीचा लाभ घडत असल्याने आजही वैष्णव भक्तजन लाखोंच्या संख्येत त्या त्या ठिकाणी जाऊन समक्ष भेटीत विष्णुंच्या दर्शनाचा लाभ घेतात. आणि त्यातूनही ह्या दोन एकादशीं दिवशी तरी प्रतिवर्ष वरील प्रत्येक देवस्थानी, वैष्णवजनांच्या प्रचंड गर्दीचा उच्चांक पार दाटत असतो हे विशेष.
    जगन्नाथ पुरी व वेंकटरमणा तिरुपती ही अतिश्रीमंत देवस्थाने असूनही VVIP व्यतिरिक्त त्यांच्या गाभाऱ्यात अगदी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. फक्त उघड्या डोळ्यांनी श्रीविष्णुंचे नेत्रसुखद दर्शन घेण्याचा लाभ मात्र प्रत्येकाच्या नशीबी तेवढे घडतं हेच भाग्य म्हणायचं.परंतु आपल्या महाराष्ट्रातील पंढरपुरात मात्र सर्वच जातीधर्माच्या गरीब श्रीमंतांना तसेच लुळे पांगळे व आंधळ्यांना देखील गाभाऱ्यात प्रवेश असुन विठ्ठलाच्या पदस्पर्शाने सर्व भाविकांना जीवन धन्य व सार्थक झाल्याची अनुभूती प्राप्त होते हे खरोखरच प्रत्येक भाविकाचे अहोभाग्यच म्हणावं लागेल.
    त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने भुलोकी च्या मानवाला प्रत्यक्ष विष्णुदर्शनाचा स्पर्श-लाभ घडत असल्यानेच अखंड भारतात पंढरपूरलाच वैष्णवांकडून विशेष प्राधान्य दिले जाते हेच खरं उल्लेखनीय.तसे तर पंढरीच्या विठ्ठलाचा इतिहास आणि आषाढी एकादशीला पंढरीचे महत्त्व आहे. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत..!! या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का..?
    एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो...
    ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्याय भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून म्हणजेच स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
    स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
    सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
    न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
    न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।
    एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशी हरिदिन म्हणजेच श्री विष्णूचा दिवस..!
    आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला,शेषशायी भगवान श्री विष्णु झोपीजातात म्हणूनच आषाढी एकादशीला "शयनी एकादशी" असे देखील म्हणतात.
    आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. या एकादशी दिनी पंढरपुरातल्या पांडुरंगाचे दर्शन घ्या आणि शेअर करून इतरांना देखील दर्शन घडवा. जय हरी विठ्ठल.
    जय जय राम कृष्ण हरी।
    जय जय राम कृष्ण हरी॥
    जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ॥

      October 31, 2017


  • वेश्या व राजकारणी

    दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात.

      February 7, 2017


  • पोटाचा घेर कमी करण्यासाठी

    जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.

    जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

    पोटाचा घेर किती असावा?
    यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!

    आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.

    पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.

    पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
    या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.

    खरी भूक लागल्यावर हवे ते-
    (याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!

    यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.

    खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?

    शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
    एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.

    ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733
    संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन

      December 22, 2016


  • डोळे आपल्याला काय सांगतात?

    जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपल्याही डोळ्यांना खाज सुटत असेल, डोळे खूप लाल होत असतील, डोळे थकल्यासारखे वाटत असेल तर आपल्याला आय सिंड्रोम हा त्रास होत आहे.

    यावर उपाय काय? जाणून घ्या.

    डोळ्यांची उघडझाप करा, डोळ्यांचा थकवा कमी होईल.

    सतत कंप्युटरवर काम करण्यासाठी अथवा वाहन चालवल्यासाठी एकटक बघावे लागते. खूप वेळ एकटक बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांची उघडझाप ही सामान्य प्रक्रिया आहे. हवेसोबत डोळ्यात विविध प्रकारचा कचरा जातो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर निर्माण होणारे अश्रू हा कचरा साफ करतात आणि डोळ्यांचा ओलावा कायम ठेवतात.

    कंप्युटरवर खूप वेळ काम करणे.

    कंप्युटरवर खूप वेळ काम केल्यावर डोळे थकल्यासारखे वाटते. सतत एकटक कंप्युटरकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने काम थांबवून मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करा.
    गाडी चालवताना डोळ्यात धूर, हवा आणि धुलीकण जाणे.

    वाहन चालवताना डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यात कचरा, धूर, धुलीकण जाण्याची शक्यता आहे. धुरामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होते. अश्रूंचे प्रमाण कमी होते.

    वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे डोळे कमकुवत होतात. वाढते वय आणि शरीरात होणारे बदल याचा डोळ्यांवर परिणाम होतो.

    व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेह.

    व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेहासारख्या आजारांनी पीडित असलेल्यांना डोळ्यांच्या समस्या हमखास जाणवतात. अशा मंडळींना डोळे कोरडे पडणे हा त्रास अनेकवेळा होण्याची शक्यता आहे. मधुमेहामुळे तर डोळे कमकुवत होण्याची शक्यता असते. काही वेळा तर थेट दृष्टीपटालवर परिणाम होऊन डोळे कायमचे कमकुवत होण्याची शक्यता असते.

    डोळ्यांना पुरेसा आराम देण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय. कंप्युटरवर काम करताना, वाहन चालवताना मुद्दाम थोडा वेळ थांबून डोळ्यांची उघडझाप करा, थोडे इकडेतिकडे बघा आणि पुन्हा आपले काम सुरू करा. आपण आय स्पा वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा कमी करू शकता. आय स्पा डोळ्यांना सुटणारी खाज, डोळ्यांचा थकवा, डोळ्यांचा कोरडेपणा यावर उपाय करतो. बाजारात विविध चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत.

    -- संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३

      November 21, 2016


  • दसरा आणि आपट्याची पाने

    दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही.

    या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.

    नुकतीच या झाडांना पालवी फुटून, हि कोवळी पाने तयार झाली आहेत, या पानांचे काम खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. हि पाने या झाडांसाठी अन्न बनविण्याचे एक प्रमुख काम करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता, या पुढे झाडाची पाने कृपया सोने म्हणून वाटू नका.

    लोकांना भेटायला जाऊन हात जोडून नमस्कार करा, व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या, कारण बीज तयार होणार नसेल तर फुलाचा झाडाला काही उपयोग होत नाही. जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, चाफा वगैरे पुष्कळ सुवासिक फुले बाजारात उपलब्ध असतात.

    याची आणखी एक बाजू सांगतो, हि पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत. म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी निघून जातात. अश्या तर्हेने बाजारात कचरा होण्यास आपणच कारणीभूत होतो. नगरपालिकेचे लोक कचरा साफ करत नाहीत म्हणून आपण ओरडतो, मुळात कचरा केलाच नाही, तर साफ करण्याचा विषय तयार होणार नाही, याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.

    प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ. मी मागील काही वर्षापासून सोने म्हणून पाने देणे घेणे बंद केले आहे.

    सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

    -- विजय लिमये
    (9326040204)

      October 10, 2016