वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !
' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'
ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .
' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .
' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
' ते त्यालाच विचारा .'
त्यांनी विषय संपवला .
आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
' अहो पण ...'
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?
मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .
हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '
-- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .
'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'
त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'
मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .
त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .
पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .
केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
"...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.
- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
-------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
डॉ. मंजू बन्सल या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.
अम्मल ह्या एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पेशी शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी अनुवंशशास्त्र, उत्क्रांती, वनस्पति भूगोल आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जानकी अम्मल या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक फेलो आहेत.
असीमा चॅटर्जी या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या ज्या सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या पहिल्या महिला होत्या.
मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा - राजाभाऊ बेहरे - यांचा फोन आला . " मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . "
बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , " मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . "
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .
कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .
पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .
त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .
या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )
--- पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .
त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .
पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )
तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .
त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ' आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .'
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .
पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .
आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .
आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
---------------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा - राजाभाऊ बेहरे - यांचा फोन आला . " मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . "
बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , " मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . "
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .
कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .
पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .
त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .
या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )
--- पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .
त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .
पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )
तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .
त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ' आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .'
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .
पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .
आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .
आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
---------------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
५७ वर्षीय शीना राणी ह्या हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते.
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
Copyright © 2025 | Marathisrushti