No Picture
लेखसंग्रह

मृत्यू शिका

Category:

 

जन्म झाल्यापासून आपल्याला कसे जगावे हे शिकवले जाते. वय वाढेल तसं जगण्याचं शिक्षण वाढत जातं. सगळी धडपड जगण्यासाठी चालू रहाते. जीवन इतके चिवट बनते की मृत्यूचा विचारही शिवत नाही. हा विचारही आपल्या मनात का यावा हे सांगत आहेत निरेन आपटे.
कधीतरी, कोणीतरी मृत्यू पावतो. आज एक जातो, उद्या दुसरा जातो. पण आपण गेलेले नसतो. त्यामुळे मीही एक दिवशी जाईन हा विचार मनाला शिवत नाही. तरुण वयात तर मुळीच नाही. पण आपण कुठपर्यंत जगणार आहोत हे कोणालाही माहित नसतं. म्हणून जगता जगता मृत्यूही शिकायला हवा. मृत्यू शाश्वत आहे, आज ना उद्या येणारच! मग तो शिकून घेतलेला बरा. हा विचार सहसा आपण करत नाही, पण ह्याचा विचार खूप प्राचीन काळापासून झालेला आहे.

No Picture
लेखसंग्रह

कल्याण-डोंबिवलीचं “कल्याण ” झालं !, तुमच्या शहराचंही होणार!!

Category:

 

काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्या नादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर, bankbook वैगरे करायला निघाले. मुंबईत लघुशंकेला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला.
अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण-डोंबिवली शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. इथे सत्ता कोणाचीही असो, प्रत्येकाने कल्याण डोंबिवलीकरांचं “कल्याण” करून टाकलं.
ह्या शहराची मजेदार सफर घडवत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

नवीन वर्ष गड-किल्ल्यांवर

Category:

 

आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

पुस्तकांनी काय शिकवलं

Category:

 

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली. पुस्तकांच्या परंपरेचा हा आढावा घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी!

No Picture
लेखसंग्रह

पुस्तक वाचून भटकंती

Category:

 

आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
“मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे ”
पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.

No Picture
लेखसंग्रह

आत्महत्या करण्याआधी

Category:

 

राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील.

No Picture
लेखसंग्रह

कलिंगडाचे डोहाळे

Category:

 

बदलापूर स्टेशनवरून सोनावणे घाईघाईत घरी निघाले. आता घरी पोहोचायला उशीर करून चालणार नव्हते. कारण पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे भराभर घरी पोहोचले. स्नान करून पत्नीसमोर निवांत बसले. चहा पिताना तिच्याशी गप्पा सुरु झाल्या.
पत्नी जुन्या आठवणीत रमून गेली. ती सांगू लागली ” आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! “

No Picture
लेखसंग्रह

कोणी रायगडचा, कोणी तिरंग्याचा वेडा. करा थोडा वेडेपणा

Category:

 

रामाने श्री लंकेवर चढाई करण्यासाठी समुद्रावर सेतू बांधायचे ठरवले तेव्हा एका इवल्याश्या खारीने आपल्या तोंडातून त्यात वाळू भरण्याचे काम केले. ती फक्त मूठभर वाळू सेतूमध्ये भरू शकली. तिने संदेश दिला की प्रत्येकाने स्वतःच छोटं योगदान दिलं तरी सामूहिकपणे मोठं यश मिळवता येतं. वरवर पाहता खार वेडी वाटते. अशीच काही वेडी माणसे आहेत, जे स्वतःच इवलंसं योगदान देऊन देश घडवत आहेत. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

तुमचं मन सचिन तेंडुलकरसारखं खेळतं का

Category:

 

भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
कबीर म्हणतो,
मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
…मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

सैनिकांची मावशी: अनुराधाताई

Category:

 

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.