वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२०१८ - १९ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्या संसदेत आता संमत झाला आहे . त्यावर संसदेत जरासूद्धा चर्चा झाली नसली तरी हा अर्थसंकल्पसादर होतांना प्रस्तावित केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात ( आपल्या अर्वाचीन मराठीत सांगायचे म्हणजे लॉन्ग टर्म कपिटल गेन टक्सआणि आधुनिक स्टायलिश भाषेत सांगायच तर LTCG ) काही सवलती देऊन झाल्या आहेत .( या कराबाबत सविस्तर स्वतंत्र लेख लवकरच .)लोकसभा - विधानसभा यांच्या ज्या काही निवडणुका - पोटनिवडणुका व्हायच्या होत्या त्या होऊन गेल्या आहेत . सध्या ज्यांना ज्या - त्या सरकारातयायच - जायचं होत त्यांच ते करून झाल असाव अस आत्ता तरी वाटत आहे . ज्यांना यातल्या किंवा कुठल्याही विषयांवर नुसते बोलायचेच आहे ते नेहमीप्रमाणे जोरदार बोलत आहेत .
अर्थात अशी पार्श्वभूमी आपल्या देशात बऱ्याचदा असते .
अशावेळी गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षाचा मुहूर्त साधत सध्याच्या एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षाऐवजी जानेवारी ते डिसेंबर अशाआर्थिक वर्षाची घोषणा पंतप्रधान करणार का ?
ते अशी घोषणा येत्या काही दिवसांत करतील असे मला अनेक कारणांमुळे वाटते .
त्यापैकी पहिले कारण म्हणजे सर्व महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पाबाहेर करण्याचा मोदीकारणाचा परिपाठ आहे . त्यात अशी महत्वपूर्ण घोषणा आत्ताकरणे चपखल बसते .
दुसरे कारण म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात ( " चालू " मुद्दामून म्हणले नाही . कारण त्यालाआपल्या मराठीत अनेक अर्थ आहेत . सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत निष्कारण गैरसमज नको .) आपल्या देशात झालेल्या थेट विदेशीगुंतवणुकीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर आहे . इतकेच नव्हे तर , या काळात आपल्या देशाने इतर देशांत केलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाणहीसर्वोच्च पातळीवर आहे . हा कल येणाऱ्या काळातही सुरू राहील असे आजमितीस मिळणारे संकेत आहेत . अशी थेट विदेशी गुंतवणूक स्वीकारत आणिकरत असताना जर संबंधीत दोन देशांचे आर्थिक वर्ष एक असेल तर ते सोयीस्कर ठरते . नाहीतर संबंधित कंपन्यांना दोन्ही देशांच्या वर्षानुसार स्वतःचेहिशोब ( Accounts ) ठेवावे लागतात . त्यामुळे ते Ease of doing business च्या निकषांवर तितकेसे बसत नाही . जगातील महत्वपूर्णअर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत असताना हा पुस्तकी अडथळा दूर करत जगातील अनेक देशांत प्रचलित असणाऱ्या जानेवारी ते डिसेंबर अशाआर्थिक वर्षाचा स्वीकार करणे जास्त सयुक्तिक ठरते .
आर्थिक वर्षात असा बदल करण्यामागे असू शकणारे तिसरे कारण हे वस्तू - सेवा कराच्या ( GST ) अंमलबजावणीशी निगडीत आहे .१ जुलै २०१७पासून अंमलात आलेल्या या कराच्या सुरवातीच्या काळात विविध कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी सादर केलेली माहीती आणि आता सादर होत असलेलीमाहीती यात बऱ्यापैकी तफावत असल्याचे आता लक्षात येऊ लागले आहे . एक अर्थव्यवस्था म्हणून हे गाडे लवकरात लवकर रुळावर येणे आवश्यकआहे . याबाबत केवळ नियम किंवा मार्गदर्शक तत्वे बनवण्यापेक्षाही आर्थिक वर्ष बदलण्याचा उपाय जास्त कालबद्ध ठरेल . कारण त्यातून संपूर्णआर्थिक क्षेत्र एका विशिष्ट वेळेत संपूर्ण माहीती दिल्या वेळेत सादर करण्यास उद्युक्त होईल . त्यातून निर्माण होणाऱ्या आकडेवारीच्या पायावर या कराचेदर , त्यातील वस्तू व सेवांचे वर्गीकरण , आणि कर - संकलनाची प्रक्रिया अशा सगळ्याच गोष्टींबद्दल जास्त शास्त्रशुद्ध आणि व्यवहार्य पद्धतीने निर्णयघेणे सर्वच संबंधितांना शक्य होईल .
असे आर्थिक वर्ष बदलण्याचे चौथे कारणही GST शी च संबंधित आहे . यंदाच्या अर्थसंकल्पात GST पासूनचे उत्पन्न फक्त अकरा महिन्यांसाठीचग्रुहीत धरल्याचे नमूद करण्यात आले आहे . वास्तविक पाहाता असा स्वतंत्र उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते . त्यामुळे हा स्वतंत्र उल्लेख हेआर्थिक वर्ष बदलण्याचे सूतोवाच तर नाही ना अशी शंका येते .
याबाबतचे पाचवे कारणही एका वेगळ्या तऱ्हेने पुन्हा GST शीच निगडीत आहे . या कराची अंमलबजावणी करत असताना या करामुळे होणाऱ्या राज्यसरकारांचे नुकसान केंद्र सरकार पहिली ५ वर्षे भरून देईल अशी हमी देण्यात आली आहे . याबाबतचा उल्लेख " पाच वर्षे " असा आहे . यांत वर्ष याशब्दाला विशेषण नाही . त्यामुळे पाच आर्थिक वर्षे की पाच केलेंडर वर्ष हे स्पष्ट नाही . त्यामुळे आता जर आर्थिक वर्षात बदल केला गेला तर केंद्रसरकारला प्रत्यक्षात १२ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी नुकसान - भरपाई देत वर्षासाठी ती दिल्याचे गणित मांडता येईल . वित्तीय तुटीचे प्रमाण त्यातूनत्या वर्षात आवाक्यात ठेवण्यास त्यातून मदत होईल . २०१९ साली आपल्या लोकसभेच्या मध्यावधि निवडणुका आहेत हे लक्षात घेतले तर हा फायदालगेचच घेण्याच्या द्रुष्टीने अशी आर्थिक वर्ष बदलण्याची घोषणा आता कधीही होऊ शकते असे मला वाटते .
असा बदल होण्याचे सहावे कारण हे शेअर - बाजारातील वादळी बदलांशी ( Volatility ) निगडीत आहे . गेल्या काही वर्षात विदेशी गुंतवणूक संस्थानीआपल्या देशांत केलेल्या गुंतवणूक तसेच खरेदी - विक्रीचे प्रमाण आणि सातत्य यांत लक्षणीय प्रमाणांत वाढ झाली आहे . अशा प्रकारे कार्यरतअसणाऱ्या बहुतांश संस्थांच्या देशाचे आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असे आहे . त्यामुळे त्यांची आर्थिक नफा - नुकसानीची सोयीस्कर आकडेवारी दाखवण्यासाठी ही मंडळी नोव्हेंबर - डिसेंबर मधे मोठे व वारंवार व्यवहार करण्यातून आपल्या देशाच्या शेअर - बाजाराची volatility या काळातनिष्कारणच वाढते .त्याचा आपल्या देशाच्या त्यावेळी असणाऱ्या अर्थस्थीतीशी अर्थाआर्थी फारसा ताळमेळ दरवेळी असेलच असे नाही .पण म्हणूनकोणतेही सरकार असले तरी त्यावर बंदी घालता येत नाही . त्यानंतर मार्च मधे सध्याच्या नियमानुसार आपले आर्थिक वर्ष मार्च मधे सपते .तेंव्हापुन्हा काही प्रमाणात हा मार्ग स्वदेशी वित्तसंस्था अंमलात आणतात . आर्थिक वर्ष बदलण्यातून हा प्रकार थांबणार नाही . पण निदान या कारणामुळेवर्षात दोनदा येणारी volatality निदान काही प्रमाणात तरी कमी होईल आणि ती वर्षात एकदाच येईल . अर्थातच शेअर - बाजारातील volatality चेहेच फक्त कारण नसल्याने बाकीच्या कारणांमुळे येणारी volatality हा प्रकार राहीलच .( या मुद्द्याची विस्तृत चर्चा राजहंस प्रकाशनाने प्रकाशितकेलेल्या माझ्या " मार्केट मेकर्स " या मराठी पुस्तकात केली आहे .)
अशा बदलाचे सातवे कारण हे शेती क्षेत्राशी निगडीत आहे . खरीप मोसमाचा नेमका अंदाज घेत सप्टेम्बर - ऑक्टोबर मध अर्थसंकल्प सादर होणेक्रुषिप्रधान देशात जास्त सयुक्तीक होईल . त्यातून खरीप आणि रब्बी या दोन्ही मोसमांसाठी योग्य तरतूद आणि योग्य अंमलबजावणी व यासाठी पुरेसाकालावधि अश बदलातून मिळेल . हे एकूणच क्रुषि क्षेत्रास उपयोगी ठरेल .
आर्थिक वर्ष बदलण्याची घोषणा आता कधीही होण्याचे आठवे कारण म्हणले तर आर्थिक आहे आणि म्हणले तर राजकीय आहे . अशी घोषणायेणाऱ्या काही दिवसांत झाली तर त्यानुसार आपल्या देशाचे नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारी २०१९ पासून सुरू होऊ शकते .त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर२०१९ या संभाव्य आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सप्टेम्बर - ऑक्टोबर २०१८ मधे सादर करण्याची संधी मोदी सरकारला मिळू शकेल .कारणएप्रिल २०१९ मधे होणाऱ्या मध्यावधि निवडणुकांची आचार -संहीता तोपर्यंत लागू झालेली नसेल .
त्यामुळे राहता - राहीला प्रश्न या संभाव्य बदलाच्या घोषणेच्या मुहुर्ताचा .....
कदाचित आंध्र प्रदेश मधल्या दोन राजकीय पक्षांनी सादर केलेल्या मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास ठरावाची संधी साधत सरकारी कामगिरीचा अहवाल संसदेत मांडला जाईल ....
आणि ज्या दिवशी या ठरावाचा निकाल मोदी सरकारच्या बाजूने लागेल त्या रात्री देशवासीयांना उद्देशून केलेल्या राष्ट्रीय संबोधनात अशी आर्थिक वर्ष बदलाची घोषणा होऊ शकते ....
निदान मला तरी असे वाटते .
मग ?
" Ready - Steady -Go " म्हणायचे का ?
चन्द्रशेखर टिळक
२० मार्च २०१८.
( ही माझी वैयक्तिक मते आहेत . यातील काही मुद्द्यांची यंदाच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने माझ्या फेब्रुवारी २०१८ मधील काही कार्यक्रमात मी सविस्तर चर्चा केली होती .)
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.
पृथ्वी जेव्हा जन्माला येत होती तेव्हा पृथ्वीभोवती असणाऱ्या हायड्रोजन आणि हिलिअमयुक्त वातावरणाचा दाब हा, पृथ्वीच्या वातावरणाच्या आजच्या दाबाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे पट इतका प्रचंड होता! या प्रचंड दाबामुळे याच वातावरणातला हिलिअम वायू हा द्रवरूपातल्या तप्त शिलारसात मोठ्या प्रमाणात विरघळला. त्यानंतर या शिलारसाच्या अभिसरणाद्वारे या हिलिअमचा काही भाग शिलारसाखालील गाभ्यात मिसळला.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
कुणाचे वर्म काढू नये
कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये.
बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर कशी येईल, रावाचा रंक कधी होईल ते कधीच सांगता येत नाही. आंधळेपणा, पांगळेपणा ह्या वर्मावर बोट ठेवून कधी कोणाला दोष देऊ नये. हेच आई शिकवित असते. बाबा पण कधीतरी ओरडत असतात.
पण काहीही म्हणा हं आईचं शिकवणं आणि बाबांचं शिकवणं यात फरक असतोच. अगदी नव्वद टक्के मुलं सांगतील, आई शिकवित होती तेच बरं होतं. फक्त ओरडाच खायला लागायचा, मार तर नाही.
वर्म काढू नये. घालून पाडून बोलू नये. भांडणाची पण एक शैली असते. त्या शैलीतच भांडता आलं पाहिजे. अहो, हल्ली मुलांना नीट भांडतासुद्धा येत नाही. त्या वाॅटसप मुळे भांडण होतात, ती सुद्धा ऑनलाईनच ! ?? समोरासमोर.
भांडायला शब्द सुचावे लागतात. आणि शब्द सुचले नाही की थेट हल्लाबोलच.
आणि भांडायचं असतं ते मातृभाषेत. आणि शिक्षण होतं पूतना मावशीच्या भाषेत ! त्यामुळे भांडायला जे इरसाल शब्द भांडार लागतं, ते असतं मातृभाषेत! म्हणून तरी मातृभाषेत शिका !
बोलताना जशी भाषा समृद्धता असणं आवश्यक आहे, तशी भांडताना सुद्धा ही भाषा समृद्धता दिसणं आवश्यक आहे.
तुटे वाद संवाद तो हितकारी असे समर्थांचे बोल आहेत.
संवादाचे रुपांतर विवादात होऊ नये, यासाठी हितकर असणारे शब्द योजावे लागतात. अर्थात शहाण्याला शब्दांचा मार, बाकीच्यांची पूजा कशानी करायची ते, आपल्या मराठी वाड़मयात तेपण सांगितलेले आहे.
वर्म म्हणजे दुर्गुण, कमीपणा. कुणाचा दुर्गुण कुणाला सांगू नये, कारण त्यावरून आपलीच परीक्षा होत असते. आपले दुर्गण शोधावे आणि इतरातील सद्गुण.
हे उपदेशात्मक लिखाण फार गांधीगिरीचे वाटत नाही ना ?
वर्म म्हणजे वेदनेचे ठिकाण. नेमके इथे बोट ठेवले तर दुखणारच ना ! पण जिथे पूय साठून साठून जमा झालेला असतो, तिथे वेदना निर्माण होणारच ना. ? असणारच. आणि जिथे जिथे पूयसंचिती तिथून तो बाहेर काढावा, असे वैद्यक शास्त्र सांगते. जखमेतील वेदना कमी होण्यासाठी काहीवेळा ऑपरेशन करावेच लागते, मग ती जखम प्रत्यक्षात शरीरावरील असो, वा मनावर आघात करणारी. हेपण आईकडूनच शिकायचे असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१६.०८.२०१७
नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।
आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.
नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.
नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे.

वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.
आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष २०१४-१५ चे विवरणपत्र काही कारणास्तव दाखल करायचे राहून गेले असल्यास ३१ मार्च २०१७ ही अंतिम तारीख आहे, हे विसरता कामा नये.
आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या प्राप्तिकर विवरणपत्राबाबत.
सामान्यपणे आर्थिक वर्ष संपले, की ३१ जुलै ही त्या संपलेल्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करावयाची देय तारीख असते. परंतु, बऱ्याच करदात्यांकडून देय तारखेपर्यंत असे विवरणपत्र दाखल होत नाही. अशाच प्रकारे जर आपले आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र अजूनही सादर केले गेले नसल्यास ते ३१ मार्च २०१७ च्या आधी दाखल करावे, खरे तर ३१ मार्च २०१७ नंतरही आपण आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र दाखल करू शकता. परंतु, ३१ मार्च २०१७ नंतर आपणास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. या दोन्ही आर्थिक वर्षांच्या विवरणपत्राबाबत तुम्ही देय तारखेनंतर विवरणपत्र दाखल करत असल्यामुळे आपल्याला दुरुस्तीपत्र दाखल करता येणार नाही.
अॅडव्हान्स टॅक्स बद्दल.
खरे तर आगाऊ कर हा सुद्धा टप्याटप्याने भरला गेला पाहिजे. परंतु तो भरला नसल्यास आताही वेळ गेलेली नाही, कारण ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक वर्ष १६-१७ साठी भरला गेलेला प्राप्तिकर हा आगाऊ करच असतो. थोडक्याणत सांगायचे तर ज्यांचा देयकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त येत आहे, त्यांनाच आगाऊ कराच्या तरतुदी लागू आहेत. तसेच असे ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा जास्त) ज्यांना उद्योगधंदा अथवा व्यवसायातून काहीही उत्पन्न नसल्यास, त्यांनाही आगाऊ कर भरणे सक्तीचे नाही. अशांनी येणारा देय प्राप्तिकर आपले विवरणपत्र दाखल करण्याआधी भरला तरी चालू शकेल. नव्या नियमानुसार, जे व्यापारी एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के निव्वळ नफा दाखवून प्राप्तिकर कलम 44 ए.डी अंतर्गत विवरणपत्र दाखल करतात, अशांना देखील आता मार्च महिन्यातील आगाऊ कराचा हप्ता भरणे जरुरीचे केले आहे. आगाऊ कर न भरल्यास अथवा कमी भरल्यास व्याजरुपी ओझे करदात्याला सोसावे लागू शकते.
पगार सोडून इतर करपात्र उत्पन्न असल्यास (व्यवसाय, भाडे, मुदत ठेवींवरील व्याज, भांडवली नफा आदी) आणि असे उत्पन्न आपल्या कंपनीने घोषित केले नसल्यास त्यावर बसणाऱ्या कराची गणना करून आगाऊ कर भरला गेला पाहिजे. बॅंक आपळ्या व्याजातून करकपात करत असते, पण अशा करदात्यांनी लक्षात घ्यावे, की बॅंक ठेवींच्या व्याजातून केवळ १० टक्के दराने करकपात केली जाते. परंतु, जर तुमचे वार्षिक एकूण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख अथवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अनुक्रमे २० टक्के आणि ३० टक्के कर दरात येतो. तेव्हा केवळ १० टक्के करकपात पुरेशी नाही, हे लक्षात ठेवा.
प्राप्तिकर बचतीसाठीच्या गुंतवणुकीसारखी इतरही काही कामे आहेत, जी आपण ३१ मार्च २०१७ पूर्वी आवर्जून पूर्ण करायला हवीत.
एनपीएस
एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.
पीपीएफ अकाउंट
पीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.वर फक्त महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होणार नाही, हाच त्यामागचा उद्देश!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक.
Copyright © 2025 | Marathisrushti