वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेतकर्यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.
May 20, 2013
संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे.
June 1, 2021
मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे.
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना घर, शाळा, शिकवणी वर्ग, संगणक, टीव्ही आणि मोबाइल या व्यतिरिक्त इतरत्र डोकावूनसुद्धा पाहू देत नाहीत. जग जवळ आले असले तरी विद्यार्थ्यांना आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी कोणते? याची माहिती नसते. पूर्वी ‘चिव ये, दाणा खा, पाणी पी अन् भुर्र्र उडून जा’, असे लहानपणी मुले खेळत होती. बालगोपाल चिमण्यांच्या चिवचिव आवाजाचा, भुर्र्र उडण्याचा मनसोक्त आनंद घेत असत. परंतु, आज हा प्रकार अनुभवाला मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी खामगाव येथील र्शी अ. खि. नॅशनल हायस्कूलमधील कलाशिक्षक संजय माधव गुरव, त्यांची दोन मुले, पत्नी व मित्र विजय खंडागळे यांनी एक प्रयोग करून बघितला. सुरुवातीला अंगणात वृक्षलागवड केली. त्यामुळे विविध पक्षी येऊ लागले. सोबतच खार, मुंगूस, सरडे, हिरवा सरडा, चिमणी, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंकी, चष्मेवाला, शिंपी, पिंगळा, होला, दयाळ, राखी वरवट्या, काळी मैना, ब्राrाणी मैना यांची ओळख छोट्या मुलांना व मित्रांना करून देण्याचा छंद त्यांना जडला. नंतर या पक्ष्यांसाठी अंगणात 22 बाय 33 फूट लांबीचे चार पाणवठे तयार केले. पाणवठय़ाच्या वरच्या बाजूला 12 फूट उंचीवर एक लाकडी घरटे तयार करून लावले. त्या ठिकाणी नियमित अन्न टाकणे सुरू ठेवले. दोन महिन्यांनंतरच त्या घरट्यात ब्राrाणी मैनेने दोन पिलांना जन्म दिला, हे त्यांचा मुलगा संदेशने आनंदाने नाचून सांगितले. हा आनंद पैसे देऊनही विकत मिळत नाही, असे वाटल्याने त्यांनी घरट्यांची संख्या वाढवली. मातीच्या मडक्यांची घरटी तयार केली, परंतु पक्षी येईनात. म्हणून सहा महिन्यांनी मडक्याच्या तोंडावर चिमणीच्या आकाराचे छिद्र पाडले व त्यावर खरड्याचे आवरण लावले. आणि अवघ्या अध्र्या तासातच दोन्ही मडक्यांमध्ये चिमण्यांची ये-जा सुरू झाली. आजपर्यंत या घरट्यात मैना व चिमण्यांनी दहा-बारा वेळा आपल्या पिलांना जन्म दिला. हा अनुभव खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना सुखदायक ठरणारा आहे.
February 27, 2017
आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं.
November 13, 2017
हे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं…
January 4, 2023
आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे.
October 29, 2023
श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
June 10, 2025
केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.
म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !
थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.
हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.
त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.
आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.
तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
यालाच म्हणतात,
चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
माझे काही चुकलंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.02.2017
February 22, 2017
मागच्या आठवड्यात संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, आता संरक्षण मंत्री पद गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आले.अरूण जेटली गेले सहा महिने संरक्षण मंत्री आणि अर्थ मंत्री हा कार्यभार सांभाळत होते. संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय ही दोन्ही खाती एकाच व्यक्तीकडे असणे योग्य नव्हते.
November 20, 2014
लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे.
June 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti