(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रदक्षिणा

    प्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात.

      September 5, 2017


  • डिजिटल रुपया आणि डिजिटल बँकिंग

    नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे ‘लेस कॅश व्हीजन 2018’ असे पत्रक तयार केले. ज्यात ग्राहकांसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग आणि डिजिटल रुपी लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये व्यापारी बँकांचाही फार मोठा सहभाग व सहकार्य आहेच.

      December 12, 2022


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २१

    यदा दारुणाभाषणा भीषणा मे
    भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
    तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
    कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖

    जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
    नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
    सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,

    यदा - ज्यावेळी
    दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
    भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
    कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
    मे- माझ्या,
    भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
    तदा- यावेळी
    मन्मनस्- माझे मानस,
    त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
    कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
    नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.

    असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
    त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 30, 2020


  • श्री आनंद लहरी – भाग १८

    आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,

      February 23, 2020


  • गणकयंत्र

    आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली.

      August 5, 2023


  • श्री महालक्ष्मी मंदिर, वेणगाव, कर्जत

    कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली.

      October 15, 2025


  • नखांची स्वच्छता

    निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना नखांची चांगली स्वच्छता करावी. जेवण्यापूर्वी किंवा कोणताही खाद्यपदार्थ हातात घेण्यापूर्वी हात नखांपासून स्वच्छ धुवावेत. नखंवर कोणतेही पॉलिशिंग रंग, चकमक आदी आर्टिफिशल्स शक्यतो वापरू नयेत. पोटाचे व आतड्याचे आजार इन्फेक्शन आदींपासून बचाव होतो.

      December 16, 2015


  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ८

    मांसाहार करण्याची संयुक्तिक कारणे आणि समर्थन कितीही केले तरी ते लंगडेच होईल. कितीही शोधून काढा, माणसासाठी दररोज मांसाहार करणे हा कदापि आरोग्यदायी होणार नाही.

    आपली गाडी जर पेट्रोलवर चालणारी असेल, तर ती गाडी डिझेल किंवा राॅकेलवर चालेल का ?
    चालेलही.
    पण किती दिवस ? आणि चालवली तरीही आतमधे काहीतरी, कुठेतरी दोष उत्पन्न होणारच ना !

    अगदी हाच नियम वापरून बघा, जर माणसाचे शरीर निसर्गाने शाकाहाराला पूरक केले असेल तर त्यातील केवळ इंधन बदलले तर गाडीचे अॅव्हरेज वाढेल का ?
    कधीही नाही.
    शाकाहारी प्राण्यांची रचना आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळीच आहेत. ती मान्य करणे यातच जास्त शहाणपणा आहे.

    काही व्यक्ती रोज मांसाहार करतात. काही आठवड्यातून ठराविक दिवस. तर काही जण महिन्यातून ठराविक दिवस.
    पण ही मंडळी फक्त मांसाहारच करतात का ? नाही.
    मांसाहाराबरोबर शाकाहार तर घेतच असतात. नव्हे तो घ्यावाच लागतो.

    मांसाहारी कुटुंबात जन्म झाल्यामुळे मांसाहारी सवय लागतेच. पण त्यामुळे काय खातोय, कसं खातोय, कशासाठी खातोय, परिणाम काय होणार आहेत, यावर चिंतन अजिबात होत नाही. करू शकत नाही. जशा परंपरा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पुढे सुरू रहातात. यालाच अंधानुकरण म्हणतात. संस्कार एवढे पक्के होतात, की मांसाहाराचे दुष्परीणाम समजूनही मांसाहार सोडता येत नाही. जणु काही त्याचे व्यसनच लागते. मग घरातले पुरत नाही, रवि बुध लवकर येत नाही तेव्हा बाहेरील हाॅटेलिंग सुरू होते. खाल्लेले मांस सहजपणे पचत नाही म्हणून त्यासाठी पुनः मद्य सेवनाचा दोष.

    एका दोषातून बाहेर पडण्यासाठी पुनः दुसरा दोष निर्माण केल्यासारखंच नाही का ?
    म्हणजे एका उष्ण औषधाचे ऊष्ण परिणाम (म्हणजे अॅसिडीटी) दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे थंड औषध ( म्हणजे अॅण्टासिड .) याचा तिसरा दुष्परिणाम मलविबंध (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन ) यावरील औषधांनी आतड्यांचा फ्लोरा डिस्टर्ब होतो, म्हणून आणखी एक औषध. त्याने काही व्हिटामिन्स कमी होतात, म्हणून आणखी एक औषध. म्हणजे एक गुन्हा लपवण्यासाठी आणखी एक गुन्हा !

    मग काय,
    जगण्यासाठी चौदा पंधरा प्रकारची औषधे सुरू होतात.

    आजन्म !
    मरे पर्यंत !!
    Until death !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    8.10.2016

      October 8, 2016


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ५

    जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मी त्या एकदंतांचे सदैव चिंतन करीत असतो. त्यांच्या त्या दिव्यशक्तित्वाचे चिंतन करतो.

      January 5, 2020


  • तमिळनाडूमधील पोंगल – सुगीचा सण

    पोंगलच्या दिवशी अग्नीला नैवेद्य दाखवणे हा सर्वांत महत्त्वाचा विधी असतो. पोंगल सण हा प्रामुख्याने शेतात साजरा केला जातो. शेणाने सारवलेल्या जमिनीवर तीन दगडांची चूल मांडून त्यावर नवीन भांड्यात तांदूळ आणि डाळी टाकून आधण दिले जाते.

      January 14, 2022