वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.
तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात…
मराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय?
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.
“श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २
हिरवी हिरवी रानं....निळं निळं आकाश...लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू ...उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी... झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी.... निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. वाटत रहायचं आपल्याला ह्या फुलाशिवाय या निसर्गाशिवाय पर्यायच नाही... अगदी बुडून जायचो निसर्गाच्या रुपात तेंव्हा.. हळूहळू काळ बदलला.. एक एक करून अनुभवाचे पक्षी -हदयाच्या झाडावर गोळा होऊ लागले.त्यातले काही विचित्र होते.. काही थोडे निराशावादी होते. तर काहीना वर्गीकरणाच्या कुठल्याच कप्प्यात बसवता येणार नाही एवढे भयानक होते....
ज्या निसर्गावर जीवापाड प्रेम करावं. जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे तोच निसर्ग आज खायला उठल्यासारखा वाटू लागला आहे.. आपल्याला शेत आहे याची जाणीव होऊ लागली.. मग नदीला मोठ्ठा पूर आला तर सारी पिकं वाहून जातील... नुकसान होईल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे पूर्वीसारखा मोठ्ठा पाऊस आल्यावर पूर आला तर टाळ्या वाजवून होणारा आनंद आज राहिला नाही... जाणिवांची मनात पक्की वस्तीस्थानं होत गेली.. अन पूर्वीच्या आनंदाच्या झोपडीचं पुनर्वसन होत गेलं... एक एक करून हळूहळू खळाळून हसणं विरुन गेलं...उरलं फक्त नाटकी हसणं तेवढंच...
आत्ता आत्ता मुर्दाड विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. हळूवार भावनांचे पक्षी दूर देशी उडून गेलेत आपण एक निगरगठ्ठं दगडी माणूस बनू लागलोय... तरीही आपण हात- पाय हलवून जिवंत असल्याचं नाटक करत असतो... आपण जिवंत नसतोच मुळी.. आपल्या भावना मृत... आपल्या संवेदनांना बोथट कातडीची साल.. कासवाच्या पाठीवरील टणटणीत... कवचासारखी किंवा आपण म्हणजे एखाद्या खाटीकखान्यात कसाई... कुणाबद्दलही कशाबद्दलही अनुकंपा न बाळगणारं आपलं स्वार्थी कठोर मन... या सार्या गोष्टी पुरेशा आहेत आपले मुर्दाड जीवन स्पष्ट करायला.... फक्त श्वास घ्यायलाच आपण जीवंत जीवन समजत असतो.
आता तर आपल्या डोळ्यांमध्ये स्प्लेन्डर किंवा कॅलीबर्सची स्वप्न तरळू लागली आहेत. कधी कधी आपण एखादी ड्रीम राईडही घेऊ लागतो त्यावरून. एखाद्या गाडीची ठेकेदार फायरींगही रुंजी घालू लागते... आपल्या कानात... सेकंड ... थर्ड करत करत आपण सुसाट वेगाने धावू लागतो.. काळ्या करकरीत.. डांबरी रस्त्यावरुन ... काही रुपायाचं पेट्रोल गाडीत टाकून चेहऱ्यावरुन फुटका आनंद आणि दळभद्री समाधान मिरवत असतो आपण नेहमीच... पण ज्यांना संध्याकाळच्या फोडणीच्या तेलाची भ्रांत आहे अशी माणसं दिवसभर हाडाची काडं करून राबल्यावर संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं निखळ समाधान किंवा खळाळून हसणं आपल्याला हेवा वाटावं असंच असतं... पण आपल्याला त्याचं काहीच नसतं आपण फक्त खोट्या समाधानाच्या पाठीमागे लागलेलो असतो. आपल्याला आता ओळखू येत नाही ओढ्याचा खळखळणारा आवाज किंवा पाखरांचे कुजबुजणे, झाडांचे पानांच्या आडून डोकावणे... फुलांचे हळुवार पसरणे.... मोरांचे केकारव... काही काहीच वाटत नाही कशाचं ....समजत नाही त्यांची भाषा. आपली सौंदर्य दृष्टीच वेगळी झाली आहे पूर्णपणे.. कृत्रिम फुलं काचेच्या भांड्यात टेबलावर ठेवणं किंवा चित्रात दिसणारं संकुचित सौंदर्य एवढंच आपल्याला माहीत असतं..
एखादं सुंदर गीत मुक्तपणे ऐकायला येईनासं झालं आहे हल्ली कुठलाच स्वर मधुर वाटत नाही गीत कितीही हळुवार असलं तरीही कानावर कर्कश्य आघात व्हावेत किंवा मुर्दाड भावनाच सारख्या मनात येऊ लागतात राहून-राहून सर्वांनाच सवय झाली आहे याची.. कुणालाही कशाचेही काहीही वाटत नाही.. सर्वांची मनं वरचेवर निर्ढावू लागली आहेत... प्रत्येक जण घाई... गर्दी .. गडबड यातच एवढा रमला आहे की त्याला किंचितही कळवळा वाटत नाही.. करुणेचा झरा कोरडा पडू लागलेला आहे... नावाभोवती वलंयं तयार होत आहेत.. मोठेपणाचे बेगडी मुखवट्यावर मुखवटे चढवले जात आहेत.. भावनांचेही व्यावसायीकरण होऊ लागलं आहे.. करकचून बांधून टाकलं आहे आपण आपल्या मनाच्या मुक्ततेला 'लाईफ स्टेटस'च्या नावाखाली आपल्याला फार मोठं टेन्शन येतं आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जाता आलं नाही याचं.. उटी.. कुलू मनालीला जायचं रिझर्वेशन तिकीट मिळालं नाही याचं.. कधीकधी नळाच्या पाण्याचं किंवा पेपर उशिरा आल्याचं टेन्शन येतं... आपल्याला पण आपल्याला चुकूनही आठवण होत नाही आपल्या शेजाऱ्याचा मुलगा का आतल्याआत धुमसतो आहे? किंवा परवा गल्लीत कोणी तरी का आत्महत्या केली? कारण आपण त्यांच्यावर खदाखदा हसण्याशिवाय काहीच करू शकत नसतो तसे आपण... आपण स्वतःला जिवंत समजत असतो तसं आपलं वागणंही फार काही चूक नसतं...
अनुभवाच्या पक्षाच्या टोचण्या खात -खात प्रवास चालू असतो मात्र आपलीच फसवणूक करीत असतो... आपण... नेहमीच!
-- संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०
तिळाच्या तेलाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!तिळाच्या तेलाचा उपयोग करून पहा नक्कीच फायदा होईल.तिळाच्या तेलाचा जेवणात वापर केल्याने जेवण स्वादिष्ट होते. मात्र याचा केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. या तेलात व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरससाखी खनिजे तसेच प्रोटीनची चांगली मात्रा असते. यासाठीच हे केस तसेच त्वचेसाठी फायदेशीर असते.
केंसाच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे लांबसडक केस होतात. यासाठी केवळ आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज करा. केस नक्की वाढतील.
केमिकल्स, प्रदूषण आणि उन्हामुळे तुमचे केस खराब झाले असतील तिळाच्या तेलाचा वापर उत्तम. तिळाचे तेल खोलवर जाऊन केसांना पोषण देते.
सूर्यांच्या किरणांमधून निघाणारे यूव्ही रेंज त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवतात. तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करुन हे रोखू शकता. तिळाचे तेल केस आणि त्वचेवर संरक्षक कवच बनवते ज्यामुळे केस अथवा त्वचेचे नुकसान होत नाही.
हल्ली कोंड्याची समस्या सर्वसामान्य झालीये. झोपण्यापूर्वी बोटांच्या सहाय्याने तिळाचे तेल स्काल्पला लावून मसाज करा आणि सकाळी केस धुवा. कोड्यांची समस्या निघून जाईल.
कोरडे तसेच रुक्ष केसांमध्ये नवजीवन आणण्याचे काम तिळाचे तेल करते. आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाचा वापर केल्यास स्पिल्ट एंड्स तसेच कुरळे कोरड्या केसांची समस्या दूर होईल. १. ताण कमी करण्यासाठी तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
१.ताण कमी करण्यासाठी
तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
२.त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.
३.हृद्याचे आरोग्यसाठी
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.
४.हाडांचे आरोग्यासाठी
लहान बाळांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ठिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.
५.गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनएचे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.
६.स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी
गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.
७.तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.
८.शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.
९.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.
१०.व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
forwarded by - गजानन
whats app - 7775871809
चिकित्सक सल्ला जरूर घ्यावा .....
सौजन्य - सम्रुद्धी पापड
जेवण झाल्याबरोबर या गोष्टी करण्याचे टाळा…
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
( आणि, आज तर भारतावर इंग्रजांचें राज्य नाहीं. तर मग, आज जे upwardly mobile लोक सॉफ्टरेअरच्या कामासाठी व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इंग्लिश शिकतात, त्याचें काय ? ).
मात्र, जैनांनी व बौद्धांनी संस्कृतमध्ये रचना करण्याचें कारण तें नव्हे. जैन किंवा बौद्ध विद्वानांनी प्राकृतात लिहिलें, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलें, व संस्कृतातही लिहिलें. त्या कारणांचा ऊहापोह आपण आधी केलेलाच आहे.
प्रागैतिहासिक काळीं आर्ष-संस्कृत ही एका पूर्ण-समाजाचीच भाषा होती. परंतु, शेकडो वर्षें लोटल्यावर तिचें रूप, संपर्क-भाषा, ज्ञान-भाषा, दुवा-भाषा (Link Language) अशा स्वरूपाचें झालें. त्यामुळे विविध विषयांमधील ज्ञान---- मग तें, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, खगोलशास्त्र असो, वैद्यक असो, गणित असो, साहित्य-कला असो, किंवा इतर कांहींही असो, ------ संस्कृतमुळेच भारताच्या विविध भागांमध्ये पोचलें ; भारतातच नव्हे तर पूर्व-आशियातील अनेक देशापर्यंतही पोचलें.
( पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti