वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.

‘आफ्रिकेची सिनेसृष्टी’ म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले चित्रपट. या सृष्टीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे ठरले. मात्र वर्षाकाठी शंभराच्या वर मराठी व एकूण बाराशेच्या वर चित्रपट निर्मिती करणारी हिंदी सिनेमासृष्टी आफ्रिकेची ‘रोल मॉडेल’ ठरावी. जगात वर्णद्वेशाचा वणवा पेटलेला असतांना औसमन सेम्बीननी ‘ब्लॅक गर्ल’ चित्रपट सादर केला.
तेव्हापासून आफ्रिकन सिनेमात नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि ते ‘आफ्रिकन सिनेसृष्टीचे जनक’ म्हणजे दादासाहेब फाळके ठरले. सध्याच्या चित्रपटात सामाजिक, संघर्ष कथाविषय, रहस्यमय कथाविषय आणि कौटुंबिक कथाविषय मुख्यत्वाने आले. पण वेगवेगळ्या परिमाणांच्या फूटपट्टीने आफ्रिकन व भारतीय चित्रपटसृष्टींच्या तुलनेची चिवडाचिवड कशाला करायची? सर्वसामान्य माणसाला कलास्वादातून फक्त सौख्याचा आणि जगण्याचा मंत्र शोधायचा असतो. यातच त्याचे भाबडेपण प्रतिबींबीत होत असते, त्याच्या मनात असतं, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे..
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावें’.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।
कल्याणीं तां कल्पलतामानतिभाजां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ९॥
या जगाच्या अंतर्गत प्रवाहित मूलशक्ती स्वरूपात विश्वसंचालन करणाऱ्या आई जगदंबेच्या लीलेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।
विविध आकार धारण करून या विश्वाची केंद्रीभूत असणारी ही आई जगदंबा संपूर्ण विश्वाला व्यापून मुक्तपणे स्वतःच्या इच्छेनुसार एकटीच क्रीडा करीत असते.
भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचे हे वचन ऐकल्यानंतर आदिशक्तीचा महानतम ग्रंथ असणाऱ्या सप्तशती ची आठवण होते. तेथे दशम अध्यायात हा विषय आलेला आहे.
शुंभ आणि निशुंभ यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी आई जगदंबेने आपल्या अनेक रूपांना प्रकट केले. ज्या देवतेचे जसजसे स्वरूप आहे तशा तशा स्वरूपात त्यांची शक्ती प्रगट झाली. अशा त्या सगळ्या शक्तीकडे पाहून शुंभ आदिशक्तीला म्हणतो की तू इतरांच्या भरवशावर पराक्रम करतेस. यावेळी आदीशक्ती आपल्या सर्व रुपांना आपल्यात सामावते आणि त्याला म्हणते येथे मी एकटीच आहे. दुसरे आहेच कोण?
येथे आचार्यश्री नेमकी तीच भूमिका सांगत आहेत. या संपूर्ण विश्वातील चराचर सृष्टीत एकटी जगदंबाच सामावलेली आहे. सर्व रूपात ती एकटीच लीला करीत आहे.
कल्याणीं तां- संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या त्या, कल्पलतामानतिभाजां- आ म्हणजे पूर्णपणे, नत म्हणजे शरणागत, भाज म्हणजे कृपेला पात्र असलेल्या, उपासकांच्या साठी कल्पलतेप्रमाणे सकल सुख प्रदान करणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमला प्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने ‘हाँगकाँग सुपर सिरीज’ स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा ‘कोड क्रॅक’ केल्याचे बोलले जाते.
आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.
नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖
स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
अभिषिक्तम् - ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
नमस्यामि - मी नमस्कार करतो.
शंभो ते - हे भगवान शंकरा आपल्या,
पदांभोरुहं- चरण कमलांना.
कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
भवांभोधिपोतं - भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
भवानी विभाव्यम् - भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे.
पत्रिका छापताना मुलासाठी केवळ ‘चिरंजीव’ आणि मुलीसाठी चिरंजीव ‘सौभाग्यकांक्षिणी’ असं लिहिलं जाताना आपण वाचलं असेल. हे असं लिहिणं प्रथेचा भाग म्हणून ते वाचून सोडूनही दिलं असेल. परंतू असा भेद का, हा प्रश्न कुणाला कधी पडतो असं मला वाटत नाही..चिरंजिवित्व आणि चिरतरुणत्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे खरंच आहे. मग पत्रिकेत ते फक्त मुलालाच का आणि मुलीसाठी ‘सौभाग्यकांक्षिणी’ असा वेगऴा शब्दप्रयोग का, असा प्रश्न मला पडला
Copyright © 2025 | Marathisrushti