(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अगस्त्य/हादगा

    अगस्त्य/हादगा

    ।। सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामि।।

    अगस्त्याचे ७-१० सेंमी उंचीचे अल्पायूषि व लवकर वाढणारा वृक्ष असतो.काण्ड सरळ व विरळ फांद्याचे असते.पाने १५-३० सेंमी लांब असतात व त्यास ४१-६१ पत्रके असतात.फुल पांढरे,नौकाकार,मंजिरी स्वरूपात असते.फळ ३० सेंमी लांब वाकडे असते व त्यात १५-२०बिया असलेली शेंग असते.

    ह्याचे उपयुक्त अंग पंचांग असून हा चवीला कडू,व थंड गुणाचा असतो व गुणाने हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे उपयोग पाहुयात:

    १)अगस्त्याची त्वचा व पाने जखमेवर लावायला व सुजेवर उपयुक्त आहेत.

    २)अगस्त्याच्या पानांची व फुलांची भाजी कृमीमध्ये उपयुक्त अाहे.

    ३)अगस्त्याचा सालीचा रस हा कफमोकळा करतो म्हणून ह्याचा उपयोग सर्दी,खोकला ह्यात होतो.

    ४)अगस्त्याच्या फुलांचा उपयोग स्त्रीयांच्या अंगावर पांढरे जाणे ह्या आजारावर होतो.

    ५)अगस्त्याचे पिकलेले फळ हे मेध्य आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 20, 2017


  • कृपा’ म्हणजे काय?

    कृपा ही जाणून घेण्याची गोष्ट आहे! उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थेतून प्रत्येक जीव वाटचाल करत असतो. दासबोधात रामदास स्वामीनी जन्म हेच दुःख आहे असे म्हटले आहे, तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून ह्या भाव सागरातून मुक्त व्हायचे आहे,तू सद्गुरुंना शरण जा! हे सद्गुरू म्हणजे कोण? व्यक्ती का नाही! हे एक तत्व आहे ह्या आधी होते आत्ता ही आहे आणि पुढे ही राहणार आहे!

      April 27, 2020


  • हार्मोन्स म्हणजे काय?

    मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे नियंत्रण दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीम या ग्रंथीमधील स्त्रावांचे स्त्रवण सरळ रक्‍तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना अंतस्त्रावी ग्रंधी म्हटले जाते.

    अशा अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्‍तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत असताना शरीरातील दुसऱ्या अवयवावर परिणाम करून अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत असतात अशा पदार्थांना हार्मोन्स असे म्हटले जाते.

    शरीरातील विविध पेशींची व संस्थांची वाढ, पुनरुपत्ती चयापचय क्रिया, यांना मार्गदर्शन आणि त्यांचे नियंत्रण करून त्यांच्या परिस्पर क्रियात संतुलन ठेवण्याचे काम हार्मोन्स करत असतात. शरीरातील विविध द्रवस्वरूप पदार्थांच्या घटकांच्या नियमनाचे कामही हार्मोन्स करत असतात.

    थोडक्‍यात अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्‍तातील जे पदार्थ शरीरातील विशेषत: हळूहळू चालणाऱ्या अथवा टप्प्याने चालणाऱ्या क्रिया नियंत्रण करत असतात त्यांना हार्मोन्स म्हणतात.

    हार्मोन्सची वैशिष्ट्ये
    हार्मोन्स हे व्हिटॅमिन्स प्रमाणेच अत्यंत सूक्ष्म प्रमाणात भरपूर काय करीत असतात. हार्मोन्स जेथे तयार होतात, त्या ग्रंधी व्यतिरिक्‍त ते साठून रहात नाहीत. ते रक्‍तात वहन होताना त्यांचे कार्य झाल्यावर त्यांचा त्वरित नाश होतो. काही हार्मोन्स (उदा. ऍड्रीनॅलिन), अतिजलद कार्य करतात. तर काही हार्मोन्स (उदा. थायरीक्‍झिन) तुलनेने हळूहळू कार्य करतात. एक अंतस्त्रावी ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करत असते. शरीरातीलर काही क्रियांवर एकावेळी दोन हार्मोन्सचा देखील परिणाम होत असतो. हार्मोन्सचे कार्य हे इतर हार्मोन्सवर अवलंबून असते. तसेच हार्मोन्स ज्या पेशींवर अथवा संस्थेवर कार्य करीत असतात त्यांच्या क्रियेवर पुन्हा नियंत्रितही होत असतात.

    हार्मोन्सचे कार्य हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्हिटॅमिन्सशी देखील संबंधित असते. उदा. इ. व्हीटॅमिन्सचा प्रजनन संस्थेतील अवयवांच्या स्त्रावावर परिणाम होत असतो. त्याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्‍यक आणि अनिवार्य आहे.

    हार्मोन्समध्ये बिघाड कसे उत्पन्न होतात?
    हार्मोन्स ज्या ग्रंथी मधून तयार होतात त्या ग्रंथीने हा स्त्राव कमी करणे अथवा प्रमाणापेक्षा अधिक करणे यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन उत्पन्न होते. अंतस्त्रावी ग्रंथीत बिघाड होणे, किंवा काही वेळा इतर हार्मोन्सचे कार्य बिघडणे किंवा संबंधित इतर दुसऱ्या अंतस्त्रावी ग्रंथीच्या बिघाडाच्या दुष्परिणामी हे घडत असते.

    *अंतस्त्रावी ग्रंथीलाच विकार होणे उदा. सूज येणे, कॅन्सरचा प्रादुर्भाव इ.
    *हार्मोन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक घटकांची कमतरता उदा. आयोडीन कमी पडल्यामुळे होणारा गॉयटर.

    *अंत:स्त्रावी ग्रंथी नियंत्रित करणाऱ्या दुसऱ्या ग्रंथीमध्ये दोन उत्पन्न होणे. उदा. पिच्युटरी या ग्रंथीचे कार्य वाढल्याने त्याच्या परिणामी हायपर थायरॉईडीझम होतो.

    *अंतस्त्रावी ग्रंथीला प्रमाणापेक्षा जास्त काम पडल्यामुळे उदा. अति गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे नियंत्रण करणाऱ्या स्वादुपिंडावर ताण येऊन डायबेटीस म्हणजेच मधुमेह होतो.
    *कोणत्याही कारणाने उदा. मानसिक तणाव, चिंता काळजी, अति शारीरिक ताण. इ. मुळे मज्जासंस्थेत बिघाड झाल्याने हार्मोन्सचे कार्य बिघडते.

    *जन्मत: दोष असणेमुळेही काही वेळा अंत:स्त्रावी ग्रंथीत बिघाड उत्पन्न होत असतो. उदा. अनुवंशीकतेने होणारा डायबेटीस अथवा हायपोथायरॉईडीझमचे काही प्रकार.

    हार्मोन्स कोणती कार्य करतात?
    शरीरातील अनेक क्रियांशी हार्मोन्सचा संबंध असतो. मुख्यत: विचार केल्यास शरीराची योग्य वाढ करणे, हाडांची वाढ करणे, उंची वाढण्याची प्रक्रिया, शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणे, स्त्री पुरुषातील जननेंद्रियांची वाढ, लैंगिक अवयवांची योग्य वाढ करणे, स्त्री बीज उत्पत्ती क्रिया, शुक्रजंतूची उत्पत्ती वयात येताना होणाऱ्या बदलांचे नियंत्रण, स्तनांची वाढ, स्त्रीयांमध्ये मासिक पाळींची नियमितता, गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्तनामधील दुधाची निर्मिती, या गोष्टींचे नियंत्रण, रक्‍तदाबाचे नियंत्रण करणे, शरीरातील जादा चरबीचे नियमन करणे, हृदयक्रिया श्‍वासोच्छवासाचे नियंत्रण, किडनीचे कार्य, यांचेही नियंत्रण हार्मोन्स करता.

    थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समुळे ऊर्जानिर्मिती, कोलेस्टोरेलचे नियंत्रण, किडनीचे लघवी उत्पन्न करण्याचे कार्य वाढवणे, स्नायूंची कार्यक्षमता, उत्साह, चपळपणा, शरीरराची वाढ ही कार्ये होत असतात.

    स्वादुपिंडामधील इन्श्‍युलीन हार्मोनमुळे रक्‍तातील साखरेचे नियंत्रण होत असते. पॅराथायराईड हार्मोन मुख्यत: कॅल्शियमचे नियंत्रण करतो. भुकेची निर्मिती, पचनक्रिया, आतड्यांची हालचाल मलमूत्रांचे उत्सर्जन, हृदयाची गती, रक्‍तभिसरण, प्रोस्टेट ग्रंथी वाढ अशा अनेक क्रिया सुरळीत होण्यासाठी अथवा नियंत्रणासाठी हार्मोन्सचे संतुलीन कार्याची आवश्‍यकता असते.

    संजीव वेलणकर पुणे
    9422301733
    संदर्भ.इंटरनेट

      December 22, 2016


  • भगवान श्री गौतम बुद्घ

    माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
    कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।

    गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
    दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।

    दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
    भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।

    बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
    नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।

    उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
    शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।

    प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
    मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।

    गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
    ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।

    ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
    धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।

    सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
    चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।

    धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
    घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।

    गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
    लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।

    कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
    प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।

    केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
    प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।

    बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
    अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।

    कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
    परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।

    मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
    ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।

    साधू संत जमती कांही भविष्य जाणती
    आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।

    हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
    विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।

    बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
    पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।

    बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
    संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।

    न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
    महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।

    जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
    न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।

    सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
    विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।

    राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
    बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।

    नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
    बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।

    राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
    सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।

    दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
    एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।

    सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
    न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।

    सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
    लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।

    उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
    प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।

    आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
    विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।

    उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
    दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।

    माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
    जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।

    जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
    निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।

    सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
    लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।

    रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
    उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।

    तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
    लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।

    नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
    सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।

    उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
    सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।

    त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
    मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।

    हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
    परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।

    सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
    तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।

    म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
    दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।

    सर्वची सोडोनी गेला तो वनीं
    एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।

    निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
    तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।

    एकाग्र करुनी मन लावले ध्यान
    केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।

    अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
    सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।

    अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
    रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।

    शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
    भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
    षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।

    संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
    सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।

    फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
    तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।

    नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
    तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।

    मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
    मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।

    अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
    तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।

    तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
    आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।

    सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
    आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।

    बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
    अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।

    गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
    महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।

    बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
    जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १७- १०११-८३

      January 17, 2018


  • चक्रव्यूह

    ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे.

      December 5, 2019


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ११

    अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥

    आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.

    अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.

    अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, "अन्नपूर्णे सदापूर्णे. "

    शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.

    ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.

    कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.

    दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.

    माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे...

    भिक्षां देहि च पार्वति !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 8, 2020


  • पाकिस्तान : माझी साहसयात्रा

    पाकिस्तान : माझी साहसयात्रा

    मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो.

    मला काही बेनझीर ओळखत नव्हत्या, ओळखणार तरी कशा ? पण भारतीय वृत्तपत्रातून तेही पुण्यातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. दरवाजावर असलेल्या दारवानाने माझी चौकशी केली. बेनजीर यांच्या सचिवाने त्याला ‘इंडिया’तून एक गेस्ट येणार आहेत हे सांगितलेले असल्याने त्याने मला आत सोडले. मी मागे वळून पाहतो तो रकिब पूनावाला मला अच्छा करत दरवाजात उभे होते. तासाभरात येतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या लाल रंगाच्या सुझुकी मोटरसायकलवर टांग टाकलीसुद्धा.

      July 2, 2025


  • बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक

    बिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्‍यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे.

      March 4, 2018


  • युनेस्कोचा वर्धापनदिन

    संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.

      November 16, 2021


  • अणुतंत्रज्ञानाचे वीजनिर्मितीव्यतिरिक्त इतर उपयोग

    अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे बहुविध उपयोग आहेत. यात काही वेळा किरणोत्सारी पदार्थांचा प्रत्यक्ष वापर होतो, तर काही वेळा किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचाच फक्त वापर केला जातो.

      August 15, 2023