वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.

चीनच्या भिंतीला चीनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेकडून होणाऱ्या भटक्या टोळ्यांचं आक्रमण रोखण्यासाठी बांधलेल्या या पूर्व-पश्चिम भिंतीची एकूण लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. अनेक राजवटींच्या काळात केलं गेलेलं या भिंतीचं बांधकाम, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सुरू होऊन ते इ.स.नंतरच्या सतराव्या शतकापर्यंत चालू होतं.
"मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.
"हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल." असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.
समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.06.2017
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥
आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात,
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील सहज मिळू शकते. मग सामान्य प्राप्तीची कथा ती काय?
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि- मूर नावाच्या राक्षसाचे विद्विष् अर्थात शत्रू असणाऱ्या भगवान श्री विष्णूंना देखील अधिक आनंद देणारा असा हा नेत्रकटाक्ष आहे. 'श्रीहरींना देखील' हा उल्लेख मोठा महत्वाचा आहे. भगवंताचे स्वरूप आनंदरूप आहे. त्यांना बाहेरून आनंद मिळण्याची आवश्यकता नाही. त्यांनादेखील आनंद मिळतो. मग सामान्य दुखी जीवांना किती आनंद देत असेल? याचा विचार जागवणारा हा उल्लेख.
इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः- इंदीवर म्हणजे निळ्या रंगाचे कमळ. त्याचे उदर म्हणजे आपला गाभा. सहोदर अर्थात त्याच्या सौंदर्यासमान असणारा असा देवी इंदिरा म्हणजे आई लक्ष्मी चा नेत्रकटाक्ष आहे.
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् - शेवटी आचार्यश्री प्रार्थना करतात की आईचा तो दिव्य नेत्र कटाक्ष अर्ध क्षण का होईना माझ्यावर कृपादृष्टीवर्षाव करो. कारण माझ्या उद्धारासाठी तेवढाही पर्याप्त आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
विजय मल्ल्या यांची " किंगफिशर एरलाइन" एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र - सहकारी - वाचक - श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी " माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा " असे उत्तर देत असे .
त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . " मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , " विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? " " त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? " "आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . " सीने जगताविशयि ची पाने " या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या " मैत्रीची " चर्चा रंगात होती .
माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की " माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . "
माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .
पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .
असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ?
दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .
दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?
दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या - भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?
दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !
प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?
दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .
दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.
चंद्रशेखर टिळक
४ सप्टेंबर २०१६ .
C - 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-mail . . . tilakc@nsdl.co.in

आपण मुलांना खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक क्लासेस लावतो. ज्यामुळे मुले रेसमध्ये ढकलली जातात आणि रेसचा घोडा बनतात.
कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?”
भारताच्या आंतरिक आणि बाह्य सीमा सुरक्षित नाहीत, अशी कितीही ओरड केली, त्याबाबत कितीही निवेदने दिलीत, निदर्शने केलीत अथवा मोर्चे काढले, तरी सरकार काही त्याची दखल घेण्यास तयार नाही. सीमेवर थातूरमातूर इलाज करून सरकार तेथे शांतता प्रस्थापित करू इच्छिते.
मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥
Copyright © 2025 | Marathisrushti