वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते.
September 17, 2021
माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.
March 9, 2020
संस्कारात वाढलेली पिढी आज निर्वात पोकळीत वाढत आहे.आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. अशी गाणी आता इतिहासजमा झाली की काय?
फ्लॅट संस्कृतीत कोणी येतच नाही. टपाल किंवा खाद्यपदार्थ घेऊन येणारी माणसे, तीही ठरवून येतात. बोलावल्याशिवाय माणसाने येऊच नये अशी तजवीज माणसानी करून ठेवली आहे.नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी मुलांनी कुठे अनुभवायची. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.पण दादाला आता सांगायची गरजच पडत नाही. दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ म्हणण्यासाठी दादी कुठे आहे?
June 16, 2026
कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
" तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",
तर तो म्हणेल,
"काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
September 24, 2016
आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात.
October 22, 2023
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. पद्मावती जावळे यांनी लिहिलेला हा लेख
वारकरी पंथात संत तुकारामांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची महती तशी सर्वांनाच माहित आहेच. म्हणूनच त्यांच्याबद्दल विद्वतजनांनी याप्रमाणे म्हटले आहे,
ज्ञानदेवे रचिला पाया । रचिले देवालया । नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत ।। भजन करू सावकाश तुका झालासे कळस ।।
असे म्हणत. कारण थोडक्यात असे म्हणता येईल की सर्वसामान्यांना गृहस्थाश्रमी लोकांना, ईश्वरप्राप्तीचा मार्ग सर्वांना सहज समजेल असा सोपा करून सांगितला आहे. त्यांच्या काही अभंगांतून त्यांचा भक्तिभावख त्यांचा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग सहज स्पष्ट दिसतो.
त्यावरील त्यांचे हे अभंग पहा,
१) एक भावचि कारण देवा ।
कासया पाषाण पूजिती पितळ ।।
अष्ट धातु खळ भावेविण ।
भावचि कारण, मोक्षाचे साधन बोलियेले।।
२) युक्ताहार नलगे आणिक साधने,
अल्प नारायणे दाखविले ।
कलियुगामाजी करावे किर्तन,
जतेणे नारायण देईल भेटी ।
३) नाम घेता उठाउठी ।
होय संसारती तुरी,
नाम संकिर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची ।।
४) नलगे सायास जावे वनांतरा ।
सखे येतो घरा नारायण ।
ठायीच बैसोनी करा एकाचित्त ।
आवडी अनंत आळवावा ||
५) रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ ।
पाहुनि आणिक नाही पै साधन ।
वाहतसे आण विठोबाची ।।
अशा शकडो वचनात ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग त्यांनी दाखविला आहे. त्यातून त्यांचा भक्तिभावही दिसून येतो.
भक्तिभावाबरोबरच संसारात राहूनही वैराग्य अंगी आणता येते असे स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी लोकांना पटवले आहे.
सर्वसामान्यांना ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे संत तुकाराम जीवनाचा आदर्श मार्गही दाखवतात. त्यांचे अभंग जीवनात कसे वागावे, कसे वागू नये याचे
मार्गदर्शन जसे त्याकाळी लोकांना होत असे त्याचप्रमाणे आजच्या या विज्ञान युगातही ते जीवनात मार्गदर्शन करीत आहेत. चारशे वर्षांपासून हे कार्य त्यांचे अभंग करीत आहेत. त्याचे कारण त्यांचे साध्या सोप्या भाषेतील हे अभंग ते सर्वसामान्य माणसाला सहज समजतात. तयातील उदाहरणे ही अगदी व्यावहारिक जीवनातली आहेत.
तसे तुकाराम फारसे शिकलेले नव्हते पण वाचनाच्या छंदाने त्यांना ज्ञानी बनवले होते. वारकरी पंथाचा साध्या सोप्या भाषेत अगदी वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान ही या अभंगातून लिहिले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रसार करण्याचे काम संत तुकारामांच्या अभंगातून झाले आहे.
अगदी साध्या सोप्या भाषेतून उपदेश करणाऱ्या तुकारामांचा जन्म देहू सारख्या लहान गावात झाला. याच गावात ते लहानाचे मोठे झाले. सर्वसामान्यांसारखा संसारही केला. तरी त्यांचे जीवन लोकोत्तर होते. कनक आणि कामिनी यांचा त्यांना कधी मोह पडला नाही. शिवाजी महाराजांनी भक्तीभावाने मोठा नजराणा त्यांना पाठविला होता. त्याला न शिवताच तो नजराणा संत तुकारामांनी परत पाठवला होता व म्हणाले,
मुंगी आणि राव आम्हा सारखाचि जीव,
गेला मोह आणि आशा ।
कळीकाळाचा हा फांसा,
सोने आणि माती
आम्हा समान रे चित्ती ।
तुका म्हणे आले घरी वैकुंठ सगळे ।।
संत नामदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी चिपळ्यांची साथ घेत अभंग विणेच्या झंकाराबरोबर म्हणायला सुरुवात केली होती. ते म्हणतात,
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंग येऊनिया ।
सांगितले काम, करावे कवित्व ।
वाऊगे निमित्य बोलो नये ।।
माप टाकी सवे धरिली विठ्ठले ।
थापटोनी केले सावधान |
प्रमाणांची संख्या सांगे शेतकटी ।
उरले ते शेवटी लावी तुका ।।
तुकाराम असे अभंग गात भजन करीत संसारात राहूनही विरक्त होते. तुकारामाचा आवाजही गोड होता. त्यांची लोकप्रियताही वाढली होती.
तुकोबांची रसाळ वाणी, शास्त्रातली क्लिष्ट तत्त्वे ती सोप्या शब्दात ते उलगडून सांगायचे. सोपे सोपे व्यवहारातले दृष्टान्त द्यायचे. आवाजही मधुर होता. नवनवीन अभंगांतून ते सोपे केलेले तत्त्वज्ञान ते किर्तनातून सांगू लागले. त्यांची लोकप्रियता वाढू लागली. ती मंबाजीबुवांना खटकू लागली. रामेश्वरशास्त्र्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले व तुकारामांना गाढवावर बसवून त्यांची धींड काढली. तुकारामांना गावाबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तर तुकारामांच्या गाथा त्यांनी इंद्रायणीत टाकल्या. तुकारामांना खूप दुःख झाले परंतु संत तुकारामांच्या भक्तिचा महिमा असा की त्यांचे सर्व अभंग परत मिळाले. त्यामुळे रामेश्वर शास्त्रीही चकित झाले व संत तुकारामांचे शिष्य झाले. त्याआधीही त्यांचे आणखी काही शिष्य झाले होते.
संत तुकारामांचे अध्यात्म लिखाण व त्यांचे शुद्ध चारित्र्य लोकोत्तर भागवत भक्ति हे पाहून प्रसिद्ध कवी वामन पंडितांनी तुकारामांबद्दल ते म्हणतात,
'जपावी वद पुर्ण वेदान्तवाणी,
कसे हो म्हणावे तयालागी वाणी ।'
संत तुकारामाचे अभंग दोन प्रकारचे आहेत. काही भावपर व काही विचारपर.
भावपर अभंगात त्यांनी देवाविषयीच्या भावना इतक्या उत्कटपणे गायल्या आहेत की त्यांना तोडच नाही. कधी ते कोपाने, कृतकोपाने तर कधी लोभाने, प्रेमाने तर कधी अगतिकतेने देवाशी बोलतात तर कधी आपली भक्तिभावना आपल्या अभंगातून व्यक्त करतात, कधी म्हणतात,
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।
अभंग जेव्हा इंद्रायणीतून मिळाले तेव्हा लोकांनी त्यांच्या भक्तीची वाखाणणी केली. तेव्हा ते म्हणतात,
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी ।
शिकविता धनी वेगळाची ।
फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
मी तो हमाल भारवाही ।।
तर कधी देवाला म्हणतात,
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
चालविशी हाती धरूनिया ।।
लोभानंतर म्हणतात,
फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर ।
नामाचा गजर सोडू नये ।।
त्यांचे विचारपर अभंग स्तोत्रासारखे आहेत. प्रत्येक अभंगात एखादा प्रमुख विचार ते मांडतात आणि लौकिकातले, व्यवहारातले दाखले देतात. सामान्य व्यवहारापासून तर अत्युच्च तत्त्वज्ञानापर्यंत त्यात ज्ञान भरलेले आहे. असे अभंग उपदेशपर व सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करणारेही आहेत.
याचे हे उदाहरण पहा,
असाध्य ते साध्य करीता सायास ।
कारण आभ्यास तुका म्हणे ।।
अगदी विद्यार्थ्यांना हा अभंग किती मार्गदर्शक आहे. जिद्द व प्रयत्न चिकाटीने काय साध्य होणार नाही.
तर एका अभंगात ते म्हणतात,
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
चंचल मनावर बंधने हवीतच हे सांगताना ते म्हणतात,
तका म्हणे मना पाहिजे अंकुश ।
नित्य नवा दिस जागृतीचा ।।
यात उपदेश आहेच. त्यांचे विचारपर स्तोत्रासारखे असतात, त्याचेही उदाहरण पाहू या!
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ।।
अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ ।
त्याचे गळा माळ, असो नसो ।।
तसेच
निंबाचिया झाडा साकरेचे आळे ।
आपली ती फळे संडिच ।
तैसे अधमाचे अमंगळ चित्त ।
वमन ते हित करून सांडी ।।
तुकारामांच्या अभंगातून कधीतरी त्यांची
विनोदबुद्धीही दिसून येते. उदाहरणार्थ,
म्हातारपणी थेटे पडसे खोकला ।
जातो वाराणसी निरखी गाई घोडे हौशी ।।
बोलाचिच कढी, बोलाचाच भात ।
कोणी वंदा कोणी निंदा । आमचा स्वहिताचा धंदा।।
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।
अशा काही अभंगांतून उपरोधही झळकतो.
आजच्या काळात हा उपयुक्त अभंग तर लोकप्रिय आहेच,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ।
पक्षीही सुस्वरे गान गाती ।।
येणे सुखे रूचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ।।
शब्दांवरील कवित्वावरील प्रेमाला व्यक्त करताना ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
शब्दांचीच वस्त्रे यात्न करू ।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्दचि गौरव पुजा करू ।।
शब्दांवर त्यांचे प्रेम होते. शब्दांचे सामर्थ्य त्यांना माहित होते म्हणून त्यांनी किर्तन प्रवचनद्वारा भगवतभक्तीचा प्रसार केला. शेवटी वैकुंठात जाण्याची तळमळ लागलेल्या तुकोबांना सगळीकडे परमेश्वरीवास जाणवू लागला. आनंदी आनंद जाणवू लागला आणि
ते म्हणू लागले,
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ।।
शेवटी तर या आनंदनंदातच ते दिसेनासे झाले
तेही सदेह वैकुंठात गेले असे म्हटले जाते.
तुकोबांनी आमच्या महाराष्ट्रासाठी फार मोठे कार्य केले आहे. वारकरी पंथाचा प्रसार करताना लक्षावधी लोकांना एकत्र करून त्यांना हा भक्तीचा मार्ग दाखवला. वारकऱ्यांनी तो महाराष्ट्रभर पसरवला आहे. आजही तुकोबांचे अभंग हे काम करीत आहेत. संसाराचा त्याग न करता परहित साधून परमेश्वरप्राप्तीचा त्यांनी सांगितलेला मार्ग सर्वसामान्य लोकांना भावला म्हणूनच तुकोबांचे अभंग लोकप्रिय आहेत.
संत तुकारामांच्या जन्माआधी त्यांच्या आईला, कनकाईला विठ्ठलाचे भजन, कीर्तन करण्याचे डोहाळे लागले होते. त्यांना सारखे साधू-संतांचे दर्शन घ्यावेसे वाटत असे. त्या भक्तीचे तिला फळही तसेच मिळाले. एका निरभ्र दिवशी संत तुकारामांचा तिच्या पोटी जन्म झाला.
नवविधा भक्ती केली सायास ।
तेंचि पूर्ण झाले नव मास ।।
कनकाईचे भाग्य विशेष ।
विष्णु भक्त उदरासी आला कीं ।।
प्रपंचाची कथा तुकाराम महाराजांच्या शब्दात
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।
उदास विचारें वेच करीं ।।
उत्तमचि गति तो एक पावेला ।
उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणें परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माता ।।
भूतदया गायी पशूंचे पालन ।
तान्हेल्या जीवन वनामाजी ।।
तुकारामांनी परमेश्वराचे भामनाथ डोंगरावर चिंतन केले. त्याचे वर्णन त्यांच्या शब्दांत-
वृक्षवल्ली आम्हां सोयरें वनचरें ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
येणे सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथिवी आसन ।
रमे तेथे मन क्रीडा करी ।।३।।
कथा कमंडलु देह उपचारा ।
जाणवितो वारा अवसरू ।।४।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रूची ।।५।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुलाचि वारू आपणांसी ।।६।।
तुकाराम महाराज समाजात साधू संतांचे भरपूर
पीक आलेले पाहून त्याविषयी ते म्हणतात,
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू।।
दया धर्म नाही चित्ती । ते जाणावे भोंदू ।।
कलियुगी घरोघरी । संत झाले फार ।।
वीतिभरी पोटासाठी । हिंडती दारोदार ।।
तुकाराम महाराजांना समाधीत असताना परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना सर्वत्र विठ्ठलाचे अस्तित्व जाणवू लागले. गायी, म्हशी, म्हाताऱ्या-कोताऱ्यांत तसेच रंजल्या-गांजलेल्यात त्यांना देव दिसू लागला. त्यांची तुकाराम महाराज सेवा करू लागले. सगळ्यांना समान वागणूक द्या, असे ते लोकांना उपदेश करू लागले. कारण विठ्ठल सगळ्यात आहे.
जे का रंजले गांजले ।
त्यांसि म्हणें जो आपुले ।।
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ।
ज्याची अपंगिता नाही ।।
त्यासी धरी जो हृदयी।
दया करणें जे पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ।।
तुका म्हणे सांगू किती ।
तोचि भगवंताची मूर्ती ।।
-– सौ. पद्मावती जावळे,
डोंबिवली (प.)
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
October 9, 2022
शेंगभाज्या
आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.
शेवग्याची शेंग
तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.
ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.
जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:
१)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.
२)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.
३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.
४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 26, 2016
भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले.
August 2, 2013
आई जगदंबेचे स्वरूप अत्यंत शांत आहे. अशांती, हलचाल काही मिळवण्यासाठी असते. ती पूर्णतृप्त असल्याने शांत आहे.
February 1, 2020
आंतरराष्ट्रीय असो देशांतर्गत असो तुम्हाला अटकळ अंदाज निर्णय घेण्यापूर्वी बांधावेच लागतात .अर्थात ह्यासाठी सल्लागारांचे ताफे मदतीला असतात. पण एखाद्याचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर अंदाज चुकू शकतात व ते उलटूही शकतात. युद्धावेळी तर रशियेला युक्रेन अशी कडवी झुंज देईल असे वाटले नव्हते. ह्याचाच अर्थ इथे अंदाज पार चुकला होता. असो .
April 28, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti